- विश्वजीत श्रीपती शिंत्रे.
काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.*
*बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्येकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक.
कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय.
रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक.
एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद...
...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि...
त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!*
© विश्वजीत श्रीपती शिंत्रे.
मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर
०९९२२३१३९१९
- Naresh
मी लायब्ररी मधून पुस्तक घेतले आणि वाचायला बसलो सखाराम आणि त्यांचे तीन मित्र रायगडावर चाललेले असतात. कारण टकमक टोकावरून पडणारी माणसे त्यांच्या गावात पडतात त्यामुळे त्या गावात जंगली प्राणी उपद्रव मांडतात. याची तक्रार करण्यासाठी ते जाताना त्यांना खंडोजी सावित्री भेटतात आणि प्रवास खूप विचित्र होतो 160 पाने वाचताना कुठेही कंटाळा येत नाही
- Gajanan Kale
गुप्तहेर संघटना म्हटले तर सर्वात अगोदर आपल्याला मोसाद आठवते .. इस्त्राईल हा छोटासा ज्यू लोकांचा देश पण त्यांच्या गुप्तहेर संघटनेमुळे तो बलाढ्य मानला जातो. याच इस्त्राईलने त्यांची संघटना शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर संघटनेच्या आधारावर मोसाद बळकट केली.
बहिर्जी नाईक म्हणजे स्वराज्याचे गुप्तहेर.
असामान्य व्यक्तिमत्व, अलौकिक बुद्धिचातुर्य आणि अमर्याद धाडस..शत्रुच्या गोटात जाऊन शत्रुच्याच पोटातुन माहिती काढुन आणणे हे कौशल्य बहिर्जी नाईकांच्य अंगी होते.
इस्त्राईल च्या अभ्यासक्रमात भारताचा इतिहास, शिवाजी महाराज शिकवले जातात.
इस्त्राईलच्या मोसाद संघटनेचा आत्मा म्हणजे ...बहिर्जी नाईक.
`बाजिंद` ही एक ऐतिहासिक रहस्यकथा आहे.
बहिर्जी नाईकांच चातुर्य ,पराक्रम आणि स्वराज्यनिष्ठा यांच अत्यंत साध्या ,सोप्या शब्दात लेखकाने चित्रण केलं आहे.
गजानन काळे.
- Naresh Mohare
वाचताना छत्रपती शिवाजी महाराज आणि बहिर्जी नाईक यानी एखादी मोहीम पुर्ण करण्यासाठी कोण कोणत्या योजना आणि डावपेज करावे लागतात ते वाचताना वेळेचे भानच राहत नाही...
- Minakshi Satpute
आज बाजिंद वाचून पुर्ण केली. अतिशय उत्कंठा वर्धक कादंबरी.
सखाराम धनगर व त्याचे तिन मित्र मल्हारी, नारायण आणि सर्जा यांना शिवाजी महाराजांच्या भेटी साठी जाताना काय काय घडले त्यांना आलेले स्वप्नवत अनुभव याची चित्तथरारक कथा आपल्याला शिवकाळात घेऊन जाते. अवश्य आवर्जून वाचावी अशी कादंबरी.
- Pramod Pujari
टकमक टोक म्हणजे फितुर,अन्यायी लोकांसाठी शेवटची शिक्षा,हे आपल्याला माहीत आहेच पण या टोकावरुन फेकली जाणारी लोकं खोल दरीत पडत कितीतरी हजारो फुट,तळाला.
आणि पै.गणेश मानुगडे सुद्धा आपल्याला एका कल्पनेच्या तळालाच घेऊन जातात,एखाद्या भोवर्यात अडकावं आणि अतीवेगानं तळाशी जावं तशीच ही कादंबरी तितक्याच वेगाने जाते,
`बाजिंद.`
टकमक टोकावरुन ढकलुन दिलेल्या लोकांची प्रेतं धनगरवाडीच्या शेजारी येऊन पडत,ती प्रेतं खाण्यासाठी आजु-बाजूचे वन्यजीव तिथे येत आणि धनगरवाडीवरही हल्ला करत,याच गोष्टीला वैतागुन गावातली काही मंडळी सखाराम आणि त्याचे तीन साथीदार या समस्येचं निवारण काढण्यासाठी रायगडाकडे महाराजांच्या भेटीच्या हुतुने प्रस्थान करतात आणि कादंबरी इथुन वेग पकडते ती शेवटच्या पानावरच वेगवान प्रवास संपतो,
या कादंबरीत `प्रवास` हा नायक आहे,किती पात्रांचा प्रवास लेखकांनी मांडलाय आणि १५८ पानाच्या कादंबरीत हे त्यांनी कसं सामावुन घेतलं हे त्यांनाच ठाऊक.
एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहील्यावर अंगात स्फुरण चढतं,अस्वस्थ व्हायला होतं तसंच काहीसं `बाजिंद` ने एक वेगळ्या प्रकारचं स्फुरण अंगात चढतं,
मनापासुन सांगायचं झालं तर बहीर्जी नाईक यांच्याबद्दल जास्त माहीती नव्हती,कारण आम्ही इतिहास जास्त वाचलेला नाहीये,ठळक-ठळक घटना फक्त ठाऊक आहेत,
फारतर फार `रायगडाला जेंव्हा जाग येते` हे नाटक वाचलंय,इतिहास म्हणुन एवढंच.
पण अधिक माहीती या पुस्तकानं दिली,
कथा जरी काल्पनिक असली तरी सत्याला बरोबर घेऊन जाणारी आहे,
अगदी उत्कंठावर्धक,गुढ,रहस्य,रोमांचकारी अश्या भावनांचा संगम असलेली बाजिंद एकदा वाचलीच पाहीजे.
धन्यवाद मेहता पब्लीकेशन्सचे सर्वेसर्वा Anil Mehta सर आणि बाजिंद चे लेखक गणेश मानुगडे सर तुम्ही मला हे पुस्तक भेट दिलंत त्याबद्दल आभार आणि हे भेट नेहमी हृदयाजवळ राहील,
कारण भेटीत पुस्तक आलं की भेट देणार्याला नेहमी भेटावसं वाटत राहतं,
बाकी तुमच्या सहवासात घुटमळत राहीन आणि तुमचं लिखान वाचुन स्थिर होण्याचा प्रयत्न करीन...
-प्रमोद पुजारी
- Sudhir Kulkarni
अतिशय वेगवान कथानक. मी एवढा वेगाचा भोक्ता... पण या पुस्तकाच्या वेगाने मलाही भोवळ आली. हेही पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे... कथेतील वेगाबरोबरच..यातील रहस्य ही अखेर पर्यंत टिकवून ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे. शेवटच्या टप्प्यात कथेला जी कलाटणी दिली आहे ना... त्यामुळे वाचक तीनताड उडतो.
वाचनीय पुस्तक आहे. अवश्य वाचा...आणि हो...पुस्तक विकत घेऊन वाचा....
थोडक्यात काय... तर पै. मानुगडे यांनी या "पुस्तकडावा"ने
वाचकांना चारी मुंड्या चित केले.
- Aneruddha Devdhar
`बाजिंद` ही एक ऐतिहासिक रहस्यकथा आहे. धनगरवाडीचा कारभारी सखाराम आपल्या तीन सहकाऱ्यांसह एक फिर्याद घेऊन शिवाजी महाराजांकडे रायगडावर जायला निघतो. रस्त्यात गुप्तहेर बहिर्जी नाईकांचा चेला असलेल्या खंडोजीशी नाट्यमयरित्या झालेली भेट, या चौघांना रायगडावर प्रवेश मिळवून द्यायचं आश्वासन, खंडोजी आणि सावित्रीची प्रेमकथा, शिर्के - कदंब वैर, बहिर्जी नाईकांनी शिर्क्यांवर केलेला हल्ला, तसेच बाजी आणि मुघल सरदार हुसेनखानची कथा, बाजीला अवगत असलेली पशू-पक्ष्यांची भाषा, मृत्यूसमयी त्याने आपल्या वंशजाला `बाजिंद`ला त्या भाषेचा दिलेला वारसा, इ. थरारक, धक्कादायक आणि नाट्यमय घटनांनी, वळणांनी ही कादंबरी पुढे सरकत राहते. नाट्यमय वळणं घेत, रहस्यमयतेने शेवटपर्यंत वाचकांची उत्कंठा ताणून धरणारी ही कादंबरी बहिर्जी नाईकांच्या बुद्धीचातुर्याची साक्ष देते आणि शिवरायांचं स्वराज्य हे सुराज्यही होतं याचंही दर्शन घडवते. युध्दाचा थरार, भावनांची गुंतागुंत आणि प्रखर राष्ट्रप्रेम याचं अद्भुत रसायन म्हणजे `बाजिंद` ही कादंबरी.
- Aneruddha Devdhar
`बाजिंद` ही एक ऐतिहासिक रहस्यकथा आहे. धनगरवाडीचा कारभारी सखाराम आपल्या तीन सहकाऱ्यांसह एक फिर्याद घेऊन शिवाजी महाराजांकडे रायगडावर जायला निघतो. रस्त्यात गुप्तहेर बहिर्जी नाईकांचा चेला असलेल्या खंडोजीशी नाट्यमयरित्या झालेली भेट, या चौघांना रायगडावर प्रवेश मिळवून द्यायचं आश्वासन, खंडोजी आणि सावित्रीची प्रेमकथा, शिर्के - कदंब वैर, बहिर्जी नाईकांनी शिर्क्यांवर केलेला हल्ला, तसेच बाजी आणि मुघल सरदार हुसेनखानची कथा, बाजीला अवगत असलेली पशू-पक्ष्यांची भाषा, मृत्यूसमयी त्याने आपल्या वंशजाला `बाजिंद`ला त्या भाषेचा दिलेला वारसा, इ. थरारक, धक्कादायक आणि नाट्यमय घटनांनी, वळणांनी ही कादंबरी पुढे सरकत राहते. नाट्यमय वळणं घेत, रहस्यमयतेने शेवटपर्यंत वाचकांची उत्कंठा ताणून धरणारी ही कादंबरी बहिर्जी नाईकांच्या बुद्धीचातुर्याची साक्ष देते आणि शिवरायांचं स्वराज्य हे सुराज्यही होतं याचंही दर्शन घडवते. युध्दाचा थरार, भावनांची गुंतागुंत आणि प्रखर राष्ट्रप्रेम याचं अद्भुत रसायन म्हणजे `बाजिंद` ही कादंबरी.
- Aaditya Patil
ऐतिहसिक - रहस्यमय , थरारक पुस्तक म्हटलं की खजिना आणि त्याचा शोध हे समीकरण जवळपास ठरलेलं असं मला वाटायचं . ऐतिहासिक काळातील दस्तावेजांचा वापर करून आजच्या युगातील घटनांची त्याला गुंफण घालून कथा सादर करणे म्हणजे ऐतिहासिक रहस्यमय कथेची व्याख्या असा माझा समज होता . पण बाजिंद ने माझा हा गोड गैरसमज दूर केला .
शिवकालीन युगातील गुप्तचर यंत्रणेचा सहारा घेऊन त्याला विविधांगांनी जोड देऊन सादर केलेली कलाकृती म्हणजे ` बाजिंद `.
रायगडावरील टकमक टोकाखाली कडेलोट होण्यामुळे खाली पडणाऱ्या प्रेतांमुळे हिंस्त्र श्वापदांचा धनगर वाडीतील लोकांना त्रास होतो . या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी निघालेला सखाराम धनगर आणि त्याचे तीन सहकारी ह्यांची वाटेत बहिर्जी नाईकांच्या गुप्तहेर खात्यातील खंडोजी सोबत नाट्यमय भेट होते . रायगडापर्यंत पोहोचवण्याचे वचन खंडोजी सखारामला देतो . मध्यंतरी सखाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांना सावित्री भेटते . खंडोजी आणि सावित्री ची कथा सखाराम व त्याच्या सहकाऱ्यांना कुठवर नेते हा थरारक आणि रंजक अनुभव या कादंबरीतून मिळतो . कादंबरी बद्दल जास्त माहिती देऊन स्पाॅईलर्स देण्याचा गुन्हा मी करणार नाही .
सावित्री कोण? बाजींद कोण? त्यांचा खंडोजी शी काय संबंध हे व ह्यांसारखे अनेक प्रश्न वाचकाला पडतात पण हळूहळू अनेक पैलू उलगडत जातात आणि वाचकाला त्याच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळत जातात .
यशवंत माचीचा पडाव , बाजिंदच्या मूळ पुरुषाचा इतिहास , शिवकालीन गुप्तचर यंत्रणेचे कामकाज सगळं वर्णन अगदी चपला केले आहे . एकूणच कादंबरी वाचल्यावर वाचक बहिर्जी नाईकांचा जबरा फॅन बनतो . बहिर्जी नाईक यांची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टी यांना मनोमन सलाम करतो .
एक जबरदस्त आणि तुफान अनुभव हवा असल्यास नक्की वाचावी #बाजिंद
- Kiran Borkar
एक शिवकालीन रहस्यकथा असे आपण समजू.
रायगडाच्या टकमक कड्याखाली काही गावे आहेत. कडेलोटाची शिक्षा झालेल्यांची प्रेते खोल दरीत पडतात आणि रानटी प्राण्यांचे खाद्य बनतात.त्यामुळे रानटी प्राण्यांची संख्या वाढून आता ते आजूबाजूच्या वस्तीवर हल्ला करू लागले.
गावातील चार जेष्ठ नागरिक या समस्येसाठी शिवाजी महाराजांना भेटायला निघाले आहेत.या प्रवासात ते घनदाट अरण्यात रस्ता चुकतात आणि खंडेराव नावाचा तरुण त्यांना मदत करत करतो.
प्रवासात तो त्यांना आपली विलक्षण कहाणी सांगतो . आपण बहिर्जी नाईकांच्या हेरखात्यातील प्रमुख हेर असल्याचे सांगतो. मी तुम्हाला शिवाजी महाराजांपर्यंत घेऊन जाईन असा शब्द देतो.
पण त्याचे वागणे खूपच रहस्यमय असते . शिवाजी महाराजांच्या भेटीपर्यंत खूप काही घडते . कहाणीला वेगवेगळी वळणे येतात. खूपच धक्कादायक घटना त्यामागचे राजकारण ,कारस्थान उलगडत जाते .
बाजिंद कोण आहे ...?? शेकडो वर्षे तो जिवंत कसा ...?? त्याच्याकडे अशी कोणती वस्तू आहे जी फक्त बहिर्जी नाईकांना द्यायची आहे ....?? अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला शेवटी मिळतात.त्यासाठी लेखक आपल्याला शेवटच्या पानापर्यंत खेचून नेतो.
- Balasaheb Patil Jadhav
स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक अवश्य वाचा, खूपच जबरदस्त आहे,
- Niranjan N. Kulkarni
काय पुस्तक आहे, अवर्णनीय अनुभव... धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचं गुप्तहेर खातं 🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
- Rishikesh Honrao
आज बाजींद वाचून पूर्ण झाली...
खूपच सुरेख आणि अप्रतिम लिखाण, भाषेचा सुरेख वापर, रायगड असो किंवा टकमक टोक असो प्रत्येक गोष्टीची मुद्देसूद मांडणी, धनगरवाडी आणि तिथले प्रश्न यापासून सुरू होणारी कथा शेवटी बहिर्जी नाईक याच्यावर येऊन संपते. कथा वाचताना असे वाटते की आपण त्या जगात हरवून जातो की काय, वाचताना पुढे काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचते, गणेश मानगुडे यांनी बहिर्जी नाईक यांच वर्णन त्यांना शोभेल अस केलेलं आहे, वस्ताद काका, खंडोजी, सावित्री, बाजींद, सखाराम असो किंवा त्यांचे सोबती प्रत्येकांच योग्य वर्णन व पध्दतशीर मांडणी तुम्हाला यात दिसून येईल. किचकट लिखाण नाही किंवा अधिक दुसर कोणतं वर्णन नाही.
लेखकांना जे सांगायच होत ते त्यांनी योग्य पद्धतीने आपल्या लिखाणातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्याकाळातल गुप्तहेर खात कस होत याचं योग्य उदाहरण त्यांनी त्यांच्या लेखणीतून दिल आहे...
माझ्या आवडत्या कादंबऱ्या पैकी एक...👌🏻❤️
- Avdhut Patil
This book gives a larger view on spies and their techniques to do anything for National Security.Must read book to understand Bahirji Naik techniques and strategic approach to conquer any impossible goal.http://www.booktalks.info/
- Kailas Wadghule
शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास करतांना पदोपदी जाणवते ते म्हणजे स्वराज्याच्या गुप्तहेर संघटनेची महत्वपूर्ण कामगिरी. कमीत कमी सैन्यबळ वापरून महाराजांनी मोठमोठ्या अशक्यप्राय वाटणाऱ्या मोहिमा यशस्वी केल्या त्यात महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा वाटा खूप मोठा आहे. परंतू या सर्व बाबी इतक्या गुप्त होत्या की बहिर्जी नाईक हे नाव सोडलं तर इतर काहीही माहिती आपल्याला मिळत नाही.
कादंबरीत बहिर्जी नाईक यांच्या संदर्भात काहीतरी माहिती मिळेल अशा मोठ्या अपेक्षेने बाजिंद वाचायला घेतली. शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या या कादंबरीतून माझी अपेक्षापूर्ती मात्र झाली नाही, बराचसा कल्पनाविलास पदरी पडला. परंतू मुळात आपल्या मराठी मनाला आवडणाऱ्या शिवकालीन युद्धाचा थरारक वर्णन, रहस्यमय कथानक आणि बहिर्जी नाईक या वर्णनामुळे कादंबरी कमी कालावधीत प्रचंड लोकप्रिय झाली असावी.
रायगडाच्या पायथ्याशी टकमक टोकाच्या खाली असलेल्या धनगरवाडीचा कारभारी सखाराम आणि त्याचे तीन सहकारी त्यांच्या वाडीची एक फिर्याद घेऊन रायगडावर शिवरायांकडे जायला निघतात. रस्त्यात गुप्तहेर नाईकांचा खास चेला असलेला खंडोजी भेटतो आणि मग पुढे रहस्यमय उत्कंठा वाढविणाऱ्या घटनांचे काल्पनिक कथानक असलेल्या या कादंबरीत, गुप्तहेर खात्याशी संवनधित code words, जंगलातील त्यांचे वास्तव्याचे गुप्त ठिकाणे अशी माहिती मिळते. गुप्तहेर खात्याच काम कसे चालते याची सर्वसामान्य माणसाला नेहमीच उत्कंठा असते. त्याची पुसटशी कल्पना या कादंबरीतून मिळते.
बहिर्जी नाईक यांच्या संदर्भात काही वाक्ये काळजाचा ठाव घेतात. जसे की `गड्यांनो महाराजांचा नाईकांवर इतका विश्वास, की हा माणूस चुकून सुद्धा चूक करू शकणार नाही इतका दृढ विश्वास ! पाचही पातशाह्यांना रणांगणात चारी मुंढ्या चित करून जेव्हा महाराज राज्याभिषिक्त झाले, तेव्हासुद्धा बहिर्जी नाईक समोर आले नव्हते. इतकी गुप्तता पाळत होते बहिर्जी नाईक.
वरील वर्णन काळजाला भिडते. कारण इतक्या ठिकाणी राज्याभिषेकाची वर्णने वाचली परंतु बहिर्जींचा उल्लेख कुठेच सापडत नाही.
शिवचरित्रातील या सगळ्या गोष्टींचा अभ्यास देशोदेशीची लष्करी महाविद्यालये आणि गुप्तहेर संघटना करत असतांना आम्ही मात्र या बाबतीत कपाळ करंटेच म्हटले पाहिजे.
158 पानांच्या या कादंबरीचे वाचन पूर्ण झालंय परंतु लवकरच बहिर्जी नाईक यांची समाधी असलेल्या बाणुरगड या समाधिस्थळाला भेट देऊन माथा ठेकवायचा हे मनोमन ठरवलंय...
- Patel Dhirendra
Great Book must read
- श्री. पंडित जगन्नाथ लोहार
सध्याच्या धावपळीच्या व धकाधकीच्या काळामध्ये विज्ञानप्रगतीमुळे समाजजीवन कमालीच्या वेगाने बदलत व गतीमान होत चालले आहे. सद्य जीवनशैलीमध्ये, सुख मानण्याच्या संकल्पनाच बदलू लागल्या आहेत, त्यामुळे मनुष्याला जीवनात खऱ्या अर्थाने विरंगुळा, सुख व शांती प्राप्त करून देणाऱ्या बाबीकडे लक्ष द्यायला वेळच नाही या बाबी कोणत्या? तर निसर्गात रमणे, ध्यानमग्नता, चिंतन व कलेचा मनासोक्त आस्वाद म्हणजेच उत्तम संगीत ऐकणे, शिल्प, चित्रकलेत रमून जाणे अथवा साहित्य वाचणे व त्यात भान विसरणे या होत. मात्र त्यासाठी वेळच नसल्याने वाचनप्रिय नवीन पिढी निर्माण होताना दिसत नाही व अशा परिस्थितीमध्ये एखादे साहित्य निर्माण करणे ते प्रकाशित करणे हे एक दिव्यच आहे, असे मला वाटते.
अगदी सकस वैचारिक, सामाजिक भान जागृत करणाऱ्या लेखनास सध्या वाचक प्रतिसाद किती मिळेल याची साशंकता आहेच. या परिस्थितीत आपली ‘बाजिंद’ कादंबरी मात्र या सर्व बाबींचा विचार करता सर्वसामान्य वाचकासाठीही वाचकप्रिय कलाकृती ठरेल अशी आशा आहे. कारण सर्व रसाचा परिपोष या कलाकृतीमध्ये अंतर्भूत आहे असे जाणवते. ज्यामध्ये प्रामुख्याने वीर, अद्भुत, शृंगार, शांत व बीभत्स रसानुकूल प्रसंग वाचताना वाचक गुंग होवून रमून जाईल असे मला वाटते.
या कादंबरीमधील छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर युगपुरुषाच्या ऐतिहासिक कालखंडाच्या संदर्भाने उभी केलेली पात्रे - खंडोजी, बर्हिजी नाईक, शिर्के, मोगली सरदार इ. व्यक्तिरेखा खूपच वेगळ्या पद्धतीने चित्रित झालेल्या जाणवतात. यातील कथानकात साऊ-खंडोजी या पात्राच्या माध्यमातून वीर-शृंगार व प्रेम-भाव प्रभावी व उत्कटतेने तरीही कोणतीही मर्यादा न उल्लंघता मांडली आहे. बर्हिजी नाईक, उस्ताद या पात्राच्या वर्णनातून साहस रहस्य व गूढता प्रभावीपणे व्यक्त होताना दिसते, तर ‘बाजिंद’ या व्यक्तिरेखेच्या चित्रणातून अद्भुत, अकल्पित भाव चित्रण, कल्पनारम्य (फॅन्टसी) भाव उत्तम साधला आहे.
शेवटी वाचनीयता हा सर्व साहित्याचा आवश्यक गुण असतो तो यामध्ये छान जमला आहे. प्रत्येक क्षणी उत्कंठा वाढवत वाढवत कथा पुढे पुढे जात राहिल्याने वाचक कथेशी समरस होतो व भान विसरतो. याची प्रचिती येते. एक छान कलाकृती वाचून काही क्षण जगरहाटी विसरायला झाले ही माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! धन्यवाद!
- रवींद्र नागपुरे
बाजींद हि एक अप्रतिम कलाकृती जी साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत घेऊन जाणारी आहे. मी हे अप्रतिम पुस्तक किमान १५ वेळेस तरी वाचलं असेल.आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत मी बाजींद च्या वेडाने झपाटलेलो असेल हे नक्की. या पुस्तकाच्या वेडाने मला लेखक पैलवान श्री गणेश मानुगडे यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली आणि तांबड्या मातीसाठी पवित्र कार्य करत असलेल्या एका लेखकाचे मनोगत ऐकून धन्य झालो. तांबड्या मातीतली कुस्ती यूट्यूब आणि फेसबुक माध्यमातून भारताबाहेर प्रचलित करण्यासाठी त्यांचा एक महत्वाचा वाटा आहे. त्यांच्याबद्दल कितीही लिहलं ते कमीच आहे. त्यांच्या प्रत्यक्ष भेटीची ओढ आहेच.
मित्रांनो आपण एकदातरी बाजींद नक्की वाचावं, स्वराज्याच्या कारणी जीव ओवाळून टाकणारी मानस आज मिळणार नाहीत, निदान त्यांच्या आठवणी आपल्यासारख्या मावळ्यांच्या स्मरणात राहतील या पुस्तकांच्या माध्यमातून. ऐतिहासिक पुस्तकं ही अमृतापेक्षा कमी नाहीत हे नक्की. ही पुस्तकरुपी अमृत एकीकडे आपल्याला जीवनातील संकटांवर मात करण्याचं शिकवतात, तर दुसरीकडे एक आदर्श माणूस आणि समाज बनवायला शिकवतात. बाजींद चा उत्तरार्ध मानुगडे लवकरच प्रकाशित करतील हि आशा आहे...
धन्यवाद पैलवान
आपला वाचक ( रवींद्र नागपुरे )
- Anil Jadhav
अतिशय सुंदर मांडणी...
प्रचंड थरारक कथा...
भयानक गूढ पण तरीही वाचायला भाग पाडणारे .
वाह...👌🏼
लेखक पै. गणेश मानुगडे यांनी पूर्ण पुस्तक डोळ्यासमोर जिवंत केलय.
खुप कमी लेखकांना ही जादू जमते.
त्यातले हे एक पैलवान गणेश मानुगडे.
लेखनाची भुरळ कशी पडते हे अनुभवायचं असेल तर #बाजिंद वाचाच.
त्यात जर तुम्ही थोडे जरी वाचनवेडे असाल,
(...आणि नसाल तर हे पुस्तक एकदा वाचायला हातात घ्याच),
...तर हे पुस्तकं तुमच्या हातून संपल्या शिवाय सुटणं कठीणच.
आणि एक,
...आपल्या शिवरायांच्या काळात घेऊन जाणार आणि तेंव्हाचा शिवकाळ जिवंत उभा करणार हे पुस्तक आहे.
तेंव्हा एकदा नक्की वाचाचं.
- Saroj Kole
#बाजींद वाचायला घेतले होते,चार दिवसात वाचून पूर्ण केले,इतके उत्कंठावर्धक पुस्तक आहे की,हातातून दूर ठेववत नव्हते
#बहिर्जी नाईक यांच्या बद्दल एव्हढी सविस्तर माहिती नव्हती ते
हुशार गुप्तहेर आहेत हे माहीत होते
पण त्यांनी स्वराज्यासाठी काय त्याग केला आणि त्यांची गुप्ततेची प्रणाली आजही इस्त्रायल सारखा देश अंमलात आणतो याचा तर खूपच अभिमान वाटला 🌺
#बाकी सर्व गोष्टी पटल्या पण बाजींद ला अभ्यास करून प्राण्यां ची भाषा कळत होती आणि वाघ,
सिंह,साप, हत्ती,मुंग्या,घार आणि
वटवाघूळ त्याच्या आज्ञेत वागत हा
भाग काल्पनिक किंवा कल्पना विलास असावा असे वाटते
एकूण काय एकदा तरी नक्की हे
पुस्तक वाचावे 🌸🌸
- मनेश देशमुख
काल "बाजिंद" वाचून झाली, पण खरं सांगू का, मला तर काहीच समजली नाही, काल्पनिक असली तरी मांडणी अजीबात जमलेली नाही, काही लिंकच लागत नाही, ऊत्तरार्धात जरा दरबाराचं वर्णन आहे, तेवढं जरा बरं वाटलं, महाराज व बहिर्जी नाईक हा आस्थेचा विषय असल्याने त्या पात्रांविषयी थोडीशी सहानुभुती मनामधे अनायासे तयार होते, तेवढंच.......
- Prashant Chavan
उत्तरार्ध कधी येणार ?
- Ashutosh Hajare
`बाजिंद` ही एक ऐतिहासिक रहस्यकथा आहे.
धनगरवाडीचा कारभारी सखाराम आपल्या तीन
सहकाऱ्यांसह एक फिर्याद घेऊन शिवाजी महाराजांकडे
रायगडावर जायला निघतो. रस्त्यात गुप्तहेर बहिर्जी
नाईकांचा चेला असलेल्या खंडोजीशी नाट्यमयरित्या
झालेली भेट, या चौघांना रायगडावर प्रवेश
मिळवून द्यायचं आश्वासन, खंडोजी आणि
सावित्रीची प्रेमकथा, शिर्के - कदंब वैर, बहिर्जी
नाईकांनी शिर्क्यांवर केलेला हल्ला, तसेच बाजी आणि
मुघल सरदार हुसेनखानची कथा, बाजीला अवगत
असलेली पशू-पक्ष्यांची भाषा, मृत्यूसमयी त्याने आपल्या
वंशजाला `बाजिंद`ला त्या भाषेचा दिलेला वारसा, इ.
थरारक, धक्कादायक आणि नाट्यमय घटनांनी,
वळणांनी ही कादंबरी पुढे सरकत राहते. नाट्यमय वळणं
घेत, रहस्यमयतेने शेवटपर्यंत वाचकांची उत्कंठा ताणून
धरणारी ही कादंबरी बहिर्जी नाईकांच्या बुद्धीचातुर्याची
साक्ष देते आणि शिवरायांचं स्वराज्य हे सुराज्यही होतं
याचंही दर्शन घडवते. युध्दाचा थरार, भावनांची गुंतागुंत
आणि प्रखर राष्ट्रप्रेम याचं अद्भुत रसायन म्हणजे
`बाजिंद` ही कादंबरी.
- Siddheshwar Ashok Tapkir
स्वराज्याला फितूर झालेल्या गनिमांचा रायगडाच्या टकमक टोकावरून कडेलोट केला जायचा.त्या मढ्यांमुळे पायथ्याशी असलेल्या पंचक्रोशीत नवीनच पेचप्रसंग उभा राहिला.त्याचे निराकरण व्हावे या हेतूने सखाराम,सर्जा,मल्हारी,नारायण हे फिर्याद घेऊन शिवाजी राजांना भेटायला निघतात.आणि येथूनच सुरु होतो बाजींदचा,जंगलाचा दिलखेचक प्रवास.
यशवंत माची स्वराज्यात यावी म्हणून,बहिर्जी नाईक,खंडेराय सरदेसाई उर्फ खंडोजी यांनी केलेला त्याग,खंडोजी व सावित्री यांचे प्रेम,सूर्यराव बेरड व शिर्के यामधील हाडवैर याचे मनाला खिळवून ठेवणारे वर्णन अद्भुत आहे.
हुसेनखान याने केलेली गद्दारी,राजे चंद्रभान यांचा मृत्यू आणि पशु पक्षी यांची भाषा अवगत असणारे बाजिंदचे ज्ञान हे सर्व काल्पनिक असले तरी स्वराज्य ,रयतेचे राज्य स्थापन करण्यासाठी किती ज्ञात अज्ञात मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती वाहिली असेल याची पुसटशी कल्पना येते.
लढाया व बाजींदच्या जंगलाचे वर्णन सुरेख आहे,आवर्जून वाचावे
- Sayali Chavan
आज बाजिंद वाचुन संपवले. अफलातुन. छत्रपती शिवाजी महाराजांचे खास गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्यावरील रहस्यमय कथा. आता रायगडावर जावुन यावेसे वाटते. काय ती स्वराज्यनिष्ठा, काय पराक्रम. शतशः धन्यवाद.
- Laxmi Pradip
Bajind vachaley mi...khup chhan Ahe...pustak thevu shakat nhavte
- Sunita Mundhe
बाजिंद वाचा खूप interesting आहे
- Arun Dhamane
बाजिंद कादंबरी खूपच उत्कंठावर्धक आहे.
- Ganesh Gole
मेहता पब्लिशिंग हाउस .. सर बाजिंद ही कादंबरी तर छान आहेच पण तुमच्या प्रकाशनाची इतर पुस्तकेही छान असतात.... वाचक आणि त्यांना योग्य वाटतील अश्या किमतीची सांगड घालून दिल्याने पुस्तक खरेदी करताना प्रॉब्लेम येत नाही... आणि अमेझोन वर उपलब्द केल्याने घरपोच सेवा मिळते.... किंवा जे बुक महाग आणि दुर्मिळ असते ते वाचनालयात उपलब्द असतेच...
धन्यवाद...🙏🙏🙏
- Manoj More
i read it,very very beautiful kadambari
- Pratik Yetavadekar
एकदम उत्कृष्ट कादंबरी
उत्कंठा वाढवणारी
आणि वाचनीय
- Amol Navale
Lai Bhari pustak aahe
- बसवराज नंदनवाडे कोल्हापूर
masat ahe mi vaclay tumi hi vaca.
- Akash Rajkumar Bavane
`बाजिंद` ही एक ऐतिहासिक रहस्यकथा आहे..रायगडाच्या टकमक टोकाच्या खाली असणाऱ्या जंगलात असणाऱ्या धनगरवाडी आणि तिथे राहनाऱ्या लोकांची व्यथा सांगणारी ही कथा आहे ..त्यांची व्यथा सांगण्यासाठी ते रायगडावर जाताना त्यांना भेटलेला खंडोजी आणि सावित्रीची प्रेमकथा ,शिर्के -कदंब वैर तसेच शिवरायांचं स्वराज्य हे सुराज्याही होत,याचंही दर्शन घडते.युद्धचा थरार ,भावनांची गुंतागुंत आणि प्रखर राष्ट्रप्रेम याचं अदभुत रसायन म्हणजे `बाजिंद`ही कादंबरी.
मला खूप आवडली तुम्ही पण नक्की वाचा...
- Neha Rawool
Interesting ...
- DAINIK LOKMAT 23-04-2017
लाल माती, काळी अक्षरं!
कुणाची वाट कुणाला कुठल्या दिशेनं घेऊन जाईल, हे खरं तर कुणालाच सांगता येत नाही. डॉक्टर असणारा माणूस उत्तम कलावंत होतो... आयटीतला माणूस चित्रकार होतो इथपर्यंत ठीक; पण लाल मातीतल्या कुस्तीत रमणारा रांगडा जीव जेव्हा लेखणी हातात घेऊन लेखक बनतो, तेव्हा अचंबा वाटल्याखेरीज राहत नाही. पै. गणेश मानगुडे यांची कहाणी अशीच विलक्षण. आजच्या सोशल मीडियाच्या युगात फेसबुक त्यांना सातत्याने लेखनाची प्रेरणा देत राहिले, हे आणखी विशेष.
गडकोटांचं आकर्षण आणि कमालीची शिवभक्ती ही मानगुडे यांच्या नसानसांत भिनलेली. त्यातून गडकोट किल्ल्यांच्या मोहिमा ठरलेल्याच. अशाच अवघड वाटांवरून प्रवास करताना ओळख झाली बहिर्जी नाईकांची. हा शिवरायांचा खास गुप्तहेर. त्यांच्या जीवनाचा शोध घेताना हा माणूस हरखून जात होता. याच धडपडीत आणि शोधामध्ये चक्क तीन दिवसांचा कडकडीत उपास घडला आणि त्यांच्यातून एका लेखकाचा जन्म झाला.
पाखरांची बोली टिपणारा नायक आणि शिवाजीमहाराजांचा गुप्तहेर असणारे बहिर्जी नाईक यांच्या विलक्षण आयुष्याचा मागोवा घेण्याच्या वेडाने पैलवान मानगुडे यांना झपाटून टाकले. दररोज त्याविषयी ते फेसबुक पेजवर लिहू लागले आणि त्यांच्या लेखनाला कमालीचा प्रतिसाद मिळू लागला. लोकांना उत्कंठा लागून राहिली.
मानगुडे यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी. तांबड्या मातीतल्या कुस्तीशिवाय बाकी काहीच माहीत नव्हतं; पण बहिर्जी नाईकांप्रमाणे गुप्तहेरी करण्याची सुप्त इच्छा होती. गडकोट मोहिमेत नाईकांविषयी अधिक माहिती होत गेली. या मोहिमेत तीन दिवस उपाशी राहण्याची वेळ आली, तर एकदा चारपाचशे जण रस्ता भटकून एका धनगरवाड्यात पोहोचले. तिथंच ‘बाजिंद’ची बीजं रुजली आणि या पैलवानाचा लेखक झाला.
बाजिंद ही एक रहस्य उलगडणारी अशी कादंबरी आहे. त्याची ओघवती शैली आणि ओघवती भाषा हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. शिवकालीन संदर्भ, बहिर्जी नाईक यांचे गुप्तहेरखाते, त्यातील खलबते, स्वराज्यासाठी झपाटलेली आणि जीव ओवाळून टाकणारी माणसे हा सारा ऐतिहासिक काळ वाचताना निश्चितच आपणही त्यात हरवून जातो. एका वेगळ्या वातावरणात रमून जातो. ऐतिहासिक संदर्भ चांगल्या रितीने जोडून या कादंबरीचा मूळ धागा सुटू दिलेला नाही.
-पराग पोतदार
- DAINIK SAKAL (SAPTARANG) 09-04-2017
अगदी वेगळ्या विषयावरची, खिळवून ठेवणारी ही ऐतिहासिक रहस्यकथा. स्वराज्यप्रेम, बुद्धिचातुर्य, युद्धांचा थरार या सगळ्याला रहस्याची, भावनांची जोड देऊन गुंफलेली ही कादंबरी. खंडोजी, सावित्री, वस्तादकाका, सखाराम, बाजिंद अशा वेगवेगळ्या पात्रांचा वापर करून, कल्पनांची जोड देऊन पैलवान गणेश मानुगडे यांनी ती लिहिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक आणि एकूणच स्वराज्याविषयीचा आदर आणखी वाढेल, अशा पद्धतीनं मानुगडे यांनी लिहिलेली ही कादंबरी. वेगवेगळ्या कथा एकमेकांत मिसळत आणि ‘फ्लॅशबॅक’ तंत्राचा वापर करत त्यांनी तिची रचनाही रोचक केली आहे. थरारक चित्रण, धक्के आणि नाट्यमय घटनांमुळं वाचकांची उत्कंठा शेवटपर्यंत कायम राहते.
- Manjiri Sapre Joshi
Bajind changali katha aahe.
- Ramdas Karad
सुंदर आहे...👍👌
मी वाचली आहे...👍
- NEWS PAPER REVIEW
सध्याच्या धावपळीच्या व धकाधकीच्या काळामध्ये विज्ञानप्रगतीमुळे समाजजीवन कमालीच्या वेगाने बदलत व गतिमान होत चालले आहे. सद्य जीवनशैलीमध्ये सुख मानण्याच्या संकल्पनाच बदलू लागल्या आहेत, त्यामुळे मनुष्याला जीवनात खर्या अर्थाने विरंगुळा, सुख व शांती प्राप्त करून देणार्या बाबीकडे लक्ष द्यायला वेळच नाही. या बाबी कोणत्या? तर निसर्गात रमणे, ध्यानमग्नता, चिंतन व कलेचा मनसोक्त आस्वाद! म्हणजेच उत्तम संगीत ऐकणे, शिल्प चित्रकलेत रमून जाणे अथवा साहित्य वाचणे व त्यात भान विसरणे या होत. मात्र त्यासाठी वेळच नसल्याने वाचनप्रिय नवीन पिढी निर्माण होताना दिसत नाही व अशा परिस्थितीमध्ये एखादे साहित्य निर्माण करणे, ते प्रकाशित करणे हे एक दिव्यच आहे असे मला वाटते.
अगदी सकस, वैचारिक, सामाजिक भान जागृत करणार्या लेखनास सध्या वाचक प्रतिसाद किती मिळेल याची साशंकता आहेच. या परिस्थितीत आपली बाजिंद कादंबरी मात्र या सर्व बाबींचा विचार करता सर्वसामान्य वाचकासाठीही वाचकप्रिय कलाकृती ठरेल अशी आशा आहे. कारण सर्व रसांचा परिपोष या कलाकृतीमध्ये अंतर्भूत आहे असे जाणवते, ज्यामध्ये प्रामुख्याने वीर, अद्भुत, शृंगार, शांत व बीभत्स रसानुकूल प्रसंग वाचताना वाचक गुंग होऊन रमून जाईल असे मला वाटते.
या कादंबरीमधील छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर युगपुरुषाच्या ऐतिहासिक कालखंडाच्या संदर्भाने उभी केलेली पात्रे — खंडोजी, बहिर्जी नाईक, शिर्के, मोगली सरदार इत्यादी व्यक्तिरेखा खूपच वेगळ्या पद्धतीने चित्रित झालेल्या जाणवतात. यातील कथानकात साऊ-खंडोजी या पात्रांच्या माध्यमातून वीर-शृंगार व प्रेमभाव प्रभावी व उत्कटतेने तरीही कोणत्याही मर्यादा न उल्लंघता मांडली आहे. बहिर्जी नाईक, उस्ताद या पात्राच्या वर्णनातून साहस, रहस्य व गूढता प्रभावीपणे व्यक्त होताना दिसते, तर बाजिंद या व्यक्तिरेखेच्या चित्रणातून अद्भुत, अकल्पित भाव चित्रण, कल्पनारम्य (फॅन्टसी) भाव उत्तम साधला आहे.
शेवटी वाचनीयता हा सर्व साहित्याचा आवश्यक गुण असतो. तो यामध्ये छान जमला आहे. प्रत्येक क्षणी उत्कंठा वाढवत-वाढवत कथा पुढे पुढे जात राहिल्याने वाचक कथेशी समरस होतो व भान विसरतो, याची प्रचिती येते. मात्र काही व्यक्तिरेखा अजून प्रभावी व ठळकपणे मांडण्यास ताव होता असे मला वाटतो असा एक छान कलाकृती वाचून काही क्षण जगरहाटी विसरायला झाले. ही माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! धन्यवाद!