- डॉ. अनिल कुलकर्णी, सामना
काही पुस्तके वाचायलाच हवीत. कारण पुस्तके प्रेरणा देतात, संघर्षात जगायला शिकवतात आणि संघर्ष माणसाला घडवतो. अपयशाच्या रस्त्यामधूनच एक दिवस यशाचा रस्ता सापडतो. नैराश्याचे ढग काही काळ अवकाश व्यापून राहतात पण जेव्हा बरसतात ते अंकुरसोबत घेऊन आसमंत उजळून टाकतात.
केवळ आर्थिक मदत करून काहीच होणार नाही, तर या स्त्रियांचे आत्मसन्मानाने मनोबल वाढवण्याची गरज आहे हे सुधा मूर्तीना कळून चुकले. मग त्यांनी व देवदासींनी एकत्र येऊन एक संघटना उभी केली. परमेश्वराला काही सगळीकडे.. उपस्थित राहणे शक्य नसते. म्हणून तो काही काही व्यक्तींच्या रूपाने मदतीला धावून येतो या गोष्टीवर
प्रतिकूल परिस्थितीत इंजिनीअरिंगचे शिक्षण त्यांचा ठाम विश्वास होता. तीन हजार टाके....
घेतल्यानंतर सुधा मूर्ती यांनी ३००० स्त्रियांचे जटानिर्मूलन केले. त्या देवदासी म्हणून वेश्या व्यवसाय करायच्या. आपण देवाला वाहिलेल्या आहोत म्हणून त्या जटा काढतच नसत.
दोनदा अपयश आल्यानंतरही सुधा मूर्ती मागे हटल्या नाहीत. तिसऱ्यांदा त्यांना समजावण्यात यश आले व हळूहळू देवदासी प्रथेवरील देवदासींचा विश्वास उडून सत्य त्यांना कळू लागले.
१९९६ मध्ये इन्फोसिस फाऊंडेशनची स्थापना झाली. इन्फोसिस फाऊंडेशन सुरू करण्याची कल्पना सामान्य माणसाच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणणे ही होती. म्हणजेच `बहुजन हिताय बहुजन सुखाय` गरजवंताची जात, धर्म, भाषेचा विचार न करता त्यांच्या मदतीला धावून जाणे हे त्यात मायेची ऊब होती. फाऊंडेशनचे मुख्य उद्दिष्ट होते.
`देवदासी" या शब्दाचा खरं तर अर्थ ईश्वराची सेवा करणारी असा आहे. पूर्वीच्या काळी देवदासी गायन, वादन, नृत्य अशा कलांत निपुण असत. कलेच्या माध्यमातून त्या ईश्वराची उपासना करत. पण काही दिवसांनी `देवदासी` या शब्दाला `शरीरविक्रय करून उदरनिर्वाह करणारी स्त्री असा एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला. ज्या देवदासीच्या पोटी जन्माला आल्या त्याही पुढे देवदासी बनल्या. काही मुलींना त्यांचे आईवडीलच वेगवेगळ्या कारणाने देवाला अर्पण करायचे दारिद्र्याने अस्वच्छ, अनारोग्यपूर्ण राहणीमुळे एखाद्या मुलीच्या केसात जट आली की, ती देवदासी होण्यासाठी जन्माला आली आहे असा साक्षात देवानेच कौल दिला असल्याचा अर्थ लावून तिचे देवाच्या चरणी सेवेसाठी लग्न करण्याची अनिष्ट प्रथा सुरू झाली.
देवदासी समस्येचे काम सुधा मूर्तीनी हातात घेतले. संवाद साधणे अतिशय अवघड होते. त्यांनी खूप अपमान सहन केले. "तुम्ही काय सरकारी दलाल आहात का ?" वगैरे त्यांची हेटाळणी झाली, त्यांच्या अंगावर चपला फेकून मारल्या गेल्या तरी त्या डगमगल्या नाहीत
या उपक्रमाचे यश म्हणजे तीन वर्षांच्या आत बँकेकडे डिपॉझिट स्वरूपात ऐंशी लाख रुपये जमले. पूर्वी देवदासी असलेल्या स्त्रियांना या बँकेत नोकरी देण्यात आली, परंतु या उपक्रमाचे सर्वात मुख्य यश म्हणजे ३००० देवदासी शरीरविक्रय व्यवसायातून बाहेर पडल्या. अनेकांची मुलं शिकून, मोठी होऊन आपापल्या व्यवसायात यशस्वी झाली. त्यात डॉक्टर, वकील, कारकून, सरकारी नोकर, शिक्षक, रेल्वे कर्मचारी, बैंक अधिकारी असे सगळे होते.
देवदासी प्रथेतून बाहेर पडलेल्या महिलांनी एका कार्यक्रमामध्ये भरतकाम केलेली गोधडी सुधा मूर्ती यांना भेट दिली. तीन हजार टाके घातलेल्या या गोधडीवर सुंदर नक्षीकाम नसलं तरी त्याला प्रत्येकीचा हात लागला होता.
आपल्या मनोगतात त्या म्हणतात, "ही आमच्या हृदयाकडून तुमच्या हृदयाला भेट आहे. हे पांघरूण तुम्हाला उन्हाळ्यात शीतलता आणि हिवाळ्यात ऊब देईल. आमची माया यातून तुमच्यापर्यंत पोहोचेल. आमच्या संकटकाळी तुम्ही आमच्यासाठी धावून आलात. आता आम्हाला तुमची साथ सोडायची नाही." सुधा मूर्ती म्हणतात, आजवर मला मिळालेली ही सर्वात सुंदर भेट आहे.
सुधा मूर्तीच्या शब्दांत सांगायचं झालं तर "मानवी स्वभावाचे सर्व पैलू नीट समजावून घेणं आणि संकटात सापडलेल्या माणसांना मदतीचा हात देऊन त्यांना त्या संकटातून बाहेर काढण हेसुद्धा आपल्या आयुष्याचं ध्येय असू शकत. आपण सगळेच आयुष्यात छोटया छोटया लढाया जरी हरलो तरी महासंग्राम जिंकू शकतो. आयुष्यात आशेला नेहमीच स्थान असतं. "
व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार करायचा असेल तर कोषातून बाहेर यायलाच हवं. एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वानेच बदलाची प्रक्रिया सामूहिक व्हायला सुरुवात होते.
काही पुस्तके, काही माणसे आजच्या पिढीला माहीत व्हायलाच हवीत.
- Niren Apte
3000 टाक्यांची जन्मकथा
-निरेन आपटे.
सौ. सुद्धा मूर्ती आणि नारायण मूर्ती ह्यांनी इन्फोसिसद्वारे संपूर्ण जगभर आपले कार्य पोहोचवले आहे. नारायण मूर्तींच्या इन्फोसिस कंपनीने जगभर व्यवसाय नेला तर सौ. सुद्धा मूर्ती ह्यांनी त्यातून मिळणाऱ्या नफ्यामधून सामाजिक कामे केली. अनेकांना आर्थिक मदत केली, शाळांमधून संगणक वाटले, ग्रंथालय उभे केले. कपडे-आवश्यक वस्तूंचे वाटप केले. नैसर्गिक आपत्तीनंतर मदत कार्य केले.
सुद्धा मूर्ती ह्या लेखिकाही आहेत. wise and otherwise , dollar bahu , magic of lost temple , महाश्वेता
अशी त्यांची अनेक पुस्तके लोकप्रिय झाली. त्या पुस्तकांचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले. त्यांचे आणखी एक पुस्तक खूप लोकप्रिय झाले आणि त्याचे नाव आहे -3000 स्टिचेस. मराठीमध्ये हे पुस्तक ``3000 टाके`` नावाने उपलब्ध असून त्याचा अनुवाद लीना सोहोनी ह्यांनी केला आहे. देवदासी आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर आधारित हे पुस्तक आहे. ह्या महिलांनी सुधाजींना 3000 टाके असलेली एक गोधडी भेट दिली. सुधाजींनी ह्या महिलांसाठी जे काम केले त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही गोधडी दिली आहे. हे पुस्तक वाचनीय आहे आणि त्या पुस्तकाची जन्मकथाही खूप काही सांगणारी आहे.
सुद्धा मूर्ती इंजिनिअर झाल्या. पण त्यांचा ओढा सामाजिक कामांकडे जास्त होता. देवदासी प्रथा बंद व्हावी असे त्यांना मनापासून वाटे. म्हणून त्या एकदा देवदासी महिलांच्या वस्तीत गेल्या. त्या महिलांशी संवाद साधायचा होता. त्यावेळी सुधाजी आधुनिक कपड्यात होत्या. देवदासींच्या वस्तीत गेल्यावर तिथल्या महिलांना त्या आपल्यातल्या वाटल्या नाही. सुधाजींनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्या महिलांनी चप्पल फेकून त्यांना हाकलून दिले. सुधाजींना वाईट वाटले. पण त्या हरल्या नाहीत. दोन आठवड्याने पुन्हा तिथे गेल्या. त्यावेळी टोमॅटोचा हंगाम होता. त्या बायका टोमॅटो निवडण्याचं काम करत होत्या. सुधाजी पुन्हा आल्या हे पाहून त्यांनी सुधाजींच्या अंगावर टोमॅटो फेकून मारले. पुन्हा मागे फिरावे लागले. सुधाजी हतबल झाल्या. त्यांनी हा किस्सा आपल्या वडिलांना सांगितला. त्यांचे वडील डॉक्टर होते. त्यांनी सुधाला सांगितले, तू आधुनिक वेशभूषेत तिथे गेलीस. त्यामुळे त्या महिलांना तू परकी वाटलीस. जर तू साडी नेसून गेलीस तर त्या तुला आपल्यातली एक समजतील. तुझे बोलणे ऐकतील. सुधाजींना हा सल्ला पटला. त्या साडी नेसून पुन्हा देवदासींच्या वस्तीत गेल्या आणि मोठा फरक झाला. त्या महिला सुधाजींशी बोलू लागल्या.
त्या महिलांपैकी काही जण वेश्या व्यवसाय करत होत्या. त्या वस्तीमध्ये काहीच सुविधा नव्हत्या. सुधाजींनी त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप दिली. बँक हा प्रकार त्या महिलांना माहित नव्हता. मग तिथे एक बँक आणली. एड्स आजाराची माहिती दिली. एड्सपासून रक्षण करण्याचे उपाय सांगितले. त्या महिलांचा सुधाजींवर विश्वास बसू लागला. एक नातं तयार झालं. त्यांचे अनेक प्रश्न सुटू लागले. सुधाजी इन्फोसिस फौंडेशन चालवतात ह्या गोष्टी त्या महिलांना माहीतही नव्हत्या. आपली मुले शिक्षण घेत आहेत. परिवर्तन होत आहे हे त्यांना दिसू लागलं. सुधाजींच्या चिकाटीला आणि कष्टाला फळ आलं.
त्या महिलांनी एक कार्यक्रम करायचं ठरवलं. ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणी म्हणून सुधाजींनी यावं इतकाच आग्रह करून त्या थांबल्या नाहीत तर सुधाजींना बंगलोरवरून येणं सोपं व्हावं म्हणून वोल्वो एसी बसचं तिकीट पाठवलं. सुधाजी त्या कार्यक्रमाला गेल्या. सुधाजींमुळे 3000 पेक्षा जास्त महिलांचे जीवन बदलले होते. म्हणून त्या महिलांनी सुधाजींना 3000 टाके घातलेली गोधडी भेट दिली. ह्याच घटनेवरून सुधाजींनी 3000 स्टिचेस हे पुस्तक लिहिले आहे. माणुसकीचं एक निराळं उदाहरण ह्या पुस्तकातून दिसून येतं, म्हणून हे पुस्तक आपल्या संग्रही असायलाच हवं.
- DrPawan S Chandak
`तीन हजार टाके` हे सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित पुस्तक नुकतेच वाचले
या पुस्तकात `सामान्य व्यक्तींचे पण त असामान्य असे कर्तृत्व` रेखाटले आहे. हे पुस्तक वाचताना विविध व्यक्तिमत्त्वाविषयी सुधा मुर्तींना आलेले अनुभव त्यांचे विचार यातून वाचायला मिळते. देवदासींच्या पुनर्वसनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न व सुरुवातीला जरी प्रतिकूल अनुभव आला तरी त्यास त्यांच्या वडिलांची मिळालेली साथ यामुळे त्या देवदासींच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले काम तसेच या देवदासींना स्वावलंबी बनवून त्यांचे विविध बचत गट किंवा पतसंस्था निर्माण आदी कार्य प्रेरणादायी आहे.
`एकटी मुलगी` या कथेतून सुधा मूर्ती यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर त्या कॉलेजमधील त्या एकटी मुलगी होती. तरी देखील कॉलेजमध्ये शिक्षण घेताना आलेले विविध प्रतिकूल अनुभव, मुलांची teasing तरी सुद्धा त्यांनी तितक्याच जिद्द व चिकाटीने या सर्व अनुभवांकडे कोणाकडे सुद्धा तक्रार न करता त्यांचे इंजिनियरिंग चे शिक्षण पूर्ण केले व एक प्रकारे पुरुषी अहंकारावर आपल्या कर्तृत्वाने मात केली.
`विचारांसाठी खाद्य` मधून एकदा त्या मैत्रिणीकडे जेवायला गेले असता तेथील यजमानांनी श्राद्ध निमित्त भोजनात देशी भाज्यांचे नैवेद्य केले असता. त्यात त्यांच्या चर्चेतून आपण रोज वापरत असलेल्या विविध भाज्या त्यांचे उगम स्थान यावरून देशी आणि विदेशी भाज्या याविषयी आपल्याला वाचायला खूप मजा येते.
`तीन ओंजळी पाणी` या कथेमध्ये कदाचित आपल्या माहीत असेल की वाराणसीमध्ये गंगेत स्नान केल्यावर ओंजळीत पाणी घेऊन आपल्या आवडत्या वस्तूचा त्याग करायचा असतो. मग सुधा मूर्तींनी काय केले असेल बरं ? त्यांनी त्यांच्या सर्वात आवडती वस्तू म्हणजे नवीन साड्या खरेदी करणे या आवडीच्या वस्तूच्या नावे ओंजळीत पाणी घेऊन गंगेत सोडून त्याग केला.
`कॅटल क्लास` मधून त्यांना आलेले बिझनेस क्लास vs इकॉनोमिक क्लास आदी विषयी व पेहरावा वरून भेदभावाचा अनुभव व तरीसुद्धा त्यांनी संयम ढळू देता अशा मानसिकतेच्या लोकांना दिलेले उत्तर हे वाचायला खरच मजा आहे
`अलिखित आयुष्य` मधून त्यांच्या वडिलांनी डॉक्टर पेशीतून ग्रामीण भागातील दुर्गम भागात केलेली वैद्यकीय सेवा या सेवेतून ज्या पेशंटची त्यांनी प्रसूती केली त्या पैशांची मुलगी पुढे एक नावाजलेली स्त्री रोग तज्ञ होते असा हा प्रवास वाचताना खूप ऊर्जा मिळते.
`घरासारखे दुसरे ठिकाण नाही` ही अत्यंत हृदयास हेलावणारी कथा, कारण या कथेमध्ये सुधा मूर्ती जेंव्हा एका शेलटर होम ला भेट देतात तेव्हा त्या ज्या पीडित घरकामगार स्त्रियांना भेटल्यावर त्यांनी सौदी किंवा त्या भागात घरकाम साठी गेलेल्या स्त्रियांना आलेले अत्यंत कटू अनुभव, त्यांच्या वर झालेले अत्याचार, पुढे त्या तिथे अडकून बसल्याने त्यांना परत भारतात आणून त्यांचे पुनर्वसन करणे आदींसाठी इन्फोसिस फाउंडेशन द्वारे सुधा मूर्ती ने केलेली मदत वाचण्यासारखी आहे.
इन्फोसिस फाउंडेशन मधील एक दिवस मधून फाउंडेशनची शिष्ट सुधा मूर्ती यांचे उत्कृष्ट प्रशासन एकदा वाचा म्हणजे त्यांच्या कामाविषयी कल्पना येईल.
तसेच पुढे `मला जमणार नाही पण आम्हाला जमेल` मधून अल्कोहोल ॲनॉनिमस चे कार्य त्यांनी खूप छान रेखाटले आहे .
एकंदरीत मी काही सांगण्यापेक्षा आपण स्वतः पुस्तक वाचून एकदा अनुभव घ्यावा
- Gayatri Pangarkar, Amravati
*`पुस्तकप्रेमी`* whatsapp समूह
काही दिवसांपूर्वी KBC च्या `कर्मवीर स्पेशल` एपिसोड मध्ये सुधा मूर्ती जी आल्या होत्या.. तेव्हा अमिताभ त्यांच्या पाया पडून म्हणाले होते ‘हम गर्व से कहते हैं कि, हम उस देश के वासी हैं जिस देश में ‘सुधा मूर्ती’ जी रहती हैं”...काय यथार्थ भावना व्यक्त केल्या एका महापुरुषाने...
आज हे आठवायच निमित्त झालं ते म्हणजे सुधा मूर्ती हस्ते लिखित “तीन हजार टाके” हे वाचनात आलेलं पुस्तकं... या कथा म्हणजे रोजच्या जीवनातील सामान्य व्यक्तींच्या असामान्य जीवन कथा आहे. त्यांना कथा म्हणा, वर्णन म्हणा किंवा अनुभव संकलन आहे म्हणा... ज्याला जे नाव रुचेल ते देऊ शकता.. काय नाहीये या पुस्तकात? या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण आपल्याला एक नवीन गोष्ट शिकवतं, अंतर्मुख करत.
असं हे नितांत सुदंर पुस्तक मी एका बैठकीत वाचून संपवलं... किती तरी गोष्टी शिकले मी यातून.. सगळ्यात जास्त गारुड घातलं ते सुधा ताईंच्या साधेपणाने... त्यां नेसत असलेल्या अगदी साध्या साड्या हीच त्यांची ओळख आहे.. बऱ्याच वेळा आपल्याला वाटत राहतं कि आपले कपडे अगदी out of style आहेत..त्यातून एक न्यूनगंड जन्माला येतो...पण सुधा ताईंना पाहून लक्षात येतं कि class आणि style हे inbuilt असावे लागतात.. घातलेल्या कपड्यांवरून class ठरत नाही ... आजकाल "classy" ची व्याख्या वापरत असलेला महागडा मोबाईल, त्यावर पाहिल्या जाणाऱ्या अगम्य वेब सिरीज, ट्विटर, इंस्टा वर किती फॉलोअर्स ह्या आणि यासारख्या अनेक दिखाऊ गोष्टींवरून ठरवली जाते.. ते किती चुकीचं आहे हेच सुधाताईंकडे पाहून लक्षात येतं.. दुसरी भावलेली गोष्ट म्हणजे सुधा ताईंचा आत्मविश्वास.. आणि तो मिळवायला करावा लागतो अखंड अभ्यास आणि अथक परिश्रम... there is no substitute to hard work...कित्येक वेळा एखाद काम टाळून ते का टाळलं यासाठी आपण स्वतःला excuses देत असतो.. सुधा ताईंना समजून घेतल्यावर आपल्या या सवयीत नक्की बदल व्हायला मदत होईल... आणि लास्ट बट नॉट लिस्ट, खूप खूप महत्त्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे “ पालकत्व हि एक जवाबदारी आहे” सुधा ताईंचं असामान्य व्यक्तिमत्व घडविण्यात त्यांच्या पालकांचा मुख्य वाटा आहे.. "संस्कार करावे नाही तर पेरावे लागतात" मुलं आपल्या पालकांच अनुकरण करत, त्यांना निरखत च मोठी होतात.. संस्कारी आणि यशस्वी मुलं त्यांच्या पालकांचं च प्रतिकरूप असतात.. केवळ पालकत्वाची पुस्तक वाचून responsible पालक होता येत नाही... मदत जरूर होते.. पण प्रत्येक पालकत्वाची काही ना काही व्यथा ही असतेच.. ज्याला त्या व्यथेची कथा करता आली तेच जवाबदार पालकत्व म्हणून नावाजलं जातं...
पुस्तकाविषयी आणि सुधा ताईंविषयी कितीही लिहिलं तरी कमीच आहे..कारण शिकण्यासारख्या इतक्या गोष्टी या समर्थ व्यक्तिमत्वाकडे आहेत... इतिहास, पुराण आणि अंडरवल्ड चा फेरफटका मारल्यावर वास्तवात परतण्यासाठी ‘तीन हजार टाके’ हे पुस्तक वाचा च....👌👌👌👌👌👌👌👌
- Vaishali Patil Waghirkar
सुधा मुर्ती यांच्या या कथासंग्रहातील सर्व कथा सत्य कथा आहेत.मानवी स्वभावाचं सौंदर्य आणि त्यांच घृणास्पद हे दोन्हीही उघड करुन दाखावणा-या या कथांमधुन आयुष्य सन्मानानं कसं जगता येत, हेच प्रतिबिंबित होत.त्यांची खास शैलीत त्यांच निरीक्षण नेमक्या शब्दात मांडलेले आहे.
- Sarvesh Fadnavis
माझं आवडतं पुस्तक. तशी मूर्ती मॅडमची सगळीच पुस्तक संग्रही आणि वाचनीय आहेत. साधी,सोपी आणि प्रवाही भाषाशैली हे पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे.त्यांनी देवदासी समाजासाठी जे काम केलं ते वंदनीय आहे.देवदासी सारख्या निंद्य आणि घृणास्पद परंपरेतून त्यांनी ३००० स्त्रियांची मुक्तता केली. "तीन हजार टाके" म्हणजे प्रत्येक स्त्रीने गोधडीच्या नक्षीत तिचा लावलेला हात म्हणजेच एक टाका आहे असे हे तीन हजार टाके असलेली गोधडी त्या सर्व स्त्रियांनी सुधा मूर्तींना पतसंस्थेच्या तिसऱ्या वर्धापनदिनाच्या सोहोळ्या दिवशी भेट म्हणून दिली आहे आणि त्या म्हणतात,"मला आजवर मिळालेली ही सर्वांत सुंदर भेट आहे.!" आज याच प्रसंगचा व्हिडिओ बघायला मिळाला आणि पुन्हा सारं आठवलं..
Inspiring and very beautiful book just loved it....
- Gayatri Mukesh Pangarkar
दिवसांपूर्वी KBC च्या कर्मवीर स्पेशल एपिसोड मध्ये सुधा मूर्ती जी आल्या होत्या.. तेव्हा अमिताभ त्यांच्या पाया पडून म्हणाला ‘हम गर्व से कहते हैं कि, हम उस देश के वासी हैं जिस देश में ‘सुधा मूर्ती’ रहती हैं”...अगदी यथार्थ वर्णन...ते पाहून आलेला काटा आता लिहितांना सुद्धा परत फुलला अंगावर.. कोण आहे असं ज्याला “इन्फोसिस” हे नाव माहिती नाहीये??? कुणाला खरं वाटेल की आज ज्याची उलाढाल कितीतरी कोटींची आहे ती कंपनी उभी करायची सुरवात केवळ 10,000 रुपयांपासून झाली होती.. आजच्या इन्फोसिस च्या उत्तुंग यशामागे सुधा ताई आणि नारायण मूर्ती यांचे अखंड परिश्रम आहेत..जरा विचार करा किती अवघड असेल हि वाट...
आज सुधा मूर्ती या असामान्य व्यक्तिमत्वाबद्दल लिहायचं निमित्त झालं ते त्यांच्या हस्ते लिखित “तीन हजार टाके” हे वाचनात आलेलं पुस्तकं... रोजच्या आयुष्यतल्या सामान्य व्यक्तींच्या असामान्य जीवन प्रवासाच्या कथा आहे म्हणा, वर्णन आहे म्हणा किंवा अनुभव संकलन आहे म्हणा...काय नाहीये या पुस्तकात? या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण आपल्याला एक नवीन गोष्ट शिकवतं, अंतर्मुख करत..
असं हे एक नितांत सुदंर पुस्तक मी एका बैठकीत वाचून संपवलं.. किती तरी गोष्टी शिकले मी यातून..सर्वप्रथम सुधा ताईंचा साधेपणा... त्यां घालत असलेली साडी हीच त्यांची ओळख आहे.. कधी कधी आपल्याला उगाचच वाटत राहतं कि आपले कपडे style मध्ये नाहीये..त्यातून मग inferiority complex yeto...पण हे वाचून समजत कि style हि inbuilt असावी लागते.. ती कपड्यात नसते... दुसरं म्हणजे सुधा ताईंचा आत्मविश्वास.. आणि तो मिळावंता येतो अखंड अभ्यास आणि परिश्रमानी.. there is no substitute to hard work...काम नाही जमलं कि कित्येक वेळा आपण स्वतःला excuses देत असतो.. सुधा ताईंचे अनुभव वाचून आपल्या या विचारसरणीत नक्की बदल व्हायला मदत होईल. ..आणि लास्ट बट नॉट लिस्ट, खूप खूप महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे “ पालकत्व हि एक जवाबदारी आहे” सुधा ताई अशा घडल्या कारण त्यांना घडविणारे हात तसे होते..त्यांच्या वडिलांचा वेळोवेळी पुस्तकात उल्लेख आलेला आहे..तसेच आईचा आणि आजीचा सुद्धा आलेला आहे.. पालकत्वाची पुस्तक वाचून responsible पालक होता येत नाही... मदत जरूर होते.. पण प्रत्येक पालकत्वाची एक वेगळी व्यथा ही असतेच.. ज्याला त्या व्यथेची कथा करता आली तेच जवाबदार पालकत्व...
पुस्तकाविषयी कितीही लिहिलं तरी कमीच आहे..कारण शिकण्यासारख्या इतक्या गोष्टी या समर्थ व्यक्तिमत्वाकडे आहेत... म्हणून एकदा तरी ‘तीन हजार टाके’ हे पुस्तक वाचा च....👌👌👌👌👌👌👌👌
- Jaywant Bhabhad
सामान्य व्यक्ती असून असामान्य जीवन जगणाऱ्या सुधा मूर्ती यांचे लीना सोहोनी यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक आहे. सुधामूर्ती यांचा जन्म १९५० साली कर्नाटक राज्यातील शिगवि येथे झाला. त्या विख्यात सामाजिक कार्यकर्त्या, कुशल लेखिका आहेत. सुधा मूर्ती या "इन्फोसिस फाउंडेशन"च्या अध्यक्षा आहेत. त्यांच्या असामान्य योगदानाबद्दल "राजलक्ष्मी पुरस्कार", २००६ मध्ये भारत सरकारतर्फे "पद्मश्री पुरस्कार" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सहा डॉक्टरेट्स मिळाल्या त्यातील दोन महाराष्ट्रातील आहेत.
"तीन हजार टाके" हे पुस्तकाचे नाव बघितल्यावर प्रथमतः या नावाबद्दल आणि पुस्तकाच्या मुखपृष्ठावर ग्रामीण भागात पांघरण्यासाठी आजीच्या किंवा आईच्या वापरलेल्या लुगड्यांमध्ये अडगळीत पडलेल्या जीर्ण कापडे वापरून बनविलेल्या गोधडींचे चित्र बघून कुतूहल निर्माण होते. पण पहिलयाच प्रकरणात त्याचे उत्तर मिळते. सुधा मूर्ती यांच्या अथक प्रयत्नातून ३००० देवदासी शरीरविक्रयाच्या व्यवयासातून बाहेर पडून अनेक उदयोग करत, मुलांना चांगल्या दर्जेचे शिक्षण देत स्वतःची पतसंस्था काढतात. आणि बँकेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिम्मित सुद्धा मूर्ती यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करतात. त्यावेळी ३००० देवदासींनी थोडी थोडी कलाकुसर, भरतकाम केलेली गोधडी भेट देतात.
या कथासंग्रहातील प्रत्येक कथा ही सत्यकथा आहे. मानवी स्वभावचं सौंदर्य आणि त्याचं घृणास्पद रूप हे दोन्हीही उघडं करून दाखवणाऱ्या या कथांमधून आयुष्य सन्मानानं कसं जगता येतं, हेच प्रतिबिंबित होतं बऱ्याच वेळा हिंमत आणि धैर्य दाखवून केलेल्या लहानश्या गोष्टी इतरांचं जीवन स्पर्शून जातात. इन्फोसिस फाउंडेशचं काम करत असताना सुधा मूर्ती यांनी केलेल्या दूरदूरच्या प्रवासांमध्ये तसंच त्यांच्या स्वतःच्या तरुणपणी जे अनुभव आले त्या प्रत्येक अनुभवातून काही कहाण्यांचे पट त्यांच्या समोर उलगडत गेले. या कथासंग्रहातून त्यांनी त्यांच्या नेहमीच्या साध्या, स्वच्छ, निर्मळ आणि प्रवाही शैलीत ह्या हृदय कहाण्या आपल्यापुढे मांडल्या आहेत.
त्यांनी देवदासी समाजासाठी जे काही काम केले आहे, त्यांच्या परिणामांविषयी त्या बोलतात. इंजिनिअरिंग कॉलेजात शेकडो मुलांमध्ये एकुलती एक मुलगी म्हणून शिकतांना त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, त्याविषयी कथन करतात. आपल्या वडिलांचा प्रेमळ स्वभाव , बॉलीवूड चित्रपटांच्या संदर्भात परदेश प्रवासात आलेले सुंदर अनुभव, भारतीय भाज्यांचे मूळ, असे अगदी सोपे विषय हाताळणाऱ्या या कथांमधून दैनंदिन जीवनातील संघर्ष आणि यश त्या अत्यंत परिणामकारकरित्या आपल्यासमोर उलगडतात.
- हर्षद आचार्य
सुधा मूर्ती लिखित `Three Thousand Stitches` ह्या पुस्तकाचा लीन सोहोनी ह्यांनी केलेला मराठी अनुवाद- तीन हजार टाके.
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस
पाने - १५२
सुधा मूर्ती ह्यांची ओळख करून देण्याची गरज नाही. त्यांच्या वैयक्तिक व सार्वजनिक आयुष्यातले विविध अनुभव ह्या पुस्तकांतील अकरा प्रकरणांतून अतिशय सहज, सोप्या व ओघवत्या भाषेत वर्णन केले आहेत. किस्से, गोष्टी, प्रसंग वर्णन अशा स्वरूपात अनुभव कथन केल्याने सुधाजींच्या व्यक्तिमत्वाची ओळख होत जाते. हे आत्मचरित्र नाही पण त्यांच्या अनुभवांतून भेटणाऱ्या व्यक्ती आपल्याही आयुष्यात भेटलेल्या, पाहिलेल्या असतात. पुस्तकातून इन्फोसिस फौंडेशनच्या कामाची, अल्कोहॉलिक अनोनिमस ह्या व्यसनमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या संस्थेची थोडीफार माहिती होते.
कुठेही उपदेशात्मक लिखाण नाही परंतु तरीही प्रेरणादायी असं, नक्की वाचावं, असं हे पुस्तक आहे.
- Purva
हे पुस्तक सुधा मुर्तींनी "T. J. S. George" ह्यांना अर्पण केले असून, इंग्रजी भाषेत लेखन करायची प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन, त्यांच्यातील सुप्त लेखनकौशल्य जागृत करून साहित्यातील विविध प्रयोग करून पाहण्यास George ह्यांनी त्यांना व अनेकांना उत्तेजन दिले आहे असे त्या म्हणतात.
पुस्तकातील कथा, सत्यकथा असून प्रत्येक कथा ही मनुष्य स्वभावाची सुंदर आणि घृणास्पद अशी दोन्ही रूपे उलगडत जाते."आयुष्य सन्मानाने कसं जगता येत" हे सुधा मूर्तींनी हिंमत आणि धैर्य दाखवून पारंपरिक प्रथांच्या गुलामगिरीत अजाणतेपणे अडकलेल्या स्त्रियांची सुटका करून वास्तवात आणून त्याची जाणीव ह्या स्त्रियांना करून दिली आहे.
सुधा मूर्तींनी इन्फोसिस फौंडेशनच काम करत असतानाच्या केलेल्या प्रवासात भेटलेल्या स्त्रियां,त्यांच्या कॉलेज जीवनातील अनुभव,वडिलांचा प्रेमळ आणि समजूतदार स्वभाव आणि त्यांची परोपकारी वृत्ती व मार्गदर्शन,भारतीय भाज्यांचं उगम स्थान, सिनेसृष्टी संदर्भात इराण,पोलंड,क्यूबा, बहामाज, उझबेकिस्तान, आइसलँड ह्या देशांतील त्यांचे बॉलीवूडच्या चाहत्यांचे अनुभव असे सोप्पे विषय घेऊन कथा मांडल्या आहेत..
साधी, सोपी आणि प्रवाही भाषाशैली हे पुस्तकाचं वैशिष्ट्य.
त्यांनी देवदासी समाजासाठी जे काम केलं ते वंदनीय आहे.देवदासी सारख्या निंद्य आणि घृणास्पद परंपरेतून त्यांनी 3000 स्त्रियांची मुक्तता केली.."तीन हजार टाके" म्हणजे प्रत्येक स्त्रीने गोधडीच्या नक्षीत तिचा लावलेला हात म्हणजेच एक टाका आहे असे हे तीन हजार टाके असलेली गोधडी त्या सर्व स्त्रियांनी सुधा मूर्तींना पतसंस्थेच्या तिसऱ्या वर्धापनदिनाच्या सोहोळ्या दिवशी भेट म्हणून दिली आहे आणि त्या म्हणतात,"मला आजवर मिळालेली ही सर्वांत सुंदर भेट आहे...!!!"
Inspiring and very beautiful book ..loved it.... Poorva....😊
- Vrushali Kelkar
जरूर वाचावे असं आहे
- Shweta Kularkar
Good collection...khup chan..wacha nakkich
- DAINIK SAMANA 16-09-2018
‘मूर्ती’मय अनुभव कथन...
स्वत:च्या आयुष्यातले अविस्मरणीय प्रसंग तसेच मौल्यवान क्षण साध्या, सोप्या पद्धतीने उलगडून दाखवण्याचं कसब सुधा मूर्तींच्या लेखणीत आहे. जीवनाचे कुठलंही तत्त्वज्ञान आत्मसात न करता सुधा मूर्ती या त्यांच्या आयुष्यातील अनेक अनुभवांतून शिकत गेल्या नि एक व्यक्ती म्हणून समृद्ध होत गेल्या. त्यांच्या ‘वाईज अॅण्ड अदरवाईज’ या पहिल्या पुस्तकापासूनच त्यांचं लिखाण हे वाचकांच्या मनाला भुरळ घालण्यास यशस्वी झालं आहे. जीवनावर नितांत प्रेम करणाऱ्या या लेखिकेचं ‘तीन हजार टाके’ हे पुस्तकसुद्धा त्यांच्या साध्या, सोप्या भाषेतील अनुभवकथनामुळे वाचनीय बनले आहे.
या पुस्तकातसुद्धा सुधा मूर्ती यांनी त्यांच्या आयुष्यातील निवडक प्रसंग समाविष्ट केले आहेत. लेखिकेच्या लहानपणीचे, त्यांच्या कामकाजाविषयीचे तसेच त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातल्या प्रसंगाचे चित्रण ‘तीन हजार टाके’मधून दिसून येते. देवदासी स्त्रियांसाठी काम करताना त्यांना आलेले अनुभव आणि त्यांच्या कामाचे ऋण म्हणून त्या स्त्रियांनी लेखिकेला स्वत:च्या हातांनी विणलेली गोधडी देण्याचा हृद्य प्रसंग ‘तीन हजार टाके’ या लेखातून दिसून येतो. तसेच इंजिनिअिंरग कॉलेजला प्रवेश घेतल्यावर एक स्त्री म्हणून आलेल्या अडचणी, परंतु त्या अडचणींना ओलांडून त्यांनी मिळवलेलं यश ‘मुलांवरती मात’ यामधून लेखिकेने वर्णिले आहे.
तसेच हिंदुस्थानी पदार्थांचा मूळ उगम कुठून झाला याबद्दलचा लेखिकेचा अफलातून अनुभव ‘विचारांसाठी खाद्य’ या लेखातून सुधा मूर्तींनी सांगितला आहे. नातवंडांनी कृष्णाच्या कथाचं केलेलं आधुनिक आणि मजेशीर रूपांतर ‘रसीला आणि पोहण्याचा तलाव’मधून प्रत्ययास येतं. हे आधुनिक रूपांतर वाचून आपल्याला खरोखर गंमत वाटते. इन्फोसिस फाऊंडेशनमध्ये काम करतानाचा लेखिकेचा दिनक्रम आणि कामाचा प्रचंड ओघ याची माहिती ‘इन्फोसिस फाऊंडेशनमधील एक दिवस’मधून कळून येते. माणसाला त्याच्या गुणवत्तेच्या ऐवजी पोशाखावरून कसे पारखण्यात येते याबाबतचा एक अनुभव ‘कॅटल क्लास’मधून लेखिकेने कथन केला आहे.
‘तीन हजार टाके’मधील बरेचसे प्रसंग आपल्या आयुष्यात घडून गेले असतील अथवा पुढे घडतील ही शक्यता नाकारता येत नाही. कारण या प्रसंगांमधला साधेपणा आपल्याला त्यांच्याशी जोडून घेतो. तसेच हे प्रसंग उत्कटतेने मांडण्याची हातोटी सुधा मूर्तींच्या लिखाणात आहे. त्यामुळे हे अनुभव आपल्याला भावतात आणि नकळतपणे आपणही या अनुभवांद्वारे शिकत असतो.
या पुस्तकामधून सुधा मूर्तींची समाजाबद्दलची असलेली निष्ठा आणि कामासंबंधी आखलेली तत्त्वं दिसून येतात. प्रचंड काम करूनसुद्धा कधीही न थकणाऱ्या आणि कायम शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या लेखिकेच्या स्वभावाचे अनेक पैलू या पुस्तकातून उलगडतात लीना सोहोनी यांनी हे पुस्तक मराठी वाचकांसाठी दर्जेदार शैलीत अनुवादित केले आहे. ‘टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.’ अशी एक म्हण मराठीमध्ये आहे, परंतु ‘तीन हजार टाके’ हे पुस्तक वाचून आपण मात्र माणूस म्हणून नक्कीच समृद्ध होतो आणि जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या अंगी भिनला जातो.
–देवेंद्र जाधव
- धनंजय जाधव
हल्लीचं मी *सुधा मूर्तींचे* *तीन हजार टाके* हे पुस्तक वाचले. या पुस्तकाविषयी सांगायचं झालं तर यातील प्रत्येक कथा ही सत्यकथा असून त्यात समाजकार्य करताना सुधाजींनी त्यांना आलेल्या अनुभवांचे कथन केलेले आहे. मानवी स्वभावाचं सौंदर्य आणि त्याचं घृणास्पद रुप हे दोन्हीही उघड करून दाखवणाऱ्या या कथांमधून आयुष्य सन्मानानं कसं जगता येतं, हेच प्रतिबिंबीत केले आहे. बऱ्याच वेळा हिंमत आणि धैर्य दाखवून केलेल्या गोष्टी इतरांचे जीवन स्पर्शून जातात.
इन्फोसिस फाउंडेशनचं काम करत असताना सुधा मूर्ती यांनी केलेल्या दूरदूरच्या प्रवासांमध्ये, तसेच त्यांच्या स्वतःच्या तरुणपणी त्यांना जे अनुभव आले, त्या प्रत्येक अनुभवातून काही कहाण्यांचे पट त्यांच्यासमोर उलगडत गेले आणि याच हृद्य कहाण्या त्यांनी त्यांच्या नेहमीच्या साध्या, स्वच्छ,निर्मळ आणि प्रवाही शैलीत या आपल्यापुढे मांडल्या आहेत. देवदासी समाजासाठी त्यांनी जे काही काम केलं आहे, त्याच्या परिणामांविषयी त्या बोलतात. इंजिनिअरिंग महाविद्यालयात शेकडो मुलांमध्ये एकुलती एक मुलगी म्हणून शिकताना त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, त्याविषयी कथन करतात. आपल्या वडिलांचा प्रेमळ स्वभाव, बॉलिवूड चित्रपटांच्या संर्दभात परदेश प्रवासात आलेले सुंदर अनुभव, भारतीय भाज्यांचे मूळ स्थान, असे अगदी सोपे विषय हाताळणाऱ्या या कथांमधून दैनंदिन जीवनातील संघर्ष आणि यश त्या अत्यंत परिणामकारक आपल्यासमोर उलगडतात. एकंदरीत काय तर *सामान्य व्यक्ती... असामान्य जीवन.
- DAINIK SAKAL 10-06-2018
‘इन्फोसिस फाउंडेशन’ या सेवाभावी संस्थेचे काम करताना सुधा मूर्ती यांनी अनेक ठिकाणी प्रवास केला. तसेच त्यांच्या तरुणपणी त्यांना जे अनुभव आले ते त्यांनी ‘तीन हजार टाके’मधून लिहिले आहेत. फाउंडेशनचा पहिलाच प्रकल्प हाती घेतला तो देवदासींच्या समस्या सोडविण्याचा. त्यासाठी त्या उत्तर कर्नाटकातील विशिष्ट भागात गेल्या. तेथील देवदासींकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली. वडिलांच्या सल्ल्यानुसार त्यांनी कामात बदल केल्यावर मात्र त्यांना सकारात्मक बदल दिसला. देवदासींच्या त्या आवडत्या अक्का बनल्या. त्यांनी अक्काला भरतकाम केलेली गोधडी भेट दिली. त्यावर शरीरविक्रयाच्या व्यवसायातून बाहेर पडलेल्या तीन हजार देवदासींनी मिळून तीन हजार टाके घातले होते. ही अमूल्य भेट व देवदासींचे अनुभव यात आहेत. ‘मुलांवर मात’ या प्रकरणात हुबळीतील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकताना झालेला त्रास व नंतर मुलांपेक्षा जास्त गुण मिळविल्यानंतर सहकारी विद्यार्थ्यांशी झालेली मैत्री, मैत्रिणीच्या वडिलांनी दिलेले वनस्पतींविषयीचे ज्ञान, आजीच्या इच्छापूर्तीसाठी काशीला दिलेली भेट, असे त्यांच्या आयुष्यातील समृद्ध अनुभव वाचताना प्रेरणाही मिळते.
–मंजूषा कुलकर्णी
- महाराष्ट्र टाइम्स १८/२/२०१८
आयुष्य म्हणजे विविध प्रसंगांचा, अनुभवांचा संचयच खरेतर. अशाच एका संध्याकाळी निवांत चांदण्यांच्या प्रकाशात बसल्यावर मनाला भिडलेले आणि जीवनाला खऱ्या अर्थाने नवे वळण देऊन गेलेले अनेक प्रसंग डोळ्यांसमोरून झर्रकन सरकतात. यात वेळ कसा जातो, ते कळतच नाही. म्हणूनच वर्तमान, भविष्याकडे लक्ष द्यायला हवे, असे सांगतिले जात असले तरी आठवणींची दुनिया निराळीच. अक्षरशः आयुष्याचा पट या आठवणींत दडलेला असते. लेखिका सुधा मूर्ती यांचे `तीन हजार टाके` हे पुस्तक म्हणजे त्यांच्या आयुष्यातील अशाच आठवणींची, प्रसंगांची कथामालाच. त्यांच्या सोप्या, सरळ लेखनशैलीमुळे त्या कथा अधिक खुलल्या आहेत. म्हणूनच त्या थेट मनाला भिडतात. यातील काही कथा अगदी सामान्य किंबहुना समाजाच्या दृष्टीने दुर्लक्षित व्यक्तींभोवती फिरतात, परंतु त्याचबरोबर त्यांचे असमान्य जीवनही उलगडवतात. माणसाचं माणूसपण दाखवताना त्याच्यातील दुष्ट प्रवृत्तीही समोर आणतात. थोडक्यात, मानवी जीवनाचे विविध पैलू या कथांद्वारे समोर येतात.
लेखिका `इन्फोसिस फाऊंडेशन`मध्ये काम करत असताना विविध प्रकारच्या घटकांसोबत त्यांचा परिचय आला. यातून त्यांना दुर्लक्षित घटकांचे जगणे समजून घेता आले आणि त्या माणसांच्या प्रेमाची पुंजी जमा होत गेली. या प्रवासात आलेले खाचखळगेही लेखिकेने मांडले आहेत. तीन हजार टाके या कथेत देवदासींसाठी काम करण्याचा लेखिकेचा अनुभव समोर येतो. सुरुवातीला हा प्रवास खडतर होता. पण मदत करण्याचा लेखिकेचा निर्धार इतका पक्का होत गेला की, हळूहळू त्यांचा मार्ग मोकळा झाला आणि देवदासींना सन्मानाने जगणे शक्य झाले. आणखी एका कथेत लेखिकेने आपला इंजिनीअरिंगच्या शिक्षणाचा प्रवास मांडला आहे. हे आव्हानही सोपे नव्हते. संपूर्ण कॉलेजमध्ये एकटीच मुलगी असल्याने क्षणोक्षणी त्यांच्यासमोर प्रश्न उभे राहत होते. पण शिक्षकांची साथ आणि शिक्षणाचे ध्येय या जोरावर त्यांनी असंख्य मुलींना इंजिनीअरिंग कॉलेजची कवाडे खुली करून दिली. मुलींसाठी स्वच्छतागृह नसल्यासारख्या प्राथमिक अडचणींनाही त्या सामोरे गेल्या. हा प्रवास स्तब्ध करतो. लेखिकेचे चित्रपटाचे प्रेम, बॉलिवूडसंदर्भात आलेले अनुभव, त्यांच्या नातींनी आजच्या काळाची सांगड घालून सांगितलेल्या पौराणिक गोष्टी, विविध भाज्यांविषयी माहिती, या कथा गंमत आणतात. यात लेखिकेने आपल्या वडिलांच्या आयुष्यातील एक कथाही मांडली आहे. एका चित्रपटात शोभेल अशी कथा त्यांच्या वडिलांच्या मनाचा मोठेपणा अधोरेखित करते. आपल्या मदतीची समोरचा जाणीव ठेवत नाहीत, असे आजकाल सर्रास म्हटले जात असले तर लेखिकेच्या वडिलांनी त्यांच्याही नकळत एका तरुणीला केलेल्या मदतीने तिचे सारे आयुष्य कसे पालटले, हे वाचून अक्षरशः अवाक व्हायला होते. काही हलक्याफुलक्या, काही माणसांच्या वेदना सांगणाऱ्या, तर काही त्यांचे संघर्ष सांगणाऱ्या या कथा म्हणजे एक परिपाठच आहे.
- सकाळ दि. ४/२/२०१८
सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या या कथा. त्यांना आलेले अनुभव, एखादा प्रसंग, भेटलेली एखादी व्यक्ती यांच्यातून कथाबीज घेऊन सुधा मूर्ती त्याचं छानशा कथेत रूपांतर करतात. या पुस्तकातल्या बहुतेक कथा या सत्य घटनांवर आधारित आहेत. सुधा मूर्ती यांनी त्यांच्या खास शैलीत, त्यांचं निरीक्षण नेमक्या पद्धतीनं मांडत आणि सकारात्मक प्रेरणा देत या कथा लिहिल्या आहेत. समकालीन अनुभवांकडं वेगळ्या पद्धतीनं बघायला लावणाNया या कथा. लीना सोहोनी यांनी अनुवाद केला आहे.