* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VAVTAL
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983876
  • Edition : 8
  • Publishing Year : JANUARY 1985
  • Weight : 140.00 gms
  • Pages : 92
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 41 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THEY HAD NEVER THOUGHT FOR ONCE THAT ALL THEIR NEIGHBOURS WHO WERE STAYING CLOSE TO THEM, HAD THEIR HOUSES NEXT TO THEM WOULD ONE DAY BECOME THEIR ENEMIES. THEY ALWAYS RELIED UPON EACH OTHER, SOUGHT EACH OTHER’S HELP IN DIFFICULT TIMES, WERE ALWAYS THERE WHENEVER NEEDED. BUT TODAY, THESE SAME PEOPLE HAD BECOME THEIR ENEMIES. FOR THE FIRST TIME THEY REALIZED THAT THERE WAS DANGER FROM THESE VERY PEOPLE. IT WAS INDEED A SHOCK. THEY WERE SHAKEN TO THEIR CORE. NEVER BEFORE THEY HAD REALIZED, BUT NOW THEY FELT THAT THEY WERE ORPHANS. THEY HAD NOBODY WHOM THEY WOULD CALL AS THEIR OWN. NOW THEY HAD NO GUARANTEE OF ANYTHING. AT WHAT TIME WOULD DESTINY TAKE A TURN AND IN WHAT WAY WAS SO VERY UNSURE. A BIG STORM WAS THE CAUSE BEHIND THIS….
आपल्या घरांना लागून असलेली घरे, अडीनडीला आपली मदत घेणारी, आपल्याला मदत करणारी, आपल्याच गावातील ही माणसे आपली ‘शत्रू होतील, असे त्यांना कधी वाटले नव्हते. त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे, ही जाणीव त्यांना आज पहिल्याप्रथमच होत होती. हा धक्का अगदी अनपेक्षित होता. त्याने ही मंडळी ळापासून कलली होती. कधी नव्हे ते त्यांना वाटत होते की, आपण अनाथ आहोत. आपले असे म्हणायला कोणी नाही.आता कशाची शाश्वती नाही.केव्हा काय होईल त्याचा नेम नाही! एका ‘वावटळी’मुळे हे सर्व घडले होते...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VYANKATESH MADGULKAR#MANTARLELE BET#BIG CITY LITTLE BOY#MANUEL KOMROFF#MANHATAN# #व्यंकटेश माडगुळकर#मंतरलेले बेट#बिग सिटी लिटील बॉय#कॉमरॉफ#
Customer Reviews
  • Rating StarVinamara Bhabhal

    वावटळ (कादंबरी) लेखक : व्यंकटेश माडगूळकर प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन ३० जानेवारी १९४८ च्या सायंकाळी नथुराम गोडसे नामक एका ब्राम्हण युवकाने गांधीजींची गोळी घालून हत्या केली आणि देशाचं राजकारण, समाजकारण सगळं एका रात्रीत बदलून गेलं. हया घटनेचे परिणाम शहर, गाव, खेड ह्यापुरते मर्यादित राहिले नाही. तर दुर्लक्षित भागातले लोक सुद्धा ह्या आगीत होरपळून निघाले. तेव्हाची जीवन व्यवस्था ढवळून निघालीच सोबत येणाऱ्या आगामी पिढ्या सुद्धा ह्या घटनेच्या शिकार झाल्या. पुण्यात राहणारे ३ युवक. गांधी हत्येच्या संध्याकाळ नंतर त्यांच्या आयुष्यात आलेली वावटळ मांडणारी ही कादंबरी आहे. त्याचा पुण्यातून गावाकडे झालेला प्रवास, प्रवासात गावागावातून माणसांच्या आयुष्यात होणारे बदल आणि मग आपापल्या गावी पोहोचल्यावर त्यांची उर्ध्वस्थ झालेली घर, गावं ह्यांचं वर्णन तुम्हाला २०१९ च्या संध्याकाळी सुद्धा अस्वस्थ करतं. विशिष्ट जातीद्वेष्टा समाज आज पण आहेच. त्याची पाळमुळ किती आधीपासून रुजलेली आहेत ते ही कादंबरी वाचल्यावर लक्षात येतं. पण एक गोष्ट खूप नकळत जाणवली ती म्हणजे प्रत्येक समाज दुसऱ्या समाजावर किंवा स्वतःवर नकळत अन्याय हा करत असतोच आणि त्या सगळ्याची आपल्याला इतकी सवय झालीये की आपल्या ते लक्षात ही येत नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more