* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WHY MY THIRD HUSBAND WILL BE A DOG
  • Availability : Available
  • Translators : SHOBHANA SHIKNIS
  • ISBN : 9788184985351
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 288
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
A HILARIOUS COLLECTION OF STORIES FROM THE LIFE OF THE NEW YORK TIMES BESTSELLING AUTHOR OF LOOK AGAIN AT LAST, TOGETHER IN ONE COLLECTION, ARE LISA SCOTTOLINE’S WILDLY POPULAR PHILADELPHIA INQUIRER COLUMNS. IN HER COLUMN, LISA LETS HER HAIR DOWN, ROOTS AND ALL, TO SHOW THE HUMOROUS SIDE OF LIFE FROM A WOMAN’S PERSPECTIVE. THE SUNDAY COLUMN DEBUTED IN 2007 AND ON THE DAY IT STARTED, LISA WROTE, “I WRITE NOVELS, SO I USUALLY HAVE 100,000 WORDS TO TELL A STORY. IN A COLUMN THERE’S ONLY 700 WORDS. I CAN BARELY SAY HELLO IN 700 WORDS. I’M ITALIAN.” THE COLUMN GAINED MOMENTUM AND POPULARITY. WORD OF MOUTH SPREAD, AND READERS DEMANDED A COLLECTION. WHY MY THIRD HUSBAND WILL BE A DOG IS THAT COLLECTION. SEVENTY VIGNETTES. VINTAGE SCOTTOLINE. IN THIS COLLECTION, YOU’LL LAUGH ABOUT: • BEING CAUGHT BRALESS IN THE EMERGENCY ROOM • BETTY AND VERONICA’S LIFE LESSONS FOR GIRLS • A MAN’S MOST IMPORTANT BODY PART • INTERRUPTING AS AN ART FORM • A RELIGION MEN AND WOMEN CAN WORSHIP • REAL ESTATE ADS AS PORN • SPANX ARE PUBLIC ENEMY NUMBER ONE • AND SO MUCH MORE ABOUT LIFE, LOVE, FAMILY, PETS, AND THE PURSUIT OF JEANS THAT ACTUALLY FIT!
या पुस्तकात लेखिकेने स्वत:चा घर-परिवार अन् त्यातील जबाबदाऱ्यांसोबतच भारतीय महिला विविध क्षेत्रांत नुसते काम नाहीतर पथदर्शक कामगिरी पार पाडू शकतात, हे सिद्ध करणाऱ्या महिलांशी मनमोकळे हितगुज केलेले आहे. भारतातील आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या या महिलांनी सांगितले की, वादळ-वाऱ्यात, ऊन-पावसात अत्यंत कठीण समयी कोणत्या तत्त्वांच्या आधारे त्या ठाम राहिल्या त्यांना कोठून प्रेरणा मिळाली. या महिलांनी तेव्हा सर्व प्रकारच्या विपरित परिस्थितींचा सामना केला, प्रसंगी हालपेष्टा सोसल्य़ा, लिंगभेदामुळे अपमान गिळले. यामुळेच त्या-त्या क्षेत्रातील कवाडे पुढील पिढीतील महिलांसाठी खुली झाली आहेत. या महिलांनी जागतिक क्रमवारीत स्थान पटकावलेले आहे. सर्वच क्षेत्रांतील अग्रणी तुमच्या भेटीला आलेल्या आहेत. धवलक्रांतीत मोलाचा सहभाग असलेल्या अम्रिता पटेल, औषध निर्मीती अन् संशोधन क्षेत्रातील किरण मुझुमदार, बँकिंग क्षेत्रातील कल्पना मोरपारिया, शिखा शर्मा, नैनालाल किडवाई, उद्योग क्षेत्रातील अनु आगा, मेहेर पद्मजी, मल्लिका श्रीनिवासन, प्रिया पॉल, लीला पुनावाला, विनीता बाली, कला क्षेत्रातील मल्लिका साराभाई, शुभा मुद्गल आणि सामाजिक क्षेत्रातील शाहिन मिस्त्री, क्रिडाक्षेत्रातील पी.टी. उषा यांतील प्रत्येक जण आपापल्या कार्यात शिखराला पोहचलेल्या असून प्रत्येकीचे जीवन फारच प्रेरणादायी आहे; पण सर्वांत महत्त्वाचे नमूद करावेसे वाटते, ते म्हणजे प्रत्येकीने आपापली सामाजिक जाणीव जागृत ठेवून त्यानुसार भरीव काम केलेले आहे. यातील प्रत्येकीचाच प्रवास रोलकोस्टर राइडसारखा चित्तथरारक असून तुम्हाला या पुस्तकाच्या वाचनातून त्यांच्या अष्टपैलू व्यक्तित्वाचे दर्शन तर होईलच, पण यशस्वी होण्याच्या त्रिकालाबाधीत सत्य असलेले गुपित देखील उमजेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #लिसा स्कॉटोलिन #LISA SCOTTOLINE #SHOBHANA SHIKNIS #तिसरा नवरा नको गं बाई #WHY MY THIRD HUSBAND WILL BE A DOG #TISARA NAVARA NAKO GA BAI
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKRANG 07-09-2014

    खुमासदार शैलीतल्या गुजगोष्टी... ‘स्त्री एका टी-बॅगसारखी असते. गरम पाण्यात असल्याशिवाय ती किती कडक आहे ते तुम्हाला कधीच कळणार नाही.’ या एलेनॉर रुझव्हेल्ट यांच्या सुप्रसिद्ध वाक्याने ‘तिसरा नवरा नको गं बाई!’ या पुस्तकाची सुरुवात होते आणि हे पुस्तक स्तरियांच्या एका आगळ्यावेगळ्या स्वभावपैलूवर प्रकाश टाकणार याची कल्पना येते. लिसा स्कॉट्टोलाइन या अमेरिकन लेखिकेचे हे पुस्तक म्हणजे तिच्या वृत्तपत्रीय स्तंभाचं संकलन आहे. छोट्यामोठ्या निरीक्षणांपासून ते अगदी राष्ट्रीय घडामोडींवर प्रतिक्रिया देणारी लिसा नकळतपणे वाचकांना तिच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची संधी देते. समस्त महिलावर्गाशी हितगुज केल्यासारखी बिनधास्तपणे, काहीशा धाडसी विषयांना ती सहज हात घालते. पन्नाशीच्या जवळ असलेली, दोनदा घटस्फोट झालेली स्त्री तिच्या भन्नाट आयुष्यातले किस्से ऐकवत वाचकाला खिळवून ठेवते. त्यातूनच एका स्त्रीची आयुष्याकडे बघण्याची नर्मविनोदी शैली उलगडत जाते. तिच्या विभक्त पतीराजांना ती चक्क ‘वस्तू १’ आणि ‘वस्तू २’ या नावाने संबोधते. पाळीव प्राण्यांचा ताफाच तिच्याकडे आहे. त्यांच्यासह आकाराला आलेले तिचे कुटुंब हा तिचा जिव्हाळ्याचा विषय आहे. नुकतीच पदवीधर झालेली तिची तरुण मुलगी फ्रान्सिस्का, सत्तरीतली आई, गे असणारा भाऊ फ्रॅंक आणि हयात नसणारे वडील हे तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्याविषयीच्या माहितीतून त्यांच्यातील नातं, भावनिक बंध उलगडत जातात. अमेरिकन लोकही कुटुंबाशी इतके जोडलेले असू शकतात, याचा प्रत्यय तिच्या लेखनातून आपल्याला येतो. तिची मते अनेकदा खट्याळ वाटली तरी प्रामाणिक वाटतात. ‘राष्ट्राध्यक्षांचे व्हाइट हाऊस थोडं अधिक चांगल्या प्रकारे नाही का सजवता येणार’, असं सुचवून सजावटीच्या काही सूचनाही करून ती मोकळी होते. अमेरिकेत न्यक्लिअर कुटुंबाचं इतकं पेव फुटलेलं असताना कुत्र्यांवर प्रेम असलेली माणसे किमान २-३ जातीची कुत्री पाळतात, याला काय म्हणावे? असे तथ्य असणारे प्रश्न ती उपस्थित करते. ‘बाबांची आठवण येते’ या प्रकरणातून तिची वडिलांविषयीची कृतज्ञता, प्रेम, हळवी लिसा समोर येते. तर ‘स्वर्गातला घोटाळा’ मधून फ्रॅंक व आई यांच्यातील लुटुपुटुच्या लढाईचा तिने लावलेला सोक्षमोक्ष पाहून तिच्या लेखनाविषयी कौतुक वाटतं. ‘माझे लाडके प्राणी’ मधील लिटिल टोनी हा किंग कॅव्हॅलिअर जातीचा गोंडस कुत्रा हा माझा रोल मॉडेल असल्याची प्रस्तावना करीत आपल्याला लेखिका धक्का देते. पुढे रुबी ही कॉर्गी जातीची दमदाटी करणारी कुत्री टोनीचा कसा मायेने सांभाळ करते याचे वर्णन करत, लेखिका तिच्या रोल मॉडेल्सचे वेगळेपण विषद करते. पुस्तकातील काही प्रकरणे थोडी पाल्हाळ लावल्यासारखी वाटली तरी लिसाची लेखनशैली वाचकांना खिळवून ठेवते. एकूणच अनौपचारिक गप्पांमधून आपल्याला तिच्या आयुष्यातील घटना, प्रसंग यांविषयी माहिती देत लेखिका तिचे आयुष्याविषयीचे तत्त्वज्ञान आपल्याला समजावू पाहते. अनुभवातून आलेलं शहाणपण, मनाचा मोठेपणा व एकटीने धीराने राहणारी तिची छबी आपल्याला मोहून टाकते. चटकदार तरीही संवेदनशील लेखन असाच उल्लेख या पुस्तकाचा करावा लागेल. या अनुभव कथनाला ‘तिसरा नवरा नको गं बाई!’ हे शीर्षक का, असा प्रश्न वाचकाला सुरुवातीला पडतो. परंतु पुस्तक वाचून झाल्यावर या प्रश्नाचं उत्तर सापडतं. जीवनात आधार शोधताना लिसा लग्नाच्या बंधनात अडकते. परंतु संसार थाटण्याच्या दोन्ही प्रयत्नांमध्ये अपयश आल्यावर ती शहाणी होते आणि एकटी राहण्याचा निर्णय घेते. यावेळी मात्र तिच्या सोबत असतात तिचे लाडके पाळीव प्राणी. त्यांच्याप्रती असलेला जिव्हाळा व त्यांच्यामुळे होणारा कमी त्रास या दोहोंमुळे तिला तिसऱ्या नवऱ्याची कमतरता अजिबात जाणवत नाही, म्हणूनच हा आगळावेगळा शीर्षकप्रपंच. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more