* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WHY MEN DON’T LISTEN AND WOMEN CAN’T READ MAPS
  • Availability : Available
  • Translators : SHUBHADA VIDVANS
  • ISBN : 9788184980301
  • Edition : 4
  • Publishing Year : MAY 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"WHY MEN DON`T LISTEN AND WOMEN CAN`T READ MAPS` THE TITLE OF THIS BOOK WRITTEN BY ALLAN AND BARBARA PEACE IS ITSELF SELF-INTRODUCTORY SO THERE IS NO NEED TO TELL YOU ABOUT THE THEME OF THE BOOK. BUT SPECIAL FEATURE OF THIS BOOK IS THE HANDLING OF THEME. THE LANGUAGE OF THE BOOK AND EXAMPLES THEREIN ARE VERY WITTY AND COMIC. THE FUNDAMENTAL PROBLEM IS MEN AND WOMEN ARE DIFFERENT. NOT BETTER OR WORSE, JUST DIFFERENT. SCIENTISTS, ANTHROPOLOGISTS AND SOCIOBIOLOGIEST HAVE KNOWN THIS FOR YEARS BUT THEY HAVE ALSO BEEN PAINFULLY AWARE THAT TO EXPRESS THIS KNOWLEDGE PUBLICLY IN SUCH A POLITICALLY CORRECT WORLD COULD TURN THEM INTO SOCIAL PARIAHS. SOCIETY TODAY IS DETERMINED TO BELIEVE THAT MEN AND WOMEN POSSESS EXACTLY THE SAME SKILLS, APTITUDES AND POTENTIALS JUST AS SCIENCE IRONICALLY IS BEGINNING TO PROVE THEY ARE COMPLETELY DIFFERENT. THIS BOOK IS DEDICATED TO ALL MEN AND WOMEN WHO HAVE EVER SAT UP AT 2 A.M. PULLING THEIR HAIR OUT AS THEY PLEAD WITH THEIR PARTNERS. ""BUT WHY DON`T YOU UNDERSTAND` PARTNERS CAN`T ANSWER THIS BUT WE THE WRITERS HAVE ANSWERED THIS QUESTION IN THIS BOOK. RELATIONSHIPS FAIL BECAUSE MEN STILL DON`T UNDERSTAND WHY A WOMEN CAN`T BE MORE LIKE A MAN AND WOMEN EXPECT THEIR MEN TO BEHAVE JUST LIKE THEY DO. NOT ONLY WILL THIS BOOK HELP YOU TO GRIP THE OPPOSITE SEX, IT WILL HELP YOU UNDERSTAND YOURSELF. AND HOW YOU BOTH CAN LEAD HAPPIER, HEALTHIER AND MORE HARMONIOUS LIVES AS A RESULT. MUST READ THIS BOOK.
स्त्री व पुरुष यांच्यातील नातेसंबंध बिघडतात ह्याचे कारण म्हणजे पुरुषांना हे समजत नाही की बायका त्यांच्यासारख्या का नाहीत; आणि बायकांना वाटते की आपण जसे करतो तसे पुरुष का करत नाहीत. ह्याचे कारण म्हणजे, स्त्री व पुरुष वेगळे आहेत. ते समान पेशींपासून बनलेले आहेत, एवढी एकच गोष्ट त्यांच्यात समान आहे. पण हे दोघे वेगवेगळ्या जगात रमतात. त्यांची मूल्ये वेगवेगळी असतात, पण फारच थोडे पुरुष हे मान्य करतात. एक सामायिक गोष्ट अशी की स्त्री व पुरुष कुठल्याही धर्माचे, पंथाचे, वर्गाचे असले तरी त्यांचे दृष्टिकोन व विश्वास सारखेच असतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #WHYMENDONTLISTENANDWOMENCANTREADMAPS #WHYMENDONTLISTENANDWOMENCANTREADMAPS #व्हायमेनडोन्टलिसनअ‍ॅण्डविमेनकान्टरीडमॅप्स #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SHUBHADAVIDVANS #ALLANPEASEBARBARAPEASE "
Customer Reviews
  • Rating StarPriyanka Landage

    Good evening All my वाचनवेडा मित्रमैत्रिणींनो ..... आतापर्यंत बरीच पुस्तके वाचली . पण कोणत्या पुस्तकाबददल आवर्जुन लिहाव अस वाटल नाही . पण हे पुस्तक वाचल्यावर अस वाटल कि लोकानी हे पुस्तक वाचाव . हे पुस्तक वाचल्यावर आपल्या आयुष्यातील बऱ्याच प्रशनाची उत्तर आपोआप मिळतील. कारण यामध्ये सर्वाचा आवडीच्या विषयाचे विश्लेषण केलेल आहे . *तो म्हणजे* * स्त्री पुरुष याच्यातील नातेसंबंध* तर काय वाटत तुम्हाला ? का बरं बिघडत असतील त्यांच्यामधील नातेसंबंध ? याचे कारण म्हणजे पुरुषांना समजत नाही कि स्त्रिया त्याच्यासारख्या का नाहीत ? अन् स्त्रियांना वाटतेळी आपण जस जसे करतो तसे पुरुष का करत नाहीत? याचे कारण म्हणजे ते दोघेही वेगवेगळे आहेत . अन् ते का व कसे वेगळे आहेत ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पुस्तका मध्ये मिळतील . हे पुस्तक वाचल्यानंतर वाचकामध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडेल . त्याचा / तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल.😊 ...Read more

  • Rating StarBHAUSAHEB PAWAR

    स्त्री व पुरुष यांच्यातील नातेसंबंध बिघडतात याचे कारण म्हणजे पुरुषांना हे समजत नाही की बायका त्यांच्यासारख्या का नाहीत,आणि बायकांना वाटते की आपण जसे करतो तसे पुरुष का करत नाहीत. याचे कारण म्हणजे,स्त्री व पुरुष वेगळे आहेत. ते समान पेशीपासून बनलेले हेत,एवढी एकच गोष्ट त्यांच्या समान आहे.पण हे दोघे वेगळ्या जगात राहतात.त्यांची मूल्ये वेगवेगळी असतात.पण फारच थोडे पुरुष हे मान्य करतात. एक सामायिक गोष्ट अशी की स्त्री व पुरुष कुठल्याही धर्माचे पंथाचे वर्णाच्या असले तरी त्यांचे दृष्टिकोन व विश्वास सारखेच असतात. या पुस्तकात-बायका का जास्त बोलतात, पुरुष का बोलत नाहीत अशा वेगवेगळ्या बाबींनवर या पुस्तकात माहिती दिली आहे. ...Read more

  • Rating StarVijaykumar Chougle

    Why Men don`t listen and Women can`t read Maps ~~~~Allan & Barbara Please व्हाय मेन डोन्ट लिसन अँड वूमन कानट रीड मॅप्स~~~~~अनुवाद Adv. शुभदा विद्वांस स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंध का बिघडतात? पुरुषांना हे समजत नाही की स्त्रिया त्यांच्ासारख्या का नाहीत;आणि स्त्रियांना वाटत पुरुषांनी आपल्यासारखा वागावं. ह्याचे कारण म्हणजे स्त्री आणि पुरुष वेगळे आहेत.ते समान पेशिंपासून बनलेले आहेत. एवढी एकच गोष्ट त्यांच्यात समान आहे. तुम्ही स्वतःला ओळखावं, तसच जोडीदाराच्या मनात काय चाललंय ते जानाव, ज्यामुळे तुमचे आपसातील नातेसंबंध आनंददायी व दृढ होतील. ह्या पुस्तकातून अनेक गुपीत तुम्हाला समजतील.ज्याचा तुम्हाला तुमचा पुढील आयुष्य सुफल, अधिक प्रेममय व जिव्हाळ्याचं करण्यासाठी नक्कीच उपयोग होईल. स्त्रियांची तक्रार--त्यांचे पुरुष सवेदनाशून्य आहेत.त्यांच्यामध्ये सहिष्णुता नाही.ते जास्त बोलत नाहीत, प्रेम करत नाहीत.... पुरुषांची तक्रार--मूळ मुद्दा सोडून भलतेच आणि खूप जास्त बोलतात, असे आणि अनेक.... स्त्रिया या मनकवड्या असतात.त्यांना समोरच्याच्या मनात काय चाललंय ते समजत. त्यासाठी त्यांना शब्दातून सांगण्याची गरज नसते.त्यामुळे त्यांची अपेक्षा असते की नवऱ्याला त्यांच्या मनातलं समजावं, तिच्या गरजा ओळखाव्यात पण तिची देहबोली तिचे इशारे काही त्याला समजत नाहीत.त्यामुळेच जगभरातील सर्व स्त्रिया पुरुषांना भावनाशून्य म्हणून संबोधतात. स्त्रिया एवढं का बोलतात? कारण त्यांच्या मेंदूच्या दोन्ही गोलार्धात स्पीच सेंटर्स असतात. स्त्रियांना जास्त बोलण्याची गरज का असते? पुरुषांच्या मेंदूमध्ये अनेक कप्पे असतात आणि त्यात माहिती वेगवेगळी साठवून ठेवण्याची क्षमता असते. दिवसाच्या शेवटी सर्व समस्यांचे वर्गीकरण करून त्याचे फायलिंग झालेल असत. स्त्रियांचा मेंदू माहिती त्याप्रमाणे संकलित करत नाही. समस्या डोक्यामध्ये सतत ताक घुसळलयाप्रमाणे घुसळत राहतात. मग या संकटातून बाहेर पडण्याचा एकच उपाय त्यांच्याकडे उरतो, तो म्हणजे त्या समस्या विषयी इतरांशी बोलणं. त्यांना त्याची माहिती करून देणे आणि त्याच वेळी त्यांना कोणाकडून त्या समस्यांचा शेवट किंवा त्याच्यावर तोडगा नको असतो. स्त्रियांसाठी बोलणं म्हणजे एकमेकांशी नात जुळवण तर पुरुषांसाठी बोलण म्हणजे घटना सांगण. एकमेकांच्या दोषांवर पांघरुण घालण्यातच शहाणपणा आहे आपण सगळेच सगळ्या गोष्टीत हुशार नसतो. त्यांन फारस बिघडत नाही. सरावान गोष्टी येतात पण तेवढ्यासाठी आपल किंवा जोडीदाराच आयुष्य बरबाद करु नये. स्त्रीया नातेसंबंधात असंतुष्ट राहिल्या तर त्या त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत आणि पुरुष जर कामाच्या ठिकाणी असंतुष्ट राहिला तर तो त्याच्या नातेसंबंधाला न्याय देऊ शकत नाही. स्त्री आणि पुरुष हे दोन वेगळ्या संघटनांचे सदस्य आहेत. हा फरक लक्षात घेणं, समजून घेण गरजेचे आहे तरच तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावना आणि त्यामागचा कार्यकारण भाव समजून घेऊ शकाल. तिला प्रेम, प्रणय आणि संवाद हवा असतो. त्याला मात्र बायकोकडून असा विश्वास हवा असतो की तो यशस्वी आहे आणि ती तो जे काही देतो त्यावर खुश आहे. पण त्यांन रोमँटिक असणे गरजेच असत. आणि मुख्य म्हणजे ती जे बोलते ते काळजीपूर्वक कुठलेही उपाय न सुचवता ऐकणे गरजेच असत. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    नातेसंबंधावर प्रकाश टाकणारे पुस्तक… पुरूष आणि स्त्री हे भिन्न आहेत. श्रेष्ठ-कनिष्ठ नाही, फक्त भिन्न! शास्त्रज्ञ, वंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ या सगळ्यांना हे अनेक वर्षांपासून माहिती आहे. पण सध्याच्या स्त्री पुरूष समानता, स्त्री शक्ति, स्त्री-मुक्ति्या जगात याबद्दल कसे बोलावे हा प्रश्न त्यांना सतावत आहे. स्त्री आणि पुरूष वेगळे आहेत. हे फरक समाजावून घेण्यामागे एकमेकांमधील दोषांवर टीका न करता त्यांच्यातील बलस्थाने शोधून काढून एक सुदृढ, सशक्त समाज निर्माण करणे हा हेतू आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी तीन वर्षांचा अवधी व चाळीस हजार किलोमीटरचा प्रवास लेखकद्वयीला करावा लागला. संपूर्ण जग पालथे घातले. हे पुस्तक आव्हानात्मक तर कधी धक्कादायकसुद्धा वाटेल. पण मनाला लुभावणारे. नातेसंबंध का बिघडतात तर पुरूषांना समजत नाही, की स्त्रिया त्यांच्यासारख्या का नाहीत आणि स्त्रियांना वाटते पुरूषांनी आपल्यासारखे वागावे हा घोळ मिटविण्यासाठी ह्या पुस्तकाचा प्रपंच. अ‍ॅलन आणि बार्बरा पीस यांनी लिहिलेल्या चौदा पुस्तकांपैकी आठ बेस्ट सेलर ठरली. त्यांचे साहित्य पन्नास भाषांमध्ये अनुवादित होऊन शंभर देशातील वाचकांपर्यंत पोहोचले. आपल्या पुस्तकातील माहिती अचूक व परिपूर्ण असावी यासाठी दोघेही भरपूर मेहनत घेतात. म्हणूनच त्यांची पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरतात. अ‍ॅड. शुभदा विद्वांस यांनी मूळ पुस्तकाचा सुरेख अनुवाद केला आहे. त्यांचे हे पहिलेच पुस्तक. पहिले प्रकरण आहे ‘समानतेतून भिन्नता’ समान पेशीपासून निर्माण झालेले स्त्री-पुरूष कसे भिन्न आहेत हे अतिशय साध्या, सोप्या, खुमासदार शैलीतून नजरेस आणून दिले आहे. पूर्वी जीवन-संघर्ष अवघड होता, पण नातेसंधंब सुरळीत आणि सोपे होते. पण आता आधुनिक जगात सर्व नियम धाब्यावर बसवल्यापासून खूप गोंधळ, संभ्रम आणि दु:ख वाट्याला आले. स्त्री आणि पुरुष यांना समान संधी दिल्या आणि ते घेण्याचे पूर्ण स्वातंत्र दिले, तरी त्यांच्या क्षमता वेगळ्या आहेत. दुसरे प्रकरण आहे ‘दृष्टी व दृष्टिकोन.’ स्त्री व पुरुष यांचे जगाकडे बघण्याचे दृष्टिकोन कसे वेगळे आहेत ते इथे सांगितले आहे. पुरुषांची रंगांधता तसेच त्यांची ‘टनेल व्हिजन’ तर बायकांची ‘पेरिफेरल व्हिजन’ यामुळे कशा गमती-जमती घडतात ते वाचायला मिळते. बायका ऐकलेल्या गोष्टीचे वर्णनसुद्धा त्या ठिकाणी प्रत्यक्षात हजर असल्यासारखे करतात व पुरुष प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय विश्वास ठेवत नाहीत. स्त्री-पुरुषांची निरीक्षणशक्ती कशी भिन्न आहे हे समजून घेण्यासाठी केलेल्या प्रयोगांचे वर्णन यामध्ये येते. बायका मनकवड्या असतात, पण पुरुषांना सांगितल्याशिवाय कुठलीच गोष्ट समजत नाही. ‘सार काही मनाच्या गाभाऱ्यात’ या तिसऱ्या प्रकरणात स्त्री व पुरुष यांचा मेंदू आकाराने कसा लहान-मोठा आहे, तरीही स्त्रियांची बुद्धिमत्ता तीन टक्क्यांनी कशी जास्त आहे याचे शास्त्रशुद्ध पुरावे दिलेले आहेत. या प्रकरण्याच्या शेवटी वाचकांसाठी जी प्रश्नावली दिली आहे, ती सोडवताना नक्कीच मजा येईल. चौथे प्रकरण आहे,‘बोलणं आणि ऐकणं’ बायकांना बोलणे आवडतेच. पुरुष मात्र मनाशीच बोलतात. बायका किती जास्त बोलतात, तर पुरुष कसा मुखदुर्बल असतो हे विनोदी प्रसंगातून व्यक्त केले आहे. कोणत्याही प्रसंगात पुरुषचा चेहरा कसा स्थितप्रज्ञ असतो आणि बायका भावनांच्या प्रत्येक छटा कशा दर्शवतात याचे सचित्र वर्णन हे. पुरुष मनातल्या मनात कसे बोलतात, तर बायका विचारसुद्धा मोठ्याने करतात यातील विरोधाभास पहावयास मिळतो. पाचवे प्रकरण ‘पुरुषांच्या विशेष क्षमते’ बद्दलचे. ती त्याला मिळालेली देणगी आहे. जी सामान्य स्त्रियांना आत्मसात करणे शक्य नसते. ‘विचार, भावना, दृष्टिकोन आणि इतर संभाव्य संकट’ या सहाव्या प्रकरणात पुरुष व स्त्रिया वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळे का रिअ‍ॅक्ट होतात याचे शास्त्रीय विवेचन विनोदी ढंगानी केले आहे. पुरुष भावना गिळून टाकतो तर स्त्री त्या भावना चघळत बसते़ ‘आपला केमिकल लोचा’ या सातव्या प्रकरणात शास्त्रीय पुराव्यांवर आधारित माहिती वाचायला मिळते. आपल्या शरीरात जी संप्रेरके स्त्रवतात ती माणसांवर कशी गारुड घालतात याचे वर्णन मंत्रमुग्ध करणारे आहे. ‘मुलं ही मुलं’ च असतात या आठव्या प्रकरणात काही कटु सत्यांना सामोरे जावे लागते, तर नवव्या प्रकरणात ‘पुरुष, स्त्री व प्रणय’ यामध्ये स्त्री-पुरुष एकमेकांच्या कोणत्या गोष्टीना किती महत्त्व देतात व प्रत्यक्षात त्यांचे समज काय असतात हे उगते. ‘लग्न, प्रेम आणि प्रणय’ हे या पुस्तकातील दहावे प्रकरण आणि ‘सद्य: परिस्थितीकडे’ हे अकरावे व शेवटचे प्रकरण. आजच्या पुरुषासाठी आजही काहीच बदललेले नाही. पण बायकांच्या बाबतीत बोलायचे तर त्यांचा प्रधान्यक्रम हा त्यांच्या आईपेक्षा व आजीपेक्षा बदललेला दिसतो. अनेक बायकांनी त्यांची व्यावसायिक करिअर निवडलेली आहे. शास्त्र सांगते की, करिअरमुळे बायकांनाही पुरुषांचे आजार, ह्य्दयविकार, ताणतणाव, अल्सर्स व अकाली निधन या समस्या भेडसावू लागल्या आहेत. थीन स्त्रीयांमधील एक वर्षातून किमान नऊ दिवस केवळ ताणतणावामुळे रजा घेताना दिसते. सर्व्हे केला तेव्हा लक्षात आले की, स्त्रीमुक्तीचे वारे वाहूनसुद्धा बायकांचे प्राधान्य आपल्या मुलांना चांगल्या, परंपरावादी कौटुंबिाक वातावरणात वाढवण्याला आहे. फरक एवढाच की आजच्या स्त्रीला आर्थिक परावलंबित्व नको आहे. त्यांना पुरुषांवर अवलंबून राहणे पसंत नाही. तरीही आपले शरीर जराही बदललेले नाही. इस्त्राएलमध्ये एक प्रयोग केला. मुलांना कपडे, बूट, त्यांची हेअरस्टाईल, लाईफ स्टाईल मुले-मुली भेद न करता समान दिली. पण झाले काय? नव्वद वर्षांनीसुद्धा मुलांची आक्रमकता, उद्धट वर्तन, सत्तेसाठी झगडा मारामारी कमी झाली नाही. उलट सहकार्य करणे, प्रेमळ वृत्ती, शेअरिंग आजही मुलींमध्ये दिसते. थोडक्यात हे पुस्तक वाचल्याने अनेक कोड्यांची उत्तरे मिळतील. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more