* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE PRIVATE PAPERS OF EASTERN JEWEL
  • Availability : Available
  • Translators : RUJUTA KULKARNI
  • ISBN : 9788184982053
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 306
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
AN ELECTRIFYING EPIC, BASED ON THE INCREDIBLE TRUE STORY OF A CHINESE PRINCESS TURNED SPY. PEKING, 1914. WHEN THE EIGHT-YEAR-OLD PRINCESS EASTERN JEWEL IS CAUGHT SPYING ON HER FATHER’S LIAISON WITH A SERVANT GIRL, SHE IS BANISHED FROM THE PALACE, SENT TO LIVE WITH A POWERFUL FAMILY IN JAPAN. RENAMED YOSHIKO KAWASHIMA, SHE QUICKLY FALLS IN LOVE WITH HER ADOPTIVE COUNTRY, WHERE SHE EARNS A SCANDALOUS REPUTATION, TAKING FENCING LESSONS, SMOKING OPIUM, AND ENTERTAINING NUMEROUS LOVERS. SENT TO MONGOLIA TO BECOME AN OBEDIENT WIFE, YOSHIKO MOUNTS A DARING ESCAPE AND EVENTUALLY FINDS HER WAY BACK TO PEKING HIGH SOCIETY—THIS TIME WITH ORDERS FROM THE JAPANESE SECRET SERVICE. BASED ON THE TRUE STORY OF A REBELLIOUS WOMAN WHO EARNED A CONTROVERSIAL PLACE IN HISTORY, THE PRIVATE PAPERS OF EASTERN JEWEL IS A VIBRANT REIMAGINING OF A THRILLING LIFE—A RICH HISTORICAL EPIC OF PALACE INTRIGUE, SEXUAL MANIPULATION, AND INTERNATIONAL ESPIONAGE.
पेकिंग १९१४. प्रिन्स सू यांच्या सगळ्यात लहान उपस्त्रीची आठ वर्षांची मुलगी ईस्टर्न ज्युवेलने तिच्या वडिलांची त्यांच्या एका नोकराणीशी चाललेली रतिक्रीडा एका कोरीव आडोशामागून चोरून बघितली. त्यानंतर भविष्याच्या कृष्णच्छायांचं मळभच जणू दाटून आलं आणि ईस्टर्न ज्युवेलच्या वादळी आयुष्याचा प्रवास सुरू झाला... ईस्टर्न ज्युवेलचा शरीरसंबंधांमधला चौकसपणा लक्षात आल्यामुळे तिला टोक्योला त्यांच्याच एका दूरच्या नातेवाइकाकडे पाठवून देण्यात आलं. त्यानंतर वैराण आणि बर्फाळ अशा मंगोलियातल्या राजकुमाराशी तिचा तिच्या इच्छेविरूद्ध विवाह करून देण्यात आला. वारंवार एकटेपणामुळे तिला अस्वस्थ करणारे चमत्कारिक आभास आणि तशीच दु:स्वप्नं पडू लागली; पण ती स्वभावत:च धीट, बंडखोर आणि कोणाच्याही, कमीत कमी पुरुषांच्या तरी वर्चस्वाखाली राहण्याची तयारी नसलेली अशी होती. शांघायच्या झगमगत्या शहरात तिने तिच्या धाडसी स्वभावाचा उपयोग जपानसाठी गुप्तहेरगिरी करण्यात केला. त्यासाठी तिने स्वत:ची चिनी वंशपरंपरा आणि तिला एकेकाळी जे जे प्रिय होतं, त्या त्या सगळ्याला तिलांजली दिली. ‘द प्रायव्हेट पेपर्स ऑफ इस्टर्न ज्युवेल’ ही अतिशय वादळी, बहुरंगी, दुसरे महायुद्ध आणि तीन देशांच्या पाश्र्वभूमीवर घडलेली सत्यकथा आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #THEPRIVATEPAPEROFESTERNJEWEL #RUTUJAKULKARNI #MAUREENLINDLEY
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    सुंदर

  • Rating StarVaibhav Mahajan

    पेकिंग १९१४.प्रिन्स सू यांच्या सगळ्यात लहान उपस्त्रीची आठ वर्षाची मुलगी ईस्टर्न ज्यूवेल तिच्या वडिलांची त्यांच्या एका नोकरानिशी चाललेली रतिक्रीडा एका कोरीव अडोशामागून चोरून बघितली. त्यानंतर भविष्याच्या कृष्णछायेच मळभच जणू दाटून आलं आणि ईस्टर्न ज्यूवेच्या वादळी आयुष्याचा प्रवास सुरु झाला. ईस्टर्न ज्यूवेलचा शरीरसंबंधांमधला चौकसपणा लक्षात आल्यामुळे तिला टोक्योला त्यांच्याच एका दूरच्या नातेवाईकाकडे पाठवून देण्यात आलं. त्यानंतर वैरण आणि बर्फाळ अशा मंगोलीयातल्या राजकुमाराशी तिचा तिच्या इच्छेविरुद्ध विवाह करून देण्यात आला. वारंवार एकटेपणामुळे तिला अस्वस्थ करणारे चमत्कारिक आभास आणि तशीच दु: स्वप्न पडू लागली; पण ती स्वभावात:च धीट, बंडखोर आणि कोणाच्याही, कमीत कमी पुरुषांच्या तरी वर्चस्वाखाली राहण्याची तयारी नसलेली अशी होती. द प्रायव्हेट पेपर्स ऑफ ईस्टर्न ज्यूवेल ही अतिशय वादळी ,बहुरंगी,दुसरे महायुद्ध आणि तीन देशांच्या पार्श्वभूमीवर घडलेली सत्यकथा आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more