* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE MAN FROM PAKISTAN
  • Availability : Available
  • Translators : SHEKAR JOSHI
  • ISBN : 9788184985566
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 456
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE MAN FROM PAKISTAN BY DOUGLAS FRANTZ AND CATHERINE COLLINS IS A SHOCKING AND INTRIGUING TALE ABOUT INTERNATIONAL LEVELS. THE NOVEL IS AN INTENSE AND FAST - MOVING STORY TOLD THROUGH THE EYES OF AMERICAN AND EUROPEAN OFFICIALS. THE SECOND NUCLEAR AGE HAS BEGUN AND THERE IS FEAR ALL AROUND. NOT SINCE THE END OF THE COLD WAR HAS THERE BEEN SUCH FEAR ABOUT A POSSIBLE NUCLEAR DISASTER. THIS TIME IT`S WORSE AS THE EFFECTS COULD NOW BE LARGER AND MORE DEVASTATING. SHOULD SUCH AN ACT HAPPEN, IT IS POSSIBLE THAT THE MASTERMIND BEHIND IT IS THE FORMIDABLE ABDUL QADEER KHAN. ABDUL QADEER KHAN IS THE PAKISTANI MAKER OF THE POWERFUL ISLAMIC BOMB. HE HAS MASTERMINDED A VAST NUMBER OF UNDERGROUND ENTERPRISES THAT HAVE LED TO THE SELLING OF NUCLEAR SECRETS TO COUNTRIES LIKE LIBYA, IRAN AND NORTH KOREA. KHAN`S ORGANISATION MAY BE A LOOSE - KNIT ONE, BUT ITS THREAT REMAINS. IT STILL HAS THE CAPABILITY TO SELL WEAPON BLUEPRINTS, PARTS AND CONTAINS THE KNOW - HOW TO BRING TOGETHER THE PARTS INTO A DO - IT - YOURSELF BOMB KIT. IN SUCH A SITUATION, ONE WOULD EXPECT THE AMERICAN AUTHORITIES TO TAKE ACTION AND HALT ALL SUCH OPERATIONS, BUT TO EVERYONE`S SURPRISE THEY CHOOSE TO LIE LOW AND WATCH KHAN`S ACTIONS. AS THEY AWAIT KHAN`S EVERY NEXT STEP, ONE BY ONE HE PROVES ALL PROBABLE INTERNATIONAL SAFEGUARDS TO BE DEFUNCT. HE PROVES TO THE WORLD THAT NONE OF THEM MATTER AND ARE COMPLETELY DYSFUNCTIONAL. THE SUSPICION WAS ON KHAN RIGHT FROM THE BEGINNING AND AMERICAN AND EUROPEAN OFFICIALS ULTIMATELY DO CATCH HOLD OF HIM, BUT UNFORTUNATELY THE NUCLEAR GENIE IS OUT AND IS NOW OF GREAT DANGER. THE MAN FROM PAKISTAN IS AVAILABLE IN PAPERBACK. THE BOOK WAS PUBLISHED IN 2008 BY TWELVE.
आंतरराष्ट्रीय पातळीवर संभ्रावस्था निर्माण करणारी एक सत्यकथा! या ग्रहावरील सर्वात धोकादायक अशा उद्दाम आणि युद्धखोर देशामध्ये अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा फैलाव करण्यासाठी केवळ एका माणूस कसा वागतो, कोणत्या थराला जाऊ शकतो; याबाबत ध्योक्याची सूचना देणारे तसेच सर्वकाही द्यात असूनही अमिरेकेच्या सरकारने हे सर्व होऊ कसे दिले, यावर प्रकाश टाकणारे पुस्तक.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #DOUGLASFRANTZ #CATHERINECOLLINS #SHEKARJOSHI #THEMANFROMPAKISTAN #तोएकपाकिस्तानी #
Customer Reviews
  • Rating Starकिरण माने

    NakKi vacha barech mahiti purna pustak aahe.

  • Rating StarKiran Borkar

    पाकिस्तानच्या अणुबॉम्ब निर्मितीचा जनक अब्दुल करीम खान ( ए. क्यू. खान ) याची ही सत्यकथा . खान हा पक्का भारतद्वेष्टा आणि त्या द्वेषापायी त्याने अणुबॉम्बच्या निर्मितीत हात घातला .इतकेच नव्हे त्याने जागतिक पातळीवर अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा काळाबाजार सुरू कला .त्याने आणि त्याच्या सहकार्यांनी इराण, लिबिया, उत्तर कोरिया अश्या देशांना आपले तंत्रज्ञान विकले होते . पाकिस्तानच्या अणूक्षेत्रातील त्याचा उदय आणि अस्त याची रसभरीत ही कहाणी आहे . ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 15-03-2015

    पाकिस्तानच्या अणुबाँब जनकाची सुरस कहाणी… ‘द मॅन फ्रॉम पाकिस्तान’ हे पाकिस्तानच्या अणुबाँबचे तथाकथित जनक डॉ. ए. क्यू. खान यांच्या एकूण कारकिर्दीचा आढावा घेणारे असे पुस्तक. पाकिस्तानला अण्वस्त्रसज्ज देशांच्या पंक्तीत नेऊन बसविण्याचा ध्यास घेतलेला हा मणूस पाकिस्तानच्या अणुक्षेत्रातील त्याचा उदय आणि एकूण कामगिरी यांची रसभरित कहाणी, लेखक डग्लस फ्रान्झ आणि पत्रकार पत्नी कॅथरिन कॉलिन्स यांनी या पुस्तकाद्वारे सादर केली आहे. ‘तो एक पाकिस्तानी’ हा या पुस्तकाचा मराठी अनुवाद शेखर जोशी यांनी केला आहे. मूळ पुस्तकाइतकाच त्याचा अनुवादही माहितीपूर्ण आणि मनोरंजक करण्याचा लेखकाचा प्रयत्न जागोजागी दिसून येतो. २० व्या शतकाच्या प्रारंभी अल्बर्ट आईनस्टाईनने अणूमधे लपलेल्या शक्तीचा शोध लावला. दुसऱ्या महायुद्धात याचा वापर अणुबाँबच्या निर्मितीत करण्यात आला. या अणुबाँबच्या स्फोटामध्ये जपानमधील हिरोशिमा-नागासाकी ही शहरे क्षणार्धात जळून खाक झाली. हा इतिहास सर्वांच्या परिचयाचा आहे. या हादऱ्यानंतर सगळे जग हादरून गेले. बऱ्याच राष्ट्रांनी एकत्र येऊन अण्वस्त्रबंदीसाठी आवाज उठवला. अमेरिका, रशिया, ब्रिटन अशा प्रमुख राष्ट्रांनी एकत्र येऊन ‘आय ए ई ए’ म्हणजेच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. सदर आयोग मार्शल प्लॅन म्हणून परिचित असलेल्या योजनेच्या धर्तीवर एक योजना तयार करून शांततापूर्ण अणुकार्यक्रम राबविण्यास प्रोत्साहन देईल असे जाहीर करून या प्रस्तावाचे ‘शांततेसाठी अणु’ असे नामकरणही केले. एकीकडे ‘आय ए ई ए’ आकार घेत असतानाच दुसरीकडे अमेरिकेने इराण, इस्त्रायल, भारत, पाकिस्तान यासारख्या अनेक देशांना अणुभट्ट्या सवलतीच्या दरात विकायला सुरुवात केली. अमेरिकेचा या क्षेत्रातील प्रभाव कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून रशियानेही स्वत:ची मित्र राष्ट्रे असलेल्या देशांना अणुतंत्रज्ञानाची खिरापत वाटायला सुरू केली. या सर्वांची अतिशय मनोरंजक माहिती या पुस्तकातून मिळते. थोडक्यात काय तर लहानमोठी सर्वच राष्ट्रे अण्वस्त्रनिर्मितीबाबत छुपेछुपे प्रयत्न करू लागली. शांततापूर्ण अणुऊर्जा कार्यक्रम आणि त्याचा अण्वस्त्रनिर्मितीसाठी व्हावयाचा संभाव्य वापर यातील तथाकथित सीमारेषा म्हणजे एक मृगजळ असल्याचे हळूहळू सिद्ध होऊ लागले आहे. या अशा पार्श्वभूमीवर पाकिस्तानी शास्त्रज्ञ व या कादंबरीचा नायक अब्दुल करीम खान अण्वस्त्र चळवळीत सक्रिय होत आपली पावलं उमटवित होता. खानचा जन्म २७ एप्रिल १९३६ रोजी भारतातील भोपाळ संस्थानात झाला. खानचे वडील अब्दूल गफूर खान ‘मुस्लीम लीग’ या राजकीय पक्षासाठी कार्य करीत असत. मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्राची मागणी आणि हिंदूंचा द्वेष हे गुण खानने आपल्या वडिलांकडून वारसाहक्काने मिळवले होते. पुढे जरी खानने आपल्या आयुष्यातील दहा वर्षे युरोपात घालवली असली तरीही बालपणापासून झालेल्या मुस्लीम संस्कारांच्या पगड्यातून तो बाहेर पडू शकला नाही. पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही सुमारे दशकभर त्या देशाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. किमान प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या उद्योग, शाळा आणि आर्थिक संस्था या सुविधांचीही तिथे कमतरता होती. त्या तुलनेत भारताची आर्थिक स्थिती झपाट्याने होत होती. त्याची असूया वाटणारे खान सारखे बरेच पाकिस्तानी होते. अब्दूल खान या पाकिस्तानी शास्त्रज्ञानाने जागतिक पातळीवर अण्वस्त्र तंथज्ञानाचा काळाबाजार करावयास सुरुवात केली. त्याच्या कारवायासंबंधी बारीक सारीक बारकावे लेखकाने सुसंगत रीतीने मांडले आहेत. सुमार दर्जाचे तंत्रज्ञान अवगत असलेला हा शास्त्रज्ञ आपली राक्षसी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी काय काय करतो. द्वितीय अणुयुगाचा एक महत्त्वाचा भागीदार कसा बनतो, पाकिस्तानसारख्या एका सर्वस्वी कमकुवत देशाला अण्वस्त्रसज्ज देशांच्या पंक्तीत कसा नेऊन ठेवतो आणि जगातील अत्यंत अस्थिर देशांना आपले अण्वस्त्र तंत्रज्ञान बिनदिक्कत कसे विकतो या सर्वाची कहाणी सांगण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. यामध्ये खानच्या कारवायांचा उदय आणि ऱ्हास याची कारणे जाणून घेऊन वाचकापर्यंत पोहोचविण्याचे काम लेखकाने केले आहे. तांत्रिक बाजू बरोबरच पुस्तकाची ललित बाजूसुद्धा व्यवस्थित हाताळली असल्यामुळे वाचकाची उत्सुकता व कुतूहल जागे ठेवण्यात लेखकाला यश मिळाले आहे. एका वेगळ्याच विषयावरचे माहितीपूर्ण व उत्कंठा वाढवणारे असे हे पुस्तक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more