* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TAKE ME HOME
  • Availability : Available
  • Translators : SUNITI KANE
  • ISBN : 9788184986303
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 380
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Sub Category : MEMOIRS, DIARIES, LETTERS & JOURNALS
  • Available in Combos :RASHMI BANSAL COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
TAKE ME HOME: THE INSPIRING STORIES OF 20 ENTREPRENEURS FROM SMALL-TOWN INDIA WITH BIG-TIME DREAMS IS THE STORY OF INSPIRING ENTREPRENEURS WHO NEVER LEFT THEIR HOMETOWNS TO GET FOREIGN EDUCATION OR DECIDED TO WORK A FEW YEARS ABROAD. THEY ARE YOUNG AND INNOVATIVE AND HAVE BUILT EMPIRES FROM THEIR HOMELAND. RASHMI BANSAL DESCRIBES THE LIVES OF SUCH ENTERPRISING TALENT WITH HER BOOK, TITLED TAKE ME HOME: THE INSPIRING STORIES OF 20 ENTREPRENEURS FROM SMALL-TOWN INDIA WITH BIG-TIME DREAMS. SHE BELIEVES THAT THESE SONS OF THE SOIL HAVE NEVER ABANDONED THEIR OWN HOMES FOR THE GREENER PASTURES AND HAVE RUN GLOBAL TRIUMPHS THROUGH THEIR OWN WORLD. TAKE ME HOME: THE INSPIRING STORIES OF 20 ENTREPRENEURS FROM SMALL-TOWN INDIA WITH BIG-TIME DREAMS IS THE STORY OF A NEW GENERATION OF MOGULS WHO BRING HOPE TO THEIR COMMUNITIES, WRITTEN IN SIMPLE AND RELATABLE VERSE. THEIR STORIES INSPIRE PEOPLE TO DREAM BIGGER WITHOUT LAMENTING THEIR LOCATION OR BACKGROUND.
किरीट देशपांडे यांनी नागपुरात राहून आपलं व्यवसायाचं स्वप्न पूर्ण केलं... चंदूभाई विराणी यांनी राजकोटमधून सुरुवात करून ‘ग्लोबल’ उद्योग साकारला... दीपक दाधोटी यांनी बेळगावमधून घेतलेली ‘उद्योग-भरारी’ देश-विदेशांत पोहोचली... या सगळ्यांना हे जमलं; तर मग तुम्हाला का नाही जमणार? या पुस्तकात आहेत आपल्या मातीशी इमान राखत उद्योगांची उभारणी करणाऱ्या २० उद्योजकांच्या विलक्षण प्रेरक कहाण्या. भारतातल्या लहानशा खेड्यांमधून या उद्योजकांनी आपल्या उद्योगाची सुरुवात केली, आणि ते जागतिक स्तरावर नेले. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवरील गुणवान मंडळींच्या गुणांचाच कौशल्याने उपयोग करून घेतला, आणि नवीन रोजगारही निर्माण केला. त्यांनी सिद्ध केलं की, एक चांगला उद्योग उभारण्यासाठी तुम्ही मोठ्या शहरांमध्येच असलं पाहिजे असं काही नाही. त्यांनी दाखवून दिलं की, तुमच्याकडे योग्य दृष्टिकोन, ध्येयवेड आणि जिद्द असेल तर तुम्हीही यशस्वी उद्योजक होऊ शकता; तुम्हीही तुम्हाला हवं ते करू शकता; काहीतरी नवीन घडवू शकता; तुमचा स्वत:चा असा यशोमार्ग निर्माण करू शकता — हा मार्ग ‘मायमाती’तून सुरू होणारा... ‘ग्लोबल’ आकाशाला गवसणी घालणारा...!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #SWAPNANCHEINDRADHANU #TAKE ME HOME #सुनीति काणे #SUNITI KANE #RASHMIBANSAL #स्वप्नांचे इंद्रधनू #FOLLOW EVERY RAINBOW #रश्मी बन्सल
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 13-04-2015

    मुलांना स्वातंत्र्य द्या!... मुलांनी ठराविक क्षेत्रातच करिअर करावे, अमक्या क्षेत्रात करू नये, असे सांगून आपल्या मुलातील नावीन्यता आणि उत्साह कमी करू नका. याउलट मुलांना स्वातंत्र्य देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहा, असा सल्ला प्रसिद्ध लेखक रश्मी बन्सल यंनी दिला. ही मुलाखत प्रसिद्ध लेखिका अपर्णा वेलणकर यांनी घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. मेहता पब्लिकेशनच्यावतीने बन्सल यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. यावेळी बन्सल म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तीत मोठी शक्ती आहे, वेगळेपण आहे. पण, ते जाणायला हवे आणि ती शक्ती योग्य पद्धतीने वापरली गेली पाहिजे. फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि मिंत्रासारख्या कंपन्या या बन्सल ग्रुपच्या आहेत. मी सुद्धा बन्सल असली तरी मीही वेगळा व्यवसाय करण्याच्या हेतूनेच कार्यरत झाले. नोकरीचा पर्याय मी स्वीकारला नाही आणि लिखाणाच्या आवडीतून साहित्याच्या क्षेत्रात आले, असे त्या म्हणाल्या. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये मी एमबीए करत असतानाच तेथे एक पुस्तक लिहिण्याची संधी मिळाली. आयआयएमचे विद्यार्थी भल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळवतात. असे नाही तर २० ते २५ टक्के विद्यार्थी स्वतःचा उद्योग, व्यवसाय करीत आहेत. या सर्वांवर प्रकाश टाकणारे ते पुस्तक होते. त्याला मिळालेले यश मला लिखाणाकडे अधिक ओढ लावणारे ठरले. माझे पुस्तक वाचून अनेक प्रतिक्रिया मला येतात. मी पुस्तक वाचले आणि नोकरीचा राजीनामा दिला, असा मेल करणारेही माझे वाचक आहेत. आपल्यातील क्षमता आणि कौशल्य ओळखून आपण निर्णय घ्यायला हवा. पालकांनी आपल्या पाल्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. जबरदस्ती किंवा इमोशनल ब्लॅकमेल करणे हिताचे नाही. पालकांनी त्यांचे करिअर केले तो काळ आणि आताचा काळ यात कमालीचा फरक आहे. आता करिअरचे मार्ग, विविध प्रकारच्या संधी हे लक्षणीयरित्या बदलले आहे. त्याचा विचार करून मुलांना प्रोत्साहन द्या, तो नक्की काय करू इच्छित आहे. ते जाणून घ्या, असे बन्सल म्हणाल्या. मी निवडलेले करिअर आई-वडिलांना मनापासून आवडले नाही. पण, २० वर्षांनी वडिलांना जाणीव झाली की मी जो मार्ग निवडला तो योग्य होता. त्यांनी विस्तृत मेलद्वारे त्यांच्या भावना मला कळविल्या. पण, त्याला फार उशीर झाला, असे मला वाटते, असे त्यांनी सांगितले. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 14-04-2015

    गोष्टीरूपातील विचार अधिक परिणामकारक : ज्या व्यक्तींनी व्यवसायात उत्तुंग यश मिळविले त्यांच्याकडे बघून गोष्टी लिहिल्या. त्यासाठी विविध भागातील वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींची निवड केली. फक्त विचार देण्यापेक्षा ते विचार गोष्टीच्या रूपातून दिले तर ते अिक परिणामकारक ठरतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका व उद्योजिका रश्मी बन्सल यांनी केले. मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे कुसुमाग्रज स्मारक येथे त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम नुकताच झाला. त्यांनी लिहिलेल्या ‘टेक मी होम’ या पुस्तकाच्या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. रश्मी बन्सल म्हणाल्या, ‘‘उच्च शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग व्यवसायात नक्कीच होतो. प्रत्येक माणसात एक शक्ती आहे. ती त्याला ओळखता आली पाहिजे. अनेकांना नोकरी करण्याची इच्छा असते. मात्र त्यातील काही विद्यार्थ्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असतो. अशा तरुणांसाठी व्यवसायाला प्रेरणा देणारे पुस्तक लिहिले.’’ मेहता पब्लिशिंग हाऊसच्या मनीषा देवकर यांनी प्रस्ताविक केले. ...Read more

  • Rating Starpramodgokhale

    This is book nicely translated, i appreciate author, bringing this book in Marathi. Book is inspiring and translation is thrilling. I am retired blue collar worker technician worked in India and abroad. I feel it is to my heart.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more