- Mukund Shinde
Straight forward "सरळ न पुढे" किती साधा अर्थ या दोन शब्दांचा पण अशी जर माणसे असतील तर ती दुर्मिळ असतात,या भेकड्या समाजात अशी जात उगवणेच हेच मुळात अवघड पण या जातीला हा भेकडा समाज मात्र डोळ्यात सलत असतो।।
व पु च्या ही वाट एकटीची मध्ये फक्त एक पात्र बाबी पण या पात्राणे दाकवून दिल की अशी पात्र मुळातच कमी या जगात कारण, अशी माणसे या जगाला सहन होणारीच नसतील मुळात समाज च हा कोणता नेमका ज्याला माणूस आपला म्हणतो पण त्यामध्येच वावरताना कायम भीती मध्ये च असतो.
व पु चं ही वाट एकटीची एकदम झकास पुस्तक straight forward वागणाऱ्या ना काय सोसावा लागत याची चुनुक यात कळते
- Rama Khatavkar
खरंच फार सुंदर कादंबरी आहे.
- Shivanand Badadale
सरुवात.....
अगदी पहिली आणि विलक्षण गाजलेली,
महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभलेली कादंबरी...
जीवनविषयक एक कठोर तत्वज्ञान परखडपणानं
`बाबी` यानायिकेच्या माध्यमातून मांडणारी
ही कादंबरी म्हणजे
एक अविस्मरणीय अनुभव आहे...
तुम्ही तो घ्यायलाच हवा....
- DAINIK KESARI 16-11-1969
एकाकी जीवन ...
‘ही वाट एकटीची’ ही एका समर्थ स्त्रीच्या आकुल जीवनाची आतंकपूर्ण शोकांतिका व.पु. काळे यांनी रेखाटली आहे. ज्या स्त्रीने लहानपणी सत्यासाठी दिवसभर उपास सोसला, कोमार वयात नादान मास्तराच्या थोबाडीत मारण्याचा धंटिगणपणा केला, यौवनावस्थेत आपल्या चुकीचे प्रायशिस्त उजळ माथ्याने वागायचे, ठरविले, त्याकरिता जन्मदात्या आईबापांना देखील जिने सोडले. अशा स्त्रीची ही कथा. पोरगा पोरका जन्माला येणार होता. बाई त्याअगोदर पोरकी झाली. मुलगा आई असून पोरका, आई दोघेहि असून पोरकी! का! तर केवळ सत्याला न सोडण्याच्या एककल्ली आणि अतर्क्य हट्टापायी! या हट्टापायीच ती जगापासून एकटी-एकटी पडत चालली. पण सत्याला कुणीतरी वाली असतो. नव्हे सत्याला वाली एखादाच! सत्याला अपवाद हाच आधार. दुर्मिळ! दुष्कर! दुर्धर! आठल्येमास्तराच्या रूपाने आधार भेटतो. ते तिला नोकरी आणि निवारा मिळवून देतात. मूल झाले. ते शाळेत जाऊ लागले. या एकाकी जीवनरस्त्यावर वाकडी वळणेहि बरीच आली. पण या बाईजवळच्या सत्याला इतकी धार होती की तिच्या कायेभोवती मिठी पडण्यापूर्वीच ते भ्याड आणि कातर पौरुष-पौरुष कसले ते वासनाच ती कातरली जात असे. अशा स्त्रीला निदान तिच्या पुत्राने तरी भीमबल द्यावयास हवे होते. पण सत्य केवळ एकाकी राहण्यासाठीच जन्माला आले असावे. तिचा पोरगा परीक्षेत अनुत्तीर्ण होतो. पण आईशी खरे सांगायचा धीर होत नाही. प्रतारणा तीहि असल्या मातेशी! केवळ कल्पनेनेच तिची काया काळवडली असेल, ऊर उसकटला असेल! छातीची चाळणी झाली असेल. पराभव जीवनमूल्यांचा पराभव, सतीच्या वाणाला अपेश, तेहि पोटच्या पोराकडून! असत्याचे पारिपत्य करायला निघालेली ती नारी! पोराला ती काय माफ करणार? जिने जगाला ठोकरले, सत्याच्या हव्यासापायी, तिने पोराचीहि वळकटी बांधली. सांगितले तू कुठेहि जा. चारी वाटा मोकळ्या आहेत. या असत्याने बरबटलेल्या जगात, ज्याने असत्याचा पहिला धडा गिरवला आहे त्या तुला कुठेहि वाट आणि वस्ती मिळेल, माझ्यापाशी नाही,’ पोरगा आईच्या पायावर कोसळला. पण आई द्रवली नाही. आपल्या लाडक्या एकुलत्या एकाला दारापार केले. काय वदतो व्याघात पहा. सत्याच्या कुशीत असत्याने जन्म घेतला. धिटाईच्या पोटी भ्याडपणा पोसला गेला. का? केवळ त्याचे बीज अशाच कुणा एका असत्याचे, भ्याडाचे होते. मग त्या सोन्याच्या बावनकशी मशीचे काय, जिच्यात ते रूप साकार झाले? काऽ ही नाही अखेरी. त्या अपूर्व स्त्रीला या भरल्या जगात एकटेच रहावे लागले सत्यासारखेच!
कथेचा आत्मा कथेची चरित्रनायिका, सत्याचे तेजस्वी आणि उघडे दर्शन आणि त्याच्या पाठपुराव्याने स्त्रीच्या अंगी आलेले तेजस्वी पाठबळ व लेखकाने त्याचे केलेले कोरीव दर्शन खरोखरच अपूर्व आहे.
-प्रभाकर जोशी
- Aniket Wadwale
पानावर बसताना बाबीला सर्व काही आठवलं पण दुसऱ्या क्षणी तिला फार निराधार वाटू लागल..
विवेक उष्ट्या रिकाम्या ताटकडे गेलं आणि एकाकी तिची अन्नावरची वासना उडाली. तोंड कडवट झाल..
समोरच्या पानाकडे ती नुसती पाहत राहिली...
पाहता पाहता अश्रुंची लाट आली.लाट कसली?प्रतापच तो.
त्या लाटेत सगळं वाहून गेल.
भूतकाळ.
आजवर दिलेली झुंज.
समोरच ताट,जेवण,खोली.
सगळ सगळ
केवळ इतकंच नाही तर,
भविष्यकाळही......
नजरेवर वाजवीपेक्षा जास्त विश्वास टाकला की चुकीची वाट सुद्धा बरोबर वाटायला लागते......
निशब्द...
जीवनाविषयक एक कठोर तत्त्वज्ञान परखडपणानं बाबी या नायिकेचे माध्यमातून मांडणारी ही कादंबरी म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे तुम्ही तो घ्यायलाच हवा..........
- Anuradha Ashok Pable
One of the best by V. P.
- Vishnu Sunita Suwarnkar
कथा संवादात व.पू काळे यांचं पारडं नेहमीच भरलेलं असतं..त्यांच्या या अफाट कथासंग्रहातली त्यांची पहिली अन गाजलेली कांदबरी म्हणजे "हि वाट एकटीची"..
हि वाट "बाबी" या स्त्रिभुमिकेची आहे.
वपु काळे ह्यांचे कादंबरीलेखन मोजकेच आहे. त्यातील ही त्यांची पहिलीच कादंबरी. जिच्याभोवती हे लेखन झाले आहे तिच्या तडक, ठाम निर्णयामुळे आणि तिच्या एकाकी झुंजीमुळे हे लेखन प्रथम जेव्हा वाचकांपुढे आले तेव्हांच त्याने वाचकांच्या मनाचा ठाव घेतला होता. लेखनातला तो ताजेपणा अजूनही टिकून आहे म्हणूनच जग वेगाने बदलत असले तरी हे लेखन अजूनही तितक्याच उत्कटतेने वाचावेसे वाटते आणि ते वाचकाला तितकेच अजूनही धरून ठेवते. बाबीचे निर्धाराने आल्या प्रसंगाला सामोरे जाणे आणि अखेर आपलाच दाम खोटा निघाल्याचे बघून घायाळ होणे - हे वाचकालाही तितकेच घायाळ करणारे आहे - वपुंच्या लेखनाचा हा एक वेगळाच पैलू आहे. त्याने वाचकाला स्तंभित केले आहे.