* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SANGAVESE VATLE MHANUN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666793
  • Edition : 7
  • Publishing Year : JANUARY 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 180
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE ALL KNOW SHANTA SHELKE AS A POETESS AND AS A LYRICIST, BUT SHE HAS VERY SUCCESSFULLY HANDLED THE CREATIVE WRITING AS WELL, ON THE CONTRARY IT IS ONE OF HER FAVORITES. SHE HAS BEEN A SUCCESSFUL COLUMNIST AND HAS WRITTEN FOR MANY NEWSPAPER COLUMNS. THIS COLUMN WRITING HAS FURTHER INITIATED HER TO HANDLE THE CREATIVE WRITING INDEPENDENTLY. THE MAIN IMPETUS TO HER CREATIVE WRITING HAS BEEN HER CURIOSITY ABOUT THE WORLD AROUND HER, HER MINUTE OBSERVATION OF THE HUMAN BEINGS AROUND HER, AND HER EAGERNESS TO INCLUDE EVERYONE IN HER EXPERIENCES. SHANTABAI HERSELF IS A GREAT READER. THIS HAS MADE HER VOCABULARY VERY RICH AND HAS WIDENED HER UNDERSTANDING CAPACITIES. SHE HAS MAINTAINED A RHYTHM IN HER WRITING, HER LOVE FOR LIFE IS ALSO REFLECTED THROUGHOUT, ALL THESE QUALITIES HAVE GIVEN A WONDERFUL DIMENSION TO HER CREATIVE WRITING MAKING IT MORE READABLE. THIS COLLECTION ADDS TO HER PREVIOUS WELL KNOWN CREATIVE WRITINGS SUCH AS `ANANDACHE ZAAD`, PAVSAADHICHA PAUS, "SANSMARANE`, "MADRANGI`, "EKPANI`, ETC. A FEW ARTICLES IN THIS COLLECTION TO NAME ARE "HEMALA MULGI ZALI`, "YAYATICHA VARSA`, "FASAVI DARE`, "SANTUSHTA`, "MADAM`, ETC. EACH AND EVERY ARTICLE IS UNIQUE, ENTERTAINING, AND ENLIGHTENING.
कविता आणि गीते यांच्याइतकाच ललितलेखन हाही शान्ताबार्इंच्या आवडीचा साहित्यप्रकार आहे. आतापर्र्यंत वेगवेगळ्या नियतकालिकांतून त्यांनी सदर लेखनाच्या निमित्ताने ललितलेख लिहिले आहेत, त्याप्रमाणे स्वतंत्रपणेही असे लेखन त्यांनी विपुल केले आहे. भोवतालच्या जगाविषयीचे अपार कुतूहल, मनुष्यस्वभावाचे कंगोरे न्याहाळण्याची आवड आणि स्वत:ला आलेले सूक्ष्मातिसूक्ष्म अनुभवही इतरांपर्यंत पोहोचवण्याची उत्सुकता या शान्ताबार्इंच्या ललितलेखनामागील प्रमुख प्रेरणा आहेत. भरपूर वाचनामुळे येणारी संदर्भसंपन्नता, काव्यात्म वृत्तीतून निर्माण होणारी शैलीची रसवत्ता आणि उत्कट जीवनप्रेम यांमुळे त्यांचे ललितलेख अत्यंत वाचनीय झाले आहेत. ‘आनंदाचे झाड’, ‘पावसाआधीचा पाऊस’, ‘संस्मरणे’, ‘मदरंगी’, ‘एकपानी’ या त्यांच्या ललितलेखसंग्रहांच्या परंपरेतलाच ‘सांगावेसे वाटले, म्हणून’ हा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण संग्रह. ‘हेमाला मुलगी झाली’, ‘ययातीचा वारसा’, ‘फसवी दारे’, ‘संतुष्ट’, ‘मॅडम’, ‘पुन्हा पुन्हा ज्यून इलाइझ’ या आणि यांसारख्याच इतर अनेक सुरेख लेखांनी वाचकांना तो जितका रंजक, तितकाच उद्बोधक वाटेल, यात शंका नाही...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK KESARI 29-09-2002

    आशयगर्भ विषयांचा आविष्कार… ‘सांगावेसे वाटले, म्हणून’ हा शांता शेळके यांच्या एकोणतीस ललित लेखांचा संग्रह आहे. विविध वृत्तपत्रांतून सदर लेखनाद्वारे आणि स्वतंत्रपणे प्रसिद्ध झालेले असे काही लेख यात समावेश केले गेले आहेत. वृत्तपत्रासाठीच्या लेखनामुळे वषयांना वैविध्यता येते, पण लेखन मर्यादित शब्दात करावे लागते. ‘सांगावेसे वाटले, म्हणून’ यात लेखन मर्यादेचे पथ्य पाळावे लागले तरी कुठलाही लेख अपुरेपणाची उणीव राहू देत नाही. उलट आपल्या सिद्धहस्त शैलीदार लेखनाद्वारे शांताबाई वाचकांशी हितगुज करीत आपल्या नि आपल्या मित्रपरिवाराच्या, मसजातील अबालवृद्धांच्या सुख-दु:खांचे पट हळूवारपणे उलगडून दाखवायला लागतात. त्यावेळी वाचकही त्या सुख-दु:खात केव्हा सामावून जातो, हे त्याचे त्याला कळत नाही. बाष्कळ बडबड करण्यापेक्षा मौन जास्त बोलके असते. नुसत्या स्मिताने, डोळ्यांनी, स्पर्शाने, रंग-गंधाच्या भाषेतसुद्धा शब्दांची ताकद भरून असते. शब्दाशिवाय असलेली भाषाच आपण विसरून चाललो आहोत, हे ‘शब्द शब्द शब्द’ या पहिल्याच लेखात मार्मिकतेने त्यांनी सांगितलेले आहे. पूर्वग्रहांनी पछाडलेले आणि निरागस अशी दोन व्यक्तिमत्त्वे प्रत्येकाच्या ‘मी’मध्ये दडलेली असतात. आनंद यात्रेला जाण्यापूर्वी आनंदावर विरजण टाकणाऱ्या ‘मी’ला फेकून द्यावे असे ‘जेथे जातो, तेथे’ मध्ये त्यांनी स्पष्ट महत्त्व यामुळेच वर्णिलेले आहे, हे ‘एकांत’मध्ये मोठ्या मार्मिकतेने सांगितलेले आहे. संग्रहातील ‘हेमाला मुलगी झाली’, ‘ययातीचे वारस’ हे आणखीन अप्रतिम लेख आहेत. कुणा अनामिक स्त्रीकडून फोनवर ‘आमच्या हेमाला मुलगी झाली. ती गोंडस, देखणी गोरी आहे,’ अशी वार्ता समजते. ही हेमा कोण, कुठली ही माहिती मिळायच्या आधी फोन बंद होतो. क्षणभर गंमत वाटणाऱ्या अशा घटना नेहमीच घडत असतात. आनंद, क्रोध, दु:ख अपमान अशा नाना विकारांचे उद्रेक सतत होत असतात. इच्छा असो नसो, त्याचे चार शिंतोडे आपल्यावर उडत असतात. ‘जेथे जातो, तेथे’ मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. ‘सलगी’मध्ये व्यक्तीचा दर्जा, प्रसंग, परिस्थिती यानुरूप वागले तर ते सुसंस्कारितपणाचे लक्षण ठरते. ‘तुमच्या सहवासात आलेल्या कुठल्याही माणसाला अवघडल्यासारखे वाटता कामा नये तरच तुम्ही खरे सुसंस्कृत!’ ही पंडितजींची सुसंस्कृत माणसाची व्याख्या ‘सलगी देणे’ मधून चपखलतेने अनुभवायला मिळते. अनुकरण काही वयापर्यंत, काळापर्यंत ठीक असते; आवश्यकही असते. पण कधीती ते सोडून देऊन आपल्या स्वयंभू व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणे गरजेचे असते, हे ‘सावल्या’ या लेखाद्वारे स्पष्ट केले आहे. समोरच्या व्यक्तीला हिणवण्यापेक्षा त्याची मानसिकता जाणून घेऊन त्याच हळूवारपणे वागण्याची तारतम्यता दाखवणे हे खरे माणुसकीचे लक्षण आहे हे ‘लाखेचे मणी’मध्ये अगदी सहजतेने सांगितले आहे. ‘ती हळवी दुसरी जागा’ हा अप्रतिम असा लेख आहे. अतिशय नाजूक, किंमती पेले एका डॉक्टरीणबार्इंनी रोजच्या वापरासाठी काढलेले असतात. सहामधील एक पेला फुटलेला असतो. या टणक पेल्याला कुठंतरी अशी हळवी दुसरी जागा आहे. एरवी तो वाटेल ते धक्के सोसू शकतो, असं डॉक्टरीणबाई सांगतात. आपल्यातील प्रत्येकजणाची या पेल्यासारखीच अवस्था असते. प्रत्येक व्यक्तिमत्त्वाला, मग ते कितीही कणखर असो, हळवी, दुखरी जागा असतेच. एका अर्थाने आपण सगळेच काचेचेच पेले आहोत, असे अगदी सहजपणे त्या बोलून जातात. एकांत काही वेळा नकोसा वाटला तरी एकाकी अवस्थेतच आपली स्वत:ची खरी ओळख पटते. साधु-संतांनीही एकांताचे इच्छा असो नसो, त्याचे चार शितोंडे आपल्यावर उडत असतात. त्याचा स्वीकार करून समोरच्या उद्रेकी मनाला बिनबोभाट शांत राहू देणे उचित असते, हे शांताबार्इंनी इतरहि उदाहरणे देऊन छान पटवून दिले आहे. ‘फसवी दारे’, ‘थबकलेली वये’, ‘संवाद’, ‘मानवी प्राणांचे मोल’ हे लेखही मुळातून वाचावे असे मानवी स्वभावाच्या गाभ्याला स्पर्श करणारे आहेत. आंतरराष्ट्रीय बालकवर्षानिमित्त बालकांच्या विविध मनोवृत्तींवर प्रकाश टाकणारे जगभरातील बालकांचे चिंतन ‘होईल का असे जग?’ मध्ये रेखाटलेले आहे. ‘पोरकी पुस्तके’ मध्ये रक्ताचे पाणी करून आयुष्यभर जमवलेली मौल्यवान पुस्तके त्या व्यक्तीच्या पश्चात्त देणगी दिली गेली तरी कशी पोरक्या अवस्थेत पडतात, हे विदारक सत्य पुस्तकप्रेमींच्या जीवाची घालमेल करते. हे सगळे लेख वाचल्यावर वाटते की, शांताबार्इंचे ललित लेख हे केवळ ललित आणि मनोरंजनापुरते राहत नाहीत. मानवी मनाची ‘फसवी दारे’ शोधत, मनुष्य स्वभावाचे कंगोरे न्याहाळीत, आपल्या अनुभवसंपन्न व शैलीदार शब्दात, उत्कटरितीने वाचकांसमोर ठेवताना त्या स्वत:लाही हरवून बसतात. या त्यांच्या हरवण्यातूनच वाचकालाही काही छान वाचल्याची पावती आणि समाधान मिळून जाते. मुळातच शैलीदार लेखन, त्यात प्रकाशकांनी पुस्तक सजवण्यात कुठलीही कमतरता इेवलेली नाही. यामुळे ‘सांगावेसे वाटले, म्हणून पुस्तक तुम्हालाही वाचावेसे वाटणार, यात शंका नाही. -मोहन जोशी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book