* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VAYU PRADUSHAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664263
  • Edition : 2
  • Publishing Year : 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 188
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHO IS THE CREATOR OF AIR POLLUTION? WHO ELSE, BUT THE HUMANS! MAN HAS THE INTENSE URGE TO RULE OVER EVERYBODY AND EVERYTHING. THIS DESIRE MAKES HIM SO BLIND THAT HE WISHES TO RULE OVER THE EARTH AND THE NATURE. NOT ONLY THIS, HE INTERFERES AT ALL LEVEL IS WITH THE NATURAL HAPPENINGS AND EVENTS. THE TERRIBLE POPULATION GROWTH, THE INDUSTRIALIZATION, THE WANTON FALLING OF THE TREES, AUTOMATIC VEHICLES PUMPING OUT POISONOUS GASES ALL THE TIME, THESE ALL THINGS ARE EQUALLY RESPONSIBLE FOR THE POLLUTION ALL OVER. WE ARE NOT ABLE TO REALIZE THAT THIS POLLUTION IS ENGULFING THE EARTH INTO ITS JAWS AND ONE FINE DAY IT WILL NOT HESITATE TO POISON US ALL, LIVING OUT NOBODY, KILLING EACH AND EVERY LIVING SOUL, MAKING THE EARTH LIFELESS. EACH YEAR, WE COME ACROSS ACCIDENTS WHERE THE AIR POLLUTION HAS CAUSED MORE DEATHS. THE INCIDENT OF BHOPAL GAS ACCIDENT IS STILL FRESH IN EVERYONE`S MIND. CAN WE NOT DO SOMETHING ABOUT THIS? CAN WE NOT OVERCOME THIS PROBLEM? YES, WE CAN! BUT WHAT WE NEED FOR IT IS IMMENSE WILL POWER, AWARENESS ABOUT THE ENVIRONMENT, EDUCATION ABOUT IT, AND PARTICIPATION OF THE EDUCATIONAL, SOCIAL AND SCIENCE INSTITUTIONS; AND LAST BUT NOT THE LEAST IS THE STRICT FOLLOW UP OF THE RULES AND REGULATIONS.
वायू प्रदूषणाचा भस्मासूर निर्माण केला आहे मानवानेच! निसर्गावर स्वामित्व गाजविण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे आणि निसर्गातील अमर्याद आणि विनाशकारी ढवळाढवळीमुळे! जगभर वेगाने वाढणारे औद्योगिकरण, लोकसंख्येमुळे फुगत चाललेली शहरे, अमानुषपणे होत चाललेली जंगलांची कत्तल, विषारी वायू आणि धूर ओकणारी असंख्य स्वयंचलित वाहने, यामुळे वायू प्रदूषणाचा अजगर सजीवांनाच नव्हे तर आपल्या वसुंधरेलाच विळखा घालीत आहे. प्रदूषणाचा हा भस्मासूर एक दिवस सा-या सजीवांनाच संपवून टाकील. मग उरेल आपली पृथ्वी एखाद्या ओसाड आणि निर्जन ग्रहासारखी! वायू प्रदूषणाने जगभरातील हजारो निष्पाप लोकांचे प्राण घेतले आहेत. भोपाळ वायुकांडाची साक्ष इतिहास सतत देत राहील. वायू प्रदूषणाच्या भस्मासूराला गाडून टाकता येणार नाही का? थ्यासाठी हवी प्रबळ इच्छाशक्ती, पर्यावरणाबद्दल लोकजागृती, पर्यावरण शिक्षण, सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक संस्थांचा सहभाग आणि कायद्याची कडक अंमलबजावणी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VAYUPRADUSHAN #VAYUPRADUSHAN #वायुप्रदूषण #SCIENCE #MARATHI #DR.KISHOR/DR.NALINIPAWAR #डॉ.किशोर/डॉ.नलिनीपवार "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 23-05-2004

    वायू प्रदूषणाचा भस्मासूर निर्माण केला आहे मानवानेच! निसर्गावर स्वामित्व गाजविण्याचा राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे आणि निसर्गातील अमर्याद आणि विनाशकारी ढवळाढवळीमुळे! जगभर वेगाने वाढणारे औद्योगिकरण, लोकसंख्यमुळे फुगत चाललेली शहरे, अमानुषपणे होत चाललेली जगलांची कत्तल, विषारी वायू आणि धूर ओकणारी असंख्य स्वयंचलित वाहने, यामुळे वायू प्रदूषणाचा अजगर सजीवांनाच नव्हे तर आपल्या वसुंधरेलाच विळखा घालीत आहे. प्रदूषणाचा हा भस्मासुर एक दिवस साऱ्या सजीवांनाच संपवून टाकील. मग उरेल आपली पृथ्वी एखाद्या ओसाड आणि निर्जन ग्रहासारखी! वायू प्रदूषणाने जगभरातील हजारो निष्पाप लोकांचे प्राण घेतले आहेत. भोपाळ वायुकांडाची साक्ष इतिहास सतत देत राहील. वायू प्रदूषणाच्या भस्मासुराला गाडून टाकला येणार नाही का? त्यासाठी हवी प्रबळ इच्छाशक्ती, पर्यावरणाबद्दल लोकजागृती, पर्यावरण शिक्षणख् सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक संस्थांचा सहभाग आणि कायद्याची कडक अंमलबजावणी. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 25-07-2004

    वायुप्रदूषणाची समस्या... जगाला भेडसावणाऱ्या समस्यांचा विचार केला तर वायुप्रदूषणाचा क्रमांक फार वरचा लागेल. सध्या ‘औद्योगीकरण म्हणजे देशाची प्रगती’ हे समीकरण रूढ झाल्यामुळे त्याच्या अनेक अपरिहार्य परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागते आहे. अशा परिणामंची प्रत्यक्ष झळ बसत नाही, तोपर्यंत आपण जागे होत नाही. वस्तुत: आपण स्वत: सिगारेट ओढत नसलो, तरी त्या धुरानेही आपल्याला जसा त्रास होत असतो, तसा कळत-नकळत होणारा वायुप्रदूषणाचा त्रास मानवी आरोग्याची हानी करतो आहे. नेमकी हीच जाणीव ‘वायुप्रदूषण’ या पुस्तकातून डॉ. किशोर पवार व सौ. नलिनी पवार यांनी आपल्याला करून देण्याचा प्रयत्न केला आहे. वायुप्रदूषण ही जागतिक समस्या असल्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांना वाटणारी जगबुडीची भीती निराधार म्हणता येणार नाही. या भूतलावर वनस्पती, प्राणी व मानव अशा घटकांमधील संतुलन बिघडले की, पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होऊन सजीवांना धोका पोहोचतो. यालाच प्रदूषण म्हणतात. या प्रदूषणाची कारणे प्रामुख्याने मानवनिर्मित व क्वचित नैसर्गिक असतात. अमर्याद औद्योगीकरण, वाढती लोकसंख्या, निसर्गदत्त जंगलाचा विनाश स्वयंचलित वाहनांची गर्दी, रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर यामुळे पाणी, हवा आणि जमीन तिन्हींचे प्रदूषण होते. वायुप्रदूषणाची नैसर्गिक कारणे म्हणजे वनस्पतीचे परागकण विषाणू, जिवाणू व बुरशीचे बीजाणू आणि ज्वालामुखीचा उद्रेक अशी आहेत. वायुप्रदूषणाची अशी अनेक कारणे असली आणि या प्रदूषणाच्या व्याख्या जरी अनेकांनी केलेल्या असल्या तरी त्यापेक्षा त्याचे भयावह परिणाम जास्त महत्त्वाचे आहेत. कारण ते समस्या मानवजातीला भोगावे लागतात. जगात अनेक ठिकाणी वायुप्रदूषणामुळे घडलेल्या दुर्घटनांची जंत्री फार मोठी आहे. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे ३ डिसेंबर १९८४ ला भोपाळ वायुकांडात जवळपास विकलांग, अपंग झाले. विकृत बालते जन्माला आली. संबंधितांना जरी नुकसानभरपाई मिळाली तरी त्यामुळे लाखमोलाचा जीव कधी परत येत नाही. जगातली आधुनिक काळातली अशा प्रकारची पहिली दुर्घटना बेल्जियममध्ये डिसेंबर १९३० मध्ये घडली. त्यानंतर अमेरिका, लंडन, मेक्सिको, जपान आदी देशांमध्येही अशा दुर्घटना वेळोवेळी घडल्या. तरीही माणसाला पुरते शहाणपण आल्याचे दिसत नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते. त्यामुळेच लेखकाने वायुप्रदूषणाच्या उगमापासून त्याच्या नियंत्रणापर्यंतची साद्यंत माहिती दिलेली आहे. स्वयंचलित वाहने, कीटकनाशके, विविध धातू, रासायनिक खते, किरणोत्सर्गी पदार्थ, औष्णिक विद्युत केंद्रे, पर्जन्य, प्रकाश, रासायनिक धुरके आदी गोष्टींपासून प्रदूषण कसे फैलावते व त्याचे कोणकोणते दुष्परिणाम होतात ते सविस्तर स्पष्ट केले आहे. मानवाच्या बाबतीत डोकेदुखी, थकवा, नैराश्य, कर्करोग, दमा, अंधत्व, त्वचारोग, श्वसनाचे विकार, जन्मजात विकृती, मूत्रपिंड तसेच मेंदूचे विकार, विषबाधा असे अनेक दुष्परिणाम संभवतात. वनस्पती तर बोलूही शकत नाहीत आणि पळूनही जाऊ शकत नाहीत. पण त्यांची वाढ खुंटणे, पाने, पाकळ्या गळणे अशा प्रकारचे परिणाम त्यांच्यावर होतात. निर्जीव गोष्टीही यातून सुटत नाहीत. इमारतींचा रंग, फर्निचर, कपडे, गालिचे, विविध शिल्पे यावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ताजमहाल, चारमिनार, काही सुप्रसिद्ध मंदिरे अशा ऐतिहासिक स्मारकांवरही वायुप्रदूषणाचा प्रतिकूल परिणाम होतो. आर्थिक नुकसानही प्रचंड प्रमाणात होते. फक्त न्यू यॉर्क शहरात १९५५ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात दरवर्षी ६० लाख डॉलरचे नुकसान झाल्याचे आढळते. पश्चिम बंगालमध्ये धुरामुळे गंजणाऱ्या वस्तूंचे नुकसान पाच कोटी रुपये इतके झाले. एकूण या सजीव आणि निर्जीव सृष्टीचे सर्व प्रकारचे होणारे नुकसान टाळण्यासाठी काही ठोस उपाय आवश्यक आहेत. या उपायांची चर्चाही लेखकाने केलेली आहे. सरकारने प्रतिबंधक कायदेही केलेले आहेत. प्रगत देशात त्याची कडक अंमलबजावणी केली जाते, पण मागासलेल्या किंवा विकसनशील देशात मात्र त्याबाबत आजही अनास्था दिसते. कायद्यातूनही पळवाटा काढल्या जातात. काही स्वयंसेवी संस्था पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्याचे काम आजही करतात. पण दुर्दैवाने आपल्या देशात गंभीर प्रश्नांना दुय्यम स्थान दिले जाते. या परिस्थितीत आमूलाग्र बदल होऊन एकूण समाजात पर्यावरणविषयक जाणीव निर्माण झाली, तर लेखकाचे श्रम सार्थकी लागले, असे म्हणता येईल. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 06-06-2004

    जगभर वेगाने वाढणारे औद्योगिकीकरण, लोकसंख्येमुळे फुगत चाललेली शहरे, आमनुषपणे होत चाललेली जंगलाची कत्तल, विषारी वायू, आणि धूर ओकणारी असंख्य स्वयंचलित वाहने, यामुळे वायू प्रदूषणाचा अजगर सजीवांनाच नव्हे तर आपल्या वसुंधरेलाच विळखा घालीत आहे. प्रदूषणाचा हाभस्मासूर एक दिवस साऱ्या सजीवांनाच संपवून टाकेल. मग उरेल ती फक्त पृथ्वी एखाद्या ओसाड आणि निर्जन ग्रहासारखी. प्रस्तुत पुस्तकात पृथ्वीचा हा ऱ्हास थांबवता यावा यासाठी पर्यावरण लोकजागृती, पर्यावरण शिक्षण आणि कायद्याची कडक अंमलबजावणी याविषयी चर्चा आढळते. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 26-09-2004

    वायू प्रदूषणाची जाणीव... झपाट्याने होणारे शहरीकरण व वाढती कारखानदारी यांचा एकत्र परिणाम म्हणजे प्रदूषण. विशेषत: शहरी भागामध्ये नागरिकांच्या आरोग्यावर दूरगामी विपरीत परिणाम घडवून आणण्याची क्षमता असणारे वायू प्रदुषण’ ही एक जागतिक गंभीर समस्या आहे. वाय प्रदूषणाची व्याप्ती फार मोठी आहे व याविषयी शास्त्रीय माहिती एकत्र मिळवणे ही जिज्ञासू नागरिकांची मोठी गरज आहे. ‘वायू प्रदूषण’ या पुस्तकाच्या रूपाने याविषयीची सर्वंकष व शास्त्रीय माहिती एकत्रित परंतु सुलभ रीतीने मांडून डॉ. पवार यांनी ही गरज पूर्ण केली आहे. वायू प्रदूषणाचे प्रकार कोणते, त्यांची कारणे काय, त्यांचे आरोग्यावर कोणते विपरीत परिणाम होतात याची शास्त्रीय माहिती लेखकांनी दिलेली आहे. वाहनांचे प्रदूषण, कीटकनाशके, धातू, किरणोत्सर्ग, औष्णिक विद्युत केंद्रे, कारखाने अशा विविध स्रोतामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाचा गोषवारा घेणारी सोळा प्रकरणे म्हणजे याविषयीच्या उत्तम माहितीचा संकलित खजिनाच आहे. याबरोबरच वायू प्रदूषणामुळे होणारे आम्ल पर्जन्य, हरितगृह परिणाम, ओझोन थराचे विरळीकरण व एकूण पर्यावरणावर होणारे विपरीत परिणाम यांची उत्तम चर्चा या पुस्तकात आढळते. या माहितीबरोबरच वायू प्रदूषणामुळे ऐतिहासिक स्मारकांवर होणारे परिणाम, आर्थिक नुकसान, सजिवांच्या आरोग्यावरील दुष्परिणाम यांचीही माहिती येथे दिली आहे. वायू प्रदूषण प्रतिबंधक कायदे व वायू प्रदूषण नियंत्रण करण्याची उपकरणे व उपाययोजना यांची चर्चाही लेखकाने केलेली असल्यामुळे ‘वायू प्रदूषण’ हे एक परिपूर्ण पुस्तक बनले आहे. उत्तम छपाई व विषय सुलभ करण्यास व रंजक करण्यास विविध छायाचित्रे, आकृत्या व तक्ते यांचा मोठा सहभाग आहे. लेखकाने संदर्भसूची दिली असती तर जिज्ञासूंना त्याचा अधिक उपयोग झाला असता. पर्यावरण या विषयाचे वाढते महत्त्व व त्याचा शालेय शिक्षणात केलेला समावेश या पार्श्वभूमीवर ‘वायू प्रदूषण’ या पुस्तकाचे स्वागत केले पाहिजे व लेखकांनी हा महत्त्वाचा विषय उत्तम रीतीने हाताळून पर्यावरण शिक्षण व जनजागृतीच्या प्रयत्नांना चांगला हातभार लावला आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये उपयोगी पडेल व जिज्ञासूंना शास्त्रीय माहिती देणारे ‘वायू प्रदूषण’ हे पुस्तक निश्चितच संग्राह्य आहे. -डॉ. भूषण पटवर्धन ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more