* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VIMUKTA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668117
  • Edition : 2
  • Publishing Year : 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 164
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SATYA WAS DISTURBED. HE FELT THAT DHAMNYA HAD INSULTED THE `PANCHAYAT`. ALL THE PEOPLE GATHERED THERE WERE MURMURING AMONG THEMSELVES. THE WOMEN AND THE KIDS WERE GIVING HORRIBLE LOOKS TO LACHCHI, AS IF SHE WAS A VAMP. BUT LACHCHI WAS LOOKING SATISFIED WITH HERSELF. SANTYA CLEARED HIS THROAT, HE SHIFTED IN HIS SEAT, AND STARTED HIS SPEECH; "THE WORK DHAMNYA AND LACHCHI HAVE DONE IS VERY DISGUSTING. THEY HAVE INSULTED OUR COMMUNITY. THEY TOOK GULAB`S MONEY AND THEN VERY CONVENIENTLY HE KEPT HIS WIFE WITH HIM. WHAT IF THIS PRACTICE PREVAILS? THEN NOBODY WILL BELIEVE ANYTHING, THE WORD FAITH WILL HAVE NO MEANING AT ALL! IT WILL BE AGAINST THE INTEREST OF OUR COMMUNITY IF ALL THE MEN AND WOMEN START BEHAVING IN A WAY TO PLEASE ONLY THEMSELVES. SO, I HEREBY ORDER THAT DHAMNYA SHOULD GIVE HIS TENT WITH ALL THE BELONGINGS TO GULAB AND SHOULD LEAVE AT ONCE WITH HIS WIFE AND FAMILY WITHOUT CARRYING ANYTHING ELSE BUT THE CLOTHES THAT THEY ARE WEARING. THEY ARE FREE TO GO ANYWHERE. HEREAFTER DHAMNYA, HIS WIFE AND HIS CHILDREN ARE FORBIDDEN TO HAVE ANY CONTACT IN ANY FORM WITH OUR COMMUNITY. AFTER HEARING SANTYA`S DECISION, EVERYONE ROSE TO GO HOME. LACHCHI AND DHAMNYA FOLD HANDS OF THEIR CHILDREN AND STARTED IN THE DIRECTION OF THE CITY. ALL THE MEN AND WOMEN, CHILDREN WATCHED THEM, THEY WERE THUNDERSTRUCK. BUT LACHCHI AND DHAMNYA HAD OTHER THOUGHTS IN THEIR MINDS, THEY WERE HAVING CERTAIN SHINE ON THEIR FACES. THEIR CHILDREN WERE WALKING VERY CLOSE TO THEM. LACHCHI AND DHAMNYA DID NOT CAST EVEN A GLANCE AT THE PEOPLE GATHERED THERE. NOW THEY WERE FREE FROM THE WORN OUT TRADITIONS OF THEIR COMMUNITY. THEY BID THEIR FINAL GOOD BYE TO THE CULTURE, THE TRADITION AND THE PEOPLE. THEY STEPPED FORWARD TOWARDS DAWN, THEY LURCHED FORWARD A STEP TOWARD HUMANITY, TOWARDS BEING HUMAN.
संत्या फारच अस्वस्थ झाला होता. धमन्याने जातपंचायतीचा घोर अपमान केला आहे, असेच त्याला वाटत होते. तेथील सर्वच माणसांत कुजबूज सुरू होती. एखाद्या हडळिणीकडे बघावे, तसे बायका, मुलं लच्छीकडे बघत होती. लच्छीच्या चेहNयावर मात्र समाधान दिसत होते. संत्या नीट सावरून बसला. खाकरून त्याने घसा साफ केला आणि निर्णय देऊ लागला, ‘‘धमन्या व लच्छीनं जातीला काळं फासाचं काम केलंय... जातपंच्यातीचा आवमान केलाय... गुलब्याचं पयसं घेतलं ती घेतलं... आणिक बायवूÂबी घरात ठिवून घितली... उंद्याच्याला आपल्या जातीत आसच व्हुया लागलं तर... येकमेकांच्या सबदावर कोण सुदीक इस्वास ठिवणार न्हाय.. परत्येक घरातील बाया, माणसं... मनाला यील तसं वागत्याली... ही जातीच्या हिताचं न्हाय... तवा धमन्यानं... आपलं पाल... आशील त्या... सामानसुमानासकट... गुलब्याच्या ताब्यात देवावं... आणिक
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VIMUKTA #VIMUKTA #विमुक्त #SHORTSTORIES #MARATHI #DADASAHEBMORE "
Customer Reviews
  • Rating StarAnil Bhalerao

    विमुक्त हा कथासंग्रह वाचताना मन हेलावून गेलं, आपण संगणक युगात वावरत असताना आज आपले बांधव परिघाबाहेर चाचपडत आहे, यातील कथा सत्य असल्याचे लेखक सांगतात.

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 02-12-2007

    उपेक्षितांच्या व्यथा - वेदनांचे हुंकार… ‘गबाळ’ या आत्मकथनाद्वरे कुडमुडे जोशी जमातीच्या सुखदु:खांचा पट उलगडून दाखवणाऱ्या दादासाहेब मोरे यांनी अन्य भटक्या विमुक्त जमातींच्या व्यथा-वेदना प्रकट करण्यासाठी कथालेखन केले. त्यांच्या १४ कथांचा विमुक्त हा संगरह आहे. मोरे यांनी आपल्या मनोगतात भारताच्या विषम समाजव्यवस्थेतील शेवटचा घटक म्हणूनही भटक्या विमुक्तांना समाजव्यवस्थेपासून दूर ठेवण्यात आलेले आहे. गावगाड्यातील उत्पादन प्रक्रियेमध्ये भटक्या विमुक्तांना सामावून घेण्याचे टाळले गेले आहे हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी या भटक्या जमातीजमतींना सतत फिरावे लागते आणि आध्यात्मिक भटके, मनोरंजन करणारे भटके तसेच जनावरांच्या पालनपोषणासाठी वणवण फिरत राहणारे भटके म्हणून जीवनपद्धतीचा अवलंब करून आपले अस्तित्व टिकवून धरणे क्रमप्राप्त ठरले; आता पारंपारिक व्यवसाय कालबाह्य झाल्यामुळे भटक्या विमुक्तांच्या पारंपारिक कौशल्याचे महत्त्व संपुष्टात आले. भटक्या विमकुक्तांना त्यामुळे उदरनिर्वाह करणेही कठीण झाले आहे. अशा एकूण ४२ भटक्या विमुक्त जाती आहेत. त्यामधील बारा-तेरा जमातींचे वास्तव जीवन रेखाटण्यासाठी या कथा मोरे यांनी लिहिल्या आहेत. डॉ. भालचंद्र फडके यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये म्हटले आहे. विशेषत: भटक्या विमुक्त समाजातील माणसे, उघड्यानागड्या अवस्थेत आदिमानवाचे जीवन गडद काळोखात जगत आहेत. लाचारपणे भीक मागत. माणसापेक्षा जनावरांच्या संगतीत राहून अन्नाच्या शोधात भटकत आहेत. कुरणशोधक भटके, अन्नशोधक भटके, चरण भटके, आध्यात्मिक करमणूक करणारे भटके, यांना गाव नाही, घर नाही, जातीजमातींच्या, जातपंचायतीच्या तुरुंगात ते बंदिस्त आहेत. भाकरीच्या शिळ्या तुकड्यासाठी त्यांना दारोदार लाचार होऊन भटकावे लागते. या जमातींमध्ये आजही जातपंचायत सर्वांवर अधिकार चालवते. जातिबहिष्कृत होण्याचे भय सर्वांना वाटते. जातपंचायतीचा न्याय सर्वांना शिरोधार्थ मानावा लागतो. त्यानुसार वागावे लागते. लग्न घटस्फोट याबाबत जातपंचायतीचा अधिकार चालतो. आपापसातले तंटे सोडवण्याबाबत जातपंचायतीचा निर्णय अखेरचा ठरतो. जातपंचायतीची न्यायदानाची व्यवस्था जातबहिष्कृतीच्या भयावर टिकून राहिलेली असते. वाळीत टाकले जाणे ही सर्वात भयंकर शिक्षा ठरते, पुन्हा जातीत येण्यासाठीही जातपंचायतीचे काही दंडक असतात. त्यानुसार दंड भरणे, जमातीतील लोकांना मेजवानी देणे, मद्य पाजणे वगैरे गोष्टी केल्यावर पुन्हा जातीत घेतले जाते. ‘विमुक्त’ या पहिल्याच कथेत अशा जातपंचायतीच्या जाचातून स्वत:ला मुक्त करून घेण्याचा बाणेदारपणा दाखवणाऱ्या लच्छीची गाठ पडते. धमन्याला त्याच्या पोराच्या ऑपरेशनसाठी गुलब्या पैसे देतो. त्या मोबदल्यात पैसे परत मिळेपर्यंत धमन्याच्या बायकोला- लच्छीला गहाण म्हणून गुलब्याकडे राहावे लागते. परंतु ही लच्छी पैसे फिरण्याच्या आधीच गुलब्याच्या घरातून बाहेर पडते आणि धमन्याबरोबर व मुलांबरोबर राहू लागते. तेव्हा गुलब्या जातपंचायतीत लच्छीविरुद्ध दावा गुदरतो. धमन्याला त्याचे जातवाले विचारतात, ‘पैकं न्हाईत तर बायकूला गुलब्याकडे धाड आणि जातपंचायतीच्या विरुद्ध कृती केल्याबद्दल दंड भर.. नाहीतर तुला जातीतनं वाळीत पडावं लागेल.’ लच्छीही म्हणते, ‘मी गुलब्याकडे जाणार न्हाय, त्येनं पयशाच्या बदल्यात माज्या पालातलं आशील-नशील ते घेवावं. आमी अंगावरच्या कापडासकट ऱ्हायला तयार हायं.’ जातीपंचायत रात्रभर खल करते. बुजूर्ग सरपंच संध्या काळे निर्णय देतात, ‘धमन्या बायकूबी घरात ठेवून घेतली. उद्याच्यात आपल्या जातीत आसंच बहुधा लागलं तर... एकमेकांचया सबदावर कोणसुदिक इस्वार ठिवणार न्हाय... तवा धमन्यानं आपलं पाल... गुलब्याच्या ताब्यात देवावं... अंगावरच्या कापडासकट आपल्या बायकूपोरास्नी घिऊन कुटंबी जावावं. त्यांचा आणि त्यांच्या बायकू पोरांच्या जातीशी कसलाच संबंध न्हाय. लच्छी आणि धमन्या मग शहराकडे निघतात. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज असते. लेखक शेवटी म्हणतो, ‘लच्छी आणि धमन्या यांनी पालाकडे वा तेथील माणसांकडे ढुंकूनही पाहिले नाही... ते आपल्या जातीच्या, आदिम परंपरापासून, दुष्ट रूढींपासून मुक्त झाले होते. जातीच्या, जमातीच्या बंधनांनाच नव्हे तर जातीजमातीच्या चौकटींना कायमचा रामराम ठोकून, माणूस म्हणून जगण्यासाठी जात होते, त्याचवेळी सूर्य उगवत होता. ही कथा जातीजमातीच्या मर्यादांना झुगारून देून नव्या युगात प्रवेश करू करण्याला प्रेरणा देते. नव्या वास्तवाचे मान देते. बंदिस्त परंपरागत विचारसरणीला आणि समाजव्यवस्थेतील मूल्यप्रणालीला नाकारून स्वत:च्या अस्तित्वाला नवा संदर्भ, नवा आशय देण्यासाठी प्रवृत्त करते. तशा कृतीचा गौरव करते. भटक्यांना आपापले परंपरागत व्यवसाय करणेही आता सोपे राहिलेले नाही. हेही या कथांमधून अधोरेखित करण्यात आले आहे. कंजारभाट हातभट्टी लावून दारू तयार करतात आणि ती विकतात. पोलिसांना हप्ते देतात, चोरून व्यवहार करतात. पण कधी हप्ता चुकला म्हणून तर कधी नवीन आलेले ऑफिसर आपले वर्चस्व दाखवायचे म्हणून हातभट्ट्यांवर छापे घालतात. तयार माल जप्त करतात किंवा फेकून देतात. पोलीस स्टेशनवर तरण्याताठ्या लक्षीला रात्रभर डांबून ठेवले जाते. तिचा बाप भानुदास तिला सोडवायला येतो, तेव्हा तिचा चोळामोळा झालेला असतो. बाबा, गिधाडांनी मात केला माझा म्हणून ती ओक्साबोक्शी रडू लागते. (धंदा) पारध्यांवर चोरीचा आळ घेणे सर्वात सोयीस्कर. कापड चोरल्याच्या केवळ संशयावरून राहिला लोक पकडतात. पारध्यांच्या पालावर गावकरी चाल करून येतात. तुटून पडतात. सरपंच राहिला चावडीत डांबून ठेवतो. माराने अंग ठणकत असते. ‘चार घरं मागून पोट जाळावं म्हटलं तर शिव्यांचा भडीमार, मार. हेच नशिबात लिहिलेले. या जातीत जन्माला आलो हाच आपला गुन्हा ठरला. चोरी करूनही चोर; न करूनही चोर... ही माणसं आपल्याला चांगल्या माणसासारखं का जगू देत नाहीत? असा प्रश्न पारधी महिला, एकमेकींना विचारतात. पारध्यांना आपली पालं त्या गावातून उठवावी लागतात. आपले चंबूगबाळे आवरून गाढवावर लादून दुसऱ्या गावी जावे लागते. (अंधारातील प्रवास) अस्वलाचा खेळ करणाऱ्या कमल्याची अस्वलीण रंगी मरण पावते. नवीन अस्वलाला शिकवून तो पहिलाच खेळ करतो. तर ते अस्वल त्याच्या मुलाला ओरबाडून काढते. मुलगा जखमी होतो. प्रेक्षक चार पैसेही टाकत नाहीत. उलट अस्वलवाल्याच्याच वस्तू पकडून नेतात... (अस्वलाचा खेळ) पिढीजात धंदा करतानाही प्रशिक्षण लागतेच. ‘शिक्षण’ मधला सुभाष पहिल्यांदाच खिसा कापण्याचे प्राथमिक धडे घेऊन बापाबरोबर प्रात्यक्षिक करू लागतो. ‘ह्या तिरंगायला नीट येत नाही. उद्या पोटाला काय बिंब घालणार हाय व्हयं?’ असें म्हणत त्याला बापाने मारून मुटकून तयार केलेला, पत्ती (ब्लेड) नीट धरता येत नाही म्हणून फ़ैलावर घेतलेला सुभाष... बापाबरोबर बाजारात जाऊन सावज हेरतो... एका माणसाचा फुगलेला खिसा पाहून पॅन्टच्या खिशावर पत्ती मारतो... हातात पाकिट येते... पण त्यात कागदपत्रे मिळतात. पैसे किरकोळच मिळतात. बाप लगेच त्यांचे सांत्वन करतो. ‘वाईट वाटून घेऊ नकोस. एकदा ही कला चांगली जमली म्हणजे एकाच्या न्हायीतर दुसऱ्याच्या खिशाला माल घावेल... एकटा तो खिसा कापू पाहतो. पण पकडला जातो. कसाबसा तो पळ काढतो. लपून बसतो. संध्याकाळी हा सुभाष घरी येत नाही म्हणून सर्वजण चिंता करतात. तो येतो... काहीच हाती लागलं न्हाई म्हणून तो हबकलेला असतो. बाप, त्याला सांगतो, ‘आरं मग. भितुयास कशापाय? त्येंच्या हातातनं सुटून आलास... ही काय थोडं न्हाय. तू आज बरंच शिकल्यासारखं हायं. दुसऱ्या दिवशी तो आत्मविश्वासानं दुसऱ्या बाजारला जायला तयार होतो... (शिक्षण) म्हातारा संत्या आपल्या केसांनी मोठा दगड उचलण्याचा खेळ दाखवू पाहतो. पण त्याला ते जमत नाही. त्याची प्रेक्षक मग टवाळी करतात. (निर्धार) कोटीत पहिल्यांदाच गेलेल्या कमलीला कोठीची मालकीण सांभाळून घेते, पाणी दे... पान दे... अशी कामे सांगून सांजच्याला २० रुपयांची नोट तिच्या हातावर ठेवते... ती रात्री कृष्णा नदीत उडी मारून आपले जीवन संपवते. (अभागी कमल) ...अशा विविध व्यक्तिरेखा, विविध समस्या लेखकाने कथारूपात मांडल्या आहेत. भटक्या , विमुक्तांना मानाने, कष्ट करून प्रामाणिकपणे जगायचे आहे. जातपंचायतीच्या अनिष्ट प्रभावापासून मुक्त व्हायचे आहे... माणूस म्हणून जगायचे आहे... न्यायासाठी समतेचा लढा द्यायचा आहे... हे या कथांद्वारे वाचकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book