* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SMART LEADERSHIP : INSIGHTS FOR CEOS
  • Availability : Available
  • Translators : MADHURI SHANGBAUG
  • ISBN : 9788184982749
  • Edition : 3
  • Publishing Year : AUGUST 2011
  • Weight : 200.00 gms
  • Pages : 180
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FOR CORPORATE LEADERS, THE CHALLENGE IS TO FIND NEW WAYS OF DOING THINGS. SMART LEADERSHIP: INSIGHTS FOR CEOS PRESENTS TWELVE CEOS WHO HAVE DONE JUST THAT, AND SET NEW BENCHMARKS FOR GROWTH AND PERFORMANCE IN THEIR RESPECTIVE INDUSTRY IN THE PROCESS. MORE OUTSTANDINGLY, WHETHER IT IS KUMAR MANGALAM BIRLA, N.R. NARAYANA MURTHY, RAHUL BAJAJ OR K.V. KAMATH, THEY HAVE SHOWN HOW SUCH GROWTH CAN BE SUSTAINED, YEAR AFTER YEAR, EVEN AS THE BUSINESS ENVIRONMENT BECOMES, IN THE WORDS OF ONE CEO, ‘FEROCIOUSLY COMPETITIVE, RAPIDLY CHANGING AND FLUID’. IN THIS COMPACT BUT INSIGHTFUL BOOK, GITA PIRAMAL AND JENNIFER NETARWALA DRAW INSIGHTS FROM THESE CEOS, HEADING COMPANIES AS DIVERSE AS LIJJAT PAPAD TO TATA CONSULTANCY SERVICES, ON HOW THEY ACCOMPLISHED THEIR GOALS IN SUCH A COMPETITIVE ENVIRONMENT, AND WHAT OTHERS CAN LEARN FROM THEM. THEY COME UP WITH LESSONS ON SOME OF THE CORE ASPECTS OF LEADERSHIP: DECISION-MAKING, BUILDING TEAMS, NURTURING TALENT, MANAGING CHANGE, AND AN UNWAVERING FOCUS ON GROWTH. INDIAN COMPANIES ARE TODAY GRAPPLING WITH THE CHALLENGE OF MOVING UP TO THE NEXT LEVEL OF COMPETITION—ONE WHERE AN ORGANIZATION HAS A DEMAND FOR ITS PRODUCT OR SERVICE ANYWHERE IN THE WORLD. SMART LEADERSHIP OFFERS PRACTICAL TIPS ON EFFECTING THAT TRANSFORMATION FOR EXECUTIVES AT ALL LEVELS
बहुराष्ट्रीय उद्योगाच्या प्रमुखांना कार्यक्षमता वाढवायचे नवनवे मार्ग शोधावे लागतात. `स्मार्ट लीडरशिप – सीईओसाठी नवी दृष्टी` या पुस्तकामध्ये बारा यशस्वी सीईओंनी (चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे प्रमुख कार्यकारी अधिकारी) आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. या सर्वांनी विकासाचे आणि कार्यक्षमतेचे नवे मापदंड निर्माण केले, आपापल्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला. सर्वश्री कुमारमंगलम् बिर्ला, एन.आर. नारायण मूर्ती, राहुल बजाज,के.व्ही. कामत यांनी वर्षानुवर्षे गुणवत्ता राखून विकासाच्या वेगात सातत्य राखता येते, हे दाखवून दिले. त्यांच्या अनुभवसमृद्धतेतून उद्योगक्षेत्रातील व्यवहाराबद्दल काही मूलभूत धडे शिकता येतात. नेतृत्व करणे, निर्णय घेणे, योग्य माणसे निवडून टीम बांधणे, गुणवत्ता ओळखून उत्तेजन देणे, बदल पचवणे आणि हे सर्व करताना विकासावरील लक्ष ढळू न देण्याचे मर्म सांगितले आहे. परिवर्तन घडवण्यासाठी `स्मार्ट लीडरशिप` सर्व स्तरांवरच्या व्यवस्थापकांना काही अनुभवसिद्ध व्यवहार्य सूचना देऊ पाहते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #GEETA PIRAMAL #JENNIFER NETARWALA #माधुरी शानभाग #MADHURI SHANGBAUG #BIOGRAPHY #स्मार्ट लीडरशिप #SMART LEADERSHIP : INSIGHTS FOR CEOS
Customer Reviews
  • Rating StarYatin Vallabh

    पुस्तकात अनुक्रमे कुमारमंगलम बिर्ला, अश्विन दाणी, दीपक पारेख, रघुनाथ माशेलकर, के. व्ही. कामत, राहुल बजाज, शिखा शर्मा, सुभाष चंद्रा, एस्. रामादुराई, एन्. आर्. नारायण मूर्ती, अजय पिरामल व ज्योती नाईक या दिग्गजांनी लिहिलेले लेख आहेत. उत्तम नेता कसा असाव, त्याची वैशिष्ट्ये काय, त्याला कोणकोणत्या बाबी हाताळाव्या लागतात, कोणत्या संकटांना त्याला सामोरे जावे लागते? त्याने संकटांना सामोरे कसे जावे? इ. या सार्‍या प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या उदाहरणांतून मांडत लेखक वाचकाला शिक्षित करताना दिसतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more