* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LIVING WELL WITH PAIN & ILLNESS
  • Availability : Available
  • Translators : DR.SUBHASH DANDEKAR
  • ISBN : 9788184983104
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 244
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
VIDYAMALA BURCH’S ‘LIVING WELL WITH PAIN AND ILLNESS’ (2008) IS A VERY USEFUL BOOK ON MANY LEVELS. IF YOU, OR SOMEONE YOU KNOW OR WORK WITH, HAVE BEEN LIVING WITH CHRONIC PAIN OR ILLNESS OVER SUSTAINED PERIODS, IT WILL BE A GREAT TOOL. IT PROVIDES COMPREHENSIVE INFORMATION ON SCIENTIFIC ADVANCES IN THE UNDERSTANDING OF JUST WHAT PAIN REALLY IS AND, AT THE SAME TIME, OFFERS VALUABLE TECHNIQUES FOR SELF –MANAGEMENT IN DEALING WITH LONG TERM PAIN OR ILLNESS. BURCH REVIEWS RECENT RESEARCH BEFORE PRESENTING A BIO-PSYCHOSOCIAL MODEL FOR CHRONIC PAIN. MOST OF US WHO HAVE LONG TERM PAIN OR ILLNESS BECOME EMBATTLED AND DISTRACTED ‘FIGHTING’ IT, SOMETIMES THEN COLLAPSING FROM THE EFFORT. HERE WE ARE ENCOURAGED TO CHANGE THAT EXPERIENCE, THAT RELATIONSHIP, INTO ONE OF MINDFUL ACCEPTANCE AND KINDNESS. I WAS STRUCK BY HOW MANY PARALLELS COULD BE DRAWN BETWEEN THIS WORK WITH THE BODY AND SENSATIONS AND THE PSYCHOLOGICAL OR EMOTIONAL DOMAINS ON WHICH WE SPEND SO MUCH OF PSYCHOTHERAPY TIME. THE LESSONS REHEARSED HERE CAN BE WIDELY APPLIED TO ALL SITUATIONS IN WHICH WE ENGAGE IN STRUGGLING TO AVOID WHAT WE DON’T WANT AND HAVE GOT. HAVING LIVED WITH SEVERE PAIN FOR MOST OF HER LIFE, THE AUTHOR MAKES A COMPASSIONATE AND THOUGHTFUL GUIDE. THE BOOK IS PRESENTED IN CLEAR, CONFIDENT, FLUENT STYLE IN A WELL DESIGNED WORKBOOK FORMAT. DETAILED EXERCISES FOR MOVEMENT, BREATHING, MEDITATION AND CHANGING THOUGHTS ARE GIVEN: THESE SYNTHESISE YOGA, PILATES, MEDITATION AND BODYWORK SYSTEMS. AS SOMEONE WHO HAS LIVED FOR DECADES WITH CONSTANT PAIN MYSELF, AND WORKED WITH MANY CLIENTS ALSO MANAGING PAIN OR LONG TERM ILLNESSES, I THOROUGHLY RECOMMEND THIS TITLE AS A HELPFUL COMPANION. CHARLES NEAL: PSYCHOTHERAPIST & TRAINING CONSULTANT.
‘वेदना आणि व्याधींसह चांगलं जीवन’ हे एक प्रेरणादायी आणि व्यावहारिक मार्गदर्शक आहे. सजगता आणि एका वेळी तेवढ्याच क्षणापुरतं जगणं यांद्वारे जुनाट वेदना आणि व्याधी कशा ताब्यात ठेवाव्यात, हे या पुस्तकात सांगितलं आहे. पुरातन सजग ध्यानाची परिणामकारकता अलीकडच्या काळात जगन्मान्य झाली आहे. विशेषत: आरोग्य आणि तणाव यांबाबतीत वेदना आणि ध्यान या आपल्या वयक्तीक अनुभवातून विश्वास देणा-या या पुस्तकामध्ये विद्यामाला बर्च यांनी डॉ. जॉन कबाट-झिन आणि इतर यांचं काम पुढे नेलं आहे. आरोग्याच्या कोणत्याही तक्रारींसह सजगतेने जगणं शिकल्यामुळे आत्मविश्वास, शहाणपण आणि दयाळूपणा कसा मिळतो, हे त्यांनी दाखवून दिलं आहे. विद्यामाला यांनी तयार केलेल्या अभ्यासक्रमाने हजारो व्याधिग्रस्तांना अधिक अर्थपूर्ण जीवन जगण्यास मदत केली आहे. तुमच्या शरीराची शांत आणि सजग जाणीव प्रत्येक क्षणी निर्माण केल्यामुळे, वैफल्य आणि दु:ख नाहीसं करणं शक्य आहे, हे त्या दाखवून देतात. जुनाट वेदना आणि व्याधी यांच्या दुय्यम आणि भावनिक परिणामांना योग्य रीतीने हाताळून तुम्ही अधिक सकारात्मक जगू शकता. सहज करण्याजोग्या श्वसनाच्या पद्धती, सामथ्र्यशाली सजग ध्यानप्रकार, उपयुक्त आकृत्या आणि यांपासून फायदा झालेल्या व्यक्तींचे प्रेरणादायी अनुभव यांचा समावेश ‘वेदना आणि व्याधींसह चांगलं जीवन’ या पुस्तकात आहे. व्याधिग्रस्तांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे. जन्मजात दौर्बल्य, एक अपघात आणि अनेक शस्त्रक्रिया यांमुळे होणा-या दीर्घकालीन पाठदुखीपासून तीस वर्षांपेक्षा अधिक काळ विद्यामाला बर्च वेदनाग्रस्त आहेत. आता त्या व्हीलचेअर वापरतात. ‘ब्रेथवक्र्स ऑर्गनायझेशन’ या मान्यवर संस्थेच्या त्या सहसंस्थापक आहेत. दीर्घकालीन वेदना, व्याधी आणि तणाव अनुभवत असणा-या व्यक्तींना स्वत:ची परिस्थिती ध्यान, शरीराची जाणीव आणि सकारात्मक प्रवृत्ती यांद्वारे काबूत ठेवून जगण्यास ही संस्था मदत करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VEDANAANIVYADHINSAHCHANGALJIVAN #LIVINGWELLWITHPAIN&ILLNESS #वेदनाआणिव्याधींसहचांगलंजीवन #BIOGRAPHY #DR.SUBHASHDANDEKAR #डॉ.सुभाष दांडेकर #VIDYAMALABURCH"
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more