Vrushali Patwardhan

About Author

Birth Date : 05/12/1955


DR. VRUSHALI PATWARDHAN IS WELL KNOWN AS A CAUSAL NEWS READER, AIR, PUNE FOR 30 YEARS. SHE IS FIRST RANK HOLDER IN M.A. HINDI, PUNE UNIVERSITY AND OBTAINED PH.D. FROM S.N.D.T. UNIVERSITY. SHE IS A WELL-KNOWN VOICE ARTIST AND HAS GIVEN HER VOICE FOR A NUMBER OF DOCUMENTARIES, RADIO ADVERTISEMENTS AND ALSO FOR ‘GANPATI FESTIVAL SCENES, PARTICIPATES IN STAGE SHOWS. HER TRANSLATED BOOKS (MARATHI OSHO’S SHIVSUTRA, A SERIES OF N. A. WALSH’S CONVERSATION WITH GOD, A NUMBER OF BOOKS FOR CHILDRENS. SHE IS FELICITATED BY VARIOUS ORGANIZE FOR HER CULTURAL AND SOCIAL CONTRIBUTION.

डॉ. वृषाली पटवर्धन आकाशवाणी पुणे केंद्राच्या वृत्त निवेदिका म्हणून परिचित आहेत. हिंदी साहित्यात त्या एम.ए. एम.फिल. आहेत. तसेच पीएच.डी पदवाहीR प्राप्त केली. आहे. पुण्याच्या नामवंत वरिष्ठ महाविद्यालयांत त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले. या व्हॉईसिंगच्या क्षेत्रातील आघाडीच्या कलाकार असून त्यांनी आजवर अनेक लघुपट, माहितीपट, आकाशवाणी व दूरदर्शनवरील जाहिराती इ.साठी आवाज दिला आहे. अभिवाचन, काव्यवाचन, रंगमंचावरील कार्यक्रम व आकाशवाणीवरील प्रायोगिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्या करतात. मेहता पब्लिशिंग हाऊसकडून त्यांनी मराठीतून अनुवादित केलेले बालसाहित्य, ओशो यांचे शिवसूत्र आणि गीतादर्शन हे ग्रंथ, एन.ए.वॉल्श यांच्या ‘कॉन्व्हर्सेशन विथ गॉड’ या प्रसिद्ध पुस्तक मालिकेतील दोन भाग प्रकाशित झाले आहेत. आजपर्यंत विविध सामाजिक संस्थांकडून त्यांना कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल गौरवण्यात आले आहे. ‘सिद्ध चॅरिटेबल ट्रस्ट’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा प्रमुख सहभाग असतो. संस्थेने याआधी प्रकाशित केलेल्या ‘नाथ-गीता’ आणि ‘नाथ-भागवत’ या ग्रंथांच्या लेखणीधरही त्याच आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 16 total
AMMA , MALA SHIRDILA GHEUN CHAL Rating Star
Add To Cart INR 195
AMMA, CHAL TIRUPATILA JAU Rating Star
Add To Cart INR 195
AMMA, MALA SALIM CHISTINCHYA DARGYAL... Rating Star
Add To Cart INR 195
AMMA, MALA SUVARNA MANDIR DAKHAV Rating Star
Add To Cart INR 195
CHALA JANUN GHEU YA HASTASAMUDRIK Rating Star
Add To Cart INR 50
CHALA JANUN GHEU YA PARMARTH Rating Star
Add To Cart INR 70
CHICKEN SOUP FOR THE SOUL INDIAN MOTHERS Rating Star
Add To Cart INR 270
CHITRAMAY RANGATDAR KATHA MALIKA 6 (... Rating Star
Add To Cart INR 180
ELMER MALIKA Rating Star
Add To Cart INR 350
34 %
OFF
OSHO COMBO SET - 33 BOOKS Rating Star
Add To Cart INR 5880 INR 3869
SACHITRA MAHABHARAT Rating Star
Add To Cart INR 350
SACHITRA RAMAYAAN Rating Star
Add To Cart INR 299
12

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more