* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EUTHANASIA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184982145
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 16 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DR. GHAISAS SET UP A HOSPITAL AT A PLACE POORLY DEVELOPED THOUGH CLOSE TO MUMBAI A FEW DECADES AGO. HE SOON BECAME A WELL KNOWN FIGURE IN THE VICINITY AS A DOCTOR, AS A FATHERLY FIGURE, AND A PHILOSOPHER. HE LED AN UNHAPPY PERSONAL LIFE: HIS DAUGHTER HAD AN INTER RELIGIOUS MARRIAGE IN THE USA, AND HIS WIFE PASSED AWAY AS A RESULT OF THE SHOCK. DR. GHAISAS LED A LONELY LIFE. HE ADOPTED AN ORPHAN, LENT SUPPORT TO A YOUNG RAPE VICTIM AND ENCOURAGED THE TWO TO STUDY MEDICINE. HE RECEIVED A BOLT FROM THE BLUE WHEN HE CAME TO KNOW THAT HIS DAUGHTER AND HIS SON-IN-LAW MET WITH A FATAL ACCIDENT. HE NOW TOOK THE GRANDSON UNDER HIS WINGS. EUTHANASIA HAS ALWAYS BEEN A HOT TOPIC OF DEBATE. WHILE IN PRINCIPLE ONE MAY AGREE TO OBLIGE TO END THE LIFE OF A TERMINALLY ILL PERSON TO RELIEVE HIM OF LEADING A PAINFUL LIFE, THERE ARE ETHICAL, LEGAL AND PRACTICAL CONSTRAINTS IN PERMITTING EUTHANASIA. IT IS THUS UNEXPECTED THAT IN SPITE OF AN EXCELLENT PROFESSIONAL CAREER, A HOLISTIC VIEW TO LIFE AND FULL KNOWLEDGE OF THE FACT THAT THE LAW OF THE LAND DOES NOT PERMIT EUTHANASIA, DR. GHAISAS OCCASIONALLY ADVOCATES USE OF EUTHANASIA TO THOSE FOR WHOM LIFE WAS MEANINGLESS.
मृत्यू म्हटलं कि भय,दुःख,वेदना काही टाळत नाही. जगण्यावरन आरपार प्रेम, मोह सुटत नाही. `आयुष्य नको आता` अस म्हणणारी माणस जास्तीत जास्त काळ जगतात. हे अस चित्र सर्वत्र दिसत. विकलांग झालेली शरीरही घितपत पडतात. ते आंतर्मनाच्या जगण्याच्या हव्यासापोटीच. नकोसी झालेली हि शरीर, त्रास , अपमान सहन करतात आणि मग अशाना शांत-चित्त मरण हाच अशा विचाराना प्राधान्य दिल जात.... आपणहूनच निर्णय घेतला जातो. मुक्ती दिली जाते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#EUTHANASIA #SWATICHANDORKAR #MARATHIBOOKS #MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
  • Rating StarPratik Kambale

    या दिवसांत वाचलेलं दुसरं पुस्तक! मुळात विषयच वेगळा असल्याने मन कथेत गुंतून राहतं. उगाचचा अतिरंजितपणा नाही. दयामरण असावं की नसावं? या प्रश्नाचं उत्तर शोधताना जो प्रवास घडतो, तो प्रवास म्हणजे #युथनेशिया. Swati Chandorkar यांचं वाचनात आलेलं हे पहिलंच पस्तक. विविध नात्यांबद्दल त्यांच्या संकल्पना, त्यांची वास्तविकता अगदी स्पष्ट आहे. खरंच! नाती ही आपुलकीवर टिकतात. रक्त वगैरे सगळ्या बाबी गौण आहेत. रक्ताची नाती फक्त वारसा सांगण्यासाठीच असावीत कदाचित. कदाचित एवढ्यासाठीच म्हंटल, कारण. सगळीच रक्ताची नातीदेखील स्वार्थाने ओतप्रेत भरलेली नसतात. ❤️ ...Read more

  • Rating StarSuneeta Joshi

    दयामरण किंवा इच्छामरण हे शब्द आपल्याला नविन नाहीत.तरीही या शब्दामागे एक गूढता आहे.याचा उघडपणे कोणत्याही डॉक्टर नी पुरस्कार केलेला नाही,किंवा कितीही पटत असले तरी ते व्यक्त करू शकत नाहीत असे वाटते,कारण डॉक्टर हे जीव वाचवण्यासाठी असतात,कोणालाही ते जाणूनबुजून मृत्यू देऊ शकत नाहीत.... याच नैतिक तत्त्वावर अवलंबून असणारी ," युथेनेशिया" ही स्वाती चांदोरकर यांची हृदयस्पर्शी कादंबरी वाचली. यात dr.घैसास यांच्या बरोबरच त्यांचे कुटुंबीय,त्यांचे सहकारी,त्यांचा दत्तक मुलगा आणि त्यांचा सख्खा नातू ह्यांच्यातील अनेक ताने बाणे सुंदर रित्या गुंफले आहेत. मला स्वतः ला ही कादंबरी खूप पटली आहे,तुम्हालाही नक्कीच पटेल.अवश्य वाचा....! ...Read more

  • Rating StarDAINIK PUNYANAGARI 13-03-2011

    ‘युथनेशिया’च्या निमित्ताने… अरुणा शानबाग या परिचारिकेला गेली ३७ वर्षे अंथरुणाला खिळून रहावे लागले आहे. तिच्या दयामरणाचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच स्वाती चांदोरकरलिखित ‘युथनेशिया’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. या कादंबरीत लेखिकेने दयामरणाचा मुद्दा कथमध्ये गुंफून प्रभावीपणे मांडला आहे. गेल्या आठवड्यात अरुणा शानबागच्या निमित्ताने दयामरण आणि इच्छामरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. याच काळात प्रसिद्ध कथाकार व. पु. काळे यांच्या कन्या स्वाती चांदोरकर यांनी लिहिलेली ‘युथनेशिया’ ही कादंबरीही दयामरणाच्याच प्रश्नावर बेतली आहे. पण, अरुणा शानबागच्या प्रश्नावर चर्चा सुरू होण्यापूर्वीच ही कादंबरी लिहून पूर्ण झाली होती. सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वीच स्वाती चांदोरकर यांनी ही कादंबरी लिहायला घेतली होती. या कादंबरीतील नायक डॉ. घैसास हे जगणे नको असल्या रुग्णांना दयामरण देऊन त्यांची सुटका करतात. इच्छामरण मागणे हे रुग्णाच्या हातात असते. कारण हा रुग्ण अंथरुणावर खितपत पडला असला तरी तो कोमात गेलेला नसतो. त्याची विचार करण्याची क्षमता आणि काही वेळा बोलणेही सुरू असते. आपण या आजारातून बरे होणे तर दूरच पण यापुढेही असेच अंथरुणाला खिळून राहू, सगळ्या उपचारांचा आणि व्याधीचा शरीराला त्रास होईलच पण आपली सेवा करणाऱ्यांनाही त्याचा त्रास होईल असे विचार त्या रुग्णाच्या मनात येत असतात. संपूर्ण आयुष्य सन्मानाने जगलेल्या या रुग्णाला आयुष्याच्या अखेरीस संपूर्ण परावलंबित्व पत्करणे मान्य होत नाही. त्यामुळे अशा रुग्णाने इच्छामरणाची मागणी केल्यास त्याला ते देता येते. परंतु कोमात गेलेल्या, सर्व भावना आणि संवेदना नष्ट झालेल्या रुग्णाला दयामरण देण्याचा निर्णय नातेवाईक आणि डॉक्टरांनाच घ्यावा लागतो. अशा वेळी रुग्णाच्या संपूर्ण परिस्थितीचे अवलोकन करून घेणे, रुग्णाची आणि नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती, रुग्णालयातून घरी नेल्यानंतर नातेवाईकांकडून होऊ शकणारा सांभाळ, रुग्ण बरा होण्याची शक्यता अशा सर्व गोष्टींचा सारासार विचार करून हा निर्णय घ्यावा लागतो. अनेकदा अशा रुग्णाला दयामरण दिल्याने त्याच्या नातेवाईकांच्या मनातही तो सुटल्याचीच भावना निर्माण होते. स्वाती चांदोरकर यांच्या युथनेशियाचा नायक रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या हालअपेष्टा कमी होण्यासाठी दयामरण देतो. पण, समाजविघातक प्रवृत्तींकडून त्याचा गैरवापरही केला जातो. ही कादंबरी सत्य परिस्थितीवर आधारित असली तरी त्यातील पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत. या कादंबरीबद्दल बोलताना स्वाती चांदोरकर म्हणता, ‘कादंबरीतील पात्रे मला प्रत्यक्षात जशीच्या तशी भेटली नाहीत. पण, आपल्यावर चारही बाजूंनी सतत अशा प्रकारच्या बातम्यांचे ‘हॅमरिंग’ सुरू असते. कादंबरीत घडणाऱ्या घटना कोणाच्याही आयुष्यात घडू शकतात. अशाच कोणाच्याही आयुष्यात घडू शकणाऱ्या सत्य घटनांचे आणि काही काल्पनिक घटनांचे ‘कोलाज’ या कादंबरीत दिसते.’ चांदोरकर यांच्या आई अशाच खितपत पडल्या होत्या. त्या कोणाला ओळखतही नव्हत्या. केवळ हृदय सुरू आहे म्हणून त्या जिवंत आहेत अशीच परिस्थिती होती. त्यावेळी आईच्या शरीराला यातना होण्यापेक्षा ती यातून सुटली तर अधिक बरे होईल असा विचार लेखिकेच्या मनात कित्येकदा यायचा. धडधाकट असताना संपूर्ण कुटुंबाला आधार देणाऱ्या आईची ही अवस्था त्यांना पाहवत नव्हती. रस्त्यावरून चालताना अनेक भिकारी दिसतात. परंतु, त्यातील एक भिकारी लेखिकेच्या विशेष लक्षात राहिला. हा भिकारी अतिशय लाचार अवस्थेत जगत होता. इतरही काही उदाहरणे त्यांच्यासमोर होती. अशा व्यक्तींना यातनांमधून सोडवण्यासाठी दयामरणाचा मार्ग योग्य असल्याचे त्यांना जाणवले आणि यातूनच युथनेशियाने आकार घेतला. खरे तर सुरुवातीला या लोकांना योग्य उपचार कसे मिळतील असा विचार त्यांच्या मनात आला होता आणि त्यावरच कादंबरीचे लेखन सुरू झाले होते. परंतु हळूहळू हा विषय विस्तारत गेला आणि पुन्हा स्वत:च्या पायावर उभे राहू न शकणाऱ्या मरणासन्न रुग्णांना दयामरण कसे देता येईल या विचाराच्या दिशेने कादंबरीचा प्रवास सुरू झाला. दयामरण देण्यासाठी नातेवाईकांबरोबरच डॉक्टरांच्याही मनाची तयारी व्हावी लागते. तशी मनोवृत्ती तयार होणे सोपे नाही. दयामरण देणारा डॉक्टर अतिशय खंबीर असावा लागतो. यातूनच मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजन प्रभू यांची भेट घेऊन लेखिकेने यातील मानसिक आंदोलनांचा अभ्यास केला. शिवाय इतरही अनेक डॉक्टरांशी बोलून या प्रकरणातील तात्त्विक आणि वैद्यकीय बाबी समजून घेतल्या. या सर्वांशी बोलल्यानंतर त्यांच्या काही संकल्पना बदलून विचार अगदी प्रगल्भ झाले आणि त्यांचा कथेच्या प्रवासावरही परिणाम झाला. इच्छामरण आणि दयामरणात परिस्थितीचा फायदा उठवणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींचे हितसंबंध गुंतलेले असू शकतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने धडधाकट असतानाच अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपल्याला दयामरण द्यावे असे सर्वांसमक्ष लिहून ठेवायला हवे. लेखिकेने तसे स्वत:च्या बाबतीत लिहून ठेवले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more