* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE SIMPLE TRUTH
  • Availability : Available
  • Translators : SUDHAKAR LAWATE
  • ISBN : 9788184985153
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 483
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SIZZLING DAVID BALDACCI`S NOVELS HAVE BEEN CALLED "SIZZLING" (USA TODAY) AND "SUPERIOR" (HOUSTON CHRONICLE). NOW BALDACCI IS BACK, WITH THE STORY OF A DEATH ROW INMATE, A SUPREME COURT CLERK, AND A CRIME THAT IS COSTING PEOPLE THEIR LIVES... TERRIFYING MICHAEL FISKE BROKE THE LAW WHEN HE TOOK RUFUS HARMS`S PRISON LETTER FROM THE SUPREME COURT. BUT HE ALSO SEALED HIS OWN FATE. NOW MICHAEL`S BROTHER, A COP TURNED ATTORNEY, IS COMING TO WASHINGTON TO FIND OUT WHY HIS BROTHER WAS MURDERED-AND WHAT IT HAD TO DO WITH A CRIME THAT RUFUS HARMS COMMITTED TWENTY-FIVE YEARS BEFORE... SIMPLY THE BEST IN HIS NEW NOVEL OF CORRUPTION, ROMANCE, FAMILY, AND JUSTICE AT THE HEART OF THE AMERICAN REPUBLIC, DAVID BALDACCI TAKES US ON A JOURNEY OF HARROWING CONSPIRACY-AND PROVES ONCE AGAIN THAT IN THE REALM OF SUSPENSE, HE IS IN A LEAGUE OF HIS OWN. THE SIMPLE TRUTH IT`S NEVER WHAT IT SEEMS...
‘फोर्ट जॅक्सन’ या मिलिटरीच्या तुरुंगात ‘रूफस हाम्र्स’ हा कैदी एका लहान मुलीच्या हत्येच्या आरोपावरून गेली पंचवीस वर्षं आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होता. स्मरणशक्ती गमावलेल्या रूफसला फक्त ‘त्या’ प्रसंगाची स्मृती होती. त्याच्यापर्यंत पोहोचलेल्या एका पत्राने त्याच्या विस्मरणशक्तीला हादरा बसला आणि त्याला चक्क ‘सर्व’ आठवायला लागलं. त्यानं सुप्रीम कोर्टाला त्याच्या वकिलामार्फत एक अपील केलं. ते कोर्टापर्यंत पोहोचलंच नाही. ते अपील पाहिलेल्या सुप्रीम कोर्टाच्या मायकेल फिस्क या क्लार्कचा खून झाला. त्यानंतर आणखी एका क्लार्कचा खून, त्याच्या वकिलाचा–त्याच्या बायकोचा खून अशी खुनांची मालिका सुरू झाली. आपल्याला ‘न्याय’ मिळावा म्हणून केलेल्या रूफसच्या न पोहोचलेल्या अपिलावर सुप्रीम कोर्ट कसा निर्णय घेणार? मिलिटरीत घडलेल्या गुन्ह्यांबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे का? मायकेल फिस्कच्या भावाचा – जॉन फिस्कचा आणि मायकेलची सहकारी सारा इव्हान्स हिचा या प्रकरणात काय संबंध आहे? मिलिटरीच्या ज्या पत्रामुळे या प्रकरणाची सुरुवात झाली त्या पत्रात ‘विशेष’ असं काय होतं? कायद्यापुढे सर्व समान असतात. छोट-मोठे, गरीब-श्रीमंत, काळे-गोरे असा भेद करणं, प्रघात आहे म्हणून काहीही मान्य करणं, हे कर्तव्यदक्ष न्यायाधीश एलिझाबेथ नाइट यांना मान्य नव्हतं. सत्य उजेडात आलंच पाहिजे. कितीही दडवण्याचा प्रयत्न केला, तरी शेवटी जे बाहेर येतं ते असतं निखळ सत्य! असं त्यांचं मत होतं. ‘द सिम्पल ट्रूथ!’ राजकीय-सामाजिक जाणिवेतून मानवी मनाचा शोध घेणारी, मनाला स्पर्श करणारी अशी ही कादंबरी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THESIMPLETRUTH #THESIMPLETRUTH #दसिम्पलट्रुथ #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUDHAKARLAWATE DAVID BALDACCI "
Customer Reviews
  • Rating StarSangeeta Deshmukh Deshpande

    `द सिम्पल ट्रूथ` मूळ लेखक David Bowlda , मराठी अनुवाद , सुधाकर लवाटे.प्रकाशन मेहता पब्लिशिंग Fort Jackson या मिलिटरी च्या तुरुंगात `रूफस हार्म्स `हा कैदी एका लहान मुलीची हत्या केल्याच्या आरोपावरून, पंचवीस वर्षांपासून आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असो.यामध्ये त्याची स्मरणशक्ती गमावलेली,त्याला फक्त मुलीच्या हत्येच्या प्रसंगाची आठवण होती.एक दिवस अचानक त्याच्या पर्यंत एक पत्र पोहोचते.जे मिलिटरी कडून आलेले असतेआणि हे पत्र कथेला वळण, रूफसच्या स्मृतीला आठवणींचा उजाळा देते.आणि त्याला फक्त तो हत्येचा प्रसंग आठवत असतो, आता मात्र,त्या घटनेविषयी सगळंच आठवते. यानंतर रूफस स्वत: त्याच्या वकीलामार्फत सुप्रीम कोर्टात न्याय मिळावा म्हणून याचिका दाखल करतो, मात्र ती याचिका सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचतच नाही,व त्याच्या वकीलाचा व त्याच्या पत्नीचा खून होतो.हे याचिकेचा अर्ज व पत्र पाहणार्‍या सुप्रीम कोर्टाचा क्लार्क मायकेल फिस्क याचा सुद्धा खून होतो. आपल्या भावाचा खून कोणी केला,याचा शोध मायकेल फिस्कचा भाऊ‌ जॉन फिस्क आणि मायकेल ची सहकारी,सारा इव्हान्स सुरू करतात. त्या पत्रात काय असते? विशेष म्हणजे रूफसने न्याय मिळावा म्हणून केलेली याचिका सुप्रीम कोर्टात पोहचलेली नसते.मग त्यावर निर्णय कसा होणार? सत्य उजेडात आलच पाहिजे.कितीही दडवण्याचा प्रयत्न केला, तरी शेवटी जे बाहेर येत ते निखळ सत्य असतं, असे त्यांचे मत . शेवटपर्यंत खर काय याची उत्कंठा टिकवून ठेवते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more