- ऑल अबाऊट बुक पब्लिशिंग,ऑग, सप्टेंबर 2018
Vishwas Patil takes readers to accompany the soldiers of Indian National Army and the Imperial Japanese Army through their advances across Myanmar (the Burma), Imphal and Kohima; and to witness the grim battles and the unparalleled sacrifices that the patriots made at the altar of freedom.
- Govind Joshi
लेखक विश्वास पाटील यांच्या लेखणीतुन साकारलेली, भारतीय स्वातंञ्य संग्रामातील सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारीत ही कादंबरी.
नेतांजींच्या आयुष्याचा संपुर्ण अभ्यास करून... अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेऊन...जागतीक ईतिहासाचा अभ्यास तसेच, कोहीमा,इंफाळ,जपान,जर्मनी ई. देशात जाऊन नेताजींशी निगडीत प्रत्येक स्थळाला भेटी देऊन त्यांनी हे पुस्तक साकारलं आहे. आपण पुस्तक वाचत असतानाच त्यांना हे पुस्तक लिहीन्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले असतील याची प्रचीती येते.
*नेताजी सुभाषचंद्र बोस* मात्रभुमीच्या स्वातंञ्यासाठी स्वत:च्या आयुष्याचं अग्नीकुंड करून त्यात स्वत:चीच समीध्या अर्पण करनारा हा महानायक.भारतीय स्वातंञ्य संग्रामात स्वत:च्या पराक्रमाच्या जोरावर ध्रुवासारख अढळ पद प्राप्त करनारा हा धुरंधर सेनानी.त्यांच्या आयुष्याचं एकमेव ध्येय होतं ते म्हणजे या भारतमातेला पारतञ्याच्या श्रंखलातुन मुक्त करणे.
या पुस्तकाच्या माध्यमातुन आपण जाणु शकतो की कीती विलक्षण प्रसंगानी आणी संघर्षाने भरलेलं आणी भारलेलं होतं नेताजींच जिवन.
साध..सरळ..नीरागस बालपण, जानकीनाथ व प्रभावतीदेवी यांच्यासारखे मायाळु आई वडील, आयुष्यातील प्रत्येक स्थीतीला त्यांची साथ देणारे मेजदा म्हणजेच त्यांचे जेष्ठ बंधु शरदबाबु व विभावती भाभी, व त्यांचे गुरू चित्तरंजन दास ही त्यांची बालपणीची जीवाला जीव लावणारी माणसं.
लहाणपना पासुनच स्वातंञ्य व स्वाभीमान या मुल्यांविषयी असणारा आदर...आई वडीलांचे संस्कार...स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव....गुरू चित्तरंजन दास यांचा लाभलेला सहवास...यातुन सुभाषबाबुंच्या जिवनाला आकार येत गेला.
स्वत:च्या बुद्धीमत्तेच्या जोरावर लंडनमधील ICS ही परीक्षा ते चौथ्या क्रमांकाने पास झाले होते. वडीलांच्या आग्रहास्तव त्यांनी ही परीक्षा दीली होती. त्यांच ध्येय ते नव्हतचं.जर त्यांनी ठरवलं असतं तर खुप आरामाच आणी सुखाच आयुष्य ते जगु शकले असते. पण त्यानी व्रत घेतलं होतं ते या भारतमातेला मुक्त करण्याचं...या देशातील अडतीस कोटी बांधवांना गुलामगीरीतुन मुक्त करण्याचं..त्यासाठी त्यांनी सुखासीन आयुष्याचा त्याग केला व संघर्षाचा मार्ग पत्करला.
त्यानंतर त्यांच भारतात परत येणं, काँग्रेस मध्ये प्रवेश...नेहरूंशी जमलेली मैञी..पुढं या मैञीचं काय होतं...गांधीजी–सुभाषबाबु संघर्ष (दोघांच लक्ष जरी एक असलं तरी त्यानंतर वाटा वेगळ्या झाल्या)...त्याआधी त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद भुषविलं होतं त्यांची ती कारकिर्द हे सर्व तुम्हाला या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल.
दुसर्या महायुद्धाचं औचीत्य साधुन शञुचा शञु तो आपला मिञ या नात्यानं रशिया, जर्मनी, ईटली, जपान अशा संपुर्ण जगाची मारलेली गरूडभरारी...हीटलर, मुसोलीनी, जनरल तोजो अशा हुकुमशहांच्या घेतलेल्या प्रत्यक्ष भेटी....त्याचदरम्यान एमीली आणी सुभाषबाबु यांचा प्रेम विवाह...रास बीहारी बोस यांच्यासोबत केलेली आझाद हिंद फौजेची स्थापना...रेडीयो वरील त्यांची ऊत्स्फुर्त व प्रेरक भाषणं....चलो दिल्ली चा नारा....जय हिंद हे अभिवादन...त्याचबरोबर तुम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी दुंगा ही ललकारी गर्जुन ऊठली...
जपानसारख्या हिशेबी देशाने सुद्धा नेतांजींच व्यक्तीत्व आणी देशप्रेम पाहुन त्यांना एक व्यक्तीचा दर्जा न देता राष्ट्रप्रमुखाचा दर्जा दिला...व त्यांची सर्वतोपरी मदत केली. पण जपानी सैन्यातील अंतर्गत संघर्ष...कोहीमा,इंफाळ याठीकानी अवेळी झालेला पाऊस....त्याचबरोबर हिरोशिमा व नागासाकी या शहरावर झालेले अणुहल्ले...व नेतांजींच अकस्मात निधन यामुळे आझाद हींद फौजेला माघार घ्यावी लागली.
18 आँगस्ट 1945 रोजी जरी नेतांजींच नीधन झालं असलं तरी....त्यांच बलीदान व्यर्थ गेलं नाही.आझाद हिंद फौजेचा आदर्श घेऊन भारतीय नौदल व सैनीक बंड करून ऊठले व ब्रीटीशांच धाबं दनानलं त्यांना कळुन चुकलं की आपले दिवस आता भरले.आणी काही काळातचं भारतीय स्वातंञ्याची घोषणा झाली.
ब्रिटींशांनी नेताजींच कार्य किंवा पराक्रम कीतीही लपवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्याविरूद्ध कितीही हरळ ओकली तरी त्यांच तेज सुर्यासारखं सपुर्ण हिंदुस्थानात पसरलचं...त्यानंतर महाराणा प्रताप व शिवाजी महाराजांच्या शेजारी नेताजींच्या तस्वीरी घराघरात लावल्या जाऊ लागल्या...प्रत्येक आई आपल्या मुलाचं नाव अभिमानानं सुभाष ठेऊ लागल्या. असं हे नेताजींच चित्तथरारक व संघर्षमय जिवनप्रवास अनुभवण्यासाठी हे पुस्तक वाचलचं पाहीजे....
- Umesh Jagtap
महानायक, सुंदर आहे
- Bajrang Mhatre
नेताजींची देशभक्ती आणि `खरे`गांधी यांचे वास्तवदर्शी चित्रण म्हणजेच `महानायक `!!
- Sunil Gangopadhyaya
I read Vishwas Patil`s Mahanayak. I was pleasantly
surprised at the presentation of the inter-action between the triumvirate of India`s struggle for independence: Subhash, Jawaharal Nehru and Gandhiji.
- The Times of India
What makes Mahanayak different is that unlike other books on Netaji, Patil has created a character who is human, with failings and strenghts, and who still emerges as a renaissance figure.
-
- The Week
Patil succeeds in his task as the book is a racy affair, highlighting the clash of wills that characterised Bose’s life - be it his titanic clashes with Mahatma Gandhi in the Congress or his armed struggle against the allies.