- Ishant Sarphare
पावनखिंड
महाराज आणि त्यांच्या मावळ्यांविषयी वाचाव तेवढ कमीच आहे. महाराजांचा प्रत्येक मावळा हा हिरे, रत्न मणिकांहूनही अनमोल आहे. महाराज आणि त्यांच्या मावळ्यांविषयी वाचताना अभिमान वाटतो, अनेकदा ऊर भरून येतो, अनेकदा डोळेही पाणवतात, अशी स्वामीनिष्ठा बघुन तर प्रश्न पडतो की कुठून येते एवढी स्वामिनिष्ठा, आता त्या साठी स्वामीही तसाच असावा लागतो म्हणा. पण हल्ली आपल्या सभोवताली काम करणाऱ्या लोकांकडे बघीतल इतकच काय तर स्वत:कडे जरी पाहील तरी अस वाटतं की महाराजांच्या मावळ्यांमधील 10% गुण जरी आपल्यात आले तरी जिवनाच सार्थक होईल.
पावनखिंड पुस्तक फारच छान आहे. अशी पुस्तके शालेय जिवनातच मुलांना वाचायला दिली पाहिजेत.
नक्की वाचा.
- Gitanjali Abhang
प्रचार सभेत बोलण्याऱ्या आणि मनानेच इतिहासातील प्रसंग रंगवाणाऱ्या राजकीय नेत्यांच्या वक्तव्यावर विचार करायला लावणारे हे पुस्तकं आहे.लॉकडाऊनच्या संधीचा फायदा घेत मी या पुस्तकाचे वाचन केले. खरंच हिरकणी चित्रपटासारखं हे पुस्तकं ही काहीशा छोट्या प्रसंगा वरून लिहिले आहे असं वाटते पण असे नाही कितीतरी गोष्टी पडद्या मागच्या कलाकारांसारख्या असतात. त्या कधीच दिसत नसल्या तरी खूप ग्रेट असतात.मग पुढे येणारेच लक्षात राहतात, त्यांच्याच जयंत्या होतात पण असेही अजून खूप लोक आहेत ज्यांनी कधी प्रसिद्धीच्या झोत्यासाठी इतिहास गाजवला नाही. ह्या पुस्तकात अगदी तसच बाजी सोबत त्यांचे सख्खे बंधू फुलाजी ही प्राणाची बाजी लावतात. खूप साऱ्या शिवाजी महाराजांच्या सवई आहेत. तसेच त्याचे किल्ल्याविषयी असलेल प्रेम,काही विशिष्ट आदर ह्या पुस्तकात उत्कृष्टरित्या मांडलेले आहे. तुम्ही सर्वांनी हे पुस्तकं जरूर वाचा.
- Gitanjali Abhang
- Ramesh Patil
"पावनखिंड" रणजित देसाई यांच १४४ पानांचा पुस्तक सुरवात केली ते ३ तासात शेवट करुनच थांबलो तुमच्यासारखा माणसांमुळे आम्ही इतिहास अनुभवतो खरंच तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत..
१३ जुलै १६६०.. इतिहासातील एक भयानक रात्र ३०० मावळा विरूद्ध ५००० गनिम रात्रभर ३०० मावळे चालुन थकलेले जवळपास ३ तास खिंड लढवायची होती..महाराजांनी ३०० मावळे घेऊन विशाळगडाकडे कूच केली होती पण विशाळगडाला वेढा असल्यामुळे अंदाजे ३तास होणारी लढाई ७-८ तास चालली.. जोपर्यंत तोफांचे आवाज ऐकु येणार नाहीत तोपर्यंत खिंड गनिम पुढं जावुन देणार नाही..काय ती स्वामिनिष्ठा २१ तास..पोटात अन्नाचा कण नाही..शरीर थकलय..अशा स्थितीत मावळ्यांनी खिंड लढवली ... कुणासाठी?आपल्या राजासाठी.. तोफांचे आवाज ऐकले अन् बाजी धारातीर्थी पडले पण उडत्या मातिला सांगते झाले लढण्याचा ईतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही..जोवर मैदानात उभा मी..जिंकण नियतीला ही शक्य नाही
बाजीप्रभू.. फुलाजी प्रभु..अन बांदलसेना यांच्या असिम त्यागाला..पराक्रमाला..
पराक्रमाच्या जाज्वल्य अखंड परंपरेला मानाचा मुजरा🚩🚩
#ज्वलज्वलनतेजस
- Sandip Kalyani K K
कोरोना झाले मुळे न काढता वेळ मिळाला पावनखिंड लहानपणी शाळेत बाजी प्रभू देशपांडे यांचा धडा होता तो कायम आठवायचा म्हणून हे पुस्तकच घेतले पुस्तकाचे पण रणजित देसाई यांच्या मुळे खूप चर्चा ऐकली होती 2 दिवसात काय 5 तासात वाचून काढले एक तर जुनी आठवण अन देसाई सरंच वेगवान लेखन अक्षरशः खिळवून ठेवलं या पुस्तकानं ते पण करोना असताना बाजी,फुलाजी कायअन बांदल मावळे काय काय पराक्रम केला या लोकांनी सहज जीव ओवाळून टाकला राज्या साठी थक्क करणारा अनुभव
- Akshay Shinde
मान,अपमान,गैरसमज,फितुरी, नैराश्य अशी घोडखिंडी सारखी संकटे आयुष्यात नेहमीच येतील...
पण तेव्हा आपण त्यातून
खचून न जाता संस्काराचा
"बाजीप्रभू"
उभा राहायला शिकले पाहिजे...
#पावनखिंड
#रणजित देसाई....
- A. M Patil
निष्ठावान,सच्चे स्वराज्य रक्षक, शिवरायांसाठी जीवाची बाजी लावणार्या वीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या पराक्रमाचे वर्णन अंगावर रोमांच उभे करते.रणजित देसाई यांच्या लेखणीतुन साकार झालेली,छत्रपती शिवाजी महाराज,वीर बाजी प्रभु देशपांडे, फुलाजी प्रभु देशपांडे,शिवा काशिद,यशवंत यांच्या सामर्थ्याचे आणि शौर्याचे दर्शन घडवणारी ही अप्रतिम कादंबरी सर्वांनी नक्कीच वाचली पाहिजे.
- Sandeep Gaikwad
छत्रपती शिवाजी महाराज, भारतमातेच्या पोटी जन्म घेतलेला महान योध्दा,पराक्रमी तितकाच कनवाळू राजा. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि मुघलांच्या अन्यायी तावडीत सापडलेल्या अखंड महाराष्ट्राला स्वातंत्र्याच सोनेरी स्वप्न दाखविणारा हा महापराक्रमी महापुरुष.
गुलामगिरीची सवय झालेल्या किवा स्वत:च स्वत्व विसरलेल्या लढाऊ, जिगरबाज अशा मावळ्यांची मोट बांधून महाराजांनी त्यांना स्वत्वाची ओळख करून दिली, मातीचं ईमान शिकवलं, त्यांंच्या लढाऊ वृत्तीला स्वातंत्र्याचं कोंदण दिलं, अशा परीचीत- अपरीचीरी
मावळ्यांना संगतीने घेऊन महाराजांनी स्वराज्य तोरण उभं केलं. खरतर हा स्वराज्याचा महायज्ञ धगधगता ठेवताना महाराजांना अनेक कठीण प्रसंगाना तोंड द्यावे लागले त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग म्हणजेच "पन्हाळ्याला वेढा"
पावनखिंडीतील संग्रामाचे मूळ कारण पन्हाळगड ! सिद्दी जौहरने पन्हाळयाला करकचून वेढा घातलेला. महाराज किल्ल्यावर अडकलेले. अखेर एक योजना आखून राजे शरण येत असल्याचे सांगण्यात आले. सिद्दीची छावणी आनंदात मशगूल झाली आणि वेढा ढिला पडला आणि महाराजांनी आखलेल्या रणनीतीनुसार महाराज खेळणा किल्यावर जाण्यासाठी पलायन करतात, महाराजांच्या पलायनाची वार्ता कळताच सिद्धी महाराजांच्या मागावर लागतो, त्याला थोपवण्याची जबाबदारी बाजीप्रभू स्वत:च्या अवघ्या तीनशे मावळ्यांनीशी खांद्यावर घेतात आणि महाराज गडावर सुखरुप पोहचले अशी तोफेची खुण जोपर्यंत ऐकु येत नाही तोपर्यंत प्राणपणाने घोडखिंड लढवण्याची शिकस्त करतात आणि आपला प्राण स्वराज्यासाठी अर्पण करतात.
त्या प्रसंगाच वर्णन करणारी ही रणजित देसाई यांची शेवटची ऐतिहासिक कादंबरी.
खरंतर ही कादंबरी निव्वळ त्या प्रसंगाच वर्णन करणारी नाही, ती आहे वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची महती सांगणारी, त्यांचा पुर्व इतिहास सांगणारी कादंबरी.
बाजी प्रभू हे मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते. वतनदारी संपवुन एकसंघ स्वराज्याची स्थापना करण्याच्या दृष्टीने वतनदारी नष्ट करणे गरजेचे होते. अशातच महाराजांनी मावळवर चढाई करुन मावळ स्वराज्याला तर जोडलाच परंतु बाजींचे शौर्य, पराक्रम पाहून त्यांना स्वराज्यात आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पिली.
श्रीमान योगी सारखी अजरामर कलाकृती रेखाटणाऱ्या रणजित देसाई यांनी आपलं सगळं कसब वापरून पावनखिंडीतील थरारचं रेखाटन केलं आहे. आणि इथेही त्यांच्या शब्दांची जादू आपल्या मनावर गारूड कायम राखते.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची गुणग्राहकता, जिज्ञासू वृत्ती, मधाळ वाणी, कार्यतत्परता इ.गुणांची ओळख जागोजागी आपल्याला करुन होतं राहतेच परंतु महाराजांच्या सहकाऱ्यांच, बहीर्जी नाईक,नेताजी पालकर, शिवा काशिद, इ व्यक्तिरेखांनाही योग्य न्याय देण्यात आला खहे.
घोडखिंडीतील थराराचं वर्णन अंगावर काटा उभा करणारा आहे. खरतर रणजित देसाई यांचा हा हातखंडा आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या भीमपराक्रमाच वर्णन करणारी कादंबरी संग्रही असावीच.
- Ram prasad Solanke
श्री रणजित देसाई सर यांचं मी पहिलं पुस्तक वाचलं ते म्हणजे स्वामी... त्यांचं लेखन मनाला भावलं त्यानंतर आज पावनखिंड हे पुस्तक वाचून झालं.... खूपच सुंदर पुस्तक आहे प्रसंग अगदी आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत असं वाटतं... पावनखिंडीच्या तोंडावर रक्ताच्या थारोळ्यात जिवाचा आकांत करून लढताना बाजीप्रभू व फुलाजी आणि सर्व मावळे आपल्या डोळ्यासमोर दिसतात... तिकडे विशाळ गडाच्या खाली छत्रपती शिवाजी महाराज, यशवंत आणि इतर मावळे लढत आहेत... यशवंताच्या पायाखालचा दगड सरकतो आणि यशवंत जमिनीवर कोसळतो... हे पाहून शत्रुतला एक जण यशवंतावर तलवारीने वार करणार एवढ्यात शिवाजी महाराज चपळाईने त्या शत्रूचा हात कलम करतात आणि यशवंताला हात देऊन उठवतात.... गडावर सुखरूप पोहोचल्यावर यशवंत म्हणतो महाराज आज आपल्या मुळे माझा प्राण वाचला... महाराज म्हणतात यशवंत मी तुझा प्राण नाही माझ्या मुलीचं सखुच कुंकू वाचवलय... आणि शेवटी जेव्हा गडावर पालखीमध्ये बाजीप्रभू आणि फुलाजी यांचे पालखीमध्ये देह येतात... तेव्हा माझ्यासारखा भावनिक माणूस आपलं रडणं अआवरूच शकत नाही.... किमान एकदा तरी नक्कीच वाचावं असं पुस्तक आहे...
- श्रीजीवन तोंदले
पावनखिंड या पुस्तकाची कथा फक्त बाजीप्रभु देशपांडे यांच्या शौर्य सांगणारी नाही आहे तर या घटनेच्या आधीची संपुर्ण पार्श्वभुमी सांगणारी आहे. मग त्यामध्ये बाजीप्रभु देशपांडे यांची संपुर्ण कहाणी आहे,बांदल-देशमुख यांच्या सोबत महाराजांनी केलेल युद्ध,अफझलखानचा पराभव तेव्हा बाजीप्रभु देशपांडे यांनी निभावलेली प्रमुख भुमिका, त्यानंतर जराशीही उसंत न घेता राजेंनी जिंकलेले गड-किल्ले, जासलोड गडाचे बांधकाम आणि त्यादरम्यान सापडलेला खजिना,सिद्दी ने पन्हाळ गडाला दिलेला वेढा,शिव काशीद याची महत्वाची भुमिका या आणि अशा कितीतरी गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत. त्यासोबत बाजीप्रभु देशपांडे यांच्या ताकदीचे केलेले वर्णन वाचते वेळी न काळात बाजींचा ढीपाड देह डोळ्यांसमोर उभा राहतो. या सोबतच अजुन खुप अशा गोष्टी यामध्ये आहेत ज्याने छत्रपती शिवरायांची दुरदृष्टी,युद्धनीती,प्रसंगावधान आणि त्यांचे हळवे रूप जे आपल्या प्रत्येक शिलेदारांच्या शौर्यासाठी, त्यांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानासाठी त्याचे हळहळणारे मन यासर्व गोष्टी वाचते वेळी मन भरून येते. यासर्व गोष्टी लेखक रणजित देसाई यांनी अत्यंत उत्तम प्रकारे मांडल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तकं संपुर्ण वाचुन खाली ठेवता येत नाही. आणि मंडळी हे १५८ पानांचे पुस्तक मी कोल्हापुर ते पुणे या पाच तासाच्या प्रवासामध्ये वाचुन पुर्ण केले आहे.
पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिकेशन हाऊस यांनी केले आहे. पुस्तकाचे सुरेख मुखपृष्ठ रवी मिस्त्री यांनी साकारले आहे. अत्यंत वाचनीय आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही हे पुस्तक असलेच पाहिजेल. आई अंबाबाईच्या आशीर्वादाने पवित्र झालेल्या कोल्हापुरच्या भुमी वर घडलेल्या या घटनेचे, बाजीप्रभु देशपांडे यांच्या शौर्याची गाथा सांगणारे पुस्तक स्वामीकर लेखक रणजित देसाई लिखित पावनखिंड.
आता तर टीव्ही मालिकांमधुन, सिनेमांमधुन शिवचरित्र दृश्य स्वरूपामध्ये लोकांसमोर मांडले जात आहे. यागोष्टीचा खुप अभिमान वाटतो. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तळागाळातीलच नव्हे तर संपुर्ण विश्वातील, प्रत्येक स्थरामधील लोकांना तो समजत आहे. माझा राजा हा नुसता राजा नव्हता तर तो जनतेचा राजा होता, म्हणुन लोक त्यांना जाणता राजा म्हणतात. माझी इच्छा फक्त एवढीच आहे. शिवरायांचा इतिहास पद्यावर मांडते वेळी प्रत्येक दिग्दर्शकाने आणि लेखकाने एकदा तरी रणजित देसाई यांनी लिहिलेल्या मी वरती नमुद केलेली सर्व पुस्तके वाचावे. म्हणजे मुळ इतिहासाला धक्का न लावता तो लोकांसमोर कसा मांडावा याचे आकलन होईल.
- Chetan Jivarak
आज ही कादंबरी वाचून झाली खूप छान आहॆ
बाजी प्रभू देशपांडे यांच्या जीवन चरित्र आहॆ
घोडखिंडीत (पावनखिंड)झालेला लढाईचे सविस्तर वर्णन या कादंबरीत आहॆ
- अमेय
खूपच छान आहे पुस्तक वाचताना आपण त्यातच हरवून जातो
- DAINIK SAMANA 06-05-2018
अतुल्य पराक्रमाची कथा...
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताच मान ताठ होते. छाती अभिमानाने फुलते. अंगात वीरश्री संचारते. अशा रयतेच्या राजाच्या जीवनाकार्याचा सखोल अभ्यास करून रणजीत देसार्इंनी ‘पावनखिंड’ ही एका वीर योद्ध्याची शौर्यगाथा लिहिली आहे. ज्याने आपल्या महाराजांसाठी आपले प्राण पणाला लावले. मरतानादेखील महाराजांना मुजरा करूनच श्वास सोडला अशा बाजीप्रभू देशपांडे यांची स्वराज्यनिष्ठा, स्वामिनिष्ठा आणि अतुल्य पराक्रमाची अद्भुत कथा असलेले हे पुस्तक.
एका लढाईसाठी शत्रू म्हणून समोर आलेल्या बाजींना शिवरायांनी वडिलांचा मान देऊन आपलेसे केले. बाजींचे थोरले बंधू फुलाजी हेसुद्धा बांदलांच्या सैन्यसहित शिवरायांकडे आले आणि अखेरच्या श्वासापर्यंत शिवरायांचेच राहिले. हे पुस्तक वाचताना एकनिष्ठ आणि स्वामीभक्त योद्ध्याची जिद्द पाहून खरोखर मन भरून येते.
‘भाऊ जगण्याचं सार्थक केलंस! गेलास! म्हणजे जातोस कुठं! तू मोठा ना? तुझा मान पहिला! मी मागून आलोच! बाजीच्या थोरल्या भावाचा म्हणजे फुलाजींचा खिंड लढवताना मृत्यू झाला, त्यावेळचे बाजींचे हे उद्गार त्यांच्या मनाचा मोठेपणा दर्शवतात.
बाजींच्या वीरमरणाच्या वेळेचा प्रसंग वाचताना अश्रू अनावर होतात. राजा असावा तो शिवरायांसारखा आणि सहकारी असावा तो बाजी, फुलाजीसारखा याची जाणीव हे पुस्तक वाचताना होते.
‘शिवाजी राजा साधं पोर नाही. देवमाणूस आहे. त्याच्या मागं देवीचं बळ आहे. माणसांची पारख आहे. माणसानं एकदा त्याच्याबरोबर बोलावं आणि कायमचा गुलाम व्हावं अशी त्याची करामत आहे.’ हे फुलाजींचे उद्गार शिवरायांविषयीचे प्रेम, कौतुक आणि आदर स्पष्ट करतात. या शिवाजी राजांसाठी बाजी, फुलाजींनी शर्थीने घोडखिंड लढवली. जिला ‘गजाखिंड’ ही म्हटले जात होते. त्या बाजीच्या बलिदानाने पावन झालेल्या खिंडीला शिवरायांनी ‘पावनखिंड’ हे नाव दिले त्याचप्रमाणे सिद्दी जोहरच्या वेढ्यातून सहीसलामत निसटून खेळणा किल्ल्यावर महाराज पोहोचले. त्यावेळी ‘खेळण्या’ला त्यांनी ‘विशाळगड’ हे नाव दिले.
बाजीप्रभूंमुळे महाराजांना अनेक मोठ्या संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळाले होते. अफजलखानाची भेट, सिद्दीच्या वेढ्यातून सुटका या महत्त्वाच्या घटनांमध्ये बाजींनी शिवरायांना कशी मदत केली ते या पुस्तकात सविस्तरपणे कथन केले आहे. राजा असला तरी त्याचे काही निर्णय चुकू शकतात आणि ते सुधरवण्यासाठी त्याला बाजींसारखे सहकारी हवे असतात याचा अनुभव ही शौर्यगाथा वाचताना येतो. हेच सहकारी पुढे संकटातून सुटण्यासाठी राजाला मदत करतात. बाजी, फुलाजींनी स्वराज्यासाठी आपल्या या राजाला मरेपर्यंत सहकार्य केले. म्हणून मरतानासुद्धा राजांना मुजरा करूनच प्राण सोडणाऱ्या या वीर योद्ध्यांना आणि शिवरायांना माझा मानाचा मुजरा!
-ऋचा सिनकर
- Pushpa Naikwadi
वीराची विरगाथा
- Rekha Mandge
मस्तच आहे
- Raj Bhanushali
Khupch sundar..
- Nandkumar
My Best Book