* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE DIFFICULTY OF BEING GOOD
  • Availability : Available
  • Translators : SUDARSHAN ATHAWALE
  • ISBN : 9789353171148
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 536
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHY SHOULD WE BE GOOD? HOW SHOULD WE BE GOOD? AND HOW MIGHT WE MORE DEEPLY UNDERSTAND THE MORAL AND ETHICAL FAILINGS--SPLASHED ACROSS TODAY`S HEADLINES--THAT HAVE NOT ONLY DESTROYED INDIVIDUAL LIVES BUT CAUSED WIDESPREAD CALAMITY AS WELL, BRINGING COMMUNITIES, NATIONS, AND INDEED THE GLOBAL ECONOMY TO THE BRINK OF COLLAPSE? IN THE DIFFICULTY OF BEING GOOD, GURCHARAN DAS SEEKS ANSWERS TO THESE QUESTIONS IN AN UNLIKELY SOURCE: THE 2,000 YEAR-OLD SANSKRIT EPIC,MAHABHARATA. A SPRAWLING, WITTY, IRONIC, AND DELIGHTFUL POEM, THE MAHABHARATA IS OBSESSED WITH THE ELUSIVE NOTION OF DHARMA--IN ESSENCE, DOING THE RIGHT THING. WHEN A HERO DOES SOMETHING WRONG IN A GREEK EPIC, HE WASTES LITTLE TIME ON SELF-REFLECTION; WHEN A HERO FALTERS IN THE MAHABHARATA, THE ACTION STOPS AND EVERYONE WEIGHS IN WITH A DIFFERENT AND OFTEN CONTRADICTORY TAKE ON DHARMA. EACH MAJOR CHARACTER IN THE EPIC EMBODIES A SIGNIFICANT MORAL FAILING OR VIRTUE, AND THEIR STRUGGLES MIRROR WITH UNCANNY PRECISION OUR OWN FAMILIAR EMOTIONS OF ANXIETY, COURAGE, DESPAIR, REMORSE, ENVY, COMPASSION, VENGEFULNESS, AND DUTY. DAS EXPLORES THEMAHABHARATA FROM MANY PERSPECTIVES AND COMPARES THE SUCCESSES AND FAILURES OF THE POEM`S CHARACTERS TO THOSE OF CONTEMPORARY INDIVIDUALS, MANY OF THEM HIGHLY VISIBLE PLAYERS IN THE WORLD OF ECONOMICS, BUSINESS, AND POLITICS. IN EVERY CASE, HE FINDS STRIKING PARALLELS THAT CARRY LESSONS FOR EVERYONE FACED WITH ETHICAL AND MORAL DILEMMAS IN TODAY`S COMPLEX WORLD. WRITTEN WITH THE FLAIR AND SEEMINGLY EFFORTLESS ERUDITION THAT HAVE MADE GURCHARAN DAS A BESTSELLING AUTHOR AROUND THE WORLD--AND ENLIVENED BY DAS`S FORTHRIGHT DISCUSSION OF HIS OWN PERSONAL SEARCH FOR A MORE MEANINGFUL LIFE--THE DIFFICULTY OF BEING GOOD SHINES THE LIGHT OF AN ANCIENT POEM ON THE MOST CHALLENGING MORAL AMBIGUITIES OF MODERN LIFE.
महाभारताच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर गुरुचरण दास यांनी आपल्या लेखनाद्वारे हा महान ग्रंथ आजच्या दैनंदिन जीवनातील पेचप्रसंगांवरही कसा प्रकाश टाकू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी केलेले धर्माचे विविधांगी सखोल विश्लेषण वाचकांना वेगळीच मर्मदृष्टी देते. या पुस्तकातही महाभारताप्रमाणे नैतिक, राजकीय आणि सार्वजनिक - सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब उमटले आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#GURCHARANDAS #SUDARSHAN ATHAVALE #RELIGIOUS #THEDIFFICULTYOFBEINGGOOD #द डीफीकल्टी ऑफ बिईंग गुड #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI "
Customer Reviews
  • Rating StarANIL KAVNEKAR

    हा अनुवाद वाचला. आवडला. महाभारत समजून घेण्यासाठी हे पुस्तक फारच महत्वपूर्ण आहे. व्यावहारिक दाखले देऊन साध्यासोप्या भाषेत महाभारत समजून देण्याचा लेखकाचा प्रयत्न स्तुत्य आहे. प्रकाशनाबद्दल धन्यवाद.

  • Rating StarLOKPRABHA 15-02-2019

    महाभारत आणि आधुनिक जीवनाची सांगड... महाभारत हे एक अजरामर महाकाव्य असून मानवी स्वभावातील सर्व भावभावना आणि प्रवृत्तींचे दर्शन यातून घडते. महाभारत हा पौराणिक ग्रंथ असला तरीही त्याकडे तत्त्वज्ञान, नीतीशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र शा विविध कसोट्यांवरही पाहता येते. या कसोट्या लावून महाभारत आणि त्यातील सर्व व्यक्तिरेखांकडे नव्या विचाराने आपण पाहू शकतो. हजारो वर्षांपूर्वी असलेल्या मानवी प्रवृत्ती आजच्या काळातही तंतोतंत कशा लागू पडतात याचीही पडताळणी सहज करता येऊ शकते. हार्वर्ड विद्यापीठाचे पदवीधर, संस्कृत आणि तत्त्वज्ञान विषयाचे अभ्यासक, ‘प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल’ या कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुचरण दास यांनी ‘द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड’ या ग्रंथात महाभारत आणि आधुनिक जीवन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. माणसांच्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी महाभारताची मदत घेण्याचे काम या ग्रंथाने केले असून मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद सुदर्शन आठवले यांनी केला आहे. महाभारतात नैतिक, राजकीय आणि सार्वजनिक जीवनाचे प्रतिबिंब उमटले असून महाभारत हे कालातील आहे. सध्याच्या अनिश्चित, अमर्याद स्पर्धेच्या जगात नीती-अनितीचा समतोल साधून कसे जगायचे? याचे उत्तर या पुस्तकाच्या माध्यमातून दास यांनी वाचकांसमोर ठेवले आहे. महाभारत हे मानवी बुद्धी आणि कल्पनाशक्ती यांचे दर्शन घडवणारी सर्वश्रेष्ठ कलाकृती असून त्यातील नीतिमत्तेविषयीच्या कल्पना आणि आजचे तत्त्वज्ञान या दोन्हीचे विश्लेषण दास यांनी या ग्रंथात केले आहे. योग्य-अयोग्य, चूक-बरोबर या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न महाभारत या महाकाव्यात करण्यात आला असून माणसाच्या अपयशाची, अध:पतनाची कारणे शोधण्याचाही प्रयत्न झाला आहे. समाजात सुसंवाद आणि सुख नांदण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी धर्मानुसार आचरण करण्याची गरज असते. धर्म हा शब्द जरासा जटिल आहे. आपल्या विहित कर्तव्याची प्रामाणिक पूर्ती म्हणजे धर्म, नीतिनियमांचे कठोर पालन म्हणजे धर्म. धर्माचा मुख्य रोख असतो तो योग्य आणि न्याय्य वागण्यावर. भारतीय संस्कृतीचा पाया असणाऱ्या महाभारत या ग्रंथात आपल्या भोवतालच्या समाजाच्या नीतिमत्तेचा अर्थपूर्ण दंडक पुन्हा शोधता येईल का? असा विचार दास यांच्या मनात रुंजी घालत होता आणि त्यातून या ग्रंथाची निर्मिती झाली. ‘धर्म’ या संकल्पनेची नेमकी व्याख्या करणे अवघड आहे. कर्तव्य, चांगुलपणा, नैतिकता, न्याय, यमनियम हे सर्व यात येते. पण ते पुरेसे नाही. धर्म म्हणजे या विश्वातील नीती-अनितीचा, सृष्ट-दुष्ट प्रवृत्तींचा समतोल आहे. प्रत्येक व्यक्तीची बुद्धी आणि त्याचा विवेक यांवर त्याच्या मनातील सत् आणि असत् ही पारडी वर-खाली होत असतात आणि तेच धर्माचे परिणाम. धर्माच्या मूळ संकल्पनेविषयीची शंका, त्याच्या पूर्णार्थाविषयीची गुंतागुंत हा महाभारताच्या कथनाचा व्यापक हेतू आहे. महाभारत हे महाकाव्य म्हणजे या जगात चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करायचे असेल तर नेमके काय केले पाहिजे? याचे सविस्तर स्पष्टीकरण देण्याचा विस्तृत आणि सर्वसमावेशक प्रयत्न असल्याचे दास यांचे म्हणणे आहे. ग्रंथाची सुरुवात ‘दुर्योधनाची असूया’ आणि ‘द्रौपदीची निर्भयता’ या प्रकरणांनी होते. या प्रकरणात महाभारतातील कौरव आणि पांडवातील द्यूत खेळ, पांडवांचे द्रौपदीला पणाला लावणे, भर दरबारात होणारे द्रौपदी वस्त्रहरण, समोर अधर्म, अत्याचार होत असतानाही शांत राहणारे दरबारातील धृतराष्ट्र आणि अन्य महारथी याविषयी दास यांनी सविस्तर विवेचन केले आहेच, पण त्यांनी याची सांगड आधुनिक काळातील अंबानी बंधू, त्यांचे साम्राज्य, त्याच्या झालेल्या वाटण्या, त्यांच्यातील भाऊबंदकीशी घातली आहे. महाभारतातील प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे वागणे आणि त्या वर्तनाचे आजच्या काळातील विश्लेषण दास यांनी केले आहे. युद्धिष्ठिराची कर्तव्यबुद्धी, अर्जुनाचा विषाद, भीष्मांचा नि:स्वार्थ, कर्णाची त्याच्या समाजातील स्थानाविषयीची चिंता, श्रीकृष्णाचे कपट, अश्वत्थाम्याचा सूड, युधिष्ठिराचा पश्चात्ताप, महाभारताचा धर्म अशा विविध प्रकरणांमधून हा ग्रंथ उलगडत जातो. डोळ्यांवर कातडे ओढणे, नैतिकतेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे ही माणसाची अटळ अशी प्रवृत्ती आहे? की त्यात बदल करणे शक्य आहे? यातील काही गोष्टी आजच्या शासनाच्या कार्यपद्धतीचा परिणाम असतात. त्या शासनाला आपण सर्व संबधित शासकीय आणि सामाजिक संस्थांच्या रचना, घटना यात उचित असा बदल करून अधिक काळजीवाहू, जनतेविषयी सहानुभूती बाळगणारे बनवू शकू का? महाभारतात धर्म या गहन संकल्पनेचे जे बहुविध कोनातून दर्शन घडविले आहे त्यातून मी या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आणि आपले आयुष्य आपण कशा पद्धतीने जगले पाहिजे? हे शोधण्याचा प्रयत्न केला तीच या ग्रंथाच्या लेखनामागील स्फूर्ती आहे, असे ग्रंथातील ‘निष्कर्ष’ या प्रकरणात लेखक दास यांनी म्हटले आहे. ग्रंथात संदर्भग्रंथांचा परिचय, टिपा आणि खिस्तपूर्व २५००-१५०० ते इसवी सन १६५०-१६७० या कालखंडातील घटनांचा कालक्रमही देण्यात आला आहे. दास यांनी या ग्रंथातून महाभारत या महाकाव्याचा एक वेगळा पैलू समोर आणला असून त्यांनी धर्माचे विश्लेषण वेगळ्या पद्धतीने केले आहे. महाभारत हा पौराणिक ग्रंथ आजच्या काळातील आपल्या दैनंदिन जीवनातील नैतिक पेचप्रसंगांवरही कसा प्रकाश टाकू शकतो ते दास यांनी या ग्रंथातून दाखवून दिले आहे. महाभारत काळातील आणि आजच्या काळातील नीतिमानतेच्या परिणामातील संदिग्धता, अनिश्चितता यांतील आश्चर्यकारक साम्यही दास यांनी या ग्रंथातून वाचकांसमोर ठेवले असून आजच्या अवघड, संघर्षमय, गुंतागुंतीच्या जीवनाशी सामना कसा करायचा हेही समजावून सांगितले आहे. –शेखर जोशी ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 28-10-2018

    महाभारताचा आधुनिक वेध... एकेकाळी ‘प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल’ या जगप्रसिद्ध कंपनीचे सीईओ असलेले गुरुचरण दास हे साहित्य प्रांतात ‘इंडिया अनबाउंड’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक म्हणून विख्यात आहेत. त्यांचे नुकतेच ‘द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड’ हे पुस्तक प्रकाशि झाले असून, त्याचा सुदर्शन आठवले यांनी मराठीत अनुवाद केला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने हा अनुवाद प्रसिद्ध केला आहे. भारतीयांचा महान ठेवा असलेल्या महाभारताने त्यांनाही वेड लावले. त्याची अनेक पारायणे त्यांनी केली. त्यातून या महाकाव्याचा एक आगळा पैलू या पुस्तकाद्वारे त्यांनी वाचकांसमोर उलगडला आहे. महाभारत आपल्या रोजच्या जीवनातील नैतिक पेचप्रसंगावरही कसा प्रकाश टाकू शकते, हे लेखकाने अत्यंत विद्वत्तापूर्ण दाखवून दिले आहे. कथानकांची सर्वांधिक गुंतवळ असलेल्या या महाकाव्याचा लेखकाने आधुनिक वेध घेतला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more