* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
VIOLENCE NEVER ENDS, IT GROWS MORE AND MORE, FINDING NEW OPPONENTS, NEW METHODS . VIOLENCE , PERSECUTION , POSSESS THEIR OWN VELOCITY, THEIR OWN RATIONALITY. PERSECUTION, POLITICS, DIPLOMACY , AND SIMILAR TERMS DON’T BELIEVE IN USING THEIR INTELLECTS , BUT ,NOBODY CAN RULE A MIND AND ITS CREATIVITY . AUTHORS, ARTISTS, JOURNALISTS, SOCIAL WORKERS ETC. ARE TARGETED BY THESE KIND OF PEOPLE. AS A RESULT, THE CULTURAL AND FOLKLORIC LOSS IS INTOLERABLE AND AWFUL. THE CIRCLE OF TIME FREEZES FOR THAT CHUNK OF PEOPLE. THE SKY WAS OBSCURED BEFORE THE DECLARENCE OF EMERGENCY CRISIS. POLITICIANS WERE CONTENT WITH THEIR HIDDEN OUTLAW POWERS . “NEITHER YOU’LL STAY ALIVE, NOR DEATH WILL ARRIVE” WAS THE CIRCUMSTANCE THEY CREATED. IN THIS DISTURBING SITUATION , HOW AN INTELLIGENT JOURNALIST ALONG WITH HIS FAMILY SUFFERS FROM AN INTENSE SITUATION, NARRATED ON A NATIONAL BACKGROUND, THAT KNOCK-BACKS OUR MINDS AND BRAINS DREADFULLY IS - TANTU GREAT AND FEARLESS KANNAD IDEALIST AND AUTHOR SHRI S.L.BHAIRAPPA WITH HIS VARIED AND STRANGE FILAMENTS HAVE STITCHED A GIANT FABRIC – TANTU
‘हिंसा सहसा नष्ट होत नाही, ती वाढतच राहते; आणि नवे शत्रू, नवे मार्ग शोधत राहते. हिंसा, जुलूमशाही यांची स्वत:ची अशी एक गती असते, स्वत:चेच तर्कशास्त्र असते. जुलूमशाही, लष्करशाही, एकाधिकारशाही आणि अशाच प्रवृत्तींचा कल स्वत:ची विचारशक्ती गुंडाळून ठेवण्याकडे असतो; परंतु विचार आणि सर्जकता यांवर कुणाचीही हुकमत चालू शकत नाही. त्यामुळे या प्रवृत्ती आपल्या हल्ल्याचा रोख लेखक, कलावंत, पत्रकार, विचारवंत, समाजधुरीण इत्यादींकडे वळवतात. परिणामी होणारी सांस्कृतिक हानी कधीही भरून येणारी नसते... त्या समाजाच्या संदर्भात कालचक्र जणू गोठले जाते.’ आणीबाणी घोषित होण्यापूर्वीच बराच काळ आभाळ झाकोळून आलेले होते. राज्यकत्र्यांच्या हातात सुप्त दमनतंत्राचे नवे दुधारी हत्यार आले होते. ‘न तू फिर जी सकेगा, और न तुझको मौत आएगी...’ अशी भल्याभल्यांची अवस्था करण्यात आली होती. अशा आणि त्यानंतरच्या कालखंडात एका बुद्धिप्रामाण्यवादी पत्रकाराची आणि त्याच्या कुटुंबीयांची कशी दारुण वाताहत होते, याची राष्ट्रीय पाश्र्वभूमीवर चितारलेली मन आणि मेंदू बधिर करणारी प्रदीर्घ कथा : तं तू! कन्नड साहित्यातील थोर तत्त्वविवेचक आणि निर्भीड कादंबरीकार श्री. एस. एल. भैरप्पा यांनी चित्रविचित्र धाग्यांनी विणलेले महावस्त्र : तं तू !
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TANTU #TANTU #तंतू #FICTION #TRANSLATEDFROMKANNADATOMARATHI #UMAKULKARNI #उमाकुलकर्णी #BHAIRAPPAS.L. #भैरप्पा एस.एल. "
Customer Reviews
  • Rating StarNilesh Dadgal

    कन्नड साहित्यातील थोर तत्वविवेचक आणि निर्भिड कादंबरीकार श्री. एस. एल. भैरप्पा यांनी चित्रविचित्र धाग्यांनी विणलेले महावस्त्र : तंतू सर्व प्रथम आमचे काका स्व. अनंत उर्फ गोटू अभ्यंकर यांचे खुप खुप धन्यवाद ज्यांनी मला हि कादंबरी वाचायला दिली आणि ाही दिवसाच आम्हाला सोडुन गेले. नंतर बरेच दिवस कादंबरी वाचता आली नाही, पण काका खरच तुमचे खुप उपकार आहेत कि भैरप्पा सारख्या महान लेखकाच्या लिखाणासोबत माझी ओळख करुन त्यांच्या लिखाणाच्या वाचनाची मला ओढ लावली. खुप छान कादंबरी, वाचतांना मग्न करणारी व विचार करायला लावणारे लिखाण. `हिंसा सहसा नष्ट होत नाही, ती वाढतच राहते आणि नवे शत्रू , नवे मार्ग शोधत राहते. हिंसा जुलूमशाही यांची स्वत:ची एक गती असते, स्वत:चेच तर्कशास्त्र असते. जुलूमशाही, लष्करशाही, एकाधिकारशाही आणि अशाच प्रवृतींचा कल स्वत:ची विचारशक्ती गुंडाळून ठेवण्याकडे असतो; परंतु विचार आणि सर्जकता यांवर कुणाचीही हुकमत चालू शकत नाही; त्यामुळे या प्रवृत्ती आपल्या हल्याचा रोख लेखक, कलावंत, पत्रकार, विचारवंत, समाजसुधारीण इत्यादींनकडे वळतात. परिणामी, होणारी सांस्कृतिक हानी कधीही भरून येणारी नसते... त्या समाजाच्या संदर्भात कालचक्र जणू गोठले जाते.` आणिबाणी घोषित होण्यापुर्वी बराच काळ आभाळ झाकोळून आलेले होते. राज्यकर्त्यांच्या हातात सुप्त दमनतंत्राचे नवे दुधारी हत्यार आले होते. `न तू फिर जी सकेगा, और न तुझको मौत आएगी...` अशी भल्याभल्यांची अवस्था करण्यात आली होती. अशा आणि त्यानंतरच्या कालखंडात एका बुध्दिप्रामाण्यवादी पत्रकारांची आणि त्याच्या कुटुंबीयांची कशी दारुण वाताहत होते, याची राष्ट्रीय पार्श्वभूमीवर चितारलेली मन आणि मेंदू बधिर करणारी प्रदीर्घ कथा : तंतू! ...Read more

  • Rating StarGovind Kulkarni

    ह्या मध्ये नायिका स्वतः बिझिनेस मध्ये उतरते सगळे अडथळे पार करत स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी व मीही पती पेक्षा वेगळं काहींतरी करू शकते ही उर्मी.

  • Rating StarGovind Kulkarni

    तंतूच प्रवाहिपण तसंच पात्रांची व प्रसंगाची रेलचेल पण त्याची सुंदर सुसूत्रता अशी अनेक कारणांनी अंतर्मुख करणारी कादंबरी आहे.मानवी स्वभावाचे अनेक पैलू व कंगोरे जागोजागी वाचायला मिळतात.त्यांत सर्वचजण आले आहेत.

  • Rating StarAkshay Chorage

    Tantu..Mast ch ahe..

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more