- LOKPRABHA 22-11-2019
सनदी सेवेचा विस्तृत आलेख...
मजी सनदी अधिकारी तसेच अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल राम प्रधान यांचे आत्मचरित्र वाचताना वाचक एका सरळ रेषेत पुढे जातो. त्यांचे अनुभव त्रयस्थपणे वाचताना 37 वर्षांच्या कालखंडातील घटनाघडामोडींचा आलेखच मांडला जातो. जन्म,शिक्षण, भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रशिक्षण, नोकरीची सुरुवात ते सेवानिवृत्तीपर्यंतचा प्रवास त्यांनी या पुस्तकात कथन केला आहे. सांगोपांग कथन हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य.
प्रधान यांची `माझी वाटचाल : मेटकॉफ हाऊस ते राजभवन` हे पुस्तक नऊ भागात लिहिले आहे. त्यांच्या शालेय शिक्षणापासून ते महाविद्यालय शिक्षणापर्यंतचा मनोरंजक आलेख त्यांनी या पुस्तकात मांडला आहे. म्हणजे त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश घेताना कोणाचे मार्गदर्शन घ्यायचे, त्याची सुरवातीला माहिती नव्हती प्रधान घराण्यात त्यांच्या अर्धे कॉलेजात कोणीही गेलं नव्हतं. त्यामुळे कोणत्या कॉलेजात गेलं की आपल्याला चांगलं शिक्षण मिळेल हे माहित नव्हते. पण त्यांच्याच लक्ष्मीबाई प्रधान यांचे चिरंजीव म्हणजेच राम प्रधान यांच्या काकांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात इंटर सायन्सपर्यंत शिक्षण घेतलेले होते. त्यामुळे त्यांचा आग्रह होता की राम यांनीही फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घ्यावा. परंतु लेखकाने त्याआधीच स.प. महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेऊन पैसे देखील भरले होते. राम यांच्या काकांना हा प्रकार आवडला नाही. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घेण्याचा आग्रह धरला. तरीही लेखकाने फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घेईन पण कला शाखेतच घेईन असा उलट आग्रह धरला तो मिळविलाही. त्यामुळे प्रवेशावरून दोघांचेही समाधान झाले.
या पुस्तकात राम प्रधान यांनी एक सिद्धांत सांगितलेला आहे आणि तो सिद्धांत त्यांनी स्वतःच्या जीवनात कृतीतही उतरवला आहे. दर गुरुवारी विधी महाविद्यालयात न्याय, प्रशासन आणि शिक्षण क्षेत्रातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तींना भेटण्याची संधी असते. लेखक तरुण आणि त्यांचे मित्रही त्यांच्याच वयाचे. त्यात आणखी काहीजण होते. म्हणजे ही तरुण मंडळी सर रघुनाथराव परांजपे (ऑस्ट्रेलियातील तत्कालीन भारतीय उचयुक्त), एस. बी. ढवळे (निवृत्त प्रशाकीय अधिकारी), प्रा. आर. पी. पटवर्धन अशा त्या क्षेत्रातील मातब्बरांशी चर्चा करीत असत. चार ते सहा निवडक विद्यार्थ्यांना चहापानासोबत शिष्टाचार तसेच इंग्रजीत संभाषण कसे करावे, याची माहिती देत असत. यात श्रीकृष्ण मोहन परांजपे आणि दत्तात्रेय सोमण यांचाही समावेश होता. त्यामुळे तरुणांचा आत्मविश्वास हळूहळू वाढू लागला. परंतु त्यांच्यातील काही परीक्षार्थी या बैठकीतून कमी होत गेले. या `म्हाताऱ्या` व्यक्तींबरोबर वेळ घालवणे निरर्थक आहे आणि त्यातून शिकण्यालायक काही नाही असे त्यांना वाटले. परंतु लेखक म्हणतात माझी भावना निराळी होती. या नामवंत व्यक्तींबरोबर वेळ घालवणे ही एक अपूर्व संधी निर्माण झाली होती. मी नियमितपणे या बैठकींना जात असे. त्याव्यतिरिक्त सर रघुनाथ परांजपे आणि न्या. ढवळे यांनाही मी एकट्याने घरी जाऊन भेटू लागलो आणि त्यांच्या संगतीत तासनतास घालवू लागलो. प्रत्येक गोष्ट ही कधीही कमी वा मोठी नसते ती मनापासून शिकली तर तिचा व्यक्तिमत्व विकासाला हातभार लागतो. हे लेखक या प्रसंगातून सांगण्याचा प्रयत्न करतात.
लेखकाची निवड भारतीय प्रशासकीय सेवेसाठी झाली. त्यांच्या मुलाखतीसाठी ३ जानेवारी १९५३ ही तारीख निश्चित झाली होती. निवृत्त आयसीएस अधिकारी आणि स्वातंत्र्यानंतरचे पहिले केंद्रीय गृहसचिव आर. एन. बॅनर्जी हे त्यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होते. लेखक सांगतात `त्यांना सामोरे जाण्याची भीतीच वाटत होती. मुलाखतीला आलेल्या उमेदवारांच्या अंगावर ओरडून त्यांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करत त्यांना `फाडून खाण्या`बद्दल बॅनर्जी यांची ख्याती होती. त्यादिवशी दुपारी पाच बळीचे बकरे वाट पाहत बसले होते. पहिले दोन उमेदवार दहाच मिनिटात पडलेल्या चेहऱ्याने बाहेर आले. खोलीत प्रवेश करताच मला अध्यक्षांचा सर्वश्रुत कोपीष्टपणाचा अनुभव आला. ते ज्या ठिकाणी बसले होते त्याच्या बरोबर मागे एक काचेची बंद खिडकी होती. खिडकीतून येणाऱ्या प्रकाशामुळे मला त्यांचा चेहराच दिसत नव्हता. मला एका दीर्घवर्तुळाकार मेजाच्या एका टोकाला असलेल्या खुर्चीवर बसायला सांगणाऱ्या मोठ्या आणि जोरदार आवाजातला आदेशच फक्त ऐकू आला. दुसऱ्या टोकाला बसलेले बॅनर्जी माझ्याकडे रागाने पाहात माझे खच्चीकरण करू पाहात होते. त्यांच्याबरोबर इतर आठ जण होते. चार जण त्यांच्या डाव्या बाजूस तर इतर कार जण त्यांच्या उजव्या बाजूस बसले होते.
अचूक उत्तर माहित नसेल तर `मला माहित नाही ` असे सांगणेच योग्य ठरेल असे मला पुण्यात बजावण्यात आले होते. अध्यक्ष्यांच्या पहिल्या चार - पाच प्रश्नांना मी हेच उत्तर दिले. अध्यक्ष रुद्रावतार धारण करत मग, तुम्हाला काय माहित आहे ते सांगा ! असे म्हणत माझ्या अंगावर ओरडले. मात्र बॅनर्जी यांचा राग नंतर निवला आणि त्यांनी त्यांच्या सहकार्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली. लेखकाची केंद्रीय लोकसेवा आयोगाची निवड झाली. लेखकाने या सेवेसाठी आवश्यक असलेल्या अनेक गुणांचा उल्लेख या पुस्तकात केलेला आहे. त्यात बुद्धिकौशल्य,नेतृत्वगुण, प्रसंगावधान, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, सचोटी, वक्तशीरपणा, कार्यक्षमता, कोणतीही जबाबदारी स्वीकारण्याची आणि कष्ट करण्याची तयारी, सहनशीलता, बिकट परिस्थितीतही कणखर राहण्याची वृत्ती या गुणांचा समुच्चय ज्याच्यात झाला आहे तो या सेवेसाठी लायक आहे, असे लेखक सूचित करतात. यातील एक उदाहरण देताना ते लिहितात, अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आणि गोखले अर्थशास्त्र संस्थेत नोकरी करण्याऱ्या मधुकर नामजोशीने माझ्यासोबत परीक्षा दिली होती. आय ए एस परीक्षेच्या इतिहासातील त्याचे उदाहरण असामान्य असावे. लेखी परीक्षेत त्याला सर्वात कमी गुण मिळाले होते आणि मुलाखतीत त्याला सर्वाधिक गुण मिळाले होते. मुलाखतीत त्याला ४०० पैकी ४०० गुण मिळाले होते. त्यामुळे त्याचे नाव यशस्वी झालेल्या पहिल्या दहा उमेदवारांच्या यादीत झळकले. भारतीय विदेश सेवेतील प्रवेशासाठी या स्थानाचा विचार केला जाणार होता. त्यासाठी आधी परराष्ट्र व्यवहार खात्याचे महासचिव सर गिरिजाशंकर बाजपाई आणि त्यानंतर परराष्ट्र खाते संभाळण्याऱ्या खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्याची मुलाखत घेतली होती. नामजोशी त्यांना पसंत पडले आणि त्यांची विदेश सेवेत निवड झाली.
राम प्रधान यांच्या प्रशासकीय सेवेतील अनुभव वाचताना ते आव्हानात्मक आहेत, हे जाणवत राहतं. हे काम करताना `वर्कहोलिक` असणं म्हणजे काय, मानेवर पट्टी ठेऊन कसं काम केलं असेल ते जाणवत राहतं. प्रधान यांच्या कारकिर्दीतले अनेक प्रसंग आपल्याला विचारप्रवृत्त करतात. प्रधान यांची सहजशैली वाचकावर गरुड करतेच; पण भारतीय राजकारण, शिक्षण, समाजकारण, परराष्ट्र आणि अर्थ यासह विविध क्षेत्रातील माहिती मिळते.
-(गोविंद डेगवेकर)
- DAINIK LOKSATTA 21-01-2018
युगांतराच्या कालखंडाचा दस्तावेज...
प्रशासन सेवेतील सर्वोच्च स्तरावर प्रदीर्घ काळ सेवा बजावलेले अधिकारी बहुधा प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात नसतात. किंबहुना, त्यांनी आपली कामे पडद्याआड राहूनच करावी असे लोकशाही प्रशासनाचे सर्वमान्य संकेत आहेत. कित्येकदा ऐतिहासिक स्वरूपाची कामगिरी हे अधिकारी बजावतात. अशा काही मोजक्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये राम प्रधान यांचा समावेश होतो. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, राजीव गांधी यांच्यासारख्या नेत्यांचा गाढा विश्वास त्यांनी संपादन केला होता, तो त्यांच्या अंगभूत गुणांच्या बळावर! त्यांची प्रखर बुद्धिमत्ता, अभ्यासू कार्यशैली आणि चातुर्य या बाबी निर्विवाद होत्या. त्याचप्रमाणे त्यांच्या नि:पक्षपाती ध्येयनिष्ठेविषयीही कधीच शंका उपस्थित झाल्या नाहीत. त्यांनी लिहिलेल्या ‘वादळमाथा ते १९६५ भारत-पाक युद्ध’ या पुस्तकात त्यांच्या आत्मचरित्राचा काही अंश ओघाने येऊन गेला आहे. तथापि ते पुस्तक प्रामुख्याने यशवंतराव चव्हाण यांच्या संरक्षणमंत्रिपदावरील कामगिरीविषयी आहे. ज्याला खऱ्या अर्थाने आत्मकथन म्हणता येईल असे त्यांचे नवे पुस्तक म्हणजे ‘माझी वाटचाल - मेटकॉफ हाऊस ते राजभवन (१९५२-१९८९)’!
राम प्रधान यांनी स्पर्धा परीक्षेद्वारे १९५२ मध्ये भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केला. तेव्हापासून सेवानिवृत्तीपश्चात १९८९ मध्ये त्यांची अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमणूक झाली, तोपर्यंतचा विस्तृत अनुभवपट त्यांनी या आत्मचरित्रात उलगडला आहे.
सर्वसाधारणपणे महाराष्ट्राचे गृहसचिव आणि मुख्य सचिव, तसेच केंद्र शासनाचे गृहसचिव या पदांवरील त्यांची नेत्रदीपक कामगिरी मराठीजनांना परिचित आहे. १९६२ मधील चीन युद्धानंतर यशवंतराव चव्हाण यांची देशाच्या संरक्षणमंत्रिपदी निवड झाली. तेव्हा आपल्यासमवेत काम करण्यासाठी ते प्रधानांना दिल्लीला घेऊन गेले. प्रधानांच्या संरक्षण मंत्रालयातील कार्यकाळविषयीही थोडीफार माहिती महाराष्ट्राला आहे. तथापि अन्य काही महत्त्वाच्या पदांवरही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. ज्यात सुमारे दहा वर्षे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाणिज्यविषयक काम केले, त्याचा समावेश होतो. ‘माझी वाटचाल’ या पुस्तकात त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवांचे विवेचन आले आहे. युनो किंवा युएनसीटीडी यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे कामकाज कसे चालते, आणि तेथे जाऊन एखाद्या देशाच्या प्रतिनिधीला कोणकोणत्या जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात याची माहिती या पुस्तकात मिळते. तीच बाब नौकानयन विभागांसंबधी. सामान्यत: भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याला अशा भूमिका निभावण्याचे पूर्वप्रशिक्षण नसते. अगदी नवे, महत्त्वाचे आणि काहीशा तांत्रिक स्वरूपाचे विषय समर्थपणे हाताळून तेथेही आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवताना लेखकाने किती परिश्रमपूर्वक अभ्यास केला असेल याची कल्पना हे पुस्तक वाचल्यावर वाचक करू शकतो.
राज्यात आणि केंद्रात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना भिवंडीची दंगल असो, दत्ता सामंतप्रणीत गिरणी कामगार संप असो किंवा पंजाब, आसाम आणि मिझोरामविषयक ऐतिहासिक करार असोत; अशा अनेकविध प्रसंगांत उद्भवलेली आव्हाने आणि आलेले अनुभव आदी कित्येक घडामोडींचा तपशील प्रधान यांनी तटस्थपणे मांडला आहे. या सर्व प्रसंगांतील त्यांची कामगिरी नेत्रदीपक होती. तरीही विवेचनात आत्मप्रौढीचा वास कोठेही येणार नाही याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली आहे. त्यामुळे या पुस्तकाची वाचनीयकता आणि विश्वासार्हता कित्येक पटीने वाढली आहे.
प्रधान यांचा प्रशासन सेवेतील सुरुवातीचा प्रशिक्षण कालावधी आणि (आताच्या) गुजरात प्रांतातला कार्यकाळ ही प्रकरणे वाचताना वाचक नकळतपणे इतिहासात काही दशके मागे जातो. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळात प्रशासनाची कार्यपद्धती बव्हंशी ब्रिटिश पठडीतलीच होती. परंतु नव्या जमान्यातील वास्तवाला समोरे जाताना अधिकाऱ्यांना किती जाणीवपूर्वक पावले उचलावी लागत होती. याचे मनोज्ञ चित्र लेखकाने सहजगत्या रेखाटले आहे. प्रशासन सेवेच्या दृष्टीने पाहता हे एक युगांतर होते. अशा कसोटीच्या काळात नवे मापदंड निर्माण करण्याची जबाबदारी प्रशासन सेवेत नव्याने प्रवेश केलेल्या अधिकाऱ्यांवर येऊन पडली होती. त्यांची प्रगल्भता, विकासविषयक मानसिकता स्वीकारण्याची तयारी आणि तारतम्य या सर्वांची ती परीक्षा होती. या संक्रमणावस्थेत लेखकाने आपली जडणघडण कशी केली, हे वाचताना आपण थक्क होऊन जातो. आजच्या पिढीतल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना हे सर्व उद्बोधक वाटावे. आपल्या भूमिका बदलत्या काळानुसार कशा सतत तपासून पाहाव्या लागतात आणि नवी कौशल्ये कशी आत्मसात करावी लागतात, याचा एक वस्तुपाठ नव्या प्रशासकांसमोर या आत्मकथनातून मांडला गेला आहे.
कोल्हापूरच्या बाजार समितीची स्थापना किंवा राजा दिनकर केळकर संग्रहालयाची पुनर्रचना असो, लेखकाच्या उपक्रमशीलतेची अशी कित्येक उदाहरणे जागोजागी आपल्यासमोर येतात. आपल्या कार्यसूचित समाविष्ट नसलेली जनहिताची अनेक कामे सहजगत्या करणे कुशल प्रशासकाला शक्य असते. मात्र त्यासाठी पुढाकार घेणे आणि सर्वसंबंधितांची मने विधायक कार्यासाठी वळवून घेणे महत्त्वाचे असते याची प्रचीती लेखक आणून देतो.
प्रशासन हा विषय तसे पाहू गेल्यास काहीस क्लिष्ट असला तरी तो सोपा आणि रंजक करून मांडण्याची हातोटी लेखकाकडे आहे. पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आहे. त्यामुळेच हे आत्मकथन अत्यंत वाचनीय झाले आहे. आपल्या व्यक्तिगत जीवनातील ताणतणाव किंवा चढउतारांविषयी लेखकाने हात काहीस आखडता घेतला आहे, असे मात्र जाणवते. विशेषत: कटु अनुभवांविषयी विस्ताराने न लिहिणे हेही अपघाताने घडलेले नाही, तर सहेतुकपणे आहे.
देशाच्या इतिहासातील काही अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींचा दस्तावेज, असे अनन्यसाधारण महत्त्व प्रधान यांच्या या आत्मकथनाला आहे. भावी काळातील संशोधक- वाचकांना हे अमोल साधन यानिमित्ताने त्यांनी उपलब्ध करून दिले आहे यात शंका नाही.
अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्य किंवा मुंबईत झालेल्या अतिरकेी हल्ल्यांच्या चौकशी समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांना आलेले अनुभवही कुतूहलजनक आहेत. त्याविषयी त्यांनी आत्मचरित्राच्या दुसऱ्या खंडात अधिक मोकळेपणाने लिहावे अशीच अपेक्षा वाचक ठेवतील. त्यानिमित्ताने सद्य:स्थितीतील राजकारण, प्रशासन आणि सामाजिक उलाढाली यांबाबबतचे त्यांचे परिपक्व चिंतन आणि भाष्य वाचकाच्या हाती पडावे अशी अपेक्षा आहे.
-प्रभाकर (बापू) करंदीकर
- DAINIK SAKAL 12-11-2017
तत्कालीन केंद्रीय गृह सचिव, अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल राम प्रधान यांचं हे आत्मकथन. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे प्रधान आयएएस झाले. दिल्लीत मेटकॉफ हाऊसमधल्या प्रशिक्षणानंतर त्यांची जी वाटचाल सुरू झाली, ती अनेक वळणं घेत अरुणाचलमधल्या राजभवनात येऊन पोचली. हा सारा रोमांचकारी, अनेक तपशीलांनी भरलेला, अनेक व्यक्तींचं चित्रण करणारा प्रवास प्रधान यांनी या पुस्तकात मांडला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण, राजीव गांधी अशा अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केलं. स्थानिक स्वरूपाच्या घटनांपासून आंतरराष्ट्रीय समस्यांपर्यत अनेक गोष्टीचा सामना करावा लागला. त्यावेळची स्थिती, निर्णयांमागचं तर्कशास्त्र, मानसिकता अशा अनेक गोष्टी प्रधान पुस्तकातून मांडतात. त्या काळचा सगळा राजकीय, सामाजिक पटच त्यामुळं उभा राहतो.
- Divya Marathi 10-11-17
प्रशासन किंवासनदी अधिकाऱ्याचा देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा सहभाग असताे. बुद्धिकाैशल्य, नेतृत्वगुण, प्रसंगावधान, याेग्य निर्णय घेण्याची क्षमता, सचाेटी, वक्तशीरपणा, कार्यक्षमता, काेणतीही जबाबदारी स्वीकारण्याची अाणि कष्ट करण्याची तयारी, सहनशीलता, बिकट परिस्थितीतही कणखर राहण्याची वृत्ती असे गुण सनदी अधिकाऱ्याकडे असणे अपेक्षित असते. अशाच गुणांचा समुच्चय असलेले माजी सनदी अधिकारी अाणि अरुणाचलचे माजी राज्यपाल राम प्रधान यांचं अात्मचरित्र `माझी वाटचाल : मेटकाॅफ हाऊस ते राजभवन (१९५२-१९८९)` या अात्मचरित्रातून त्यांनी त्यांच्या व्यावसायिक अाणि काैटुंबिक जीवनातील अनुभव कथन केले अाहेत. १९५२ ते १९८९ म्हणजे जवळ जवळ ३८ वर्षांच्या कालखंडातील हे अनुभव अाहेत. त्यांचा जन्म, शिक्षण, अायएएसचं प्रशिक्षण, नाेकरीची सुरुवात ते सेवानिवृत्तीपर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास त्यांनी सांगितला अाहे. एक कुशल सनदी अधिकारी म्हणून त्यांचा हा अनुभवपट अतिशय विस्तृत अाहे. १९६० ते १९६५ या काळात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सचिव म्हणून काम करताना नवीन महाराष्ट्राच्या जडणघडण कार्यात प्रधान यांना काम करण्याची संधी मिळाली. त्याचे काही अनुभव त्यांनी या पुस्तकात दिले अाहेत. तसेच यशवंतरावजी संरक्षणमंत्री असताना `भारतीय संरक्षण दलाची पुनर्रचना` यासारख्या महत्त्वाच्या कार्यातही त्यांचा भाग हाेता याबद्दलही त्यांनी पुस्तकात अनुभव रेखाटले अाहेत. जिनिव्हा येथे त्यांनी भारताचे केलेेले प्रतिनिधित्व, युनाेमध्ये संचालकपदावर असताना अविकसित देशांना वाणिज्य विकास क्षेत्रांमध्ये सल्लागार म्हणून पाहिलेले काम, राज्याचे गृहसचिव, मुख्य सचिव, भारताचे गृहसचिव याच काळात पंजाब, अासाम मिझाेरामचे करार असा सर्व कार्यपटल त्यांनी उलगडला अाहे.
- News Paper review
माझी वाटचाल: मेटकॉफ हाउस ते राजभवन :
एका माजी प्रशासकीय अधिकाNयाच्या अनुभवसंपन्न जीवनाचा विस्तृत पट
प्रशासकीय विंâवा सनदी अधिकाNयाचा देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा सहभाग असतो. बुद्धिकौशल्य, नेतृत्वगुण, प्रसंगावधान, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, सचोटी, वक्तशीरपणा, कार्यक्षमता, कोणतीही जबाबदारी स्वीकारण्याची आणि कष्ट करण्याची तयारी, सहनशीलता, बिकट परिस्थितीतही कणखर राहण्याची वृत्ती इ. गुण सनदी अधिकाNयाकडे असणे अपेक्षित असते. अशाच गुणांचा समुच्चय असलेले माजी सनदी अधिकारी आणि अरुणाचलचे माजी राज्यपाल राम प्रधान यांचं आत्मचरित्र आहे ‘माझी वाटचाल : मेटकॉफ हाउस ते राजभवन (१९५२-१९८९)’. या आत्मचरित्रातून त्यांनी त्यांच्या व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनातील अनुभव कथन केले आहेत. १९५२ ते १९८९ म्हणजे जवळ जवळ सदोतीस वर्षांच्या कालखंडातील हे अनुभव आहेत. त्यांचा जन्म, शिक्षण, नोकरीची सुरुवात ते सेवानिवृत्तीपर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास त्यांनी सांगितला आहे. एक कुशल सनदी अधिकारी म्हणून त्यांचा हा अनुभवपट अतिशय विस्तृत आहे.
प्रधान यांचा जन्म २७ जून १९२८ रोजी मुंबईत दादर येथे झाला. त्यांचे वडील दत्तात्रेय मिलिटरी अकाउन्ट्समध्ये क्लार्वâ होते. वडिलांच्या बदल्यांच्या निमित्ताने मुंबई, दिल्ली, पुणे येथे त्यांच्या कुटुंबाने वास्तव्य केले. गणित हा विषय घेऊन बी. ए. झाल्यानंतर प्रधान यांनी एम.ए.साठी प्रवेश घेतला होता; पण त्यांच्या आईच्या आजारपणामुळे त्यांना एम.ए. पूर्ण करता आलं नाही. मग त्यांनी आय.ए.एस.ची परीक्षा दिली आणि दिल्लीच्या मेटकॉफ हाउसमध्ये आय.ए.एस.च्या प्रशिक्षणासाठी दाखल झाले. प्रशिक्षणा दरम्यानचे अनुभवही त्यांनी शब्दबद्ध केले आहेत.
प्रशिक्षणानंतर अहमदाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर राजस्थानातील पालनपूर, पुणे, कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. सदोतीस वर्षांच्या सेवेत त्यांनी विविध पदं भूषविली. संरक्षण मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्रसंघात त्यांनी काम केले. तसेच महाराष्ट्र शासनात सचिव म्हणून काम पाहिले, भारत सरकारमध्ये गृहसचिव पद भूषविले, सागरी वाहतूक संचालक पदावरही त्यांनी काम केले. ३० जून १९८६ रोजी ते निवृत्त झाले. या वैविध्यपूर्ण जबाबदाNया पार पाडताना यशवंतराव चव्हाण, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, वसंतदादा पाटील, शरद पवार इ. महत्त्वाच्या व्यक्तींशी त्यांचा संबंध आला. त्या व्यक्तींबद्दल तर त्यांनी लिहिलंच आहे; पण त्यांच्या सहकाNयांबद्दल, त्यांच्या संपर्कात त्या त्या वेळी आलेल्या लोकांबद्दलही त्यांनी लिहिलं आहे. आई, वडील, पत्नी, भावंडं यांच्याबरोबरचं कौटुंबिक जीवनाचा उल्लेख निवेदनाच्या ओघात आला असला तरी त्यांनी आपल्या नोकरीतील वाटचालीला अधिक महत्त्व दिलं आहे. नोकरीच्या निमित्ताने भारतात आणि विदेशात केलेल्या भ्रमंतीचंही वर्णन या आत्मचरित्रातून त्यांनी केलं आहे. कर्तव्य बजावताना आलेले कसोटीचे प्रसंग, तसेच त्यांच्यांवर ओढवलेले जीवघेणे प्रसंगही त्यांनी अधोरेखित केले आहेत. १९८७मध्ये ते अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले.
प्रधानांचीं एक प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, बुद्धिमान अधिकारी म्हणून या पुस्तकातून ओळख होतेच; पण त्यांच्यातील माणुसकीचं दर्शनही या पुस्तकातून घडतं. आपल्या कुटुंबाशी असलेले त्यांचे घट्ट भावबंधही जाणवतात.
हे केवळ आत्मचरित्र नाही, तर तत्कालीन राजकीय, सामाजिक परिस्थिती, तत्कालीन महत्त्वाच्या घटना, त्यावेळची शिक्षण पद्धती यांचंही दर्शन घडविणारा हा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. प्रशासकीय क्षेत्र किती विस्तारलेलं आहे आणि प्रशासकीय अधिकाNयाला कोणकोणत्या जबाबदाNया पार पाडाव्या लागतात, कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, याची स्पष्ट कल्पना हे पुस्तक वाचल्यावर येते. प्रशासकीय क्षेत्रात काम करू इच्छिणाNयांनी आणि जे प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत त्यांनीही आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे. सध्याच्या परिस्थितीत तर ते वाचणं आवश्यकच आहे.
प्रधानांनी इतक्या साध्या, सोप्या आणि ओघवत्या भाषेत ते लिहिलं आहे, की सर्वसामान्य वाचकसुद्धा त्यात हरवून जाईल. सर्वसामान्य माणसालाही प्रशासकीय क्षेत्राची माहिती होईल. प्रशासकीय अधिकारी पद हे उंचीचं पद आहे आणि त्या पदाची उंची राखणं, विंâबहुना ती वाढवणं, हे प्रशासकीय अधिकाNयाचं कर्तव्य आहे, असा संदेशही या पुस्तकातून मिळतो.
तेव्हा प्रत्यकाने हे पुस्तक वाचलंच पाहिजे.