AAKASH SINGH RATHORE

About Author


AAKASH SINGH RATHORE IS A PHILOSOPHER OF INTERNATIONAL REPUTE AND THE AUTHOR OF NINE BOOKS, INCLUDING THE BESTSELLING AMBEDKARS PREAMBLE: A SECRET HISTORY OF THE CONSTITUTION OF INDIA (2020). HE HAS ALSO EDITED OVER A DOZEN BOOKS RANGING FROM POLITICAL PHILOSOPHY AND LAW TO LITERATURE AND RELIGION, INCLUDING B.R. AMBEDKARS THE BUDDHA AND HIS DHAMMA: A CRITICAL EDITION (2011) AND, MORE RECENTLY, B.R. AMBEDKAR: THE QUEST FOR JUSTICE (A BOX SET OF FIVE VOLUMES, 2021). HIS HEGELS INDIA WAS SHORTLISTED FOR THE NON-FICTION BOOK OF THE YEAR AT THE TATA LITERATURE LIVE! BOOK AWARDS 2017. PROFESSOR RATHORE HAS TAUGHT POLITICS, PHILOSOPHY AND LAW AT PREMIER INSTITUTIONS SUCH AS JAWAHARLAL NEHRU UNIVERSITY AND THE UNIVERSITY OF DELHI (IN INDIA), UPENN AND RUTGERS UNIVERSITY (IN THE US), THE UNIVERSITY OF TORONTO (CANADA), HUMBOLDT UNIVERSITY, BERLIN (GERMANY) AND LUISS UNIVERSITY, ROME (ITALY). HE IS INTERNATIONAL FELLOW AT ETHOS, ROME, AND WAS PREVIOUSLY FELLOW AT THE INDIAN INSTITUTE OF ADVANCED STUDY, SHIMLA. RATHORE SERVES AS THE SERIES EDITOR FOR THE FIFTEEN-VOLUME RETHINKING INDIA BOOK SERIES (2020–23) AND WAS THE CO-EDITOR (WITH ASHIS NANDY) OF ITS FIRST VOLUME, VISION FOR A NATION. HE IS ALSO THE SERIES EDITOR FOR RELIGION AND DEMOCRACY: RECONCEPTUALIZING RELIGION, CULTURE, AND POLITICS IN GLOBAL CONTEXT (PUBLISHED SINCE 2015) AS WELL AS THE LONG-RUNNING INTERNATIONAL BOOK SERIES, ETHICS, HUMAN RIGHTS AND GLOBAL POLITICAL THOUGHT (PUBLISHED SINCE 2011).

आकाश सिंग राठौर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तत्वज्ञानी आहेत. आंबेडकर्स प्रिअँबल : अ सीक्रेट हिस्टरी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया (२०२०) या पुस्तकासह त्यांची नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी डझनभर पुस्तकांचे संपादनही केले आहे. बी.आर. आंबेडकर : द बुद्ध अँड हिज धम्म : अ क्रिटिकल एडिशन (२०११) हे त्यातील एक. अलीकडे त्यांनी बी. आर. आंबेडकर : द क्वेस्ट फॉर जस्टीस (पाच खंड, २०२१) या ग्रंथाचेही संपादन केले आहे. टाटा लिटरेचर लाइव्ह पुस्तक पारितोषिके, २०१७ मध्ये त्यांच्या हेगेल्स इंडिया या पुस्तकाची नॉन-फिक्शन बुक ऑफ द इयर या यादीत निवड झाली होती. प्राध्यापक राठौर यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ आणि रूटगर्स विद्यापीठ.येथे राजकारण, तत्त्वज्ञान आणि कायदा हे विषय शिकवले आहेत. रोम येथील इथॉसमध्ये ते आंतरराष्ट्रीय फेलो माहीत आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज, शिमला येथे पूर्वी ते फेलो होते. प्राध्यापक राठौर पंधरा खंडांच्या रीथिंकिंग इंडिया या पुस्तक मालिकेसाठी मालिका संपादक म्हणून काम करतात. या मालिकेतील पहिल्या खंडासाठी (व्हिजन फॉर अ नेशन) त्यांनी आशिष नंदी यांच्यासह सहसंपादक म्हणून काम केले होते. लेखनाव्यतिरिक्त, प्राध्यापक राठौर अव्वल ट्रायथलीट आहेत आणि त्यांनी पाच जगातील खंडांवर सहा आयर्न मॅन शर्यती पूर्ण केल्या आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
BABASAHEB GHADTANA Rating Star
Add To Cart INR 450

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more