* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LESSONS IN FORGETTING
  • Availability : Available
  • Translators : SMITA LIMAYE
  • ISBN : 9788184984132
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 313
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN WE FIRST SEE MEERA, SHE IS A CAREFULLY GROOMED CORPORATE WIFE WITH A SUCCESSFUL CAREER AS A WRITER OF COOKBOOKS. THEN ONE DAY HER HUSBAND FAILS TO COME HOME AFTER A PARTY AND SHE BECOMES RESPONSIBLE NOT JUST FOR HER CHILDREN BUT HER MOTHER AND GRANDMOTHER, AND THE RUNNING OF LILAC HOUSE, THEIR RAMBLING OLD FAMILY HOME IN BANGALORE. ENTER PROFESSOR J.A. KRISHNAMURTHY, OR JAK, A RENOWNED CYCLONE STUDIES EXPERT, ON A VERY DIFFERENT TRAJECTORY IN LIFE. IN A BEDROOM IN HIS HOUSE LIES HIS NINETEEN-YEAR-OLD DAUGHTER SMRITI, LEFT COMATOSE AFTER A VICIOUS ATTACK ON HER WHILE SHE WAS ON HOLIDAY AT A BEACHSIDE TOWN. A WALL OF SILENCE AND FEAR SURROUNDS THE INCIDENT THE GRIEVING FATHER IS HELPED NEITHER BY THE LOCAL POLICE, NOR BY HER BOYFRIEND IN HIS SEARCH FOR THE TRUTH. THROUGH A SERIES OF COINCIDENCES, MEERA AND JAK FIND THEIR LIVES TURNING AND TWISTING TOGETHER, WITH THE UNPREDICTABILITY AND SHEER INEVITABILITY OF A CYCLONE. AND AS THE DAYS PASS, FRESH BEGINNINGS APPEAR WHERE THERE SEEMED TO BE ONLY ENDINGS.
मीरा, सुंदर मीरा, हंसिनी मीरा, कॉर्पोरेट पत्नी आणि पाकशास्त्राच्या पुस्तकांची लेखिका या दोन भूमिकांमध्ये बुडून गेलीये. मग एक दिवस तिचा नवरा घरी परतत नाही. एका रात्रीत मीरा, उद्ध्वस्त मीरा, भावनाप्रधान हळवी मीरा— तिची मुलं- नयनतारा आणि निखिल- एवढंच नव्हे, तर तिची आई सारो, तिची आजी लिली आणि त्यांच्या बंगळुरूमधल्या मोडकळीला आलेल्या गुलबक्षी घराचा कारभार— या सर्वांची जबाबदारी घेते. काही रस्ते पलीकडे राहणा-या प्रोफेसर जे. ए. कृष्णमूर्ती ऊर्फ जॅक– एक हवामान व वादळ-तज्ज्ञ, घटस्फोटित आणि अनेक बाकीच्या संबंधांतून बाहेर पडलेला, नुकताच फ्लोरिडाहून परतलाय. त्याच्या घरातल्या बेडरूममध्ये त्याची एकोणीस वर्षीय मुलगी स्मृती एका आठवणींच्या आणि गतकाळातल्या बलात्काराच्या मूर्तिमंत दु:खद रूपात लोळागोळा होऊन पडली आहे. तामीळनाडूच्या समुद्रकाठच्या एका छोट्या गावात तिच्यावर अशी वेळ यावी, असं काय घडलं? पोलीस मदत करत नाहीत, स्मृतीचे मित्र-मैत्रिणी नाहीसे झालेत आणि एक स्तब्धता आणि भयाची भिंत या घटनेला घेरून आहे; पण जॅक सत्य शोधून काढेपर्यंत विश्रांती घेऊ शकत नाही. योगायोगांच्या साखळीमुळे मीरा आणि जॅकची आयुष्यं एकमेकांत गुंतली, गुंफली जातात; वादळाच्या अनिश्चिततेसारखी आणि अटळपणे आणि जसे दिवस सरतात, तशी नवीन सुरुवात प्रकटते, जिथे फक्त अंतच असावा, असं वाटतं तिथे. वादळाच्या स्थितींना प्रतिध्वनित करत रेखलेली ‘लेसन्स इन फरगेटिंग’ ही कादंबरी एक मुक्ततेची, क्षमाशीलतेची आणि पुनर्संधीची हृदयस्पर्शी कहाणी आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VISMARNATACHASARVAKAHI #LESSONSINFORGETTING #विस्मरणातचसर्वकाही #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SMITALIMAYE #ANITANAIR "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA - JANUARY 2017

    एक हृदयस्पर्शी कहाणी... कुठलीही पूर्वसूचना न देता, एखादा शकुन किंवा लक्षणसुद्धा न दाखवता हे अगदी शक्य आहे. बंद पडली असं वाटणाऱ्या एका प्रणालीतून एखादी मूक लाट जन्माला येतेय. एक ओहोळ कार्यरत झालाय. ही लाट उलटल्यावर फिरते ती तिच्या शिरावर सर्व समजून आि कळून फिरते, ज्यामुळे एक खोल, तीव्र आणि अस्थिर वातावरण निर्माण होतं. जेव्हा निराशा धडकते, तेव्हा ती तशीच असते... असं निराशेचं सायक्लोजेनेसिस सुरुवातीलाच ध्वनित करून, वादळाच्या अनिश्चिततेला प्रतिध्वनित करत रेखलेली ही कादंबरी– ‘विस्मरणातच सर्व काही’. अनिता नायर यांनी ‘लेसन्स इन फर्गेटिंग’ ही इंग्रजीत लिहिलेली कादंबरी स्मिता लिमये यांनी मराठीत अनुवादित केली आहे. एक घटस्फोटित हवामान आणि वादळतज्ज्ञ जे. ए. कृष्णमूर्ती उर्फ जॅक नुकताच फ्लोरिडाहून भारतात परतलाय. त्याच्या घरातल्या बेडरूममध्ये त्याची एकोणीस वर्षांची मुलगी, स्मृती, आठवणींच्या मूर्तिमंत दु:खद रूपात लोळागोळा होऊन पडली आहे. तामिळनाडूमधल्या समुद्राकाठच्या एका लहान आणि अनोळखी गावात तिच्याबद्दल नेमकं काय घडलं? ‘मुलगी वाचवा’ मोहिमेत सहभागी झालेली आपल्या मुलीवर ही वेळ यावी नेमकं असं काय घडलं? पोलीस मदत करत नाहीत, स्मृतीचे मित्रमैत्रिणी नाहीसे झालेत. एक स्तब्धता आणि भयाची भिंत त्या घटनेला घेरून आहे. हवामान आणि वादळतज्ज्ञ असलेल्या जॅकच्या लेकीच्या आयुष्यात असं नेमकं कुठलं वादळ आलं, याचा मागोवा घेण्यासाठी जॅक स्वत:च प्रयत्न सुरू करतो. या शोधादरम्यान कौटुंबिक वादाळाच्या तडाख्यात अडकलेली त्याची कॉर्पोरेट मीरा गिरिधर योगायोगाने त्याच्या आयुष्यात येते. या दोघांचीही आयुष्यं एकमेकांत गुंतली जातात, वादळाच्या अनिश्चिततेसारखी आणि अटळपणे. कादंबरीच्या प्रत्येक टप्प्यावर काही चित्रांच्या रेखाटनांचा वेध घेत वादळ आणि मानवी आयुष्यातल्या अनिश्चिततेला अधोरेखित करणारे साम्य-भेद जॅकच्या लेखणीतून व्यक्त होतात. त्या अनुषंगाने कादंबरीचं कथानक प्रत्येक टप्प्यावर उलगडत जातं. कथानकाचा विचार करता अनिता नायर यांची स्त्री चित्रणातली हातोटी प्रकर्षाने जाणवते. मध्यमवयीन कॉर्पोरेट पत्नी मीरा, गतवैभवात रमलेल्या म्हाताऱ्या सारे आणि लिली, तरुणपणातली आणि वय झालेली कलाचित्ती, नयनतारा आणि स्मृती या दोन तरुणी, या वेगवेगळ्या वयाच्या स्त्रिया बारकाईने आणि खुबीने रंगवल्या आहेत. कादंबरीत उल्लेखलेली स्थळं, वातावरणही समर्पक रेखाटलेली आहेत. अनिश्चितता आणि अस्वस्थता या मूळ गाभ्याभोवती रचलेलं हे कथानक मराठीत वाचताना काही ठिकाणी, अनुवाद न वाटता, इंग्रजी वाक्यांचा शब्दश: भाषांतर केल्यासारख्या वाक्यरचनांमुळे रसभंग होतो. कादंबरीच्या सुरुवातीलाच ध्वनित केलेली वादळाच्या आणि मानवी आयुष्यांच्या बाबतीत असलेली अनिश्चितता कथानकातही जाणवते, आणि समोर येते, ती या अनिश्चिततेमुळे निर्माण होणारी खळबळ. मीरा, जॅक या आणि कादंबरीतल्या प्रत्येक पात्राच्या आयुष्याचा भाग आहे ही अनिश्चितता आणि खळबळ. म्हणूनच ‘विस्मरणातच सर्व काही’ ही कादंबरी एक मुक्ततेची, क्षमाशीलतेची आणि पुनर्संधीची हृदयस्पर्शी कहाणी आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more