LAXMIKANT DESHMUKH

About Author

Birth Date : 05/09/1955


EDUCATION : MSC, MA (MARATHI LITERATURE), MBA, IIM, BANGALORE ADMINISTRATIVE CAREER : 1983 DEPUTY COLLECTOR, 2002 PROMOTION TO INDIAN ADMINISTRATIVE SERVICE, 2009 TO 2012 COLLECTOR KOLHAPUR, MANAGING DIRECTOR, MAHARASHTRA FILM, THEATER AND CULTURAL DEVELOPMENT CORPORATION SINCE JUNE, 2012 AWARDS: MAHARASHTRA SAHITYA PARISHAD, PUNE, AMTE VACHAN MANDIR, ICHALKARANJI, ACHYUT BAN AWARD, NANDED, WANGMAY CHARCHA, BELGAON, NAGAR VACHANALAYA KADAMBARI AWARD, AHMEDNAGAR, STATE GOVT. AWARD FOR BEST NOVEL.

शिक्षण : एमएस्सी, एमए (मराठी साहित्य), एमबीए, आयआयएम, बेंगलोर प्रशासकीय कारकिर्द : १९८३ उपजिल्हाधिकारी, २००२मध्ये भारतीय प्रशासन सेवेमध्ये पदोन्नती, २००९ ते २०१२ जिल्हाधिकारी कोल्हापूर, जून, २०१२पासून व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ पुरस्कार : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, आमटे वाचन मंदिर, इचलकरंजी, अच्युत बन पुरस्कार, नांदेड, वाङ्मय चर्चा, बेळगांव, नगर वाचनालय कादंबरी पुरस्कार, अहमदनगर, राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार महत्त्वाचे पुरस्कार : नासकॉम सोशल ऑनर पुरस्कार (२०१०), मंथन २०११ दक्षिण आशियायी पुरस्कार प्रकाशित पुस्तके : कादंबरी : सलोमी, अंधेरनगरी, ऑक्टोपस, होते कुरूप वेडे, इन्किलाब विरुद्ध जिहाद कथासंग्रह : कथांजली, अंतरीच्या गूढगर्भी, पाणी! पाणी!!, नंबर वन, अग्निपथ, सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी (राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट कथा संग्रहाचा पुरस्कार) संकीर्ण : दूरदर्शन हाजिर हो! (बालनाट्य), मराठवाडा मुक्तिसंग्राम (संपादित), बखर भारतीय प्रशासनाची प्रशासन नामा (वैचारिक) इंग्रजी साहित्य : THE REAL HERO & OTHER STORIES (२००८), सामाजिक कार्य : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष (१९९५), अक्षर प्रतिष्ठा परभणी या साहित्य विचार व्यासपीठाची स्थापना, कोल्हापूर येथे शाहू स्मारकाचे पुर्नज्जीवन व विस्तार, व्याख्यानमाला, साहित्यिक गोष्टी व जिल्हा संमेलनाचे आयोजन, अक्षर अयान या नावाचा दिवाळी अंकाचे संपादन (२०१३) मराठवाडा साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून निवड
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
FREEDOM ON FIRE Rating Star
Add To Cart INR 300

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more