* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ZIMZIM
  • Availability : Available
  • ISBN : 9788171612932
  • Edition : 4
  • Publishing Year : 1961
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHORT ESSAYS FROM ZIMZIM DESCRIBES A STORY WITH SENSORY DESCRIPTIONS. V.S.KHANDEKAR NOT ONLY TELLS STORY, BUT ALSO MAKE A POINT BY GIVING REASONS. IN THESE ESSAY’S A WRITER TRIES TO CONVINCE HIS READERS TO ADOPT HIS POSITION ON A POINT OF VIEW OR ISSUE AFTER HE PROVIDES THEM SOLID REASONING IN THIS CONNECTION.
‘‘कुठल्याही वस्तूची दुर्मीळता झाली की तिची किंमत वाढू लागते. हा अर्थशास्त्राचा सिद्धान्तच वासंतिक वायुलहरींच्या लोकप्रियतेच्या मुळाशी आहे. वर्षाकालातल्या उद्दाम वायाच्या बाबतीतही आपली अशीच वंचना होत आली आहे. मदोन्मत्त हत्तीने शुंडादंडाने सुंदर उद्यान उद््ध्वस्त करावे, त्याप्रमाणे धूळ उधळीत आणि वृक्षवेली उन्मळीत थैमान घालणाया झंझावाताचे जगाने कौतुक करावे, ही प्रथमदर्शनी मोठी विचित्र गोष्ट वाटते. पण मनुष्य बाह्यत: कितीही सुधारला तरी त्याचे मन हे लहान मुलाचेच मन राहते. त्याला भव्यतेचा सदैव मोह पडतो. डोळे दिपविणाया गोष्टीप्रमाणे अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या गोष्टींत काव्य आहे, असे त्याला वाटते. म्हणून तर जगात विध्वंसकांची अजून पूजा केली जाते. रक्ताच्या नद्या वाहविणायांची नावे इतिहास अभिमानाने उच्चारतो. पण एखाद्या नंदादीपाप्रमाणे शांतपणाने तेवत राहणाया, जग आहे त्यापेक्षा थोडे का होईना अधिक चांगले व्हावे म्हणून आयुष्यभर मूकपणाने काम करीत राहणाया माणसाची त्याला आठवणसुद्धा राहत नाही.’’ अंतर्मुख करणारे, नवी दृष्टी देणारे लघुनिबंधसंग्रह.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #फुले आणि दगड #सूर्यकमळे (अनु.) #ढगाआडचे चांदणे #पहिली लाट #हस्ताचा पाऊस #सांजवात #आजची स्वप्ने #प्रसाद #चंद्रकोर #कालची स्वप्ने #अश्रू आणि हास्य #घरट्याबाहेर #कवी #मुरली #झिमझिम
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 15-04-2018

    प्रतिभावंत ललित निबंधकार... खांडेकरांचे अभिजात ललित निबंध आपल्याला त्यांच्या विस्तृत अनुभव विश्वात घेऊन जातात, त्यांच्या तरल, कल्पनाशक्तीचे दर्शन घडवतात, आणि सुंदर भाषाशैलीने प्रभावित करतात. ते वाचत असताना आपल्या लक्षात येते, की प्रतिभासंपन्न ललित नबंधकाराला विषयांची कमतरता कधी जाणवतच नाही. कारण साध्या विषयातला अपेक्षित आनंद किंवा मोठा आशय शोधून काढणे हे कवीप्रमाणे लघुनिबंधकाराचेही कार्य असते. त्यामुळेच लोकांना क्षुद्र आणि निरर्थक वाटणाऱ्या विषयातलासुद्धा आनंद त्याला हळुवारपणे टिपता येतो आणि वाचकांपर्यंत पोहोचवता येतो. -अरविंद बोंद्रे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 11-12-1993

    रोजच्या पाऊलवाटेवरून फुफाटा तुडवीत चालत असताना कडेचं तोडकी सावली देणारं एखादं झाड क्षणभर विसावून पुन्हा फुफाट्यातून चालत असताना अचानक पावसाच्या धारा याव्या आणि मृदगंधाच्या पायघड्यांनी पावलं खिळून रहावी असं आसमंताचं देखणं रूप किती मोहक, हवसं ! असचं काीसं ‘झिमझिम’ या लघुनिबंध संग्रहाबद्दल म्हणता येईल. वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकर हे साहित्यक्षेत्रातल मानाचं ‘पान’... भाऊसाहेबांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेलं प्रत्येक पान जीवनाचा अर्थ उलगडून सांगणारं... तुम्ही, आम्ही अनुभवलेलं, अनुभव घेत असलेलं अनुभवयला येणारचं असं जीवनाचं तत्त्वज्ञान अगदी सहजरीत्या सांगण्याची शैली अत्यंत परिणमकारक आहे, त्यामुळेच तर खांडेकरांची कादंबरी जशी मनाची पकड घेते तसेच लघुनिबंध वाचतानाही जाणवते... ‘लघुनिबंध म्हणजे अलंकारिक शब्दात तत्त्वज्ञान सांगणे’ असं जे एक चित्र आपल्या मनात असतं ते खांडेकरांचे लघुनिबंधसुद्धा किती वाचनीय असू शकतो हे स्पष्ट होते. झिमझिम या लघुनिबंध संग्रहात एकूण बावीस लघुनिबंधांचा समावेश आहे. यातील विषयही अगदी आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांचे चित्रण म्हटल तरी फारसे वावगे ठरणार नाही. पाहुणे, घड्याळ, रात्रीचा पोषाख, न्हाणीघर, ध्रुवतारा यासारख्या परिचयातील घटकांवर इतके सूक्ष्म अवलोकन वाचून आपणही नव्यानं ह्या गोष्टीकडे पाहू लागतो. ‘हिवाळा’ या लघुनिबंधात खांडेकर वर्णन करताना म्हणतात. ‘आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी क्षुद्र लेखण्यात माणूस किती पटाईत आहे, पहा ! हिवाळ्यात या गार वाऱ्याविषयी जो तो तुच्छतेने आणि तुसडेपणाने बोलत होता ! वसंत ऋतूतल्या वाऱ्याच्या झुळकांना ‘वायुलहरी’ या नाजूक नावाने संबोधणारे आणि वर्षाकाळातल्या बेछूट वाऱ्याला ‘झंझावात’ हे काव्यमय नाव देणारे जग थंडीची ‘साथ’ करणाऱ्या वाऱ्याला अगदी नालायक मानीत होते. वासंतिक वायुलहरीचे साम्य किंवा झंझावाताचे तांडव यांच्यातले काव्य हिवाळ्यातल्या वाऱ्यात नसेल ! पण काव्य हा काही जीवनाचा आत्मा नव्हे, तो त्याचा एक अलंकार आहे आणि दोन ऋतुतल्या वाऱ्यातलया काव्याचे स्वरूप तरी काय ? पाहुण्यांना मोहक वाटलेल्या रानवेलींच स्वर स्वरूप आणि त्याबद्दलची चिकित्सा ‘वनलता’ या निबंधांतून सुरेख रेखाटलीय. ‘नवा कायद्यातले’ भविष्याविषयींचे तत्वज्ञान तुम्हा आम्हाला सहज पटते. भविष्यबंदीचा कायदा झाला, तर चारी बाजूंनी नीरस झालेले या माणसाचे जीवन अधिकच भकास होईल. जीवनात भव्य, रम्य, उत्कंट किंवा उदात्त असे काहीतरी असू शकते याचा ज्यांना कधीच अनुभव येत नाही त्यांना साप्ताहिक भविष्ये या आपल्या आयुष्यातल्या फार महत्त्वाच्या गोष्टी वाटाव्यात यात नवल ते कसले ? ‘नवे व्याकरण’ मधला जो नवा अर्थ लेखकांने सांगितला आहे. तो निश्चितच उदात्त, भव्य आहे. व्याकरणाच्या पठडीतला नियम आणि त्यानुसार बनलेली मानवी प्रवृत्तीवर हल्ला करताना खांडेकर म्हणतात. या व्याकरणाने तीन पुरुषांची तीन भिन्न रूपे कशाला निर्माण केली ? व्याकरणात जर केवळ प्रथम पुरुष रूप असते तर समाजाचे चित्रच बदलून गेले असते. पण द्वितीय, तृतीय पुरुष रूपाने माणूस स्वत:ची जबाबदारी झटकून वागू लागला. जो तो ‘सत्य बोला’, ‘परोपकार करा’, ‘मुक्या प्राण्यांवर दया करा’ असा उपदेश दुसऱ्याला करायला लागला. ‘मी परोपकार करतो’ असे म्हणण्याची आवश्यकता कुणालाच वाटेना. ओझे वाटून घ्यायची पाळी आली, ती त्यातला जडभाग दुसऱ्याच्या शिरावर लादायचा, हा मनुष्य स्वभावच आहे! व्याकरणाने तीन पुरुष कल्पून नेमके याच गोष्टीला उत्तेजन दिले, त्यामुळे जग सुधारण्याची जबाबदारी द्वितीय व तृतीय पुरुषांवर टाकून प्रथम पुरुष नामानिराळा राहिला ! यामुळे मानवी जीवनात दु:खे निर्माण झाली. सुरुवातीपासून व्याकरण शिकत असतानाही आपण कधी त्याकडे इकडे ‘डोळसपणे’ पाहिले नव्हते. उंच उडी, आवाज, धागा, तीन लाख सुनीते, सुविचार, कल्पना, आत्मचरित्रे या सारख्या लघुनिबंधातूनही खांडेकरांनी त्या-त्या घटकाकडे नव्याने बघण्याचा मार्ग वाचकांना दाखवला आहे. अगदी साध्या, सोप्या शब्दांत वाचणाऱ्याला मनोमन पटेल असं सत्य सांगण्याची हातोटी उत्तमच आहे. शेक्सपिअरचा ‘हॅम्लेट’, गांधींचा अहिंसावाद नेपोलियनची निडरता, शॉची नाटके यांचा ओघाने येणारा उल्लेख ‘दोन ध्रुव’ तली धोंडू मोलकरणीची झुणका-भाकर आणि वाकळीची ऊब झिमझिममधल्या पाहुण्यांच्या पंगतीची मानकरी होते, तेव्हा त्या-त्या व्यक्तिरेखेमधली लेखकाची ओढ नव्याने दिसते. ‘व्युत्पत्ती’, ‘सत्यंम ब्रूयात प्रियं ब्रूयात’ ‘पाच मिनिटे आणि एक तरुणी’ यातील रेखाटन सुरेख आहेत. मेहता पब्लिशिंगतर्फे प्रकाशित करण्यात आलेली झिमझिम हा वि. स. खांडेकर यांच्या लघुनिबंधाची द्वितीयावृत्ती वाचनीय आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांचे सुरेख मुखपृष्ठ पुस्तकाच्या आकर्षणात भर घालणारे आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more