* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE ASSOCIATE
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PATHARKAR
  • ISBN : 9788184982497
  • Edition : 2
  • Publishing Year : JUNE 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 344
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :JOHN GRISHAM COMBO SET - 15 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IT`S A DEADLY GAME OF BLACKMAIL. AND THEY`RE MAKING HIM PLAY. KYLE MCAVOY IS ONE OF THE OUTSTANDING LEGAL STUDENTS OF HIS GENERATION: HE`S GOOD LOOKING, HAS A BRILLIANT MIND AND A GLITTERING FUTURE AHEAD OF HIM. BUT HE HAS A SECRET FROM HIS PAST, A SECRET THAT THREATENS TO DESTROY HIS FLEDGLING CAREER AND, POSSIBLY, HIS ENTIRE LIFE. ONE NIGHT THAT SECRET CATCHES UP WITH HIM IN THE FORM OF SOME BAD MEN IN A DARK ALLEY X THEY HAVE A DEEPLY COMPROMISING VIDEO OF THE INCIDENT THAT HAUNTS HIM. THE MEN MAKE IT CLEAR TO KYLE THAT HE NO LONGER OWNS HIS OWN FUTURE X THAT HE MUST DO AS THEY TELL HIM, OR THE VIDEO WILL BE MADE PUBLIC KNOWLEDGE, WITH ALL THE UNPLEASANT CONSEQUENCES. WHAT PRICE DO THEY DEMAND FOR KYLE`S SECRET?STRANGELY, IT IS FOR KYLE TO DO EXACTLY WHAT ANY AMBITIOUS YOUNG LAWYER WOULD WANT TO DO: TAKE A JOB IN NEW YORK AS AN ASSOCIATE AT THE LARGEST LAW FIRM IN THE WORLD , A JOB THAT IS INCREDIBLY WELL PAID AND, WITH MAMMOTH HOURS AND OUTRAGEOUS BILLING, COULD LEAD TO PARTNERSHIP AND A FORTUNE. BUT KYLE WON`T BE WORKING FOR THE COMPANY, BUT AGAINST IT X PASSING ON THE SECRETS OF THE COMPANY`S BIGGEST TRIAL TO DATE, A DISPUTE BETWEEN TWO DEFENSE CONTRACTORS WORTH BILLIONS OF DOLLARS TO THE VICTOR. NOW KYLE IS CAUGHT BETWEEN THE CRIMINAL FORCES MANIPULATING HIM AND THE FBI, WHO WOULD LOVE TO UNMASK THE CONSPIRACY. WILL HIS INTELLECT, CUNNING AND BRAVERY BE ENOUGH TO EXTRICATE HIM FROM AN IMPOSSIBLE DILEMMA? FULL OF TWISTS AND TURNS AND REMINISCENT OF THE FIRM, THE ASSOCIATE IS VINTAGE JOHN GRISHAM.
पेनिसिल्वेनिया भागातल्या यार्क या छोट्या गावातल्या वकीलांचा मुलगा काईल मॅकअवॉय. येल कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेणारा. ‘येल लॉ जर्नल’ चा मुख्यसंपादक म्हणून शेवटच्या वर्षी मान पटकावणारा. कॉलेजच्या चार वर्षांमधले त्याचे आणि त्याच्या मित्रांचे एक काळे गुपित अशा लोकांच्या हाती लागते आणि ते काईलला जाळ्यात अडकवतात. काईलला परतीचा मार्गच ठेवलेला नसतो. वरवर चांगला वाटणारा, लॉच्या अनेक विद्याथ्र्यांना हवाहवासा वाटणारा पण काईलला नको असणारा जॉब त्याला घ्यावाच लागतो. एका मोठ्या फर्मचा असोसिएट बनण्याचे आमिष त्याला दाखविले जाते. स्कली अ‍ॅण्ड पर्शिंग या मोठ्या लॉ फर्ममध्ये तो जॉब स्वीकारतो. अमेरिकेसाठी एअरक्राफ्ट बनविणा-या कंपनीकरता ही फर्म काम करीत असते. आपल्या अस्तित्वासाठी काईलला परिस्थितीशी जबरदस्त झगडावे लागते. मोठ्या निग्रहाने त्याला येणा-या प्रसंगांचा सामना करावा लागतो. त्यात तो यशस्वी होतो का? हे वाचायलाच हवे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #THE RAINMAKER #THE STREET LAWYER # THE PARTNER #THE CHAMBER #BIOGRAPHYA&TRUESTORIES #THE FIRM #THE ASSOCIATE #THE LAST JUROR #JOHNGRISHAM #RAVINDRAGURJAR #THECLIENT #THE TESTAMENT #THEPELICANBRIEF #MADHAVKARVE #
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more