* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ALL THE STORIES THAT ARE COMPILED UNDER THIS TITLE ARE ACTUALLY THE PRODUCT OF 1970S. TODAY, ONE MIGHT CONSIDER MANY OF THE IDEAS AS A FANCY, LIKE THE POLICE BLOWING HIS WHISTLE THE MOMENT HE SAW A GIRL AND A BOY IN A COLLEGE TALKING TOGETHER OR THE RATE AT WHICH BEER WAS AVAILABLE WITH THE IRANI, ETC. THOSE WERE THE DAYS WHEN RS. 10 WERE MORE THAN ENOUGH TO FULFILL ALL THE DEMANDS OF A TEENAGER. ONE WILL ENJOY THESE STORIES MORE BY BEING CONSIDERATE ABOUT THE STYLES AND PRICES DURING THE LAST CENTURY. ALL THE STORIES WHICH ARE PRINTED UNDER THIS TITLE WERE PREVIOUSLY PUBLISHED IN THE MONTHLY MARATHI MAGAZINES LIKE ‘BUVA’ AND ‘VATVAT’ WHICH WERE VERY FAVOURITE AMONG ALL. TODAY, AFTER A PERIOD OF ALMOST HALF CENTURY, THESE HAVEN’T LOST THEIR FRAGRANCE AND THE ABILITY TO MAKE ONE ENJOY THEM. ONE MIGHT NOT FIND THEM TO BE HIGHLY HUMOROUS, BUT THEY SURE ARE ABLE TO PINCH THE LIGHTER VEIN OF THE MIND.
सोना... वपुंच्या कादंबरीची कथानायिका. तिला प्रथम प्रश्न पडला होता की, आपण ठिकरी खेळणाऱ्या आहोत की स्वत:च ठिकरी आहोत हा संभ्रम जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत काय करायचं? नव्या अनोळखी चौकोनात जाऊन पडण्यापेक्षा परिचयाचा जुना चौकोन काय वाईट! तिची स्वत:ची जरी अधूनमधून तगमग होत असली तरी इतर ठिकऱ्यांना ती ऊब देऊ शकत होती. त्यांच्यापैकी कुणीतरी जेव्हा वाट्याला आलेला चौकोन सोडायचा प्रयत्न करेल, तेव्हा ती ठिकरी योग्य चौकोनात पडणार आहे की नाही, हे ती दक्षतेने पाहणार आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarNishigandha Abhang

    प्रियकराच्या शब्दात फसलेली `चैत्राली` विमानतळावर एकटीच पडते. मग `सोनाली` तिला स्वतःच्या घरी घेऊन येते. अनोळखी शहरात तिला आसरा देते. रात्री जेव्हा दोघी जणी गप्पा मारत बसतात, तेव्हा सोनाली एक कथा सांगते, ज्यामध्ये पुरूषांची वासनालोलुपता भडकून कोण्या एक `सोनाचा` कोमल देह,कोमल हृदय होरपळून निघालेलं असतं. नराचा `नारायण` झाला, तरी नरातला `नराधम` मात्र जिवंतच असतो. कोण्या एका दिवशी तो डसतो अन् नारीचं जीवनच उद्ध्वस्त करून टाकतो. शरीर सुख, धन-दौलत, मान-प्रतिष्ठा या नराच्या त्रिकोणात बंदिस्त झालेली नारी, जेव्हा `आझाद` होते, तेव्हा तिचं मन किती भावनाशून्य अन् निगरगट्ट झालेलं असतं, हे या कादंबरीत मांडलेलं आहे. व. पु. काळे `ठिकरी` या शब्दाचा अर्थ सांगतात की मनुष्य `ठिकरी`सारखा असतो; ज्याला अलीकडे खेळण्याच्या भाषेत `जिबली`सुद्धा म्हणतात. ती कुठल्या चौकटीत पडेल ही तिलाच ठाऊक नसतं. तरीही सगळा खेळ तिच्यावरच अवलंबून असतो. -निशिगंधा अभंग (बाळसुरेखभक्त) ...Read more

  • Rating Starधनेश चौधरी

    हि कथा वाचून मन अगदी ढवळून निघालं आहे, अगदी छोटं पुस्तक पण यातील विषय हा हिमालयापेक्षाही मोठा आहे. आपला समाजातील पुरुषांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, स्त्रीचा वापर आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी करून घेण्याची मनोवृत्ती वपुंनी अगदी सहज पणे दाखवली हे, या कथेत कथानायिका सोना हिच्या आयुष्यातील प्रसंग अधोरेखित केले आहेत. तिने स्वतः यातना सहन केल्या पण बाकीच्या मुलींना यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला,, तिसाव्या वर्षीच समवयीन मुलींची ती आई झाली,, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक पुरुषाने तिला फक्त एक सुखवस्तुच समजले आहे.तिच्या भावभावनांचा उपयोग सुद्धा स्वतःचा फायद्यासाठीच केला. कथेतील विषय स्त्री अत्याचारावरच असला तरी तो अगदी वेगळ्या पद्धतीने मांडला आहे, ज्यातून माणूस काहीतरी धडा घेईल. प्रत्येकाने एकदा आवर्जून वाचावेच असे हे पुस्तक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more