- मेघना पवार
viral infection मुळे घरी असल्याने खुप दिवसांनी खर तर खुप वर्षानी एक कादंबरी हातात घेतली… ती म्हणजे लेखक मिलिंद महांगडे यांची अर्धदशक ! आणि त्याच दिवशी रात्री 2 वाजता संपवली…(दोन लेकरांच्या आईने घरात बसून हे करणे म्हणजे एक विक्रमच केला मला वाटते)...कारण कादंबरी त्या दर्जाची आहे... वाचकाला खिळवून ठेवणारे आहे… लेखकाने घेतलेली grip सबंध कथेत सुटलेली नाही... शैली ओघवती आहे… सर्व प्रसंग,होस्टेल, त्यातल्या रूम, अभ्यासिका डोळ्यासमोर उभ्या राहतात आणि स्पर्धापरीक्षाचे वास्तव (चांगले आणि तितकेच वाइट् ही) लख्ख समोर उभे राहते.... डोळ्यात पाणी आणते… तसेच मित्रांच्या संवादच्या प्रसंगात खळखळून हसू सुद्धा येते...तिथेच लेखक जिंकतो.
- Sudhir Kamble
Milind sir,you wrote true n ground reality picture of compitative exams. it will be very useful for every competitive exam candidate n I will suggest every student n their parent read this one. Keep it up.!
- देवदत्त साबळे , संगीतकार
आजच संध्याकाळी मी " अर्ध - दशक " वाचुन पूर्ण केले . खूप सुंदर . विषय अगदी ओघवत्या पध्दतीने मांडला आहे .वाचताना " पुढे काय " ही उत्सुकता कायम ठेवण्यात लेखक यशस्वी झालाय . विविध पात्रांची बोलीभाषा वेगळी असल्याने ती व्यक्तीमत्वं डोळ्यांसमोर उभी राहतात . विशेषतः कोल्हापूरी " असं काय करायलंय ? " किंवा खानदेशी " काय भौ ? " हे ... तसंच सगळी कादंबरी पुण्यात घडते . त्यामुळे तिथली स्थानं , गल्ल्या - बोळं , पुणेरी भषा , पुणेरी पाट्या .... अक्षरशः साक्षात पुणं डोळ्यासमोर येतं . बोलीभाषेतल्या म्हणी , रोजच्या जीवनातील उदाहरणं या मुळे आपण कादंबरी वाचत नसुन त्या सर्वाचा भाग असल्याची अनुभुती मिळते . खरोखर मिलिंद त्याच्या या प्रयत्नात अतिशय यशस्वी झाला आहे . त्याचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे . एक संवेदनशील " लेखक " म्हणून माझा त्याला एक खणखणीत सलाम !! त्याच्या पुढच्या प्रत्येक लिखाण आणि प्रयत्नांना लाख लाख शुभेच्छा ....!!!
---------- शुभाशीर्वाद ... !!
- Rajendra Jadhav
Milind, absolutely great, you have touched all thoughts and feelings of those who are preparing for competitive exams. This book never let the reader to divert their mind. I think each reader can recall their past. This book will definitely help to think, for those who are willing to appear for such competitive exams and their parents too. Once again congratulations and all the best.
- Mangesh Desai
अचानक माझ्या मोबाईल वरती नीलगौरीचा व्हाट्सअप मेसेज आला. व्हाट्सअप मधला मेसेज उघडून पाहिला, पाहतो तर त्यामध्ये एक अर्धदशक नावाची कादंबरी वाच, आपल्याच एका अग्रिकॉस मित्राने लिहिलेली आहे आणि विशेष म्हणजे त्या कादंबरीत एमपीएससी केलेल्या प्रत्येकाने वाचावी अशीच आहे. सोबत त्याच्या खाली त्या कादंबरीच्या मुखपृष्टाचा फोटो पण होता. नुकतीच प्रकाशित झाली असल्याने त्याबद्दल मलाही काही माहित नव्हतं. पण मी एमपीएससी केली असल्याने आणि आमच्याच एका कृषी मित्रांने लिहिली असल्याने एक भावनिक नाते होते, कोल्हापूर येथील मेहता बुक स्टॉल मधून ती खरेदी करायला गेलो, तिथे अनिल मेहता सरांची ओळख झाली. त्यांनी ही या कादंबरी बद्दल थोडक्यात सांगितले मग काय तात्काळ ती कादंबरी वाचायला घेतली. वाचता वाचता त्या कादंबरीत कधी - कसा हरवत गेलो कळलेच नाही. स्वतःला कुठेतरी त्या कादंबरीतल्या मुलांच्या मध्ये मी पाहायला लागलो. काही क्षणासाठी रघु काही क्षणासाठी गौतम कांहीं क्षणासाठी बबन. कधीतरी प्रत्येका सारखे जगलो होतो असे वाटत होते. मिलिंदच्या शब्दांनी इतकी सुंदर पकड घेतली आहे की त्यांनी केलेले वर्णन गुंतवून ठेवायला भाग पाडते. अगदी भाड्याच्या खोलीत राहायला गेल्यानंतर अनोळखी असणारे एमपीएससी करणारे कधी मित्र बनुन गेले एकमेकांच्या दुःखाचा सहारा बनुन गेले. रिझल्ट लागल्यानंतर रिझल्ट बघायची ओढ, त्यानंतरची भावनिक घालमेल. आयुष्यात आलेली व्यक्ती, एमपीएससी करताना लागलेल्या काही सवयी खोलीवरचा पसारा, अभ्यासाचे ग्रुप डिस्कशन, पोस्ट काढल्यावर केल्या जाणाऱ्या पार्ट्या, पोस्ट निघाली नाही म्हणून दुःखात बुडालेले दिवस, विनाकारण केलेली भटकंती, हे सगळं खरंच खूप सुंदर लिहिले आहे. मेहता पब्लिकेशन यांनी अर्धदशक प्रकाशित केले याबद्दल त्यांचेही आभार कारण तुम्ही हे पुस्तक प्रकाशित करून आम्हा एमपीएससी करणाऱ्या सर्वच लोकांच्या जुन्या दिवसाच्या आठवणीच्या हिंदोळ्यावरती घेऊन गेलात.
सर्वांनी वाचावे असेच आहे... अर्धदशक...
- Prashant Ajinthekar
मिलिंद महांगडे चे `अर्धदशक` नुकतेच वाचून संपवले. कुठंतरी वाचलेलं एक वाक्य आठवलं as you write more and more personal, it becomes more and more universal. मिलिंदने स्वतः अनुभवलेल्या किंवा कल्पनेतून निर्माण केलेली मोहन, रघु, मोडक, गौत्या, सिनिअर चौगुले ही सगळी मंडळी आपल्या प्रत्येकाला आयुष्यात कुठेतरी भेटल्यासारखी वाटेल. त्यांची वेदना,त्यांचे आनंद खूप जवळचे वाटतात त्यामुळे आपण या कादंबरीतल्या पात्रांशी relate होतो. खूप छान लिहिलंय...
मिलिंद बोकील यांची शाळा ही कादंबरी वाचत असताना आपल्याला जशी आपली शाळा आठवते तशीच अर्धदशक वाचताना कित्येकांना पदवीनंतर नोकरी मिळेपर्यंतचा संघर्ष आठवेल, अत्यंत प्रवाही लिखाण,, 350 पानांत कुठेही कथा भरकटली किंवा रेंगाळली अस वाटत नाही, प्रत्येकाने वाचावी , Good job milind 👍🏻
- Sumit Khandekar
"अर्ध दशक - एमपीएससी दिलेल्या प्रत्येकासाठी"
खरंच नाव सार्थ करणारे हे पुस्तक. सदाशिव, शुक्रवार, नारायण, नवी या पेठांमधील प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या आयुष्याचा एक भाग म्हणजे हे पुस्तक. या पुस्तकातील पात्रे म्हणजे या मुलांना त्यांच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना च्या परिस्थितीचे प्रतिबिंबच. या पुस्तकातील काही पात्रे, काही प्रसंग मला माझ्या स्वतःच्या आयुष्यात सापडले आहेत. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या सर्व छटा यात वास्तववादी पद्धतीने रंगविलेल्या आहेत. कोणत्याही वळणावर त्या अतिरंजित वाटत नाहीत. यातील सर्व पात्रे एकदम Realistic आहेत मग ते अभ्यास करून पोस्ट न मिळाल्याने गांजून गेले सीनियर चौगुले असो वा तेवढाच अभ्यास अपयशातही कूल असणारे सीनियर भोसले असोत, चांगल्या घरातला एमपीएससीचे बॅकग्राऊंड असलेला अजय असो किंवा अथांग गरिबी आणि अपुरी साधनसामग्री तरी जिद्दीने लढणारा बबन असो ( बबन सारखी मुलं कमीच असतात पण असतात ) वा पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवा अवघड असल्याने नाद सोडून पीएसआय करणारा रघु असो वा कमी बुद्धी पण मेहनत अन आत्मविश्वासाने अभ्यास करणारा गौतम असो किंवा वडिलांच्या आग्रहाखातर आणि फक्त टाईमपास करायला अभ्यासिकेत येणारी आसावरी असो वा एमपीएससी जास्त सिरिअसली न करता बँकिंगचा अभ्यास करणारा मोडक असो. सर्व पात्र ही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी जुळणारी आहेत आणि त्यानंतर येतो या कथेचा नायक मोहन , मोहन प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणार्या मुलाला त्याची स्वतःची आठवण करून देतो. त्याच्या आयुष्यातील प्रसंग हे प्रत्येक स्पर्धा परीक्षा दिलेल्या मुलाने त्याच्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी अनुभवलेले मग त्याचा एमपीएससी करण्याचा निर्णय असो वा त्याचा पुण्याला येताना प्रसंग, पुण्यात राहण्याचा त्याचा पहिला दिवस, अभ्यासाचे प्रसंग, निकालाचे सुख दुःखाचे प्रसंग क्लासमधील गमतीजमती, त्याच्या मित्राच्या निकालाचे आणि सेलिब्रेशनचे प्रसंग आणि एकेक वर्ष सरत गेल्यानंतर त्याच्या मनात निर्माण होणारे विचारचक्र. या विचारचक्राला स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी कधीच मुकला नाही. मग ते अपयशाने स्वतः बद्दल येणारी कीव अन नैराश्य असो व आई-वडिलांबद्दल वाटणारी काळजी असो व समाजातल्या चार चौघांची वाटणारी अनाठायी भीती असो. हे सगळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या आयुष्याचा आरसा या पुस्तकातून आपल्यापुढे उभा राहतो.
पण खरंच हे पुस्तक वाचताना जाणवते की अजून आपण पेठेतच रहायला आहोत आणि सर्व आपल्या आजूबाजूला घडते आहे. पण यासाठी एक अट आहे की तुम्ही पुण्यात राहून एमपीएससीचा अभ्यास केलेला असावा. सर्व पात्रे आपल्या आयुष्यातीलच आहेत - फक्त नावे बदलली आहेत. आपण अजूनही अभ्यास करतोय आणि या पात्रांसोबत जगतोय अन असेच पुढे चालू राहावे..... निरंतर ......कधीच संपू नये असं.......कदाचित यालाच Nostalgia का काय म्हणत असावेत. या Nostalgia चा अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकाने जरूर वाचावे आणि खासकरून पुण्यात अभ्यास करून एमपीएससी दिलेल्या प्रत्येकानेच...
डॉ.सुमित खांडेकर,
अन्न सुरक्षा अधिकारी
(पुण्यात राहून MPSC चा अभ्यास केलेला विद्यार्थी😀)
- Yogesh
Very nice write up
- Shailesh
Excellent !!
- संतोष क्षीरसागर
खूप छान मांडणी आणि अंतिम सत्य प्रयत्न.
- Shailesh
Excellent !!!