* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ZADVATA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177660463
  • Edition : 4
  • Publishing Year : AUGUST 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A STORY COMES IN DIFFERENT FORMS, IT SEARCHES THROUGH THE DIFFERENT MODES OF LIFE. NONE OF THE EXPERIENCES OR FORMS OF LIFE ARE FORBIDDEN TO IT. AT THE SAME TIME, THE WRITER UNDERGOES SOME PARTICULAR LIFE-STYLE. HE EXPRESSES THIS THROUGH HIS WRITINGS. STILL, HE TRIES TO TAKE AN AIM AT THE UNIVERSAL HAPPENINGS BASED ON HIS PERSONAL EXPERIENCES. THIS IN TURN MAKES THE STORY UNIVERSAL WITH ITS PECULIAR BODY AND FORM. THIS IS A UNIQUE FEATURE OF THE ARTISTIC STORIES. WE TASTE THE TRUENESS OF THIS THROUGHOUT ANAND YADAV`S STORIES SKETCHED IN "ZADVATA`, LITERALLY MEANING THE WAYS IN A JUNGLE. EVEN THOUGH THE AUTHOR IS EXPLAINING HIS PERSONAL EXPERIENCES, THE READERS FIND THEM TO BE UNIVERSAL. EACH AND EVERY LEAF OF ALL THE TREES MAKE THIS COME TRUE.
कथा ही विविध रूपांनी जशी अवतरत असते, तशी मानवी जीवनाची विविध अंगोपांगे ती धुंडाळत असते. तिला कोणतेही मानवी जीवन वज्र्य नसते. असे असले, तरी त्या कथेच्या निर्मात्या लेखकाच्या वाट्याला विशिष्ट जीवन आलेले असते. त्या विशिष्ट जीवनातील अनेक अनुभवांना आणि त्यांच्या घटकांना तो आपल्या कथेत साकार करत असतो. पण गमतीची गोष्ट अशी, की त्या विशिष्ट घटनाप्रसंगांच्या पदरांना धरून तो विश्वात्मक मानवी जीवन-सत्याचा वेध घेतो. त्यामुळे कथेचा अनुभवाकार, कथेचे शरीर विशिष्ट असले, तरी त्या कथेचा आत्मा, आशय विश्वात्मक असतो. कलात्मक कथेचा हा गुणविशेष असतो. आनंद यादवांच्या `झाडवाटा`मध्ये याचा प्रत्यय येतो. ते `झाडवाटा` धुंडाळत असले, त्या वाटांवरील अनुभव व्यक्त करत असले, तरी त्या कथांचा आशय, आत्मा मात्र सर्वच मानवी मनांना आपलासा वाटतो. `झाडवाटा`ची ही किमया पानोपानी अनुभवाला येते.

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 15-04-2001

    झाडवाटांवरचा नवा प्रवास… गाव आणि शहर यांच्यातील फरक हा केवळ सोयीसुविधांचा नसतो, तर तो विभिन्न जीवनदृष्टींचा फरक असू शकतो– असा प्रत्यय देणाऱ्या कथा झाडवाटांमध्ये भेटतात. मराठी कथेला आणि पर्यायाने कथालेखकांना वर्णनांचा सोस असल्याचे दिसते. आनंद यादवां्या कथेतील वर्णने कथाबीज घेऊन येतात, नेमकी असतात. ‘एका दगडी घराचा इतिहास’ या कथेमध्ये वस्तुत: तो त्या घरातील गुंडांचा इतिहास आहे. भमा मांग व त्याचे भाऊ यांचा गावात चालणारा अमानुष कारभार, गुंडगिरी, खून, दहशत याचा प्रत्यय या ‘इतिहासा’तून येतो– ‘... ह्या घराला पोरांनी मारलेली ढेकणं, पुसलेला शेंबूड, कोळशाच्या रेघोट्या आपल्या भिंतीच्या अंगावर वागवायला अभिमान वाटायचा–’ यासारखे अभिप्राय किंवा दोन पैकी उजव्या बाजूची खिडकी बुजवल्यामुळे ‘खुनात डोळा फुटलेल्या जानू पैलवानागत ते घर वाटतं’– अशा वर्णनांमधून घराचा इतिहास, घराचे नायक (?), घराचे कथानक एकाच वेळी आकळतं. आणि अशा घराचे भवितव्य काय? हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात सुचवून कथा संपते. ‘बाकड्यावरचं जग’ ही रूढ अर्थाने कथा म्हणता येणार नाही. अनिल अवचटांची आठवण करून देणारी शैली यात आनंद यादव वापरतात. रिपोर्टाजसारखा प्रवासाचा आढावा यात घेतला आहे. त्यातील प्रवासाचे रूपक ‘बहुप्रसवी’ आहे व ते अंधारयुग, अश्मयुग, आधुनिक युग या साऱ्याचा समावेश करणारे आहे. आपण खरंच प्रगत झालो का? ‘आपली खेडी’ आणि ‘प्रसार माध्यमे त्यांचे जे चित्र उभे करतात’ यातील दरी किती सखोल आहे याचा अंदाज या कथेमधून येतो. ‘झाडवाटा’ ह्या १३९ पानी कथासंग्रहात आनंद यादव यांच्या एकूण १४ कथा आहेत. अपघातामध्ये हात गमावल्यानंतर जगावं लागणारं विमनस्क जगणं, हातांच्या अभावी जगण्यातील अपुरेपणा, ठसठस यांचा अत्यंत संयत अनुभव घेऊन ‘हात’ ही कथा आपल्यासमोर येते. खाजवणे, लाळ पुसणे, घोंघावणाऱ्या माशा उडवून लावणे इ. अनेक गोष्टींना पारखा झालेला, मनाने घायाळ झालेला अपंग व त्याची बायको मंजी यांचे चित्रण दूर कथेमध्ये केले आहे. अपघतावर मात करून जगण्याची ताकद व इर्षा यांचा या कथेमध्ये मिळणारा प्रत्यय परिणामकारक आहे. हत्तींच्या कळपामधील घडामोडींवर लिहिलेली ‘नर’ही कथा हत्तींच्या बारीकसारीक तपशिलांमुळे विचक्षण झाली आहे. हत्तींच्या हालचाली, त्यांचे कान हलवण्याची रीत, सोंडेने फुत्कार सोडणे, तसेच कानोसा घेणे, बेचैनीत पाय हलविणे यासारखी वर्णने नैसर्गिक व म्हणून प्रवाही झाली आहेत. स्थूल मादीची आकांक्षा धरणारा एक नर हत्ती, त्याची तिच्यावरील माया, त्यांचे खेळ व चाळे– कळपाच्या प्रमुखाशी तिच्यामुळे घेतलेले वितुष्ट, त्या ‘महाराजांशी’ दिलेली टक्कर तिथपासून त्याने कळप सोडणे, दुसऱ्या मादीशी त्याला पकडून नेण्यापर्यंतच्या घडामोडी या कथेत आहेत. पालवी आणि पानगळ ही कथा दत्तोबा व त्याच्या भावंडांची सावकारी कर्ज, सव्याज परतफेड, बापाचं छत्र उठलेलं, सोबत तीन धाकटी भावंडे या दत्तोबा एका कमजोर क्षणी घर सोडून जातो. नंतर तो २०-२५ वर्षांनी परत येतो. तोवर त्याच्या तिघा भावांची ३ घरे झालेली असतात. कूळकायद्याचा फायदा होतो. सावकारीचा नष्टावा झाल्यामुळे, भाऊ गेला तरी तशीच झगडत राहिलेली किसाखा, रामजी, मारुती ही दत्तोबाची भावंडे हळूहळू भरभराटीस येतात. मोठी होतात. गब्बर होतात. लग्न, संसार व प्रेम याला मुकलेला एक अभागी भाऊ ‘पालवी आणि पानगळ’ मध्ये रंगविला आहे. एकीकडे परंपरेशी नातं सांगणाऱ्या आनंद यादव यांच्या कथा ‘ग्रामीण’ आहेत, पण त्या कथांमध्ये घटनांपेक्षा, चित्तथरारक कलाटणीपेक्षा, दृष्टिकोनांचा विस्तार दिसतो. कथेतील कथाबीज हे ग्रामीणतेमुळे बहरास येते. आनंद यादवांच्या कथेतील ग्रामीणता ही ‘ग्राम्य’ भाषेमुळे आलेली नाही. वर्णनांमुळेही आलेली नाही. अनुभवाच्या अस्सल मुशीतून यादवांनी ग्रामीणता येते. आकारते. म्हणूनच संकेतसाध्य वाटा सोडून या झाडवाटांनी केलेला प्रवास जास्त बहारीचा, ताजा व स्वयंशोधात्म झाला आहे. काही कथा ह्या ‘रिपोर्टाज् ’ ह्या रूपबंदाशी जास्त जवळीकीचे नाते सांगत असल्यामुळे त्यांना ‘कथा’ म्हणताना, कथेची व्याख्या फारच रुंदवावी लागते. प्रसन्न नसला तरीही एक अस्सल अनुभव आपल्याला झाडवाटांमधून मिळतो. हा अनुभव आपल्याला मराठी ग्रामीणतेच्या अंतरंगाचे दर्शन घडवितो. मराठी समाज, मराठी कृती व मराठी परिसराचा आरसा बनून हा अनुभव येतो आणि सहजरीत्या आपल्याला भिडतो. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 05-08-2001

    महाराष्ट्राच्या मातीत उमललेल्या झाडवाटा… झाडवाटा म्हणजे रानवाट ! सापासारखी वळणं, वळसे घेत झाडीतून, रानातून जाणाऱ्या वाटा. झाडं आणि रानं आता ग्रामीण भागातच उरलेयत, त्यामुळे ‘झाडवाटा’ हा ग्रामीण कथांचा संग्रह हे वेगळे सांगायला नको. आपल्या देशाच्या, साजाच्या पूर्वापार चालत आलेल्या व्यवस्थेचा केंद्रिंबदू गाव हा होता. आपली ही ग्रामाधारित समाजरचना शतकानुशतकं टिकली. तिच्यात दोष नव्हते असं नाही, तरीही अनेक परकीय आक्रमणांना तोंड देऊन ती टिकून राहिली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हीच रचना तिच्यातले दोष काढून टाकून चालू ठेवायला हवी होती किंवा ती व्यवस्था पूर्णच बदलून तिच्याचसारखी सर्वांगीण म्हणजे संपूर्ण समाजाचा विचार करणारी नवी रचना आणायला हवी होती. दुर्दैवाने आपल्या नेत्यांनी आपल्या समाजाचा विचार पाश्चिमात्त्य चष्म्यातून केला. जुनी रचना कालबाह्य म्हणून रद्द ठरवली. नवी रचना करण्याची तर त्यांच्यात कुवतच नव्हती. लोकशाहीवर आधारलेला समाजवादी भांडलवाद आम्ही स्वीकारला. परिणामी या सगळ्या व्यवस्थांमधले तोटेच फक्त आमच्या नशिबी आले. विकास या गोंडस नावाखाली सगळं जीवनच बकाल होत चाललंय. शहरं प्रमाणाबाहेर फुगतायत आणि गावं ओस पडतायत. रोजगाराच्या संधीच नाहीत. मग माणसांनी तरी काय करावं ? उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी असं एकेकाळी म्हटलं जात असे. आज ही म्हण नेहमी उलटी झालीय. ज्या गावामधले लोक आमदार, खासदार, मंत्रीबिंत्री झाले त्यांनी सरकारी पैसा आपापल्या गावांकडे वळवला. कालवे आले. धरणं झाली. कोरडवाहू शेतीची बागायत झाली. साखर कारखाने आले, पण तिथला सर्वसामान्य माणूस सुखी झाला का ? याचं उत्तर नकारार्थी आहे. पूर्वी वतनदार, देशमुख, देशपांडे, पाटील असत. ते सामान्य रयतेला गुलामासारखं वागवत. आमदार - खासदार या त्यांच्याच आधुनिक आवृत्त्या. ते आणि त्यांचे हुजरे गब्बर झाले. शहरातलं गलिच्छ राजकारण त्यांच्यामार्फत थेट गावापर्यंत धडकू लागलं. साखर कारखान्यांच्या मळीचा उपयोग करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी मद्यार्क कारखाने निघाले. दारूची दुकानं निघाली. गोर-गरिबांचा ग्रामीण महाराष्ट्र एका नव्याच विळख्यात अडकत चालला. प्रस्तुत ‘झाडवाटा’ या कथासंग्रहातून आनंद यादवांनी जुनी समाजरचना, उद्ध्वस्त झालेल्या ग्रामीण महाराष्ट्राचा वेध घेतला आहे. बाकड्यावरचं जग, नवे वळण, झाडांची रानवाट या कथांमधून बदलत्या महाराष्ट्राचं लेखकाने केलेलं चित्रण वाचकाला अस्वस्थ करतं, अंतर्मुख करतं. कुटुंबनियोजन ही आमच्या सरकारची अशीच एक विकास संकल्पना. वाढत्या लोकसंख्येमुळे देशाच्या समस्या वाढतात. म्हणून कुटुंबनियोजन जवळजवळ सक्तीचं करण्यात आलं. जिल्हा परिषदांच्या शाळांमधले शिक्षक म्हणजे जणू हक्काचे गुलामच. त्यांना प्रत्येकी वीस -वीस माणसं गोळा करून आणण्याचे हुकूम सुटले. शिक्षकांनी मुलांना शिकवायचं की सरकारी कोटा पूर्ण करण्यासाठी नसबंदीच्या केसेस जमा करायच्या ? पण सारासारविवेक आणि सरकारी अधिकारी यांचा संबंधच काय ? ‘बदली’ या कथेतला रेड्यासारखा माजलेला एडकेसाहेब मोरे मास्तरांना हुकूम सोडतो. ‘गावातून वीस माणसं गोळा करून आणा, नाहीतर शाळेतली पोरं हाकून आणा. कोटा पूर्ण झाला पाहिजे.’ मोरे मास्तर पळून जातात आणि परिणाम म्हणून नको त्या गावी बदलीचा हुकूम त्यांच्या हातात पडतो. एका शाळामास्तराच्या ओढगस्तीच्या संसाराचं, आजच्या तथाकथित विज्ञानयुगातही समाजात पक्क्या रूढावलेल्या काही समजुतींचे चित्रण लेखकाने यथार्थ उभं केलं आहे. संस्कृत साहित्यात शरद आणि वसंत या ऋतूंची बहारदार वर्णन आहेत. भौगोलिकदृष्ट्या पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या या महाराष्ट्रात मात्र वर्षा हाच ऋतू सर्वात बहारीचा. त्यातून तो पावसाळा दुष्काळानंतरचा बरसणारा असेल तर मग बघायलाच नको. ‘दुष्काळानंतरचा पाऊस’ या कथेत तीन वर्षांच्या दुष्काळानंतर बरसणाऱ्या पावसाचं आणि तो धुवाधार पाऊस अंगावर झेलणाऱ्या माणसांचं, त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियांचं अत्यंत बहारीचं वर्णन लेखकानं केलं आहे. लेखकासोबत आपणही त्या झिम्मड पावसात भिजू लागतो. पावसाच्या बरसत्या धारांबरोबर लेखकाचा कृत्रिम शहरीपणा जसा वाहून जाऊ लागतो आणि निसर्ग त्याच्या मृद्गंदासह अंगात भिनू लागतो तशीच स्थिती वाचकाचीही होऊन जाते. एकंदरीत ‘झाडवाटा’मधल्या कथा महाराष्ट्राच्या अस्सल मातीतून उमलून आलेल्या आहेत. या मातीचे गुण आणि दोष, व्यथा आणि वेदना, सुख-दु:खं सारं काही अस्सल मराठी ढंगात इथे आलेलं आहे. पश्चिमी ढंगाची नटवी कृत्रिमता इथे जराही नाही. चंद्रमोहन कुलकर्णीचं मुखपृष्ठ आणि सुनील मेहतांची निर्मिती उत्तम. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHIKASANTVANAM
RADHIKASANTVANAM by MUDDUPALANI Rating Star
केदार मारुलकर

एक डॉक्टर काय काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या पुस्तक परिचयासाठी निवडलेल्या पुस्तकाचे लेखक (खरे तर अनुवादक) *डॉ. शंतनू अभ्यंकर.* पुण्याच्या बीजे मेडिकल मधून एमबीबीएस. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण. आयएमए तसेच इतर संघटनेत विविध पदांवर काम. अनक परिषदांमध्ये शास्त्रीय विषयावर शुद्ध मराठीत व्याख्याने. २५ वर्षाहून अधिक काळ ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा. लोकविज्ञान संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा संघटनांमध्ये काम. विज्ञान लेखक, भाषांतरकार, ब्लॉगर आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे समाजात सर्वसाधारणपणे *न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर लेखन* आणि प्रसंगी *प्रचलित समजाला तडा देणारे परखड भाष्य* करण्याची धमक. *पुस्तक परिचय* मुद्दूपलनी ही अठराव्या शतकातील राजे प्रतापसिंह यांची भोगपत्नी. अनुपम सौंदर्य, बुद्धिमत्ता, चातुर्य, शृंगारनिपुणता बहुभाषाकोविद अशी देवदासी स्त्री. राधिकासांत्वनमु हे तेलगू भाषेतील काव्य तिने रचले. परंतु नंतरच्या काळात अश्लील ठरवून त्यावर बंदी घालण्यात आली. देश स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा एकदा या काव्याला प्रकाशित होण्याचे भाग्य लाभले. गेल्याच वर्षी हे काव्य मराठीत अनुवादित करून डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी मराठी रसिकांना हा सांस्कृतिक ठेवा उपलब्ध करून दिला आहे. तंजावरच्या तत्कालीन मराठी राजवटीचं एक वेगळंच वैशिष्ट्य होतं. मराठी राजे आणि तमिळ प्रजा. या राज्याची प्रसिद्धी इतर कलांइतकीच कलावंतिणींसाठीही होती. देवदासी, देवरंडीयल, कलावती, गुडिसानी, भोगदासी, नगरशोभिनी, राजगणिका अशी, काही आज आपल्याला खळबळजनक वाटतील अशी, नावं होती. एक समृद्ध परंपरा होती. तिथे गणिकांनाही प्रतिष्ठा होती. अशीच एक गणिका-मुद्दूपलनी. तिची एक रचना म्हणजेच राधिकासांत्वनमु. तेलुगूमध्ये सांत्वन म्हणजे रुसवा काढणे. अतिशय शृंगारिक, भावनाप्रधान, बिनधास्त आणि प्रसंगी अश्लील म्हणावं असं हे काव्य. अर्थात श्लिलाश्लिलतेच्या कल्पना कालसापेक्ष असतात. राधा-कृष्ण आणि इलाची गोष्ट सांगतासांगता ती राजे राजवाड्यांच्या राज्याचीच नाही, तर स्त्रियांच्या अंत:करणाचीही दारे सताड उघडून दाखवते. मराठीमध्ये इतकं शृंगारीक काव्य लिहिलं गेलं नाही.त्यात शृंगारीक लेखन म्हणजे लिहिलंच तर पुरुषांनी लिहावं, असा अलिखित नियम. शृंगार आणि अश्लीलता याच्या सीमारेषेवर असलेलं हे काव्य एका स्त्रीने लिहावं हे म्हणूनच आगळंवेगळं ठरतं. राधा-कृष्णाच्या कथेने भल्याभल्यांना मोहात पाडले आहे. पण राधाकृष्णाची बहुतेक प्रेमकाव्ये कितीही सुंदर आणि शृंगारिक वर्णनांनी भरलेली असली तरी अखेरीस राधाकृष्णाचे मिलन म्हणजे; पुरुष आणि प्रकृतीचे मिलन, असा शोध लावून त्याला एकदम अध्यात्मिक रूप दिलं जातं. राधिका सांत्वनम् मध्ये कृष्ण आणि राधा, कृष्ण आणि या काव्यातील प्रेमत्रिकोणाचा तिसरा कोन- इला, यांचे नाते अगदी सर्वसाधारण स्त्रीपुरुषांसारखे रेखाटले आहे. आपली पार्श्वभूमी सांगून ही गणिका राधिकासांत्वनमची मुख्य कथा सुरू करते. राधा-कृष्णाच्या प्रणयलीला तर सगळ्यानाच माहीत आहेत. या काव्यातील प्रौढ राधा, तरुण कृष्णाचे आणि नुकत्याच यौवनात आलेल्या इलाचे लग्न लावून देते. कृष्ण इलेवर असा काही भाळतो की राधा रहाते बाजूला. आता राधेला पश्चात्ताप होतो. विरहाने पोळलेली राधा, कृष्णाला विनवून परत बोलवते. तो येतो. पण दुखावली गेलेली राधा त्याला फार महत्व देत नाही. त्याला राधेची आर्जवं करायला लागतात. तरीही राधा त्याला बधत नाही. मग कृष्ण आपले हुकूमी अस्त्र काढतो. आपल्या कामलीलांनी तिला घायाळ करतो, राधा पुन्हा आकृष्ट होते, दोघांचे मिलन होतं. इथे राधिकासांत्वन सुफळ संपूर्ण होतं, अशी ही काव्यरुप कथा. यातील दोन्ही नायिका अगदी मुद्दूपलनी सारख्याच आहेत. रुपगर्विता, हुशार तितक्याच हट्टी. इला नवथर तरुणी; तर राधा प्रौढ, प्रेमस्वरूप कृष्णसखी आणि दोघींचा नायक कृष्णसखा. पण सारा भर आहे तो ह्या दोन नायिकांच्या मनतरंगांवर. यातल्या दोन्ही नायिका कृष्णावर वर्चस्व गाजवणाऱ्या आहेत. प्रेमासाठी आसुसलेल्या आहेत. अनुभूती मोकळेपणानी व्यक्त करणाऱ्या आहेत. वयात येणे, विरह,असूया, प्रेम-द्वेष अशी भावनांची लपाछपी, असं बरंच काही हे काव्य उलगडून दाखवते आणि तेही एक स्त्रीच्या नजरेतून. हा नजारा थक्क करणारा आहे. हे शृंगारीक असलं तरी उत्कट आणि रसाळ काव्य आहे. या काव्याचा इंग्रजीतही अनुवाद झाला आहे. डॉ. शंतनू यांनी छंदोबद्ध भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. छंदोबद्ध असल्याशिवाय भाषांतर त्या काळातील वाटणारच नाही. मूळ छंद/वृत्त काय आहे याचा अंदाज अर्थातच इंग्लिश ओळी वाचून येत नाही. मग काही ओळी वाचायच्या, एखादी ओळ सुचेल तशी लिहायची आणि मग कारागिरी करत करत इतर ओळी जुळवायच्या; असा प्रकार करत भाषांतर केल्याचे मनोगतात लिहिले आहे. मराठीत हे सगळे काव्य लिहिताना पुणेरी भाषा वापरली असली,तरी त्यात दुर्बोधता नाही. अभंग, मंदाक्रांता, मालिनी, दिंडी, हरिभगिनी आणि लावणीसदृश ठेक्यात बसणाऱ्या काही चाली यात वापरल्या आहेत. काही ठिकाणी पद्यमय संवाद लिहिले आहेत. पुस्तक परिचय लिहिताना यातील काही ओळी उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. काव्याची सुरवातच राधेच्या बहारदार वर्णनाने होते. _थोरांनी नावाजली, गौरांगी सर्वांहुनी, शकुंतला, शुकभाषिणी, नंदाक्का राधा ही. आणि तिचे ते डोळे, नसते जर कृष्णकळे; का हरी कटाक्ष पुरे, चमकाया नयनदले?_ यानंतर षोडशा इलेचं वर्णन या शब्दांत _कृशांगा, नाजुकांगा, वेणीसंभार सोसवेना; मुखमोती दिव्य ज्योती, देवी इला, यौवना ही_ कृष्णावर भाळलेल्या इलाचे मनतरंग रेखाटताना म्हटले आहे- _लपंडावी डोळे झाकाया, फक्त मुरारी हवा इलेला. शिवशिवीचा खेळ रंगता,हिचे इशारे पळता पळता. नदीकिनारी साधून मौका, इला झोंबते हरीच्या अंगा. सदैव हरी-सह, हरीच सहचर, खेळ मिषे सुखस्पर्श अनावर. सख्यांस कौतुक सखिचे नवथर उधळून यौवन, धीट, खोडकर इला भाळली श्री कृष्णावर!_ कृष्ण आणि राधेचा प्रणय तिच्या नजरेतून सुटत नाही... _ओठ आरक्तही देता राधा, इला तुळीतसे ओष्ठ सौष्ठवा; दंतपंक्ती त्या सहज चमकता, फिके जाणी स्मित आपुले इला, शेजघरी ने कृष्णा, राधा; म्हणे ‘आले मी’, इला बाला!! मजेत हसती श्रीकृष्ण-राधा!_ राधेलाही इला मोठी होण्याची आतुरता, उत्सुकता आहेच... _कधी म्हणे विनोदे राधा, ‘ही मला सवत होई का?’ पण पाहताच इलेला, उरी उधाण ये मायेला, कुस्करी मग वारंवार, चुंबीते गोबरे गाल._ पण लग्नानंतर राधाने इलेला दिलेला संदेश आणि कृष्णाला दिलेला `दम` बहारदार आहे. इलेला संदेश _दे विश्वास अन् दे प्रोत्साहन. जाण असे तो प्रीत पुरुषोत्तम काम निपुण तो प्रेमिक उत्तम ...दे, कोमल तन, कोमल दे मन, प्रीत मनस्वी, तुझाच प्रीतम.’_ कृष्णाला `दम` _‘कठोर कांचन माझी काया, लता जणू ती, तनू कोमला, धिटाई हळू, बुजेल इला, सांभाळा तुम्ही गोपाळा!’_ काही ओळी मात्र आजही सर्वसामान्य पुरुषांनाही लागू पडतील की काय, इतक्या चपखल झाल्या आहेत. _नाही कशी मुळी लाज ;हवी मजा, वरती माज ; पुरूषांचे नीत्य काज ; बाईच्या मनीची आस कोणी ना पुसे त्यास_ चार भाग आणि ५८४ पदं असलेलं हे काव्य शृंगारीक असेलही, नव्हे आहेच. पण स्त्रीसन्मानाचा, प्रतिष्ठेचा आणि संवेदनशील मनाचा ठाव घेणारा तो एक ठेवा आहे. _इतिश्री शंतनूविरचितम् राधिका सांत्वनम् भावानुवादस्य केदारकृतपरिचयम् संपूर्णम् ...Read more

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/7120?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR06UVpU4k8DLSaBDkgmglzUuRMuX2XQ3OKxRAdL-tQo1-DZwHV7_Q3uLE4_aem_ATgHVeQrpR7vbtSsdHKWSXs5EHm0mPjS_5lEI-n3B5uorlbUPMjKGOX9doFKfROrOtk