* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE DIARY OF MARY BERG
  • Availability : Available
  • Translators : SHOBHANA SHIKNIS
  • ISBN : 9788184980769
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MARY BERG WAS ONLY FIFTEEN YEARS OLD WHEN SHE TRAVELLED TO LODA ALONG WITH HER FAMILY, AFTER THE SECOND WORLD WAR WAS DECLARED ON 29TH AUGUST 1939. WHEN THEY REACHED THERE, THE SITUATION WAS CHAOTIC AND GERMANS HAD STARTED BOMBARDING THE TOWN. LIKE OTHER THOUSANDS OF JEWS, BERG FAMILY ALSO DECIDED TO GO TO WARSAW. IT WAS A TERRIBLE JOURNEY AND THEY WITNESSED VILLAGES ENGULFED BY THE FIRE, PEOPLE DYING ON THE ROAD, CLOUDS OF DUST AND SMOKE, DIRTH OF FOOD AND WATER, AND NO MEANS OF COMMUNICATION. AFTER THE FAMILY REACHED WARSAW, BOMBING WAS STILL GOING ON. THE SUPPLY OF FOOD GRAINS TO THE TOWN OF WARSAW WAS GETTING OVER, AND FINALLY THE TOWN WAS BESIEGED. ON NOVEMBER 15 TH 1940, GERMANS TRANSFORMED WARSAW INTO A GHETTO, PREVENTING JEWS TO MOVE FREELY. WALLS WERE CONSTRUCTED AND ALL THE MEANS OF COMMUNCIATION WITH THE WORLD WERE MADE UNAVAILABLE. THOSE JEWS WHO SMUGGLED FOODSTUFF BY GOING TO THE "ARYAN`` SIDE BESIDES GHETTO BOUNDARIES, WERE KILLED ON THE SPOT IF CAUGHT BY THE GERMAN GUARDS. MARY BERG AND HER FRIENDS ORGANISED CULTURAL AND MUSIC ACTIVITIES BY FORMING LZA CLUB EVEN UNDER SUCH ADVERSE CIRCUMSTANCES. JEWISH PEOPLE WHO WERE PHYSICALLY FIT, HAD TO ENROLL AS POLICE, OR WORK FOR THE SITES FOR CONSTRUCTION, TRAFFIC CONTROL ETC. THEY ALSO HAD TO TIE ARMBANDS FOR IDENTIFICATION. THOSE WHO WERE INCAPABLE OF ANY PHYSICAL LABOUR, WERE DEPORTED. BRUTAL MASS KILLINGS OF INNOCENT JEWS WERE CONDUCTED BY NAZIS. FINALLY, BY WAY OF EXCHANGE OF PRISONERS, MARY BERG, WHO WAS SHIFTED TO THE PAWIAK PRISON ALONGWITH HER FAMILY, AND ALSO ALONGWITH OTHERS, SUCCEEDED IN REACHING NEW YORK IN A SHIP TITLED "GRIPSHOME`` MARY BERG`S DIARY IS A VERY IMPORTANT HISTORICAL DOCUMENT, SENSINTIVELY RECORDED WITH MINUTE OBSERVATIONS AND MATURITY, EVEN AT HER VERY YOUNG AGE. SHE WAS VERY TALENTED AND HER DIARY ALSO INCLUDED HER DRAWINGS, OF HER TEACHERS, HER FRIENDS, AND SOME GRAPHIC EVENTS LIKE DESTITUTE CHILDREN SEARCHING FOR FOOD IN THE HEAP OF GARBAGE ETC. S. L. SCHNEIDERMAN, ASSISTED BY SUSAN PENTALIN, WORKED ON MARY BERG`S DIARY, MADE RESEARCH, EDITED IT, AND THEN IT WAS PUBLISHED IN ENGLISH, AS WELL AS MANY OTHER LANGUAGES.THE BOOK HAS RECEIVED AN OVER-WHELMING RESPONSE FROM ALL OVER THE WORLD.
मेरी बर्गची डायरी वाचताना, विश्वास बसणं कठीण असा इतिहासाचा काळाकुट्ट कालखंड वाचकांच्या डोळ्यांपुढे अक्षरश: जिवंत होतो, कमालीचा अस्वस्थ करतो. अस्थिर, संभ्रमित अवस्था, उपासमार, रोगराई आणि मृत्यू ह्यांचे भोवताली तांडव; या सगळ्या परिस्थितीत, मेरी बर्गने कोणत्या अंत:प्रेरणेने तिच्या बारा छोट्या वह्यांत सातत्याने घटनांची नोंद केली असेल? चिखलातून कमळ उमलावं, तशी मेरी बर्ग या विनाशकारी परिस्थितीत देखील आशावाद न सोडता तग धरून राहिली. तिच्या सुदैवाने अमेरिकेला पोहोचल्यावर तिची डायरी संशोधित आणि संपादित होऊन पुस्तकरूपात प्रकाशित झाली. इतर अनेक भाषांत प्रकाशित झालेल्या ‘द डायरी ऑफ मेरी बर्ग’ या आत्मकथनाचा मराठी अनुवाद प्रकाशित होऊन तो वाचकांपर्यंत पोहोचणं, हा मराठी साहित्य प्रवासातील एक वैशिष्ट्यपूर्ण ‘माइल स्टोन’ ठरावा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SHOBHANASHIKNIS #THEDIARYOFMARYBERG #S. L.SHNEIDERMAN
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more