* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WORK LESS, DO MORE
  • Availability : Available
  • Translators : DILIP GOGTE
  • ISBN : 9789387789579
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 264
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"THE 7-DAY PRODUCTIVITY MAKEOVER. BEAT THE CLOCK ACE DEADLINES DELEGATE LIKE A PRO. TIME IS YOUR MOST VALUABLE ASSET. SPEND IT WISELY! IN WORK LESS, DO MORE, AUTHOR JAN YAGER DISCUSSES WAYS TO ALLEVIATE STRESS RELATED TO YOUR WORKLOAD BY SKILLFULLY MANAGING YOUR TIME. WHETHER IT’S ABOUT RECHARGING YOUR CAREER, MANAGING YOUR OWN BUSINESS, OR SPENDING QUALITY TIME WITH YOUR FAMILY AND FRIENDS, THIS BOOK WILL HELP YOU NAVIGATE TODAY’S EVER-DEMANDING WORLD WITH EASE AND EFFICIENCY. THIS NEW EDITION WILL HELP YOU GROW IN YOUR WORK AND PERSONAL LIFE BY HELPING YOU TO: • GET MORE DONE IN LESS TIME WITH LESS STRESS • GROW YOUR START-UP FASTER • GET PROMOTED IN YOUR JOB WITH THE HELP OF YOUR EXCELLENT TIME-MANAGEMENT SKILLS • DEAL WITH EMAILS, SMARTPHONES AND OTHER SOURCES OF “DISTRACTIONITIS” • ENJOY MORE LEISURE TIME • MAKE KEY CHANGES EVEN IF YOU HAVE ONLY 5 MINUTES TO SPARE • LEARN THE ACTION! SYSTEM TO BECOMING MORE EFFECTIVE • AND MUCH MORE! JAN YAGER, PHD., IS A SOCIOLOGIST, SPEAKER AND THE AUTHOR OF SIX BOOKS ON TIME MANAGEMENT INCLUDING PUT MORE TIME ON YOUR SIDE. SHE HAS BEEN SEEN AND HEARD ON OPRAH, THE VIEW, THE O’REILLY FACTOR AND NPR AS WELL AS ON NUMEROUS OTHER NATIONAL TELEVISION AND RADIO PROGRAMS. SHE LIVES IN FAIRFIELD COUNTY, CONNECTICUT, USA BUT TRAVELS INTERNATIONALLY. "
या पुस्तकात कमीत कमी कष्टात अधिक श्रम कसे करता येतील याविषयी चर्चा केली आहे. परंतु कष्ट कमी करायचे असतील तर त्यासाठी प्रथम आपण कोणत्या गोष्टीत विनाकारण वेळ खर्च करतो याचा विचार करावा लागेल. त्याकरीता आपला दिनक्रम कसा आहे, याचा आधी विचार करावा लागेल. आपल्या दिनक्रमात असणाऱ्या चुका शोधण्यात मदत करण्यासाठी पुस्तकात तालिकांचा समावेश केला आहे. त्या तालिकांच्या आधारे कोणत्या गोष्टीत विनाकारण वेळ खर्च होतो व तो वेळ योग्य ठिकाणी कसा वापरता येईल, वेळेचे सुव्यवस्थापन कशा पद्धतीचे असावे याची चर्चा पुस्तकात केली आहे. त्याचप्रमाणे कामाचे नियोजन व उद्दिष्ट निश्चिती वरही लेखकाने भर दिला आहे. उद्दिष्ट कशी निश्चित करावीत, दीर्घकालीन उद्दिष्ट, अल्पकालीन उद्दिष्ट, कामाच्या संदर्भातील उद्दिष्ट, वैयक्तिक संदर्भातील उद्दिष्ट असे उद्दिष्टांचे वर्गीकरण करून त्यानुसार नियोजन कसे करावे हे सांगितले आहे. कामाबरोबर वैयक्तिक आवडीनिवडी, आरोग्य, कुटुंब यांना योग्य पुरेसा वेळ कसा देता येईल? यांचाही विचार केला आहे. कामाबरोबरच येणारा ताण उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या मदतीने कसा टाळता येईल याचेही विवेचन पुस्तकात आले आहे. नकारात्मकता, चिडचिडेपणा, कामात दिरंगाई या गोष्टी टाळल्या पाहिजेत. जरी उद्दिष्ट ठरवली तरी त्यांना अति महत्त्व न देता योग्य विश्रांती (ब्रेक) घेऊन त्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहावे. एकूणच योग्य वेळ व्यवस्थापन, कामाचे योग्य नियोजन यांच्या मदतीने कमी कष्टात अधिक श्रम हे ध्येय साध्य करणे निश्चितच सोपे आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#WORKERS# BUSINESS# BUSINESSMAN# OFFICE# PRIORITY# STUDENTS# MANAGEMENT# PLANNING# PROJECT# PROGRESS# BALANCE# PERSONAL#कर्मचारी# उद्योग# उद्योजक# कार्यालय# प्राधान्य# विद्यार्थी# पालक# व्यवस्थापन# नियोजन# प्रकल्प# प्रगती# उद्दिष्टे# संतुलित# वैयक्तिक# वर्क लेस डू मोर# कमी श्रमात जास्त काम# जान यागर# दिलीप गोगटे
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more