* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MY PATH LEADS TO TIBET
  • Availability : Available
  • Translators : VANDANA ATRE
  • ISBN : 9788184985160
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 220
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
DEFYING EVERYONE`S ADVICE, ARMED ONLY WITH HER RUDIMENTARY KNOWLEDGE OF CHINESE AND TIBETAN,SABRIYE SET OUT TO DO SOMETHING ABOUT THE APPALLING CONDITION OF THE TIBETAN BLIND, WHO SHE LEARNED HAD BEEN ABANDONED BY SOCIETY AND LEFT TO DIE. ON HORSEBACK THROUGHOUT THE COUNTRY, SHE SOUGHT THEM OUT, DEVISED A BRAILLE ALPHABET IN TIBETAN, EQUIPPED HER CHARGES WITH CANES FOR THE FIRST TIME, AND SET UP A SCHOOL FOR THE BLIND. HER EFFORTS WERE CROWNED WITH SUCH SUCCESS THAT HUNDREDS OF YOUNG BLIND TIBETANS, INSTILLED WITH A NEWFOUND PRIDE AND AN EDUCATION, HAVE NOW BECOME SELF-SUPPORTING. A TALE THAT WILL LEAVE NO READER UNMOVED, IT DEMONSTRATES ANEW THE POWER OF THE POSITIVE SPIRIT TO OVERCOME THE MOST DAUNTING ODDS. AUTHOR BIOGRAPHY:SABRIYE WAS BORN IN 1970 NEAR BONN. WHEN SHE WAS TWO YEARS OLD SHE WAS DIAGNOSED WITH A RETINAL DISEASE THAT CAUSED HER TO GO BLIND AT THE AGE OF 13. SHE TOOK UP TIBETAN STUDIES, SOCIOLOGY, AND PHILOSOPHY, AND IS CURRENTLY RUNNING A SCHOOL FOR THE BLIND IN LHASA. IN 2000, SHE RECEIVED THE NORGALL PRIZE OF THE INTERNATIONAL WOMEN`S CLUB. EDITORIAL REVIEWS WHEN TENBERKEN, WHOSE BATTLE WITH RETINAL DISEASE LEFT HER BLIND AT AGE 13, WAS IN HER 20S, SHE STUDIED TIBETAN CULTURE AT THE UNIVERSITY OF BONN. FRUSTRATED BY THE AWKWARD CHARACTER-RECOGNITION MACHINERY SHE HAD TO USE TO READ TIBETAN MATERIALS, SHE DEVISED A TIBETAN BRAILLE ALPHABET, SO THAT ONCE TRANSLATED, WORKS COULD BE DIRECTLY READABLE BY THE BLIND. WHAT FOLLOWED SEEMED NATURAL TO HER: SHE`D GO TO TIBET AND START A SCHOOL TO TEACH THIS BRAILLE TO BLIND TIBETAN CHILDREN. TRAVELING ON HORSEBACK OVER TREACHEROUS MOUNTAIN PASSES, SLEEPING IN RAT-INFESTED HUTS AND DEALING WITH SELF-INTERESTED CHARITABLE BUREAUCRACIES, TENBERKEN MANAGED TO KEEP HER HUMOR AND COURAGE. SHE SUCCEEDED IN ESTABLISHING A SCHOOL, AND HER ORGANIZATION, "BRAILLE WITHOUT BORDERS" CONTINUES THE LITERACY MISSION IN OTHER COUNTRIES.
लहानपणी दृष्टिपटलाला झालेल्या आजारामुळे सॅब्रिए टेनबर्केन अंध होते, मात्र स्वत:ला वचन देते की, ‘आपले अंधत्व कधीही अपंगत्व ठरणार नाही, किंबहुना आपण तसे घडू द्यायचे नाही!’ चिनी आणि आशियाई संस्कृतीचा अभ्यास करत असताना तिबेटमधील अंध मुलांची दारुण स्थिती सॅब्रिएला समजल्यावर तिला धक्काच बसतो! ती निर्णय घेते – नाकारलेल्या, धिक्कारलेल्या आणि हीन दर्जाची वागणूक मिळणा-या तिबेटमधल्या अंध मुलांना मदत करण्याचा! निष्ठा आणि निर्धार एवढ्याच पुंजीवर ती एकहाती तिबेटी भाषेत ब्रेल बाराखडी तयार करते... अगदी मोजक्या मुलांसह ल्हासात अंधांसाठी पहिली शाळा उघडते... अर्थातच तिला यासाठी असंख्य समस्यांवर धैर्याने मात करावी लागते... आणि एका छोट्या प्रयत्नापासून सुरू झालेल्या या प्रयोगरूपी बीजाचे सर्व वयोगटातील अंधांसाठी काम करणा-या एका भव्य संस्थारूपी वटवृक्षात रूपांतर होते.... काळोखाचे जग उजळून टाकणा-या सॅब्रिएची ही तेजोमय कहाणी!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TIBETCHYAVATEWAR #MYPATHLEADSTOTIBET #तिबेटच्यावाटेवर #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VANDANAATRE #वंदनाअत्रे #SABRIYETENBERKEN "
Customer Reviews
  • Rating StarSiddharth Bonde

    तिबेट च्या वाटेवर या पुस्तकाच्या माहिती मला या आपल्या ग्रुप वरूनच मिळाली होती. नुसते तिबेट वाचून पुस्तक लगेच मागवलं सुधा , पण थोडीशी निराशा झाली. माझ्या मनात असं होते की तिबेट म्हणेच काहीतरी गूढ साहित्य, तिथलं लामा त्यांची जीवन पद्धती धर्म वैगरे वाचयला मिळेल. पण जसे पुस्तकं उघडल तसे लक्षात आले की ही तर एका परदेशी अंध मुलीची कहाणी आहे. नाराजीने वाचायला सुरुवात केली आणि खरेच काम सांभाळून 4 दिवसात पुस्तकं वाचून संपवलं. खूप प्रेरणादआयी कहाणी आहे सब्रिये ची.. जर्मनी मधील अंध मुलगी ती तिबेट भाषा शिकते , माहीत असताना ही की हे शिकून पुढे काही फारसे भवितव्य नाही म्हणजे उदरनिर्वाह चालणार नाही. तरी जिद्दीने शिकते का ? तिला काही तरी कार्य तिबेट मधील अंध मुलासाठी करायचं असते. जिद्दीनं पेटलेली ती एकटी तिबेट ला जाते. अंध मुलांसाठी तिबेटी भाषेचं ब्रेल लिपी काढते. तिथे आलेले तिला चागले , वाईट अनुभव. तिबेट म्हणजे सरकार चीन चे च... लाल फितीत व नोकर शाहीत अडकलेले तिचे काम. अंध लोक म्हणजे निरुपयोगी माणसे असा समाजात जाऊन केलेलं तिचे काम. प्रशासन कडून होणारा त्रास, आतिशय खडतर हवामान, मदत करू पाहणाऱ्या कडून नंतर दिलेला त्रास, स्व देश जर्मनी तून बंद झालेलं अनुदान. त्यातून तिने काढलेला मार्ग व निराश न होता तिने ल्हासा तील उघडलेली शाळा. देव दुता प्रमाणे नेहमी उभा असलेला तीच मित्र पौल. सब्रिय अंध असून ही तिने केलेलं काम आणि तिची अंध लोकं बद्दलची आत्मीयता... कालांतराने तिला मिळालेले यश, प्रसिध्दी, जग भर झालेलं नाव. नंतर तिचं अंध मुले पुढे शिकून त्यांनी केलीली प्रगती , कोणी संस्था प्रमुख, कोणी दुकान चालवले, कोणी परदेशी उच्च शिक्षण घेतलं. सर्व शक्य झालं सब्रुये मूळे. असा थक्क करणारा तिचा प्रवास आतिषय प्रेरणादायी आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 05-01-2014

    प्रेरणादायी कहाणी… वयाच्या बाराव्या वर्षी दृष्टिपटलाला झालेल्या आजाराने सॅब्रिए यांची दृष्टी गेली. बॉन विद्यापीठात चिनी आणि आशियाई संस्कृतीचा अभ्यास करत असताना तिला तिबेटमधील अंधांची दारूण स्थिती समजली. त्यानंतर तिने तिबेटमध्ये जाऊन अंधांसाठी काम कर्याचा निर्णय घेतला. जगभरातील अंधांना विविध सेवा देणाऱ्या तसेच समुपदेशन करणाऱ्या ‘ब्रेल विदाऊट बॉर्डर’ या गटाची स्थापना सॅब्रिए आणि तिचा सहचर पॉल क्रोनेन बर्ग यांनी केली, तसेच हिंदुस्थानात केरळ येथील तिरुअनंतपुरम येथे ‘कांथारी’ ही संस्था स्थापन केली. तिला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तिबेटमधील अंध मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण आणणाऱ्या लढाऊ वृत्तीच्या तरुण, अंध स्त्री ‘सॅब्रिए’ची प्रेरणादायक कहाणी ‘तिबेटच्या वाटेवर...’ मूळ लेखिका स्वतः सॅब्रिए टेनबर्केन, अनुवाद केलाय वंदना अत्रे यांनी. ‘तिबेटच्या वाटेवर...’ हे सॅब्रिए यांनी केलेले अनुभवकथन आहे. तिचा हा लढा आधी स्वतःच्या अपंगत्वाशी, अंधत्वाशी मग तिला पावलोपावली दया दाखवणाऱ्या समाजाशी आणि सर्वांत शेवटी आपल्या घरापासून कोसो दूर असलेल्या देशातील कर्मठ, अंधश्रदाळू समाजाशी स्वतःच्या अंधत्वावर मात करीत वैयक्तिक उत्कर्षाची स्वप्न बघणे तुलनेने खूप मोठे वाटावे, असे मोठे स्वप्न बघणाऱ्या ‘सॅब्रिए’ची कहाणी प्रथमदर्शनी अविश्वसनीय वाटावी अशी आहे. ज्या हिमालयातील थंड, निष्ठुर, शिखरांची आणि तशाच क्रूर दऱ्यांची डोळस माणसांना दहशत वाटते, त्या हिमालयात ही अंध स्त्री सहजतेने फिरते तेही पर्यटन म्हणून नव्हे तर अंध, असहाय मुलांचा शोध घेत. आपल्या अंधत्वाचा बाऊ न करता तिचे जास्त लक्ष आहे तो तिबेटमधील नैसर्गिक परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात आलेल्या अंधत्वाकडे, रोजच्या व्यवहारापासून दूर ठेवणाऱ्या समाजाकडे, असहायतेने जगणाऱ्या मुलांकडे. अशा या ‘सॅब्रिए’चा जीवन प्रवास, कार्यप्रणाली अनुवादित करावी असे ठरवून नुसते मराठी भाषांतर वंदन अत्रेंनी केलेले नाही तर त्या प्रत्यक्षात सॅब्रिए आणि पॉलला भेटल्या. हिंदुस्थानात त्रिवेद्रममध्ये जगभरातील अंध प्रौढांसाठी सुरू केलेले ‘कांथारी’ या आगळ्या-वेगळ्या व्यवसाय केंद्रात निसर्गरम्य पर्यावरणस्नेही वास्तूत सॅब्रिए आणि पॉलशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांना समजून घेतले आणि नंतर मराठी अनुवाद केला. यामुळे तो अधिक लक्षवेधी ठरतो. साधी, सोपी भाषाशैली, पण जिवंतपणा उभा करण्याची शब्दात ताकद असल्याचे ठायी ठायी जाणवते आणि म्हणूनच हा अनुवाद हृदय हेलावून टाकतो. काही तरी असच भक्कम कार्य आपणही करावं असं वाटत राहतं. हा वंदना अत्रेंचा भाषिक मोठेपणा आहे. सदर पुस्तकास लाभलेले चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ अप्रतिम. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more