* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VALIV
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669299
  • Edition : 18
  • Publishing Year : AUGUST 1980
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 156
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHANKAR PATIL COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHANKAR PATIL HAD ONCE MENTIONED,RAIN IS MY BEST FRIEND! WHEN MY MIND BURNS IN THE PYRE, I FEEL SUFFOCATED, LIFELESS, BUT WHEN IT STARTS RAINING, I FORGET MY RESTLESSNESS, BREATHLESSNESS.` THERE IS DEFINITELY SOME RELATIONSHIP BETWEEN HIM AND THE RAIN. HE HAS PICTURED THE RAIN IN VARIOUS FORMS THROUGH MANY OF HIS STORIES LIKE AABHAL, VALIV. SOMETIMES, THE RAIN JUST DRIZZLES, SOMETIMES IT COMES WITH THUNDER AND STORMS, SOMETIMES IT RAINS VERY HEAVILY, SOMETIMES IT BRINGS THE HAILSTONES WITH IT, SOMETIMES IT APPEARS LIKE AN OLD MAN WALKING, TAKING TIME BETWEEN EVERY TWO STEPS, SOMETIMES IT APPEARS AS A NAUGHTY CHILD. WHATEVER THE FORM MAY BE IT ALWAYS GIVES IMMENSE PLEASURE. THIS PLEASURE IS BEYOND ANY HAPPINESS. I REMEMBER ONE OF VINOBA BHAVE`S MEETING. IT HAD JUST STARTED DRIZZLING AND HE HAD SAID, "TODAY, I AM VERY HAPPY. THE TOUCH OF THESE RAINDROPS IS DIVINE, I FEEL THAT THE GOD HIMSELF HAS COME OVER HERE. IT IS LIKE THE THOUSANDS OF RAINDROPS ARE EMBRACING THE EARTH" -BHALCHANDRA PHADKE.
पावसाचं आणि शंकर पाटलांचं एक नातं आहे. ते एकदा म्हणाले होते, ‘पाऊस म्हणजे माझा जिवलग दोस्त! उन्हाची खाई उसळली की माझी तगमग सुरू होते. अगदी गुदमरल्यासारखं वाटतं; पण पाऊस एकदा का कोसळू लागला, की माझ्या चित्तवृत्ती उल्हसित होतात.’ त्यांचं म्हणणं खरं आहे. ‘आभाळ’, ‘वळीव’ अशा कितीतरी कथांतून पावसाची विविध रूपं त्यांनी चित्रित केली आहेत. झिमझिम पाऊस, ताशा बडवत राहिलेला पाऊस, काठी टेकत येणारा पाऊस, धुवाधार पाऊस, थट्टेखोर पाऊस, गारांचा सडा टाकून घेरणारा पाऊस... पण पाऊस अंगावर झेलण्यात एक अपूर्व आनंद आहे! मला विनोबांची पावसातली एक सभा आठवते. पाऊस झिमझिम पडू लागला तशी ते म्हणाले होते, ‘मला विलक्षण आनंद होतो आहे. जणू परमेश्वरच आपल्या सहस्त्रधारांनी या धरतीला कडाडून मिठी मारत आहे. पावसाचा स्पर्श म्हणजे परमेश्वराचा स्पर्श!’ –भालचंद्र फडके
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VALIV#SHALA#SHAARI#BHOOL#NATAK#BHAAN#AAFAT#SOOD#TIPISHAN#KANAV#MAHER#KHEL#JUGLYAKAKA#PRATIKSHA#
Customer Reviews
  • Rating Starमुकेश जाधव

    मी काही वर्षांपूर्वी जेव्हा वळीव वाचून पूर्ण केल तेव्हा त्यांची इतर पुस्तकसुद्धा वाचायची असं ठरवून टाकलं आणि महिनाभरात सगळी वाचून झाली. शंकर पाटील असे लेखक आहेत ज्यांनी मराठी कथालेखनाला एका वेगळ्या उचीवर नेऊन ठेवले. आज पुन्हा एकदा वळीव वाचायला सरवात केली आहे. आणि पुन्हा एकदा इल्लम, धिंड, वावरी शेंग, बंधारा ही सगळी पुस्तक वाचायची आहेत. शंकर पाटलांनी लिहिलेली टारफुला कादंबरी वाचताना लक्षात येत की एखदी व्यक्तिरेखा रंगवताना किती बारिकाईने लक्ष दिल गेलं असेल. वाचकांच्या डोळ्यासमोर एखादं गाव, एखादं जनावर, नदी, ओढा, पारावरची निवांत बसलेली माणसं अगदी हुबेहुब रंगवलेली दिसतात. कथानकाचा आपणही एक भाग आहोत, आपल्या डोळ्यासमोर ती गोष्ट घडते आहे असा भास निर्माण होत राहतो. शकर पाटील एक भन्नाट लेखक होते. वाचकांना एक वेगळा अनुभव देणारा लेखक म्हणजे शंकर पाटील. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    साहित्यिक शंकर पाटील हे एक सिद्धहस्त लेखक होते. याची प्रचिती त्यांची पुस्तके वाचताना पुन्हा पुन्हा येते. हास्य, कारूण्य अशा भावनांचा आविष्कार ते अगदी सहजतेने करतात. वाचक त्याच्या नकळत हळूहळू कथेत गुंतत जातो नेतर त्यास एक ओढ लागते व तो त्या कथाविश्वाततल्लीन होऊन जातो. कथाबीज अगदी साधे वाटते पण त्यातील आशय वैश्विक असतो, मनुष्य स्वभावाची वैशिष्ट्ये त्यातून परिवर्तित होतात. शंकर पाटील यांच्या कथेची सुरुवातच एकदम मनाची पकड घेणारी असते. ‘आता काय होईल?’ ही भावना पात्राबरोबर वाचकाच्या मनात रुंजी घालत जाते. लेखक मग शब्दांची, मांडणीची आतषबाजी करतो. वाचक दिग्मूढहोतो. ‘कारूण्य’ असेल तर गहिवरतो. ‘विनोद’ असेल तर हसतो आणि गांभीर्य असेल तर विचाराधीन होतो. खरोखर शंकर पाटील यांनी मानवी जीवनातील विसंगती, आर्तता, मुर्खपणा वगैरे चांगलाच अनुभवला होता, त्याचा प्रत्यय कथा वाचताना येतो. वाचक अगदी हरखून जातो! शंकर पाटील यांची निरीक्षणशक्ती, कल्पनेची भरारी आणि लेखनशैलीमधील जबरदस्त ताकद वादातीत होती याची झलक या तीन पुस्तकांमधून आपोआप मिळते. अशा या सिद्धहस्त लेखकाची पुस्तके पुन:प्रकाशित करून मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी जुन्या, नव्या पिढीतील वाचकांना एक उत्तम पुस्तक भेट दिली आहे यात शंकाच नाही! ‘वळीव’ कथासंग्रहातील ‘सूड’ ही कथा ‘वर्णनात्मक शैली’ म्हणजे काय असते याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. बैलगाड्यांची शर्यत म्हणजे एक मानबिंदू ठरतो. त्यातील हार-जीत प्राणांपेक्षाही मोलाची कशी वाटते, गावकऱ्यांची उत्सुकता, शर्यतीचा वेग कसा टिपेला पोहचतो याचे प्रत्ययकारी वर्णन या कथेत आहे. वाचकासंही जणू त्या शर्यतीचा वेग येतो! ‘यशस्वी चित्रपट कथाकार’ हा नावलौकिक शंकर पाटलांच्या मागे का आहे? याचे उत्तर ‘सूड’ ही कथा देते. एक चलतचित्रपट शब्दाच्या माध्यमातुन दिसू लागतो. यातील काही भाग पाहू. ‘विस्त्याच्या खेंडागत तापलेली ती जनावरं आवरणं आता त्याच्या देवालाही शक्य नव्हतं. गाडी दुसऱ्यांदा भकली. वाट सोडून रानात शिरली. चार-चार बोटं चाकं जमिनीत घुसू लागली तरी गाडीचा वेग काही आवरत नव्हता. हरबाही दात खाऊन कासरे ओढत होता. त्या कासऱ्यांची त्याच्या हातांचे पळके निघत होते: पण त्याला कशाचीच शुद्ध नव्हती. वेसणीला ओढलागून बैलांची नाकं फाटली होती. फड्याच्या पिकलेल्या बोंडागत त्यांचे डोळे लालभडक झाले होते. त्यांच्या रेशमासारख्या मऊ अंगावर आडवेतिडवे वळ उठून कुंड झाले होते. जागजागी कातडी सोलून निघाली होती. असं विलक्षण झपाटणारे वर्णन इतर सर्व कथांमधून आढळून येते. एक ‘काव्य’च गद्यलेखनातून प्रगटतं. ‘वळीव’ कथासंग्रहातील सर्व कथांचा आशय वास्तव असून त्याला गांभीर्यतेची आणि करूणेची एक आर्त झालर आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more