* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE CASE OF ICE COLD HANDS
  • Availability : Available
  • Translators : BAL BHAGWAT
  • ISBN : 9789387789685
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ERLE STANLEY GARDNER COMBO SET-10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"PERRY MASON SOLVES THE CASE OF THE ICE-COLD HANDS BY ERLE STANLEY GARDNER. SUPPOSE YOU HAD EMBEZZELD SOME MONEY- AND BET IT ON THE NOSE ON A LONG SHOT, AT FIFTY TO ONE. AND THE HORSE CAME IN FIRST. WITH YOUR WINNINGS YOU COULD EASILY REPLACE THE MONEY YOU HAD EMBEZZLED AND STILL HAVE A BIG PROFIT. BUT WHEN YOU WENT TO CASH IN YOUR WINNING TICKETS, YOUR EMPLOYER WAS THERE WITH A COP TO ARREST YOU FOR EMBEZZLEMENT-AND TO TAKE OVER YOUR WINNINGS. ACCORDING TO HIM, THE MONEY HAD ALWAYS BEEN HIS AND THE FACT THAT YOU HAD MADE A LUCKY BET AND INTENDED TO REPLACE THE MONEY YOU HAD ""BORROWED"" WOULDN`T STOP YOU FROM GOING TO JAIL OR HIM FROM COLLECTING THE PROFITS. WOULD THAT BE CAUSE FOR MURDER? FROM THE INSIDE FRONT COVER: ""WOULD YOU MIND IF I SKIPPED THE PRELIMINARIES?"" AUDREY BICKNELL ASKED. ""GO AHEAD,"" PERRY MASON REPLIED. ""I HAVE HERE FIVE ONE-HUNDRED-DOLLAR TICKETS ON A HORSE WHOSE NAME IS DOUGH BOY AND WHO IS IN THE THIRD RACE THIS AFTERNOON. AT THE TIME THE TICKETS WERE PURCHASED, THE ODDS WERE NEARLY FIFTY TO ONE."" ""WHAT DO YOU WANT ME TO DO?"" ""IF THE HORSE WINS, I WANT YOU TO GO TO THE TRACK TOMORROW GET THE MONEY, AND WAIT FOR MY INSTRUCTIONS."" ""AND IF THE HORSE LOSES?"" ""THEN YOU WON`T HAVE TO GO,"" AUDREY SAID. AND WITH THAT SHE SWEPT OUT OF THE OFFICE. ""HOW MUCH CHANCE DOES THAT HORSE STAND OF WINNING?"" DELLA STREET ASKED. ""THAT`S NOT THE IMPORTANT QUESTION NOW,"" PERRY MASON SAID. ""THAT HORSE HAS ALREADY WON! AND SHE KNOWS IT!"" "
"वेगळेच नाव धारण करून नॅन्सी बँक्स एक अगदी साधे काम घेऊन अ‍ॅटर्नी पेरी मेसनकडे आली. तिने रेसकोर्सवर डो बॉय नावाच्या एका घोड्यावर पाचशे डॉलर्स लावले होते. तिच्याकडे शंभर शंभर डॉलर्सची पाच तिकिटे होती. तो घोडा जर शर्यंत जिंकला असेल तर दुसरया दिवशी मेसनने रेसकोर्सवर जाऊन, ती तिकिटे खिडकीवर देऊन, जिंकलेले पैसे घ्यायचे होते आणि ती सांगेल त्या ठिकाणी तिला द्यायचे होते. दुसNया दिवशी पैसे घेत असताना पोलीसच मेसनला अडवतात. त्याला कळते की, नॅन्सी बँकचा भाऊ रॉडने बँक्स याने माव्र्हिन फ्रेमॉन्टकडे नोकरी करत असताना पैशांची अफरातफर केली होती, ते पैसे त्याच घोड्यावर लावले होते आणि तो घोडा रेस जिंकला होता. माव्र्हिन फ्रेमॉन्टचे म्हणणे असते की नॅन्सी बँक्स त्यांची साथीदार होती, अपहार केलेले पैसेच घोड्यावर लावले आहेत आणि ते पैसे आणि रॉडने बँक्स याने कमावलेला नफा यावर त्याचाच हक्क आहे. रॉडने बँक्सला तर पैशांमधून त्याने चोरलेले पैसे रॉडने बॅक्स त्याला परत करू शकत होता. पण फ्रेमॉन्टला पैशांची भरपाई नकोच असते. रॉडने बँक्सला तुरुंगातच अडकवायचे असते, कारण त्याची बहीण नॅन्सी बँक्स हिने, तो तिच्या मागे लागलेला असताना त्याला दाद दिली नव्हती; उलट त्याला थप्पड मारून त्याचा अपमानच केला होता. मेसन पैसे घेऊन ते पोचवायला नॅन्सी बँक्सकडे गेल्यावर ती त्याला रॉडने बँक्सचा जामीन भरण्यासाठी पैसे देऊन त्याची तुरुंगातून सुटका करायला सांगते. मेसन त्याचा जामीन भरतो आणि त्याची सुटका करतो. पैशांचे व्यवहार बघण्यासाठी तिने फोले मोहेलमध्ये एक केबिन भाड्याने घेतलेली असते. आपले काम पुरे झाले आहे या समजुतीखाली मेसन असताना त्याने परत तिला तातडीने भेटावे, असा तिचा निरोप मिळतो. परिस्थिती आणीबाणीची आहे असेही त्याला कळते. तो जेव्हा फोले मोटेलमध्ये जातो तेव्हा त्याला केबिनच्या स्नानगृहामध्ये माव्र्हिन फ्रेमॉन्टचे प्रेत पडलेले आढळते. पेरी मेसन स्नानगृहामधून बाहेर येतो आणि नॅन्सी बॅक्स घाईघाईने केबिनमध्ये शिरते आणि त्याचे हात आपल्या हातात घेते. तिचे हात बर्फासारखे थंडगार असतात. तिच्याशी उलटसुलट बोलल्यावर त्याच्या लक्षात येते, की तिने खरे तर प्रेत आधीच बघितलेले असते; पण तिची इच्छा असते की ते पेरी मेसनलाच प्रथम दिसले, असा सर्वांचा समज व्हावा. नॅन्सी बँक्स नंतरही त्याच्याशी खोटेच बोलत राहते. वस्तुनिष्ठ आणि परिस्थितीजन्य पुरावा दाखवत असतो की खून नॅन्सी बँक्सनेच केलेला आहे, एवढेच नाही तर खून नक्की कोणत्या वेळी पडलेला आहे याबाबत पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी प्रेताभोवती ड्राय आइसची खोकीही तिने रचून ठेवली होती. या परिस्थितीतही पेरी मेसनचे अंतर्मन त्याला सांगत राहते की खून तिने केलेला नाही. ती त्याची अशील होती आणि तो तिची सुटका करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार असतो. खटल्यादरम्यान वेगळीच परिस्थिती निर्माण होते आणि तांत्रिक मुद्द्यांवर तिची सुटका होऊ शकेल, अशी चिन्हे दिसायला लागतात. पण खून करून तांत्रिक मुद्द्यावर सुटली असा कलंक माथी घेऊन तिने आयुष्य काढावे, हे पेरी मेसनला मान्य नसते. खरा खुनीच शोधायला हवा, अशी त्याची धारणा असते. तो साक्षीदारांची उलटतपासणी सुरू करतो. माव्र्हिन फ्रेमॉन्टकडे मॅनेजर-बुक कीपर म्हणून काम करणारा लार्रोन हॉलस्टेड याने डॉलर्सच्या काही नोटांचे क्रमांकही लिहून ठेवलेले असतात. त्याने लिहून ठेवलेले क्रमांक पेरी मेसन बघतो आणि इतरांचे दुर्लक्ष झालेल्या एका साध्या गोष्टीकडे त्याचे लक्ष जाते आणि सर्वच उलगडा होतो. अर्ल स्टॅन्ले गार्डनर यांच्या इतर उत्कंठावर्धक पुस्तकांप्रमाणेच शेवटपर्यंत खर्या खुन्याचा चेहरा समोर न आणणारे आणि एकदा वाचायला सुरुवात केल्यावर वाचून संपवेपर्यंत खाली ठेवता न येणारे आणखी एक पुस्तक. कोर्टाची पाश्र्वभूमी असणारया रहस्यकथा लिहिणारा अर्ल स्टॅन्ले गार्डनरसारखा लेखक आजपर्यंत झालेला नाही. "

No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THE CASE OF THE ICE-COLD HANDS# ERLE STANLEY GARDNER A PERRY MASON MYSTERY# NANCY BANKS# FREMONT# RODNEY# LORRAINE LAWTON# OSGOOD TROUT FARM##द केस ऑफ आइसकोल्ड हँड्स# अर्ल स्टॅन्ले गार्डनर# बाळ भागवत# नॅन्सी बँक्स# रॉडने बँक्स# फ्रेमॉन्ट#ड्राय आइस# हॅमिल्टन बर्जर# जज माईल्स# ओसगुड ट्राउट फार्म# लेफ्टनंट ट्रॅग#
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more