* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WHITHER JUSTICE
  • Availability : Available
  • Translators : PRIYANKA KULKARNI
  • ISBN : 9788184983425
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THIS BOOK GIVES THE SILENT A VOICE, THE FORGOTTEN A NAME AND THE ABUSED, THE JUSTICE THAT THEY CRAVE. WHITHER JUSTICE IS A DAUNTING AND DISTURBING LOOK AT WOMEN IN INDIAN PRISONS; THESE ARE STORIES OF THEIR BATTLE AGAINST VARIOUS FORCES: THE GOVERNMENT, FAMILY AND POVERTY. NANDINI OZA, COMPLETED HER POST-GRADUATION IN SOCIAL WORK FROM BARODA. SHE WAS PLACED IN CENTRAL JAIL AS A PART OF HER FIELD WORK, AND LATER, AS A FULL-TIME ACTIVIST IN THE NARMADA BACHAO ANDOLAN. SHE WAS IMPRISONED SEVERAL TIMES - EXPERIENCES THAT EXPOSED HER TO THE STORIES OF WOMEN PRISONERS. SHE CURRENTLY WORKS WITH A TRUST.NANDINI OZA, COMPLETED HER POST-GRADUATION IN SOCIAL WORK FROM BARODA. SHE WAS PLACED IN CENTRAL JAIL AS A PART OF HER FIELD WORK, AND LATER, AS A FULL-TIME ACTIVIST IN THE NARMADA BACHAO ANDOLAN. SHE WAS IMPRISONED SEVERAL TIMES - EXPERIENCES THAT EXPOSED HER TO THE STORIES OF WOMEN PRISONERS. SHE CURRENTLY WORKS WITH A TRUST.
अनेक शतके परीघाबाहेर राहिल्यानंतर आज भारतीय स्त्रियांनी सार्वजनिक क्षेत्रात आघाडीवर स्थान मिळवलं आहे. स्वतंत्र अन् निर्भय झाल्यामुळे आज स्त्रिया दररोज नवनवीन अडथळे ओलांडताहेत, अधिकाधिक सबल बनताहेत. ह्या पुस्तकात अशा स्त्रिया नाहीत. हे पुस्तक मूक स्त्रियांचे बोल मांडते, विस्मृतीत गेलेल्यांच्या नावांना उजाळा देते आणि शोषित स्त्रिया ज्यासाठी झुरतात तो न्याय त्यांना देते. ‘व्हिदर जस्टिस’ हा भारतातील तुरूंगातील स्त्रियांवर टाकलेला एक भयभीत आणि अस्वस्थ दृष्टिक्षेप आहे. ह्यात हकीकती आहेत त्यांनी दिलेल्या विवीध कढ्यांच्या - सरकारविरुद्ध, कुटुंबियांविरुद्ध, गरीबीविरुद्ध. समाज स्वत:च खलप्रवृत्तींना जन्मास घालतो. अन् त्यांना विनाविलंब सजाही देतो. ह्या बिनचेह-याच्या, बिनआवाजाच्या आणि विस्मृतीत गेलेल्या स्त्रिया अशा समाजात राहून लढा देत राहतात. चूरचूर झालेली स्वप्ने आणि तरीही मागे रेंगाळणा-या आशा यांच्या हकीकती येथे कथारूपात मांडलेल्या आहेत. ही मांडणी झाली आहे एका अशा व्यक्तीच्या दृष्टिकोनातून जी प्रत्यक्ष त्यांच्यासोबत राहिलेली आहे. लेखकाने त्यांची हताशा आणि सामथ्र्य यांचे हुबेहूब वर्णन केलेलं आहे. नंदिनी ओजा यांनी बरोड्यातून समाजकार्यात पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. त्यावेळी कार्यक्षेत्रात काम करण्याच्या अनुभवाचा एक भाग म्हणून त्या मध्यवर्ती कारागृहात राहिल्या होत्या आणि नंतर ‘नर्मदा बचाव आंदोलना’ची पूर्ण वेळ कार्यकर्ती म्हणून कैक वेळा तुरूंगवास भोगावा लागला. ह्या दोन अनुभवांदरम्यान कैदी स्त्रियांच्या हकीकती त्यांना भिडल्या. सध्या त्या एका न्यासासमवेत काम करतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #NANDINI OZA #PRIYANKA KULKARNII #MYNAMEISSALMA #WHITHERJUSTICE #व्हिदरजस्टिस
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKPRABHA 01-05-2015

    स्त्री-पुरुष समानता, स्त्री सक्षमीकरण, स्त्रीवाद अशा अनेक मुद्यांवरून महिलांबाबत चर्चासत्र, मतमतांतरे हे सुरुच असतं स्त्रीवादी साहित्यही मराठीमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यातली सक्षम, स्वावलंबी, सुशिक्षित स्त्रिया या पुस्तकात नाहीत. खरंतर बऱ्ाच गोष्टी सकारात्मकदृष्ट्या बदलल्यामुळे अनेक क्षेत्रांत स्त्रिया आघाडीवर आहेत. पण अशा निर्भय स्त्रियांची कहाणी इतर काही पुस्तकांमधून वाचायला मिळाली असेल, पण `व्हिदर जस्टीस` हे पुस्तक स्त्रियांचं वेगळं रूप समोर आणते. भारतातील तुरुंगातील स्त्रियांवर टाकलेला एक भयभीत आणि अस्वस्थ दृष्टिक्षेप या पुस्तकातून समोर येतो. लढा हा स्त्रिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग, मग तो कुटुंबाविरुध्दचा असो, गरिबीविरुद्धचा, सरकारविरुद्धचा किंवा समाजातल्या घटनांविरुद्धचा. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर दिलेल्या लढ्यांमधून नेहमीच काही मिळतं असं नाही, पण लढणं त्यांच्यासाठी महत्वाचं असतं. अशाच काही लढ्यांची कथा या पुस्तकात मांडली आहे. त्यांनी पाहिलेली स्वप्नं पूर्ण झाली नसली तरी आशेवर रेंगाळणाऱ्या त्यांच्या या कथा मांडलेल्या आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more