* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOW TO DEVELOP A SUPER MEMORY
  • Availability : Available
  • Translators : CHARULATA PATIL
  • ISBN : 9788177660562
  • Edition : 5
  • Publishing Year : OCTOBER 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 92
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :ANANT PAI COMBO SET-4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
VERY FEW PEOPLE ARE BLESSED WITH A SHARP MEMORY. THEY REMEMBER THE LESSONS AND POEMS FROM THEIR CHILDHOOD; THEY REMEMBER THE MINUTEST DETAILS LIKE FIGURES, NAMES, NUMBERS OR SUCH OTHER THINGS. DO YOU ENVY SUCH PEOPLE? DO YOU NOT WISH TO HAVE AN EQUALLY SHARP MEMORY? DO YOU NOT WISH TO REMEMBER ALL PAST THINGS WITH THEIR MINUTEST DETAILS? THIS BOOK WILL HELP YOU TO TRUDGE ALONG THE PATH OF HOW TO REMEMBER! THERE ARE A FEW GUIDELINES IN THIS BOOK WHICH WILL SURELY HELP TO TRAIN YOUR MIND TO REMEMBER THOSE THINGS WHICH YOU WANT TO REMEMBER.THIS BOOK IS BASED ON THE CONCEPTION THAT NOTHING LIKE BAD OR WEAK MEMORY REALLY EXISTS. WE OFTEN COME ACROSS PEOPLE CURSING THEIR WEAK MEMORY. THE FACT IS MEMORY IS NOT BAD OR WEAK, IT JUST NEEDS ENOUGH TRAINING IN A CERTAIN WAY. PAI UNCLE HERE, WHOM WE KNOW AS THE ORIGINATOR OF `AMAR CHITRA KATHA`, THE MYTHOLOGICAL STORIES HAS ESPECIALLY COME UP WITH THIS BOOK TO HELP US TO KNOW THE WAYS TOWARDS A BETTER MEMORABLE LIFE. THE OTHER BOOKS IN THIS SERIES; `YASHACHA KAANMANTRA` AND `ATMAVISHWACHA KANMANTRA` ARE EQUALLY READABLE.
काही काही माणसांची स्मृती इतकी विलक्षण असते, की ती मोठमोठ्या कविता न अडखळता घडाघड म्हणू शकतात; किंवा वेगवेगळे तपशील, आकडे, नावं त्यांच्या अगदी चपखल लक्षात राहतात. या माणसांचा तुम्हांला हेवा वाटतो का? आपलीही स्मृती चांगली असावी, सगळ्या गोष्टी आपल्या अगदी छान, दीर्घकाळ आणि स्पष्ट स्मरणात राहाव्यात, असं तुम्हांलाही वाटतं का? या पुस्तकात तुमची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त ठरणाया अशा काही झटपट, पण हमखास पद्धतींचा कानमंत्र सांगितलेला आहे. माणसाला जीवनात ज्या गोष्टी स्मरणात ठेवणं आवश्यक असतं, त्या स्मरणात ठेवण्यासाठी आणि स्मृतीला सर्वोत्तम प्रशिक्षण देण्यासाठी या पद्धती हमखास यशस्वी ठरतात. वाईट किंवा कमकुवत स्मृती नावाची चीजच अस्तित्वात नसते, या विश्वासाच्या पायावर हे पुस्तक आधारलेलं आहे. अनेक लोक आपल्या स्मृतीला दोष देतात; परंतु त्यांची स्मृती वाईट नसते, तर तिला योग्य प्रशिक्षण दिलं गेलेलं नसतं, हे त्याचं मूळ कारण आहे. अनंत पैज्यांना आपण पैकाका म्हणून ओळखतो, त्यांनी आपल्या ‘अमर चित्रकथा’ या हास्यकथामालिकेतून आपल्या देशातील अनेक प्राचीन दंतकथा जिवंत केल्या आणि मुलं आणि पालकदोघांनाही मंत्रमुग्ध केलं. व्यक्तिमत्त्वविकासाला प्रेरणा देणारं लेखन करणारे लेखक म्हणूनही यांची ख्याती आहे. ‘यशाचा कानमंत्र’ आणि ‘आत्मविश्वासाचा कानमंत्र’ ही याच मालिकेतील त्यांची पुस्तकंही संग्राह्य आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#SELFHELP #ANANTPAI #SUCESS #मार्गदर्शनपर #अनुवाद #अनंतपै #यश #व्यक्तिमत्वविकसन #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 03-02-2002

    दहावी वा बारावीच्या परीक्षा जवळ आल्या की, विद्यार्थी तयारी करू लागतात. काल वाचलेलं लक्षात राहात नाही. मगाशी काही मुद्दे काढले आणि आता आठवायचा प्रयत्न केला तर काही आठवत नाही. साधारणत: घरोघरी असा सूर ऐकू येतो, यात चिंता करण्यासारखी बाब नाही. स्मृती ही ांगली अथवा वाईट असा भाग नसतो. लक्षात राहावे यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत, मात्र मनाची ठेवण वेगळया पद्धतीने तयार करावी लागते. ही ठेवण कशी असावी किंवा त्याची तयारी कशी करावी यासंबंधी माहिती देणारे ‘उत्तम स्मृतीचा कानमंत्र’ हे पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे. उत्तम स्मरणशक्ती हा गुण आपण नेहमी अभ्यासाच्या संदर्भात वापरतो. दैनंदिन जीवनात वावरताना आपल्याला अनेक गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात. स्मृती म्हणजे दुसरे असते तरी काय? दीर्घकाळ लक्षात ठेवण्याची बाब. काही माणसे मोठमोठ्या कविता न अडखळता म्हणू शकतात. वेगवेगळे तपशील, आकडे, नाव वगैरे गोष्टी चटकन त्यांच्या लक्षात राहतात. अशा माणसांचा प्रसंगी आपणाला हेवा वाटतो. आपल्या स्मृतीचा विकास कसा करावा याची आखणी या पुस्तकात केली आहे. या पुस्तकात एक उत्तम उदाहरण दिले आहे. उत्तम शरीरसंपदा राखावयाची असल्यास रोजच्या रोज व्यायाम करण्याला श्रेय दिले जाते. स्मृतीच्या बाबतीतही असेच आहे. त्यादृष्टीने जॉर्ज जॉन्सन या तरुणाची कथा पाहण्यासारखी आहे. या पुस्तकाचे मूळ लेखक अनंत पै आहेत. त्याचा अनुवाद चारुलता पाटील यांनी सोप्या मराठीत केला आहे. स्मृती विकसित होण्यासाठी आनंददायक गोष्टींची सांगड घालणे, स्मरणाचे सूत्र विकसित करणे, निरीक्षण, सेकंत पद्धत, मनाचा समतोल ठेवणे आणि त्याला साहचर्याची जोड देणे या गोष्टी स्मृती चांगली राहण्यासाठी उपयुक्त आहेत. याच साऱ्या गोष्टी जीवनात वावरताना कशा सांभाळायच्या याचे विवरण पै यांनी केले आहे. त्यादृष्टीने हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more