- Shashi sanap
अश्रू ही कादंबरी वाचून पूर्ण झाली..
अतिशय सुंदर व मार्मिक वि. स. खांडेकरांच साहित्य लेखन
टिळक,मा.गांधी,नेहरू,आगरकर यांचा विचाराचा प्रचंड प्रभाव असलेलं टिळकांच्या आग्रह खातर शिक्षक झालेला शंकर मुख्य पात्र,प्रेमळ निस्वार्थी पत्नी उमा,सावत्र असून भावाच्या पत्नीवर जीव देणारी सुमित्रा , केवळ अहिंसा ने स्वतंत्र मिळणार नाही असा मानणारा ,क्रांती विचारक भाऊ अरविंद आणि लक्षवेधक शंकर चा मित्र दिगंबर ..
अश्रू कादंबरी ही मुळात प्रत्येकांच्या घरात घडणारी गोष्ट आहे,किती ही अडचणी आल्या तरी देखील घरातला कर्ता मात्र कधीही विचलित होत नाही तो त्यांच्या विचारांवर ठाम राहतो, अश्या वेळी त्याला घरातील मंडळींची साथ देखील तशीच मिळते..शंकर हा खूप प्रामाणिक पात्र आहे,बहिणीचे लग्न,मुलाची सायकल,पत्नी साठी एक पातळ ,शाळेतील स्वखर्चाने फी भरणारा विद्यार्थी प्रिय शिक्षक... समाजातील काही लोकांनी पैसेच्या मोहात ओढण्याचा देखील प्रयत्न यामध्ये केलेला आहे।।
शेवट मात्र अश्रू ठिपकन येणारा आहे..
अश्रू आहेत म्हणून तर या जगात प्रीती,भक्ती,सेवा,त्याग व्यतीचे स्वभाव गुण आहेत...
- Milind Pawar
*अश्रू*
लेखक- वि.स.खांडेकर
अश्रु ही जणु आपलीच कहाणी आहे असं भासणारी एक अप्रतिम कांदबरी. पुस्तक हातात घेतलं अन् सुरवातीला उमा, शकंर या पात्रांची स्थिती जाणवली मग असं झालं की केव्हा एकदाचं पुस्तक संपवतो. कहाणी जरी स्वातंत्र्योत्तर सुरवातीच्या काळातील असली तरी आजही एकविसाव्या शतकातील मध्यमवर्गीय कुटुंबात घरोघरी घडणारी घटनेसारखी वाटते. प्रत्येक पात्र हे आपला ठसा उमटवणारी आहे. उमा व शकंर सारखी पात्र आजही आपल्या अवतीभवती महागाईच्या विळख्यातुन प्रामाणिकपणे संसाराचा गाडा ओढतांना आपल्या स्वप्नांचा चक्काचुर करत पुढे चालतांना दिसतात. राजकारण व व्यवस्थेचा बळी ठरणारे दिंगबर व अरविंद सारखी तरुण आपल्या कुटुंबातसुद्धा दिसतात.अरविंदच्या माध्यमातुन आजही राजकारणात प्रवेश करु ईच्छिणा-या सतरंजी व झेंडा उचलणा-या तरुणासाठी सणसणित चपराक आहे. सुमित्रा सारख्या काॕलेजला जाणाऱ्या मुलींना प्रेम म्हणजे सर्वस्व वाटणाऱ्यांना सुद्धा शेवटी प्रेम जरी आंधळ असलं तरी आशा ही वेडी ठरते हे कळतं. सर्वच प्रेमकहाण्या रोमियो-ज्युलीयट सारख्या नसतात याची जाणिव करुन देतात. दिंगबर व शकंरची मैत्री ही रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नातं श्रेष्ठ ठरवणारी ठरते.
पण उमा व शकंरचे प्रामाणिकपणे संसार करत असतांना एकमेकांवरचे निस्वार्थी प्रेम ,संसारातील सुखदुःखाची समान वाटणी , कुटुंबाप्रती आपुलकी , जिव्हाळा, प्रेम व त्याग खुपच आदर्श ठरतात.
- UMA NIJSURE
पुस्तकाचे नाव - अश्रू
लेखक - वि.स. खांडेकर
ही कहाणी आहे एका सामान्य , नाकासमोर चालणार्या अर्थातच गरीब असलेल्या ध्येयवेड्या शिक्षकाची. प्रेमळ बायको , खाष्ट सावत्र आई , उडाणट्प्पू भाउ, प्रेमात पडलेली बहिण, आठ वर्षाचा मुलगा , जुगारी मित्र दिगंबर , लबाड ढोंगी पापासाहेब, अपर्णा, गायकवाड हे विद्यार्थी अशी भरपूर पात्र कादंबरीत आहेत .जणू काही एखाद्या मराठी सिरियल चा मसाला. मुलाला साधी सायकल ही घेऊन देता येत नाही म्हणून अश्रू ढाळणारा हा नायक. ध्येयवादाचे चटके त्याला बसतात. त्याच्या डोळ्यतून अश्रू येतात. पण ते अश्रू हेच तो आपले वैभव मानतो.
अकरावी बारावीत असताना ही कादंबरी पहिल्यांदा वाचली . आणि खांडेकरांची मिळतील तेवढी सगळी पुस्तके वाचून काढली. अश्रू तला नायक आज़च्या दुनियेत दुर्मिळ झालाय म्हणजे इतकं आदर्श कोणी आज दिसतही नाही. तरीही ही कादंबरी परत परत का वाचावीशी वाटते कळत नाही. कदाचित खांडेकरांच्या लेखणी ची किमया असेल.
मुखपृष्ठ अर्थातच चंद्रमोहन कुलकर्णी यांचे आहे . त्यांचे मुखपृष्ठ असले की पुस्तक घ्यावेसे वाटतेच .
असो . आपल्या पैकी बऱ्याच जणांनी हे पुस्तक वाचलं असेलच पण ज्यांनी अज़ून वाचलेलं नाहीये त्यांनी नक्की वाचावे.- उमा निजसुरे
- Vikas Dokhe
आजच्या सामान्य माणसाची वेदना बोलकी करणारी कादंबरी
या विसाव्या शतकानं जगाला बऱ्या वाईट अनेक गोष्टी दिल्या असतील; पण त्याची सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे त्याने सामान्य मनुष्याला दिलेलं महत्त्व, जे कोणत्या ना कोणत्या दृष्टीने असामान्य आहे. ज्याला आपण जीवन म्हणतो, त्यात अधिक भाग कुणाचा असतो? मूठभर असामान्यांचा की शेकडो नव्वद किंबहुना शेकडो नव्व्याण्णव असलेल्या सामान्यांचा? आजपर्यंत राजांनी, वीरांनी, संतांनी, तत्त्वज्ञानींनी, कवींनी आणि शास्त्रज्ञांनी या सामान्य मनुष्याला गोड गोड अशी वचने देऊन त्याची प्रत्येक क्षेत्रात कत्तल केली. पण तरीही माणुसकीचा आधार एकच होता; तो म्हणजे संस्कृतीची सारी मूल्ये सांभाळण्याकरिता धडपडणारा, तडफडणारा सामान्य माणूस. ज्याला विशेष चांगले असे काही करता येत नाही; पण वाईट करताना ज्याचा हात कचरल्याशिवाय राहत नाही. हाच सामान्य माणूस या कादंबरीचा नायक आहे. वि. स. खांडेकर यांच्या असामान्य लेखणीतून उतरलेली ही कादंबरी आजच्या सामान्य माणसाची वेदना बोलकी करणारी आहे.
- Ajinkya Rokade
वि. स. खांडेकर यांच्या असामान्य लेखणीतून उतरलेली "अश्रू" कादंबरी आजच्या सामान्य माणसाची वेदना बोलकी करणारी आहे. मूल्ये जपणारा सामान्य माणूस , ज्याने आयुष्यात विशेष काही केले नाही आहे पण वाईट करताना आपल्याला झालेला अन्याय लक्षात घेऊन वाईट करण्यास न कतरणारा सामान्य माणूस ह्या कादंबरीचा मूळ नायक आहे म्हणावं लागेल ...
मला आवडलेल्या प्रमुख ५ पुस्तकांत हे फार आवडते पुस्तक आहे
- Indrajeet Lokmate
खूप छान कादंबरी आहे मानवी जीवनाचा लेखाजोखा उत्तम पध्दतीने मांडला आहे
- Ashutosh Digambar Kulkarni
विसाव्या शतकानं जगाला बर्यावाईट अनेक गोष्टी दिल्या असतील; पण त्याची सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे त्याने सामान्य मनुष्याला दिलेलं महत्त्व, जे कोणत्या ना कोणत्या दृष्टीने असामान्य आहे.
ज्याला आपण जीवन म्हणतो, त्यात अधिक भाग कुणाचा असतो ? मूठभर असामान्यांचा की शेकडो नव्वद किंबहुना शेकडो नव्व्याण्णव असलेल्या सामान्यांचा ?
आजपर्यंत राजांनी, वीरांनी, संतांनी, तत्त्वज्ञानींनी, कवींनी आणि शास्त्रज्ञांनी या सामान्य मनुष्याला गोड गोड अशी वचने देऊन त्याची प्रत्येक क्षेत्रात कत्तल केली.
पण तरीही माणुसकीचा आधार एकच होता; तो म्हणजे संस्कृतीची सारी मूल्ये सांभाळण्याकरिता धडपडणारा, तडफडणारा सामान्य माणूस. ज्याला विशेष चांगले असे काही करता येत नाही; पण वाईट करताना ज्याचा हात कचरल्याशिवाय राहत नाही.
हाच सामान्य माणूस या कादंबरीचा नायक आहे.
- Sneha Puranik
Chan ahe hi kandbari
- Sagar Malwe Sgr
प्रेक्षकांच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करता येतील कि नाही याच दडपण लेखक प्रस्तावनेतच व्यक्त करतात . पण खांडेकर निराश करत नाहीत . विसाव्या शतकातल्या पूर्वार्धातली हि कथा . कथा तशी एका मध्यमवर्गी कुटुंबाची आणि त्यांच्या संघर्षाची . संघर्ष एका मुलाचा , एका बापाचा , एका आईचा , एका सुनेचा , एका बहिणीचा आणि संपूर्ण समाजाचा . शंकर , उमा ,रुक्मिणी , दिगंबर ही पात्र आपल्या सर्वांच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या , बारीक सारीक किंवा मोठ्या घटनांचे प्रतिनिधित्व करतात . आपल्या मुलाचे छोटे छोटे हट्ट पुरवू न शकण्याची खंत असणारा बाप , संसार चालवताना आपल्या नवर्याची होणारी परवड पाहणारी बायको , प्रेमात पडून आपल्या सुंदर आयुष्याची स्वप्न पाहणारी बहिण आणि आपल्या मित्राचा संघर्ष दुरून पाहणारा त्याचा जुगारी मित्र हि सगळी पात्र आपल्याला कथेशी जोडून ठेवतात . घडणाऱ्या घटना आणि त्याचा पात्रांच्या आयुष्यावर होणारा परिणाम लेखकाने उत्तम मांडला आहे . ही संघर्षाची कहाणी नक्की वाचा " अश्रू "
- Yogesh Kadam
He Pustak...! Yatil pratyek patra hrudyasparshi aahe..! Mulala vadhdivasala cycle na gheu shakanare vadil te jugarat hajaro paise udavanara nayakacha mitra sagalech Hrudysparshi...
- Preeti Apte 13.12.16
ही कहाणी आहे एका सामान्य , नाकासमोर चालणार्या अर्थातच गरीब असलेल्या ध्येयवेड्या शिक्षकाची. प्रेमळ बायको , खाष्ट सावत्र आई , उडाणट्प्पू भाउ, प्रेमात पडलेली बहिण, आठ वर्षाचा मुलगा , जुगारी मित्र दिगंबर , लबाड ढोंगी पापासाहेब, अपर्णा, गायकवाड हे विद्यार्थी अशी भरपूर पात्र कादंबरीत आहेत .जणू काही एखाद्या मराठी सिरियल चा मसाला. मुलाला साधी सायकल ही घेऊन देता येत नाही म्हणून अश्रू ढाळणारा हा नायक. ध्येयवादाचे चटके त्याला बसतात. त्याच्या डोळ्यतून अश्रू येतात. पण ते अश्रू हेच तो आपले वैभव मानतो.
अकरावी बारावीत असताना ही कादंबरी पहिल्यांदा वाचली . आणि खांडेकरांची मिळतील तेवढी सगळी पुस्तके वाचून काढली. अश्रू तला नायक आज़च्या दुनियेत दुर्मिळ झालाय म्हणजे इतकं आदर्श कोणी आज दिसतही नाही. तरीही ही कादंबरी परत परत का वाचावीशी वाटते कळत नाही. कदाचित खांडेकरांच्या लेखणी ची किमया असेल.
मुखपृष्ठ अर्थातच चंद्रमोहन कुलकर्णी यांचे आहे . त्यांचे मुखपृष्ठ असले की पुस्तक घ्यावेसे वाटतेच .