* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DID YOU KNOW THERE WAS A TIME WHEN BEARS SPOKE, THE MOON LAUGHED AND BABIES WERE FOUND INSIDE FISH? HAVE YOU HEARD OF THE TWO-HORNED SAGE WHO HAD NEVER SEEN A WOMAN IN HIS LIFE? DID YOU KNOW RAVANA`S HALF-BROTHER WAS THE GOD OF WEALTH? HAVE YOU EVER SEEN A MAN WITH A THOUSAND ARMS? THE TALES IN THIS COLLECTION SURROUND THE TWO MOST POPULAR AVATARS OF LORD VISHNU-RAMA AND KRISHNA-AND THEIR LINEAGE. COUNTLESS STORIES ABOUT THE TWO ABOUND, YET MOST ARE SIMPLY DISAPPEARING FROM THE HEARTS AND MINDS OF THE PRESENT GENERATION. BESTSELLING AUTHOR SUDHA MURTY TAKES YOU ON AN ARRESTING TOUR, ALL THE WHILE TELLING YOU OF THE DAYS WHEN DEMONS AND GODS WALKED ALONGSIDE HUMANS, ANIMALS COULD TALK AND GODS GRANTED THE MOST GLORIOUS BOONS TO COMMON PEOPLE.
रामाच्या सूर्यवंशातील दिलीप राजाला देवांनी तू काही काळ निपुत्रिक होशील असा शाप दिला होता...कशामुळे मिळाला होता त्याला शाप?...कसा दूर झाला तो शाप?...समुद्राची निर्मिती कशी झाली...रावणाला चार जणांकडून कोणते चार शाप मिळाले होते...विजयादशमीला आपण सोनं का लुटतो...कसं झालं राम-लक्ष्मण-भरत-शत्रु्घ्न यांचं महानिर्वाण...चंद्रवंशाचे दोन भाग कसे झाले...शबरासुराने कृष्णाचा पुत्र प्रद्युम्नाला समुद्रात फेकून दिलं...तरी तो वाढत होता शबरासुराच्या महालात...कसा? बाणासुराची रूपवती कन्या उषा हिच्या स्वप्नात एक देखणा तरुण रोज येतो आणि स्वप्नातच ती त्याच्याशी विवाह करते... कोण असतो तो तरुण?...सत्यवती अंध भिकारी असलेल्या वर्धनशी लग्न का करते?...तिला वैभव कसं प्राप्त होतं?...उदंक ऋषींना श्रीकृष्ण काय वर देतो...श्रीकृष्णाची महानिर्वाणाकडे वाटचाल कशी होते...हे जाणून घेण्यासाठी वाचा रामायणातील आणि महाभारतातील असंख्य कथांनी-उपकथानकांनी सजलेला वाचनीय कथासंग्रह ‘त्रिशंकू.’

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarPramod Shinde

    खुप वाचनीय पुस्तक

  • Rating StarDivya Marathi 14.12.19

    मिथक कथांचा तपशीलवार वर्णनात्मक आढावा असणाऱ्या कथा... श्रीराम आणि श्रीकृष्ण ही भारतीयांची आराध्य दैवतं. या दोघांच्या कथा सगळ्यांना माहीत असल्या तरी त्यातील काही उपकथानकं किंवा आख्यायिका सगळ्यांना माहीत नसतात किंवा त्यातील बारीकसारीक तपशील माहीत नसता. तर या दोन्ही दैवतांच्या कथा त्या कथांमधील उपकथानकांसह, आख्यायिकांसह सुधा मूर्ती यांनी त्यांच्या `द अपसाइड डाउन किंग` या पुस्तकातून समोर आणल्या आहेत. राम ज्या वंशात जन्मला त्या सूर्यवंशातील दिलीप राजाची कथा यात अंतर्भूत आहे. दिलीप राजाने कामधेनूकडे दुर्लक्ष केलं म्हणून देवांनी त्याला शाप दिला, की जोपर्यंत तुला गायीचं महत्त्व कळणार नाही, तोपर्यंत तू निपुत्रिक राहशील. त्यानंतर वसिष्ठ मुनींनी त्याला नंदिनी नावाची गाय भेट म्हणून दिली. दिलीप राजाने आपल्या राज्याचा त्याग करून पत्नीसह नंदिनीची खूप सेवा केली आणि त्यांना पुत्रप्राप्ती झाली. मुलाचं नाव ठेवलं रघू. रघू पराक्रमी होता. त्याने वडिलांचं राज्य परत मिळवलं. रघूने सूर्यवंशाचं नाव इतकं उज्ज्वल केलं, की सूर्यवंश रघुवंश म्हणून ओळखला जाऊ लागला. अज हा रघूचा मुलगा, त्याच्याबाबतीतलं छोटंसं कथानक, अजाचा मुलगा दशरथ याचा उल्लेख, अशा रीतीने सूर्यवंशाची वंशावळ कथाभागासह समजते. मनोहर या वाटमाऱ्याची कथा यात आहे. वाटमाऱ्याचा वाल्मीकी कसा झाला, हा कथाभाग त्यात येतो. ईक्ष्वाकु वंशाचा बहू राजा, त्याला राज्य गमावून आपल्या दोन राण्यांसह भार्गव ऋषींच्या आश्रमात घ्यावा लागलेला आश्रय. तिथे त्याच्या मुलाचा सगराचा झालेला जन्म, सगराने वडिलांचं राज्य परत मिळविणे, सगराच्या दोन राण्या, त्यातील एकीला साठ हजार पुत्रांची झालेली प्राप्ती, त्यांनी सुमद्राची केलेली निर्मिती इ. कथाभाग बहू राजाच्या कथेत येतो. वसिष्ठ मुनींचा निमी राजावर झालेला रोष आणि त्याने त्यांच्याकडे मागितलेला वर याची कथा, भगिरथाने गंगेला पृथ्वीवर का आणि कसं आणलं ही कथा, सत्यव्रत त्रिशंकू का झाला, हरिश्चंद्राला किती दिव्यांमधून जावं लागलं, कौशेट्याच्या कथेचा विजयादशमीच्या सोनं लुटण्याशी असलेला संबंध, रावणाच्या जन्माची, त्याच्या विवाहाची, त्याला मिळालेल्या चार शापांची, त्याला शंकराकडून मिळालेल्या आत्मलिंगाची, रावणाच्या भावांची इ. रावणाशी संबंधित कथा या पुस्तकात समाविष्ट आहेत. हनुमानाशी संबंधित कथा, सीतेने दशरथासाठी केलेलं वाळूचं पिंडदान, राम-लक्ष्मण भरत-शत्रुघ्न यांचं महानिर्वाण इ. रामायणातील अनेक कथांचा समावेश या पुस्तकात केला गेला आहे. महाभारतातील कथांची सुरुवात होते चंद्रवंशापासून. या वंशातील राजा ययातीच्या कथेत चंद्रवंशाचे पुरुवंश आणि यदुवंश असे दोन भाग कसे झाले, हा कथाभाग येतो. कृष्णाशी संबंधित अनेक कथा यात आहेत. त्यात स्यमंतक मण्याची कथा आहे. त्या कथेतच सत्यभामा आणि जांबुवंतीशी कृष्णाच्या झालेल्या विवाहाचं उपकथानक आहे. कृष्णाचे शत्रू, त्याला झालेली अश्व आणि रथाची, शंखाची प्राप्ती, नरकासुर वध, कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न आणि शबरासुराची कथा, प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध आणि बाणासुराची कन्या उषा यांची प्रेमकथा, कृष्णाच्या राण्यांची कथा, वर्धन आणि सत्यवतीची कथा, साडेतीन रत्नांची कथा, गया राक्षसाची, उंदक ऋषींची कथा आणि कृष्णाच्या अंताची कथा इ. उपकथानकांसह, अाख्यायिकांसह या पुस्तकात अंतर्भूत केल्या अाहेत. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे या घटना अापल्या देशात काेणत्या भागात घडल्या अाणि अाता ताे प्रदेश काेणत्या नावानं अाेळखला जाताे, या विषयीही या पुस्तकातून माहिती मिळते. जसे गया राज्याच्या बलदंड व विस्तृृत छातीवरच युद्ध झाल्याने त्याला मरण पत्करावे लागले; पण जेथे हे युद्ध घडले, ती जागा बिहार राज्यातील गया नावानेच प्रसिद्ध आहे. आजही तेथे मृत्यूनंतरचे संस्कार केल्याने मोक्ष मिळतो असे म्हणतात. कर्नाटकातील गोकर्ण येथे रावणाने आत्मलिंग जमिनीवर ठेवल्याचा प्रसंग घडला व ते रावणाने तेथून उचलण्याच्या प्रयत्नांत ओढले गेल्याने गाईच्या कानासारखा आकार प्राप्त झाल्याचे आजही पहायला मिळते. असे अनेक संदर्भ या कथांच्या अनुषंगाने आपल्यासमोर येतात. महत्त्वाच्या घटनांच्या अपरिहार्यतेला कारणीभूत ठरलेले प्रसंग उदा. रावणाला चार प्रसंगांत चार जणांकडून शाप मिळाला. त्या चार शापांचं फलित होतं, त्याचा रामाकडून झालेला वध. हनुमानाचं पाताळात जाणं, राम काळाशी बोलत असताना व्यत्यय न आणण्याची अगदी महत्त्वाची सूचना लक्ष्मणाला दिलेली असताना दुर्वासांचं तिथं येणं, लक्ष्मणाला राम आणि काळ यांच्या संभाषणात व्यत्यय आणणं भाग पाडणं, या प्रसंगांची परिणती राम आणि लक्ष्मणाच्या मृत्यूच्या अटळतेत होते. तेव्हा एकमेकींमध्ये गुंफलेल्या या कथारूपी कड्या वाचकाला गुंतवून ठेवतात आणि त्याचं रंजनही करतात. राम आणि कृष्ण हे देव असूनही मानव जन्मात त्यांना जे दुःख भोगावं लागलं, ते त्यांनी धीरोदात्तपणे भोगलं. त्यामुळे माणसाने दुःख भोगताना मनाचा तोल सांभाळला पाहिजे, असा संदेश या कथांमधून मिळतो; तसेच वाईट गोष्टीचे फळ वाईट मिळते आणि चांगल्या गोष्टीचे फळ चांगले मिळते, असाही एक संदेश या कथांमधून अधोरेखित होतो. सुधा मूर्तींच्या मूळ रसाळ कथनाचा ओघ लीना सोहोनींनी मराठीतही कायम ठेवल्याने वाचक पुस्तक वाचून पूर्ण केल्यावरच खाली ठेवतो. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 07-04-2019

    विस्मृतीत गेलेल्या कथांची ओळख... प्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांच्या ‘द अपसाइड डाऊन किंग’ या पुस्तकाचा ‘त्रिशंकू’ हा मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला असून, यात राम आणि कृष्ण यांच्या अप्रचलित कथा आहेत. राम आणि कृष्ण हे विष्णूचे मनु्यरूपात प्रकट झालेले दोन अवतार. या दोन अवतारांना लोकजीवनात फार मोठे स्थान असून, त्यांच्या भरपूर प्रचलित कथा आपल्याला माहीत असतात. आपण त्या वाचलेल्या व ऐकलेल्या असतात. पण लेखिका सुधा मूर्ती यांनी विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या कथांची या पुस्तकातून ओळख करून दिली आहे. राम आणि कृष्ण यांच्याकडे केवळ देव म्हणून न पाहता त्यांच्यातील माणूसपण कसं होतं, या दृष्टिकोनातून त्यांच्यावर प्रकाश टाकला आहे. यात रामाच्या पंधरा तर कृष्णाच्या दहा कथा आहेत. या सर्व सुरस कथा वाचताना नव्याने वाचल्याचा अनुभव येतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more