* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`TRIVENI` A CONFLUENCE OF THREE RIVERS, THESE POEMS ARE UNIQUE IN THEIR STYLE. NO ONE HAS EVER TRIED THIS FORM. GULJAR IS THE FIRST TO DO SO. THE FIRST TWO LINES OF EACH OF HIS POEM MEET EACH OTHER GIVING COMPLETE MEANING TO THE POEM, BUT THE THIRD LINE? IT SECRETLY MEETS THIS CONFLUENCE, UNDERGROUND; AWAY FROM OUR SIGHT. ALL THESE POEMS MARK THE PROMINENT SILENCE IN GULJAR`S POETRY. THIS SILENCE HAS IMMENSE POWER. IT IS EXPRESSED VERY STRONGLY. HIS POETRY HAS VERY FEW WORDS, BUT EACH HAS TONS OF MEANINGS. EACH ONE IS VERY SUBTLE. IT SOMETIMES IS AGITATED WITH THE PARTING OF THE NEAR AND DEAR, IT SOMETIMES REGRET THE CONTROVERSIES IN THE SOCIETY. KEEPING IN TOUCH WITH IT IS THE ETERNAL TRUTH AND THE UNDERSTANDING.
हेलन केलर हे आजच्या जगाला सर्वपरिचित असलेले केवळ एक व्यक्तिनाम नाही. माणसाच्या अदम्य आत्मविश्वासाचे आणि अपराजित, विजिगीषु वृत्तीचे ते एक सुंदर प्रतीक आहे. निसर्गाने दिलेल्या पंचेंद्रियांच्या साह्याने माणूस परस्परांशी, भोवतालच्या जगाशी संवाद साधतो. हेलनची तर तीन ज्ञानेंद्रिये निसर्गाने हिरावून घेतली होती. ती आंधळी होती. बहिरी होती. मुकीही होती. परस्परांशी संपर्वÂ जोडण्याचे स्पर्श हे एकमेव साधन तिला लाभले होते. पण आशावादी मनोवृत्ती, विलक्षण जिद्द आणि अपरंपार परिश्रमशीलता यांच्या बळावर तिने या साया उणिवांवर मात केली. आपले स्वत:चे जीवन तर तिने अर्थपूर्ण केलेच; पण जगातील सर्व अंध, मूकबधिर यांनाही तिने प्रगतीच्या, विकासाच्या वाटा खुल्या करून दिल्या. त्या हेलन केलरची ही जीवनगाथा. जितकी वेधक, रोमांचकारक, तितकीच स्फूर्तिदायक...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating StarDhananjay Gore

    हे त्रिवेणी पुस्तक छान आहे. अगदी बेलाच्या पानासारखे आहे. जपान मध्ये याला `हायकू` असे संबोधीले जाते. मेघना साने यांचा त्रिवेणी काव्यसंग्रह वीस वर्षांपूर्वी आणि गुलजार यांचा काव्यसंग्रह पाच वर्षांपूर्वी माझ्या खजिन्यात दाखल झाले. वात, पित्त आणि कफ यासाखे मनातील त्रिदोष हरण करणा-या त्रिवेणी संगमातील या काव्यसरीता असतात जणु! छोट्या पण आशय मोठा असतो अन् त्यामुळे वाचतांना कंटाळा येत नाही. ...Read more

  • Rating StarTanmay Keluskar

    लेखनाची पद्धत भन्नाट आहे ह्यात आणि गर्भितार्थ तर अफलातून

  • Rating StarNitin Lokhande

    अप्रतिम ......तीन ओळींत पूर्ण कविता ...म्हणुन त्रिवेणी ....पहील्या दोन ओळी म्हणजे गंगा आणि यमूनेचा संगम तर ....तीसरी ओळ म्हणजे सरस्वती प्रमाणे गुप्त आणि सुप्त विचारानीं समांतर वाहत जाणारी .....

  • Rating StarDAINIK SAKAL 17-11-2002

    गुलजारांच्या ‘त्रिवेणी’चा सारस्वत अनुवाद... गुलजार संवेदनशील कवी, तर शांता शेळके भावग्राही अनुवादक. या सुरेख संगमामुळेच साकारली उर्दू, हिंदी नि मराठीची त्रिवेणी. त्रिवेणी हा गुलजारांनी घडवलेला त्रिपदी छंद. तीन दशकांच्या निरंतर रियाजानंतर तो समृद्ध झला. शांता शेळके यांना हिंदी, उर्दूची चांगली जाण होती, हे गुलजारांच्या मूळ हिंदीत लिहिलेल्या ‘त्रिवेणी’ या त्रिपदी गझल संग्रहाचा मराठी अनुवाद वाचत असताना लगेच लक्षात येते. त्यात त्यांचा पिंड कवयित्रींचा त्यामुळे भाव नि भाषेचा सुरेख संगम या अनुवादात पदोपदी लक्षात येतो. हा अनुवाद हिंदी-मराठीस जोडणारा दुग्धशर्करा योग होय. फाळणीनंतर जी माणसं पाकिस्तान सोडून भारतात आली, त्यापैकी गुलजार एक होत. फाळणीच्या वेदनांनी त्यांचं काव्य ओथंबलेलं आहे. ते अशा त्रिपदी गझल वाचताना तीव्रतेनं जाणवतं. मी आपले सारे समान घेऊन आलो होतो बॉर्डरच्या अलीकडे माझे मस्तक मात्र कुणी कापून ठेवून दिले तिकडेच माझ्यापासून अलग होणे रुचले नसेल तिला कदाचित! गुलजारांची त्रिवेणी नामक त्रिपदी अल्पाक्षरी गझल होय. पहिल्या दोन ओळींचा शेर असतात गंगा-यमुना. हा असतो विषय विस्तार. तिसरी ओळ असते सरस्वती. तीत गझलचा आशय अमूर्त, अव्यक्त असतो. सरस्वतीसारखा गुप्त. काव्य वाचकांनी स्वानुभवांच्या समृद्धीवर स्वविवेक नि स्वतर्क इत्यादीच्या बळावर तो जाणून घ्यायचा त्यामुळे ‘त्रिवेणी’ समजायची तर कवी नि वाचक यांच्यात अद्वैत भाव, भाषा, भंगिमांचा त्रिवेणी संगम होणं पूर्वअट असते. गुलजारांची कविता अनुभवाच्या समृद्धीसह भाषांतरित करायची तर अनुवादकामध्ये ते सारस्वत कौशल्य ती साहित्य प्रतिभा असणे अनिवार्य. ती शांता शेळकेमध्ये होती. ज्या मराठी वाचकांना त्यांच्या कॉफी हाऊस प्रत्येक टेबलावर नवा पाऊस! सारख्या हायकूचं त्रिपदीचं सौंदर्य पेलता आलं, त्यांना या त्रिवेणी म्हणजे नवी पर्वणीच वाटल्याशिवाय राहणार नाही. त्रिवेणी अनुभवजन्य तशीच भावसमृद्ध! मराठी अनुवाद करताना शांता शेळके यांनी मूळ त्रिवेणीतील आशयास धक्का लावू न देता त्यांचा अनुवाद केला आहे. काही ठिकाणी तर हा अनुवाद मूळ रचनेच्या बरहुकूम झालेला आढळतो. वह जिससे साँस का रिश्ता बंधा हुआ था मेरा दबा के दाँत तले साँस काट दी उसने कटी पतंग का माझा मुहल्ले भर ते लुटा! सारख्या या हिंदी त्रिवेणीचा शांता शेळकेंनी केलेला खालील मराठी अनुवाद याचा ठळक पुरावा म्हणून सांगता येईल. जिच्याबरोबर श्वासाचे धागे जोडले होते मी ते नातेच, दातांनी धागा तोडावा तसे तोडले तिने! आणि... आता काटलेल्या पतंगाचा तुटका मांजा लुटला जातो आहे मोहल्यात! ही गोष्ट अलाहिदा की ‘जोडले’च्या ठिकाणी ‘जडले’ नि ‘मोहल्ल्यात’च्या ठिकाणी ‘गल्लीत’ शब्दांची रचना चपखल ठरली असती. ‘त्रिवेणी’ या गुलजारांच्या नवरचित छंदांच्या संग्रहाचा मराठी अनुवाद ही शांता शेळके यांनी मराठी साहित्यास दिलेली शेवटची देणगी नि म्हणून तिचं ऐतिहासिक मूल्य राहिल. हा अनुवाद गुलजारना इतका भावला की, त्यांनी तो खालील शब्दांत शांताबार्इंना समर्पित केला. शान्ताबाई, आप सरस्वती की तरह मिली। और सरस्वती की तरह गुम हो गयी। ये ‘त्रिवेणी’ आप ही को अर्पित कर रहा हूँ। - गुलजार मूळ रचनाकरानं अनुवादकाचा केलेला असा सन्मानही माझ्यासारख्या अन्य अनुवादक, अभ्यासकास वैश्विक घटना वाटल्यावाचून राहणार नाही. अशी दर्दी कलाकारच देऊ जाणे! सरस्वतीच्या प्रतीकात्मक चिन्हाचं साधं परंतु आशयघन मुखपृष्ठ लाभलेला हा मराठी भाषांतरित काव्यसंग्रह मूळ हिंदी ग्रंथाच्या एक तृतीयांश किमतीत मराठी काव्यरसिकांना त्यांच्या बोलीत उपलब्ध करून देऊन मराठी प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊसने ‘मराठी पुस्तके महाग असतात’ हा आरोप अपवादाने खोटा ठरवला आहे. तो नियम होईल. तर मराठी साहित्याचा प्रसार होण्यास साह्य होईल. ‘त्रिवेणी’ या भाषांतरित गझल संग्रहात विषय वैविध्य आहे. प्रेम, प्रणय, विरह, मीलन, फाळणी, जगणं, शोषण, नाती, इच्छा, आकांक्षा, पर्यावरण सारे विषय समावून घेण्याची कुवत असलेल्या या त्रिपदीत मनुष्य निसर्ग व जीवनसंघर्षाचा त्रिवेणी संगम आहे. उर्दू, अरबी, फारसी शब्दांजागी समर्पक मराठी शब्दरचना करून शांता शेळके यांनी मराठी त्रिवेणी मूळ हिंदी इतक्याच दर्जेदार बनवल्या आहेत. या त्रिवेणीत जीवनाचा सुस्कारा जसा आहे, तशी जीवन सुसह्य करण्याची शक्तीपण. जे लिहाल त्याची साक्ष देईन मी बिनचूक सारख्या ओळीतून शांताबार्इंच्या मनातील अनुवादकाचा आत्मविश्वासच एका अर्थाने प्रकट झाला आहे. हा आत्मविश्वासच या अनुवादाचं आत्मबळ होय. हिंदी ‘त्रिवेणी’चा मराठी अनुवाद मात्र शब्दांची टांकसाळ नसून भावनेनं गुंफलेली ती मोहनमाळ होय! गुलजार नि शांता शेळके यांच्या काव्यातील भावबंधांचा धांडोळा घेणाऱ्यांना हा अनुवाद भाव नि भाषा सेतू ठरल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास वाटतो. -सुनीलकुमार लवटे ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more