* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VANHI TO CHETAVAVA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664638
  • Edition : 3
  • Publishing Year : MAY 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 96
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KHANDEKAR WAS A LITTERATEUR WITH MASTER OVER MANY STYLES. HE WAS ALSO FAMOUS FOR HIS PROFOUND WRITING SKILLS. HE DID NOT WRITE WITH THE SHEER PURPOSE OF ENTERTAINMENT. FOR HIM, A THOUGHTFUL CONSIDERATION WITH A CONCERN FOR THE SOCIETY WAS MORE IMPORTANT. HE STROVE FOR A MODERN SOCIETY. HIS ARTICLES BASED ON HIS OBSERVATIONS OF THE SOCIETY HELD A DEEP KNOWLEDGE WHICH STANDS TO BE TRUE TODAY AS WELL. IT WAS HIS DREAM TO BUILD A COUNTRY BASED ON GANDHISM WHICH WOULD FURTHER ALLOW ALL TO LIVE ON EQUAL GROUNDS. HE WISHED TO ACHIEVE A STRONG FOUNDATION BASED ON SCIENCE, EQUALITY, DIGNITY TO LABOUR, LOVE FOR OUR COUNTRY AND PURITY OF HEART. HE BELIEVED THAT THE MODERN WOMAN WAS EDUCATED AND PRUDENT. HE IMAGINED THE COMMON MAN TO BE FULL OF VIRTUE AND JUSTICE. HE BELIEVED THAT PEOPLE WOULD BE WILLING TO WORK TO THE FULLEST OF THEIR CONTENT. HE WAS INSISTENT UPON IGNITING MINDS IN ORDER TO ESTABLISH THE NEW INDIA. IT IS IMPERATIVE TO READ AND UNDERSTAND HIS ARTICLES IN ORDER TO GRASP THE DEPTH OF HIS ASPIRATION. ELSE, WE WOULD NOT BE ABLE TO CREATE THE NEW INDIA THAT HE SO WISHED TO ESTABLISH.
वि. स. खांडेकर हे ललित लेखक होते तसेच गंभीर समाजिंचतकही होते. त्यांच्या समग्र साहित्यास समाजिंचतनाची किनार अंगभूत असायची. केवळ रंजक लिहिणं खांडेकरांची वृत्ती नव्हतीच मुळी! विशुद्ध वैचारिक लेखन ते तन्मयतेने करायचे. त्यात नवसमाज निर्मितीचा ध्यास असायचा. त्यांचे समाज चिंतनपर वैचारिक लेख म्हणजे अपरासृष्टीच! गांधीवाद, समाजवादाधारित मानव समाज निर्मिती हे त्यांचं बिलोरी स्वप्न होतं. त्यांच्या कल्पनेतला नवा भारत विज्ञाननिष्ठ, समताधिष्ठित, श्रमप्रतिष्ठ, स्वदेशभावयुक्त, आंतरिक शुचितेने भारलेला असायचा. नवी स्त्री केवळ शिक्षित नव्हती तर सुजाण होती. सामान्यजन नैतिकता, न्याय व कृतिशीलतेस आसूसलेले ते कल्पायचे. नवा भारत घडवायचा तर निर्मितीचा वन्हि चेतायलाच हवा, असा त्यांचा आग्रह असायचा. खांडेकरांची ही अपरासृष्टी समजून घ्यायची तर ‘वन्हि तो चेतवावा’तील वैचारिक लेख वाचायलाच हवेत. त्या शिवाय आपण नवा भारत निर्मिणार तरी कसा? नि केव्हा?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #वन्हि तो चेतवावा #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 11-07-2004

    वि.स. खांडेकर हे ललित लेखक होते तसेच गंभीर समाजचिंतकही होते. त्यांच्या समग्र साहित्यास समाजचिंतनाची किनार अंगभूत असायची. केवळ रंजक लिहिणं खांडेकरांची वृत्ती नव्हतीच मुळी! विशुद्ध वैचारिक लेखन ते तन्मयतेने करायचे. त्यात नवसमाज निर्मितीचा ध्यास असायचा.त्यांचे समाज चिंतनपर वैचारिक लेख म्हणजे अपरासृष्टीच! गांधीवाद, समाजवादाधारित मानव समाज निर्मिती हे त्यांचं बिलोरी स्वप्न होतं. त्यांच्या कल्पनेतला नवा भारत विज्ञाननिष्ठ, समताधिष्ठित, श्रमप्रतिष्ठ, स्वदेशभावयुक्त, आंतरिक शुचितेने भारलेला असायचा. नवी स्त्री केवळ शिक्षित नव्हती तर सुजाण होती. सामान्यजन नैतिकता, न्याय व कृतिशीलतेस आसूसलेले ते कल्पायचे. नवा भारत घडवायचा तर निर्मितीचा वन्हि चेतायलाच हवा, असा त्यांचा आग्रह असायचा. खांडेकरांची ही अपरासृष्टी समजून घ्यायची तर ‘वन्हि तो चेतवावा’तील वैचारिक लेख वाचायलाच हवेत. त्याशिवाय आपण नवा भारत निर्मिणार तरी कसा? नि केव्हा? ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 29-08-2004

    वैचारिक लेखांची पर्वणी... ‘वन्हि तो चेतवावा’ हे डॉ. सुनीलकुमार लवटे संपादित उल्लेखनीय पुस्तक. प्रस्तुत पुस्तकात साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे समाजचिंतनपर वैचारिक लेख अंतर्भूत आहेत. खांडेकरांच्या समग्र साहित्यातून ध्येयवाद जाणवत राहतो. त्यांच्या कल्नेतला नवा भारत विज्ञाननिष्ठा, समतानिष्ठा, श्रमप्रतिष्ठा, स्वदेश प्रेम यावर आधारलेला होताच, पण विशेष म्हणजे त्याला आंतरिक शूचितेचं अधिष्ठान होतं. प्रस्तुत पुस्तकात एकूण तेरा वैचारिक लेख आहेत. या लेखांतून विविध सामाजिक समस्यांवरचे विचार आजही कालबाह्य झालेले नाहीत. खांडेकर हे स्वप्नदर्शी साहित्यिक होते असं म्हटलं जातं; पण त्यांची स्वप्नं, ध्येयवाद हा मनाच्या तळमळीतून आलेला आंतरिक उमाळा होता. म्हणूनच तो पारदर्शी होता. समाजचिंतन हा त्यांच्या साहित्याचा मूळ गाभा होता. ते जीवनवादी साहित्यिक होते. गांधीवाद व समाजवादाच्या बैठकीवर त्यांचा मूळ पिंड पोसला गेला होता. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळातला मूल्यांचा ऱ्हास, औद्योगिककीरणानं भौतिक सुखाची वाढती लालसा, यांत्रिकता, सामान्य माणसाची भावनाशून्यता, चंगळवाद, व्यभिचार या आत्मघाताच्या मार्गाकडे नेणारी भीषण सामाजिक परिस्थिती त्यांच्यासारख्या संवेदनशील चिंतकाला विषण्ण करते. सामान्य माणसापासून नेत्यापर्यंत सर्वांच्याच ढळलेल्या मूल्यहीन आचारविचारांनीही ते निराश झालेले दिसत नाहीत. त्यांचा आशावाद दुर्दम्य आहे. एकीकडे समाजाचं, देशाचं असं दाहक चित्रण करताना दुसरीकडे त्यांनी कल्पनेतली समाजसृष्टी लेखातून मांडण्याचं कार्य सातत्यानं सुरूच ठेवलं होतं. डॉ. भालचंद्र फडके यांनी त्यांच्या या समाजसृष्टीची ‘अपरासृष्टी’ या शब्दात चिकित्सा केली आहे. १९२७ ते १९६८ या चार दशकांतील लेखांतून स्त्रीजीवन, विद्यार्थीदशा, समाजदेश यांची स्थिती, त्याची चिकित्सा, कायदेविषयक मतं अशा विविध विषयांवर विचार व्यक्त केले आहेत. ‘वन्हि तो’ या लेखात प्रामुख्याने स्त्रीजीवन, विद्यार्थीदशा, समाजमूल्ये हे विषय आहेत. ‘कायदा म्हणजे काव्य नव्हे’ या लेखात वेश्याबंदीसारख्या उपेक्षित पण अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक समस्येवर विचार व्यक्त करताना ते म्हणतात, ‘स्त्री-पुरुष संबंधाविषयीच्या नीतीच्या आपल्या कल्पना आदर्श व काटेकोर झाल्या आहेत. मोठमोठी माणसेही ज्या भुका आवरू शकली नाहीत त्या तृप्त करण्याची संधी न मिळाल्यामुळेच ही माणसे वाममार्गाला लागतात. याबाबतीत त्यांची भूमिका शिक्षकांची, सुधारकांची, समाजचिंतकांची होती.’ ‘स्त्री विकास’ या जिव्हाळ्याच्या विषयावर रूळ बदलले पण या लेखात १९२० पासूनचा आढावा ते घेतात. स्त्रीशिक्षणाच्या प्रसारामुळे स्त्रीशिक्षणाच्या प्रसारामुळे स्त्रीजीवन व तिचा विकास यांची सखोल मीमांसा करतात. शिक्षणानं स्त्रीजीवनात झालेलं परिवर्तन, कारणे मांडताना पाश्चात्त्य लेखकाच्या या संदर्भातील विचाराचा आढावाही घेतात. ‘नवी सामाजिक मूल्ये’ या लेखात बदलती सामाजिक विषमता दूर करायची असेल तर बुद्धी, भावना, कायदा या साऱ्यांचा समतोल असावा तरच ही सामाजिक जडता नष्ट होऊ शकेल. नवी विद्या, नवे विज्ञान घेऊन आलेल्या इंग्रजी राजवटीने वैयक्तिक नीतिमत्तेच्या भारतीय जीवनाच्या गाभ्यावर जोरदार आघात केला. सामाजिक मनाची वैचारिक व भावनिक पोकळी व तिच्यापोटी निर्माण झालेला वैफल्यवाद हे आजच्या आपल्या समाजाचं खरं दुखणं आहे. सर्व जुन्या श्रद्धा गेल्या, पण त्याची जागा घेणाऱ्या नव्या श्रद्धा निर्माण करण्याच्या कामी आम्ही अपयशी ठरलो आहोत, हे त्यांचं भाष्य कटू वास्तव स्वीकारायला भाग पाडतं. व्यक्ती, समाज, राष्ट्र, मानवता या सर्वांच्याच बाबतीत सत्य व अर्थगर्भ ठरणाऱ्या केशवसुतांनी दिलेल्या संदेशाचं स्मरण ते करून देतात आणि नव्या भारताच्या निर्मितीचं स्वप्न सुजाण नागरिकांना दर्शवतात. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 02-08-2004

    प्रस्तुत पुस्तकात स्त्री-जीवन, विद्यार्थिदशा, समाजमूल्ये, बुद्धी व भावनांचे द्वंद्व इत्यादी विषयांशी निगडित वैचारिक लेख आहेत. या ग्रंथातील प्रत्येक लेखामागे विशेष असे प्रसंग, घटना आहेत. या लेखांना एक प्रतिक्रियात्मक असं रूप आहे. यामुळेच त्यांच्या समगर साहित्यास असलेल्या समाजचिंतनाच्या किनारीचे वाचकाला प्रत्यंतर येते. नवा भारत घडवायचा तर निर्मितीचा वन्ही चेतवायलाच हवा, असा त्यांचा आग्रह असायचा. खांडेकरांची ही अपरासृष्टी समजून घ्यायची तर प्रस्तुत पुस्तकातील वैचारिक लेख वाचायलाच हवेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book