Chhaya Mahajan

About Author

Birth Date : 12/04/1949


DR. CHHAYA MAHAJAN IS AN MA (ENGLISH) AND HAS OBTAINED A DOCTORATE (PHD) IN ENGLISH. HE HAS WORKED AS A PROFESSOR AND LECTURER OF ENGLISH SUBJECT. AURANGABAD DR. EN. BH. PA. SHE WAS WORKING AS A PRINCIPAL IN A WOMENS COLLEGE. HE HAS ALSO WORKED AS A GUIDE FOR PH.D AND M.PHIL.

डॉ. छाया महाजन या एम.ए.(इंग्रजी), असून त्यांनी इंग्रजी विषयातच डॉक्टरेट (पीएच.डी.) मिळवली आहे. इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका व प्रपाठक म्हणून त्यांनी काम केले आहे. औरंगाबादमधील डॉ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात त्या प्राचार्या म्हणून कार्यरत होत्या. पीएच.डी व एम.फिलच्या मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. आजवर त्यांचे विपुल साहित्य प्रकाशित झाले आहे. यामध्ये स्पर्श , वळणावर , नकळत , मोरबांगडी , एकादश कथा , ओढ हे लघुकथासंग्रह तसेच निळ्या डोळ्यांचा माणूस , हरझॉग हे अनुवादित कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. कॉलेज , मानसी , तन अंधारे या कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. फुलांच्या गोष्टी , मुलांचे प्रेमचंद (३ खंड) या बालसाहित्याचे लिखाणही त्यांनी केले. मोगरा फुलला , भोवरा , रक्ताचा रंग एक या प्रकारच्या प्रौढशिक्षणावर आधारित साहित्य लिहिले. वुइमेन इन पॉल स्कॉटज नॉव्हेल्स यावर इंग्रजीतून संशोधनपर लिखाणही प्रसिद्ध झाले आहे. विविध वृत्तपत्रांतून इंग्रजी साहित्य, स्त्रीवादी साहित्य व विविध विषयांवर लेख व मुलाखाती प्रसिद्ध झाल्या आहेत. विविध साहित्यविषयक, सामाजिक व स्त्रीविषयक परिषदांमध्ये तसेच विविध साहित्य संमेलने व सामाजिक संमेलनांच्या परिसंवादातही त्यांनी सहभाग घेतला आहे. नकळत या लघुकथा संग्रहासाठी महाराष्ट्र शासन पुरस्कार (१९९२), कॉलेज या कादंबरीला महाराष्ट्र राज्य शासनाचा वि.स. खांडेकर पुरस्कार (२००७) तसेच स्वातंत्र्यसौनिक श्री. विनायकराव चारठाणकर पुरस्कार मिळाला आहे. महाजन यांना मराठवाडा गौरव पुरस्कार (सामाजिक व शैक्षणिक कार्याप्रीत्यर्थ), मराठवाडा भूषण पुरस्कार (साहित्य क्षेत्रातल्या कार्याप्रीत्यर्थ) ही प्राप्त झाले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 7 of 7 total
ADNYAT Rating Star
Add To Cart INR 180
COLLEGE Rating Star
Add To Cart INR 280
32 %
OFF
DR.CHHAYA MAHAJAN COMBO SET - 6 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1030 INR 699
EKADASH KATHA Rating Star
Add To Cart INR 150
MANSI Rating Star
Add To Cart INR 160
MULAKHAVEGALA Rating Star
Add To Cart INR 120
YASHODA Rating Star
Add To Cart INR 140

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more