* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ORIGINALLY A PHILOSOPHER, BUT HE TURNED TOWARDS NOVEL WRITING TO REVEAL THE MEANING OF LIFE THAT HE UNDERSTOOD. THIS IS ONE OF HIS BEST SELLERS. IT REFLECTS THE CONFLICT BETWEEN ORTHODOX AND TRADITIONAL RITUALS AND THE CHANGING LIFE STYLES AND VALUES OF THIS GENERATION.HE HAS SUPERBLY JOTTED DOWN THE FEELINGS AND UPROAR ON A FAMILY LEVEL. THE ORIGINAL WORK IN KANNADA HAS BEEN BESTOWED UPON BY THE KARNATAKA SAHITYA ACADEMY AWARD WHILE THE KANNADA MOVIE BASED ON THIS HAS WON THE NATIONAL AWARD. AFTER THE SAHITYA ACADEMY DECIDED TO CONFER AWARDS TO TRANSLATED BOOKS, THIS WAS THE FIRST BOOK TO GET THE AWARD IN MARATHI.
तत्त्वज्ञानाचा मार्ग सोडून कादंबरी लेखनातून जीवनाचा अर्थ जाणू पाहणाया लेखकाची डॉ. एस.एल. भैरप्पा यांची अत्यंत लोकप्रिय आशयसंपन्न कादंबरी ‘वंशवृक्ष’. सनातन धर्मपरंपरा आणि मन्वंतरकाळातील बदलती जीवनमूल्ये यांतील संघर्षाचे कौटुंबिक पातळीवर उमटणारे भावकल्लोळ प्रभावीपणे चित्रित करणारी कलाकृती. मूळ कन्नड कादंबरीला कर्नाटक साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे तर या कादंबरीवरील कन्नड चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार लाभला आहे. साहित्यअकादमीने अनुवादासाठी पुरस्कार देण्याची योजना आखल्यावर मराठीत सर्वप्रथम हा मान या अनुवादाला मिळाला आहे. त्याचबरोबर मिळणारा ‘महाराष्ट्र गौरव’ ही या अनुवादाने मिळवला आहे. बीजक्षेत्र न्याय आणि वंशवृक्षाची संकल्पना यांचा उहापोह करणारी कलात्मक कादंबरी.
* साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार १९८९ * राज्य पुरस्कार १९९०

No Records Found
No Records Found
Keywords
#TADA #DR.S.L.BHYRAPPA #UMAKULKARNI #PARV #VANSHVRUKSHA #KAATH #AAVARAN #20JULY1931 #MANDRA #SAKSHI #UTTARKAND
Customer Reviews
  • Rating StarRakesh Sawale

    "वंशवृक्ष" धार्मिक पातळीवरील नात्यांची गुंतागुंत...!! एस्. एल. भैरप्पा यांची वाचलेली तिसरी कादंबरी. (पर्व आणि आवरण नंतरची) सुरवात काहीशी संथ वाटू शकते.. पात्र परीचयाची ती गरज आहे हे नंतर कळतं... पण जेव्हा आपण सगळ्यांना ओळखायला लागतो तेंव्ह हीच गोष्ट इतकी जबरदस्त पकड घेते की आपण त्या त्या व्यक्ती प्रमाणे विचार करायाला लागतो... गोष्ट तशी साधी आहे... श्रीनीवास श्रोत्री.. नेहमी धर्माप्रमाणे वागणारे कथेच्या केंद्रस्थानी आहेत. गृहस्थाश्रमाचा मुळ उद्देश हा फक्त "वंशवृद्धी" च आहे, असं मानणारे. त्यांच्या कुटुंबात होणाऱ्या... चढ उतारात आपण पण नकळत ओढले जातो. आणि शेवट नेहमी सारखा अर्धवट सोडल्यासारखा... मन सुन्न करणारा... जर भैरप्पांच्या लेखणीचे चाहते असाल तर जरूर वाचा...!! ...Read more

  • Rating StarPRANAV PATIL

    एस.एल.भैरप्पा ज्यांच्या लेखनाच्या प्रेमात पडल्या सारखं सध्या मला झालं आहे. आवरण आणि धर्मश्री नंतर वंशवृक्ष ही त्यांची अतिशय गाजलेली कादंबरी जीच्या वर पुढे चित्रपटही निघाला ज्यात गिरीश कर्नाड यांनी राज या मध्यवर्ती कथानकाची भूमिका चित्रपटात बजावली आे. तशी ती भूमिका त्यांना व कथानकाला साजेशीच होती त्यामुळे कादंबरीत जेव्हा जेव्हा राज चा उल्लेख येतो तेव्हा समोर गिरीश कर्नाडच दिसतात. कादंबरीचा मध्यवर्ती विषय आहे वंश आणि त्या वंश वृध्दीसाठी आसूसलेली दोन कुटुंब आणि दोन वंशाचे दिवे ज्यात एक जण वडीलांच्या तर एक जण आईच्या प्रेमासाठी मुकलेला आहे. कथा सुरु होते सदाशिवराव आणि श्रीनिवास क्षोत्रींच्या कथानकां पासून श्रीनिवास क्षोत्रींचा तरुण मुलगा नदीत वाहून गेलेला आहे ज्यामुळे घरात एक तरुण पत्नी एका लहन मुलाची आई असून विधवा झालेली आहे. संस्कृतचे पंडीत असणार्या श्रीनिवास यांच्याकडे म्हैसूरचे प्रसिध्द इतिहासाचे अध्यापक सदाशिव राव आलेले असतात ज्यांना भारताचा बृहृत इतिहास पाच खंडात लिहायचा आहे त्यातला एक खंड लिहून झालेला असतो जो ते दाखवायला आणि मार्गदर्शन घ्यायला श्रीनिवास शास्त्रींकडे आलेले असतात. सतत संशोधनात असल्यामुळे सदाशिवरावांचे आपली बायको नागलक्ष्मी हिच्याकडे कायम दूर्लक्ष असते. तर लहान भाऊ राज नुकताच लंडन वरुन म्हैसूरला घरी आलेला असतो. राज प्राध्यापक म्हणून कॉलेज मधे त्याच्या नाटक मंडळामुळे प्रसिध्द असतो पुढे या सगळ्यांच्या आयुष्यात एक वादळ येतं श्रीनिवास शास्त्रींची विधवा सून कॉलेज शिकायला म्हैसूरला येते आणि राज आणि तीचं प्रेम एकमेकांवर बसतं , इकडे सदाशिवराव श्रीलंकन संशोधिका करुणा रत्नेमुळे हिच्यामुळे प्राभावित होऊन तिच्याशी दुसरं लग्न करतात .या नंतर असणारी कथा ही खरचं वाचायलाच हवी .या कादंबरीचा शेवट ज्या प्रकारे भैरप्पांनी केलाय त्याला तोड नाही. वंशवृक्ष वाढवण्यासाठी झालेली फसवणूक, काहींची तगमग याचं दुःख हे सर्वांनाच गुरफटून टाकतं ज्यात कात्ययनी ,करुणारत्ने यांची झालेली परवड तर नागलक्ष्मीचं टाकलेली बायको म्हणून झालेली कुचंबणा, सनातन विचारांचे श्रीनिवास,बायकोच्या सुखासाठी आसुसलेला आणि सगळ्याःची काळजी घेणारा राजा, संशोधनात गुरफटलेले सदाशिवराव ही पात्रे रंगवताना सर्वांचे भावतरंग ,विचार , समांतर चाललेली कथानके म्हणजे चित्रपटाचे उत्कृष्ट पटकथा आपण वाचतोय असंच वाटत राहतं. ...Read more

  • Rating StarNiranjan N. Kulkarni

    एखाद्या पुस्तकाविषयी मनन करण्याची माझी पहिली वेळ नाही, मात्र लिहू वाटण्याची पहिलीच वेळ आहे. S L भैरप्पांची आवरण आणि तडा ही 2 पुस्तके वाचून झाली होती गेल्या काही दिवसात आणि आता चाहूल होती बहुप्रतिक्षित वंशवृक्ष ह्या पुस्तकाची. काही पुस्तके अशी असतात क त्याविषयी चर्चा करण्यापेक्षा मनातल्या मनात त्याविषयी चिंतन करावे आणि त्याचा आस्वाद घ्यावा. अत्तराची कुपी एखाद्या पेटित ठेवल्यानंतर ती संपून गेल्यावरदेखील त्याचा सुवास त्या पेटीत दरवळत राहावा तशी वंशवृक्ष मनात घर करून राहिली. भैरप्पा यांची पात्र उभी करायची पद्धत इतकी चपखल आहे की तशी हातोटी फार कमी जणांना लाभते. श्रीनिवास श्रोत्री हे धीरोदात्त असं पात्र ह्या कादंबरीभार वावरलंय, सनातन धर्म पद्धती विरुद्ध चिरचेतन चिरनुतन बुद्धिवाद यांच्यातलं द्वंद्व ह्या पुस्तकात रेखाटलं आहे. शेवटी जिंकलं कोण हे दाखवण्याची चूक भैरप्पांनी केली नाही. मंदिरात जाऊन काय मागायचं हा प्रश्न जसा याचकाचा असतो तसं भैरप्पांनी इथे तो वाचकांवर सोडला आहे. ज्याला जे घ्यायचं आहे ते घ्या. उमा कुलकर्णी यांनी ह्या मूळ कन्नड पुस्तकाचा अनुवाद मराठीत केलाय. खरंच हा अनुवाद वाटत नाही हे नक्की. मी पुस्तक परीक्षण करण्यासाठी ही पोस्ट लिहीत नाही, माझी ती योग्यता नाही. चंदनाच्या झाडाला जर बाभळी चिकटली तर त्या बाभळीलादेखील चंदनाचा वास येतो असं म्हणतात, तशीच काहीशी माझी गत झालीये. म्हणजे इतकं उत्तुंग साहित्य वाचल्यावर माझी ही पोस्ट म्हणजे ती बाभळीच.. कुठल्याही मोहाच्या अथवा कठीण प्रसंगात श्रोत्रीन्नी आपला संयम ढळू दिला नाही, तिरस्कारासारखी नकारात्मक भावना मनात ठेवली नाही, जे होईल ते ब्रम्हउपदेश ह्याप्रमाणे ते पुढे सरकत राहिले. शेवटी ज्या मुळावर वंशवृक्ष उभा होता त्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. पण अशाही परिस्थितीमध्ये श्रोत्री मनाचा संयम ढळू ना देता सर्व मालमत्ता दान करून संन्यस्त होतात. खूप कमी घटना आपल्या जीवनाचा मार्गक्रम ठरवतात, हे पुस्तक त्या दुर्मिळ गोष्टीत येतं. ...Read more

  • Rating StarSnehal Sherkar

    डॉ. भैरप्पा यांची अतिशय सुंदर आणि वाचनीय कादंबरी आहे.

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more