* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TYANCHYA SINDROMCHI KATHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980417
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A TRUE STORY. IT DESCRIBES THE G. B. SYNDROME IN DETAIL. THIS SYNDROME HAS ATTACKED THE BHAGWAT FAMILY TWICE, FIRST THE MOTHER OF THE FAMILY AND THEN THE SON OF THE FAMILY. THE DAUGHTER-IN-LAW OF THE FAMILY HAS DESCRIBED THE SIGNS OF THE SYNDROME IN DETAIL WITH WHOLE AND SOLE INTENTION OF INFORMING PEOPLE, PRESENTING THE PERFECT PICTURE OF THIS CRITICAL ILLNESS. G.B. SYNDROME IS AN ILLNESS WHICH ATTACKS THE IMMUNITY POWER OF THE PATIENT MAKING IT DISASTROUS FOR THE PATIENT. THE VIRUS OF THIS DISEASE STARTS WITH THE NERVES, SLOWLY TURNING ITS ATTENTION TOWARDS VICTIM`S TOES, LEGS, FINGERS, HANDS, LUNGS AND THEN THE TRACHEA ITSELF. THIS DISEASE IS VERY RARE. ONE PERSON IN 2-3 LAC PEOPLE IS AFFECTED WITH THIS DISEASE. THIS BOOK DESCRIBES THE EXPERIENCE OF THE BHAGWAT COUPLE. EVEN THOUGH, IT WAS MR. BHAGWAT WHO WAS THE VICTIM, MRS. BHAGWAT WAS THE SILENT PARTICIPANT OF ALL THAT WAS GOING AROUND. SHE WAS SEEING HIS PAIN, AND SUFFERING ALONG WITH HIM. TOGETHER, THEY BOTH FACED THE UPS AND DOWNS OF THE DISEASE, THE MENTAL AND PHYSICAL STRESSES, THEIR EVERLASTING BOND, THE STRENGTHENING OF THEIR RELATIONSHIP.... MRS. BHAGWAT HAS VERY SENSIBLY DESCRIBED ALL THIS IN HER WORDS, IN A NARRATIVE MANNER.THIS BOOK DOES NOT JUST GIVE DETAILS OF THE DISEASE; ON THE CONTRARY, IT GIVES US AN INSIGHT, COMPELLING US TO THINK MORE ABOUT OUR SELF, INWARDLY AND OUTWARDLY.
स्वत:ची रोगप्रतिकारक शक्ती स्वत:साठीच घातक ठरवणारा आजार म्हणजे जीबी सिंड्रोम! मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात आणि पुढेपुढे फुफ्फुसं आणि श्वासनलिकेवरही हल्ला करतो. लाखामागे केवळ दोन-तीन जणांना होणारा असा हा आजार! चारुदत्त भागवतांना अशा आजाराने पछाडल्यानंतर त्याच्याशी झगडताना ते व त्यांची पत्नी कल्पना यांना आलेले अनुभव, तीव्र मानसिक चढ-उतार आणि त्यातून वाढीला लागलेली श्रद्धा यांचे संवेदनक्षम चित्रण कल्पना चारुदत्त भागवत यांनी या कथनातून केले आहे. म्हणूनच निव्वळ भयंकर आजाराच्या पुढे जाऊन हे कथन वाचकाला शरीर-मनाबद्दल अधिकाधिक प्रगल्भ करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #KALPANACHARUDATTA #TYANCHYASYNDROMCHIKATHA #MEMOIR #त्यांच्यासिंड्रोमचीकथा"
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL 10-4-2010

    ‘एका लढाईतील अनुभव’… अलीकडे प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांकडे नजर टाकल्यास आरोग्यविषयावरील अनेक पुस्तके सध्या येत आहेत, हे जाणवते. आरोग्याची काळजी, विशिष्ट रोगाची माहिती, उपचारपद्धती, एखाद्या रोगावर मात केलेल्या रुग्णाचे अनुभवकथन, हॉस्पिटलची माहिती, डॉकटरांचे अनुभवकथन, डॉक्टरांनी राबविलेल्या एखाद्या प्रकल्पाची माहिती, शारीरिक व्याधींचा मनाशी असलेला संबंध, मनोविकार, मानसोपचार इत्यादी. अशा अनेक पुस्तकांद्वारा आरोग्याची काळजी, आरोग्याबद्दलची जाण, निरोगी जगण्याचे महत्व पटवून देण्याचे काम होत असल्याचे दिसते. ‘त्यांच्या सिंड्रोमची कथा’ हे कल्पना चारुदत्त यांनी लिहिलेले पुस्तक ‘जीबी सिंड्रोम’ या आजारावर आधारित आहे. मज्जातंतू हळूहळू निकामी करणारे या आजारातील विषाणू बोटं, पाय, हात आणि पुढे-पुढे फुप्फुसं आणि श्वासनलिकेवर हल्ला करतात. स्वत:ची रोगप्रतिकारक शक्ती स्वत:साठीच घातक ठरविणे, हे ‘जीबी सिंड्रोम’चे लक्षण! चारुदत्त भागवतांना अशा आजाराने पछाडल्यानंतर त्यांच्याशी झगडताना ते व त्यांच्या पत्नी कल्पना यांना आलेले अनुभव या पुस्तकात सांगितले आहेत. जरा, व्याधी आणि मृत्यू यांचे दर्शन झाल्यानंतर राजपुत्र सिद्धार्थाला सत्य शोधण्याचा, शाश्वताचा शोध घेण्याचा ध्यास लागला. संसारातून मुक्त होऊन तो कठोर साधना करु लागला. या साधनेतूनच त्याला संसारातील क्षणभंगुरता, क्षणिकता, सुख-दु:खे समे कृत्वा या ‘सम्यक दृष्टी’चा प्रत्यय आला, परंतु तो गौतम बुद्ध होता. सर्वसामान्य माणूस त्याच्या घरामध्ये आप्त-मित्रांमध्ये, अवती-भवती ‘जरा-व्याधी-मृत्यू’चे अनुभव घेतो. त्यातली सारी अनिश्चतता, रोकडा व्यवहार, तऱ्हेवाईक माणसे, भावनांचे चढते-उतरते आवेग, मनावरील प्रचंड ताण, रोजचे सुरळीत व्यवहार बिघडवून टाकणारी धावपळ, छोट्या-साध्या गोष्टींसाठीसुद्धा प्रसंगी वंचित राहणे, यांचा अनुभव घेतो. त्यातून त्याची जगण्याची समज वाढते. मनाचा कमकुवतपणा कमी होतो. जगण्याची अनिश्चितता, अर्थपूर्णता आणि निरर्थकता पाहण्यासाठी त्याचे मन सरावते. अखेरीस आपण आपल्यासहित इतरही ‘माणसंच’ आहोत याचा प्रत्यय आल्यानंतरची करुणा निर्माण होते. मग एका वेगळ्या संदर्भात महाभारताने कुंतीने श्रीकृष्णाकडे दु:ख का मागितले, याचे महत्व पटते. कल्पना चारुदत्त यांच्या अनुभव कथनामधून हे सारे आठवत राहते. ‘माझ्या मना बन दगड’ हे म्हणण्याआधी ‘मेणाहून मऊ’ असणारे वितळणारे, पाघळणारे मन स्वत:लाच सांभाळावे लागते. ओळखावे लागते. स्वत:च्या मनातील भावना-विचारांकडे त्रयस्थपणे पाहण्याची, स्वत:ला शोधण्याची गरज कल्पना चारुदत्त यांच्या कथनामधून ठळकपणे पुढे येते. रुग्ण आणि रुग्णाची काळजी घेणारे आप्त-मित्र यांच्या नात्याची कसाटी लागणे, रुग्णाचे जगणेच पणाला लागणे, डॉक्टरांचे निदान, हलगर्जीपणा, रुग्णाबददलचे डॉक्टरांनी आणि त्याच्या आप्त-सोबत्यांनी लावलेले अंदाज चुकवून रुग्णाचे प्रकृतीमान बिघडणे-सुधारणे हा साराच प्रकार जीवघेणा असतो. ‘येथे मनुष्यमात्राचे काय आहे’, असा निराशावादी सुरही मनात डोकावून जातो, पण साऱ्यावर मात करीत मनोबल, आत्मविश्वास स्वत:लाच प्राप्त करावा लागतो. आत्मबळ प्राप्तीचा मनाचा प्रवास कल्पना चारुदत्त यांच्या अनुभवातून उलगडतो. मानवी नात्यांचे कोवळे धागे, मानवी शरीराचे आजारपणात येणारे वेगळे ‘शरीरभान’, शरीराचे महत्वपूर्ण अस्तित्व जाणवणे, आपल्याकडून एरवी आपल्या शरीराची होणारी प्रचंड हेळसांड, आपल्या शरीराचा-मनाचा परस्परांशी होणारा अर्थपूर्ण संवाद ही सारी वैशिष्ट्ये या अनुभवकथनातून व्यक्त होतात. स्वमदत करण्यासाठी पुढे सरसावणे, आत्मबळ, आत्मसंरक्षण प्राप्तीसाठी स्वत:लाच कठोर, कणखर करणारे अनुभवकथन असे त्याचे वर्णन करता येईल. -रुपाली शिंदे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more