* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TALA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983456
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 200
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HAVE YOU EVER BEEN ABLE TO MEASURE THE FATHOM OF A LAKE, AND THAT TOO WHEN THE LAKE IS FULL OF PLANTS, FLOWERS, FISH AND LOT MANY LIVING THINGS? YOU MAY SUCCEED IN MEASURING THE DEPTH BUT THAT WILL BE JUST IN METRES. IT WILL NOT HELP YOU TO UNDERSTAND THE REAL MEANING. AND EVEN IF YOU ARE ABLE TO MEASURE THE DEPTH, WILL YOU BE ABLE TO FIND OUT THE TREASURES HIDING DEEP WITHIN? A HUMAN MIND IS VERY DECEIVING. AT TIMES, WHEN WE FEEL THAT WE KNOW EXACTLY WHAT THE PERSON BESIDES US FEELS AND WISHES, WE FAIL TOTALLY. A HUMAN MIND IS A WONDER-GAME. IT MIGHT REFLECT TO BE SOBER AND WILL BE ALL EVIL. IT MIGHT APPEAR TO BE WICKED AND WILL BE SUPER SOFT WITHIN. A SENSITIVE HUMAN MIND IS INDEED VERY DEEP AND FATHOMLESS AT TIMES. IT DOES NOT LIMIT ITSELF WITHIN THE CONFINEMENTS OF AGE, GENDER, CULTURE OR RICHNESS IN TERMS OF MONEY. THE MORE EXPERIENCES IT GETS, THE MORE PROSPEROUS IT BECOMES. THIS PROSPERITY FURTHER LEADS TO THE SOFT, GENTLE WAVES MAKING THE MIND, THINK, PONDER AND DWELL. AN OUTSIDER MAY NOT EVEN NOTICE THESE WAVES WHICH AT TIMES CAUSE STORMS IN THE SENSITIVE MINDS. SNEHAL GOES TO THESE FATHOMLESS DEPTH, RELENTLESSLY, JUST WITH ONE ASPECT… TO MAKE US UNDERSTAND THIS WONDERFUL WORKING OF THE HUMAN MIND AND THE SENSITIVITY OF ‘BEING’.
माणसाचे मन हे एखाद्या अथांग जलाशयासारखे, तळ्यासारखे आहे. वरून शांत दिसणा-या, निळेशार पाणी आणि कमळे यांनी भरलेल्या तळ्याच्या तळाशी काय काय असते ते फक्त तळेच जाणते. संंवेदनशील मनाचे हे भावविश्व, त्याची डूब ही त्याच्या खोलीवर अवलंबून असते. त्या भावविश्वाला वयाचे बंधन नाही, नाही गरिबी-श्रीमंतीचे. येणारा अनुभव, प्रसंग ह्यामुळे त्यावर उठणारे तरंग, कधी खूप मोठे तर कधी हळूच उमटणा-या लहरींसारखेही. पण वरून शांत दिसणा-या, सुंदर कमळांनी भरलेल्या त्या सुंदर जलाशयात कमळांच्या बिसतंतूंसारखी पार गुंतागुंत असते आणि मग उठणारे तरंग... ह्या अशाच तरंगांचे चित्रण ह्या कथांतून करण्याचा करण्याचा केलेला हा प्रयत्न......
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TALA #TALA #तळं #SHORT #STORIESMARATHI #SNEHALJOSHI #स्नेहलजोशी "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA - 06-05-2016

    उत्तम कथासंग्रह... मानवी भावभावनांवर आधारित अनेक कथासंग्रह मराठी साहित्यात उपलब्ध आहेत. यामध्ये बहुतकरून स्त्रीकेंद्री कथांचं प्रमाण जास्त आहे. त्यानंतर नातेसंबंधावरील कथाही आहेत. असाच एक मनाचा वेध घेणारा कथासंग्रह स्नेहल जोशी घेऊन आल्या आहेत. माणसाे मन एखाद्या तळ्यासारखे असते. वरून शांत, स्थिर असणाऱ्या तळ्यात तळाशी का असतं हे फक्त तळचं जाणतं. तसचं मनाचंही असतं. एखादा माणूस वरून कसाही दिसला तरी त्याच्या मनात काय सुरू आहे हे त्याला ठाऊक असतं. मनाचा वेध घेणाऱ्या कथा ‘तळं’ या संग्रहात समाविष्ट केल्या आहेत. या संग्रहातील सर्व कथा कौटुंबिक आशयावरच्या आहेत. माणसाच्या मनात विचारांच्या अनेक लहरी तरंगत असतात. ते उलगडत जाणाऱ्या कथा या संग्रहात आहेत. ‘तिघी’, ‘वाटचाल’, ‘खरं आहे’, ‘मोरपिस’, ‘तळं’ अशा काही कथा माणसाच्या मन:स्थितचा आढावा घेणारे आहेत तर ‘सोबत’ ‘सावट’, ‘संध्याछाया’, ‘प्रवाह’, ‘देस-परदेस’ या कथा वयस्कर लोकांच्या समस्यांबाबत भाष्य करणाऱ्या आहेत. विविध दृष्टिकोनातून मनाची अवस्था मांडलेल्या कथांमुळे ‘तळं’ हा संग्रह वाचनीय झाला आहे. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    कालच मी आपला ‘तळं’ हा कथासंग्रह वाचला. मला आपला हा कथासंग्रह खूप आवडला म्हणून मुद्दाम आपणांस पत्र पाठवून खास धन्यवाद देवून अभिप्राय कळवित आहे. आपल्या कथासंग्रहातील प्रत्येक कथेची संकल्पना वेगळी आहे, पण आपण कथेची गुंफण इतकी सुंदर करता की, कथा वाचकाच्ा मनाची पकड घेते. आपल्या कथासंग्रहातील सर्वच कथा सुंदर आहेत. त्यापैकी ‘सोबत’, ‘शवविच्छेदन’ या कथा मला आवडल्या तर ‘तळं’ ही कथा मला विशेष भावली. ‘तळं’ या कथेत आपण ज्या तळ्याकडे आपले दुर्लक्ष असते अशा तळ्याला आपल्या विचारांनी महत्त्व प्राप्त करून दिले आहे. ही कथा वाचताना मन एकदम प्रसन्न होते व कथेचा शेवट होताना मन खूपच भावनिक होते. यावरून आपल्या लेखनात केवढी मोठी ताकद आहे हे दिसून येते. याबद्दल आपले विशेष कौतुक वाटते. आपल्या कथासंग्रहाचा माझ्या मनावर एवढा प्रभाव पडला की, मला आपणांस अभिप्राय कळविल्याशिवाय चैन पडेना म्हणून पत्र लेखन केले. आपले पुस्तक मी घरी ठेवणार आहे व मित्रमंडळींना भेट म्हणूनही देणार आहे. आपण असा कथासंग्रह लिहिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा! आपले यापुढेही उत्तम साहित्य वाचकांना वाचण्यास मिळावे, ही परमेश्वराकडे प्रार्थना! आपला स्नेहांकित -मोहन पुजारी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more