* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE HUNGRY SPIRIT
  • Availability : Available
  • Translators : PRASHANT TALNIKAR
  • ISBN : 9788190734455
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 256
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THERE IS SO MUCH CONTROVERSY IN THIS WORLD. ON ONE HAND, ONE THIRD OF THE TOTAL WORKERS ARE WITHOUT ANY WORK. ON THE OTHER HAND, TWO THIRD OF THE WORLD TRADE IS CONCENTRATED WITH ONLY 500 OF THE COMPANIES ALL OVER THE WORLD. THESE COMPANIES ARE ANSWERABLE TO THE SHARE HOLDERS. ON THE BACKGROUND OF THIS CONTROVERSY AND UNCERTAINTY, CHARLES HENRY EARNESTLY PENS DOWN THE NEED OF CREATING A FUTURE WHICH WILL BE MORE CERTAIN THAN THE CURRENT EASILY SHAKABLE CULTURE AND VALUES. THIS BOOK GIVES AN INITIATIVE. IT EXPRESSES THE AUTHENTICITY OF THE WRITER AND HIS THOUGHTS, AT THE SAME TIME, IT PROVOKES OUR HOUGHTS.THE WONDERFUL PART OF IT IS THE OPTIMISM. WHEREVER THE READING OF THIS BOOK IS DONE I AM SURE IT WILL CREATE AN ATMOSPHERE OF DIFFERENCE OF OPINIONS AND ARGUMENTS. "ONCE AGAIN CHARLES HANDY: THE HUNGRY SPIRIT IS THE MORAL OF THE AUTHOR`S LIFE. THIS IS IN A WAY HIS PERSONAL APPROACH SO AS TO STAND FIRMLY ROOTED IN THE WORLD OF CAPITALISM. HIS STYLE IS DIFFERENT, HE DOES NOT LECTURE US ABOUT ANYTHING, ON THE CONTRARY WITH THE HELP OF SMALL STORIES HE ELABORATES HIS POINT MAKING IT VERY INTERESTING. HIS INTELLECTUAL THINKING IS REVEALED ON EACH OF THE PAGE OF THIS BOOK." PEOPLE`S MANAGEMENT: "THE HUNGRY SPIRIT: IS A RESEARCH WORK ON THE INDUSTRY, TRADE AND SOCIAL PROBLEMS. IT IS A HIGHLY EFFECTIVE AND INTELLIGENT PRESENTATION OF THE PROBLEMS." MODERN MANAGEMENT: "CHARLES HANDY IS THE ONE AND ONLY MANAGEMENT BOSS OF BRITAIN." DIRECTOR MAGAZINE: AT LAST, CHARLES HANDY IS AN AUTHOR; HE IS ALSO AN EFFECTIVE AND MOST POPULAR SPEAKER ON THE RADIO AND T.V. MORE THAN 10 LAC COPIES OF HIS BOOK HAVE BEEN SOLD.
एकीकडे जगातील एकतृतीयांश कामगार बेकार आहेत, तर त्याचवेळी दुसरीकडे जगाच्या एकूण व्यापाराच्या दोनतृतीयांश व्यापार फक्त ५०० कंपन्यांच्या हातांत आहे आणि या कंपन्या फक्त त्यांच्या गुंतवणूकदारांनाच उत्तरं देण्यास बांधील आहेत. या विषमता आणि अनिश्चिततेच्या पाश्र्वभूमीवर, बाजारपेठ अभिमुख भांडवलशाहीच्या मूल्यांपेक्षा अधिक चिरंतन आणि समृद्ध मूल्यं असणारं भविष्य निर्माण करण्याची गरज चाल्र्स हॅन्डी अतिशय कळकळीनं मांडतात. द हंग्री स्पिरीट हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे. या पुस्तकात लेखकाच्या व्यक्तिगत विचारांची तीव्रता तर जाणवतेच, पण काही वेळा ते आपल्याही विचारांना चालना देतं आणि मुख्यत: त्यात आशावाद ठासून भरलेला आहे. हे पुस्तक जिथे कुठे वाचलं जाईल, तिथे मतभेद आणि वादविवाद नक्कीच उफाळून येतील. ‘‘पुन्हा एकदा चाल्र्स हॅन्डी : द हंग्री स्पिरीट म्हणजे आयुष्यभराच्या अनुभवांचं सार आहे. भांडवलशाही समाजामध्ये कशी तग धरायची, याची ही एक व्यक्तिगत पद्धत आहे. हॅन्डी यांची शैली गोष्टीरूपानं विचार मांडण्याची असल्यामुळे पुस्तक खूपच वाचनीय झालं आहे आणि त्यांची विद्वत्ता प्रत्येक पानावर दिसून येते. हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे.’’ : पीपल मॅनेजमेंट. ‘‘द हंग्री स्पिरीट हा उद्योग-व्यापार संबंधित तसंच सामाजिक समस्यांचा एक विस्तृत शोध आहे. या समस्यांंचं हे एक चतुर, विद्वत्तापूर्ण आणि विवेकी विश्लेषण आहे.’’ : मॉडर्न मॅनेजमेंट. ‘‘चाल्र्स हॅन्डी हे ब्रिटनचे एकमेव जागतिक दर्जाचे व्यवस्थापन गुरू आहेत.’’ : डायरेक्टर मासिक. चाल्र्स हॅन्डी हे एक लेखक आणि नभोवाणी तसेच दूरचित्रवाणीवरचे नामांकित वक्ते आहेत. जगभर त्यांच्या पुस्तकांच्या दहा लाखांहून जास्त प्रती खपल्या आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SWARTHATUNPARARTHAKADE #THEHUNGRYSPIRIT #स्वार्थातूनपरमार्थाकडे #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PRASHANTTALNIKAR #CHARLESHANDY "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 25-01-2009

    भांडवलशाहीचे आशावादी तत्त्वज्ञान… चार्ल्स हॅन्डी हे ब्रिटनमधील जागतिक दर्जाचे व्यवस्थापन गुरू आहेत. व्यापार उद्योगातील असमतोल आणि त्यामुळे निर्माण होणारा सामाजिक बेबनाव भांडवलशाहीचे सद्य:स्वरूप आणि तिची अधिक प्रगत अशी भावी दिशा. छोट्या गावातील परस्प संबंध आणि शहरीकरणानंतर माणसामाणसांत येणारा दुरावा. गरीब-श्रीमंत यांच्यातील वाढता भेदभाव, पृथ्वीच्या पर्यावरणात मानवी चंगळवादाने निर्माण होणारा अनर्थ, ज्यांचा उपयोग आणि उपभोग आपण कधीच करून शकणार नाही इतके अतिरिक्त आणि अनावश्यक उत्पादन जगातील तीस टक्के कामगार बेकार असताना उपभोग्य वस्तूंच्या जलद उत्पादनासाठी विकसित करण्यात येणारी कार्यक्षमता, अनेक देशांच्या संपूर्ण वार्षिक अंदाजपत्रकापेक्षाही अधिक उलाढाल असणाऱ्या सतराव्या अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपन्या, काळ, तंत्रज्ञान आणि आर्थिक प्रगतीमुळे जनसामान्यांतील असंतोष आणि चिंता आपोआप दूर होऊ शकतील हा भ्रामक आशावाद आर्थिक आणि शास्त्रीय प्रगतीने सर्व प्रश्न सुटतील या गृहीतकातील भ्रामक भाबडेपणा आणि मतलबी दांभिकपणा, शासनव्यवस्थेने सगळ्या नागरिकांचे हित समोर ठेवून सभ्य आणि समताधिष्ठित कायदेकानून करावे की काही मूठभर बहुराष्ट्रीय उत्पादकांच्या नफावाढीसाठी आणि वाढत्या करसंकलनासाठी त्यांच्यावर सवलतींचा मारा करावा आणि सर्वसामान्य नागरिकाला स्वातंत्र्य आणि बांधिलकी यांच्यातला सुवर्णमध्य गाठणे अशक्य व्हावे. सर्वभक्षक अशा या शासनव्यवस्थेची आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची अधाशी भूक ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही भूक आटोक्यात राहिली तरच सर्वसामान्य व्यक्तीला सन्मानाचे जिणे जगणे शक्य होईल. त्यासाठी भांडवलशाहीने आता नवा टप्पा गाठायला हवा. चार्ल्स हॅन्डी यांनी त्याबाबत एक मूलगामी विचार मांडला आहे. भांडवलशाही आणि उदारमतवादी लोकशाहीमुळे शक्य झालेले स्वातंत्र्य आणि उपलब्ध झालेले वेगवेगळे पर्याय हे अधिकाधिक वस्तूंचा संचय करण्यात वाया घालवू नका, जास्तीत जास्त लोकांना स्वातंत्र्य मिळू द्या, त्यासाठी तुमच्याएवढेच पर्याय त्यांनाही मिळवून देण्यासाठी जागरूक राहा, त्याबाबत सुयोग्य स्वार्थीपणा दाखवा अशी हॅन्डी यांची भूमिका आहे. ‘हे एक आशावादी तत्त्वज्ञान आहे’ असे हॅन्डी यांचे प्रतिपादन आहे. शामरॉक आणि संघराज्याच्या स्वरूपाच्या संघटना, रोजगार मिळवून देणाऱ्या कामाचे स्वरूप या दोन कल्पनांवर त्यांचा भर आहे. दि हंग्री स्पिरिट या पुस्तकाचे तीन भाग पाडले आहेत. सद्य:कालीन भांडवलशाहीचे दोष पहिल्या भागात भांडवलशाहीच्या सद्य:कालीन स्वरूपाचे विश्लेषण करून तिच्यातील दोषांची आणि त्रुटींची चर्चा केली आहे. कार्यक्षमतेत वाढ होत आहे. परंतु प्रगत तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या घटत आहेत; त्यामुळे कार्यक्षमता हीच एक धोंड बनत आहे. भांडवलशाही म्हणजे एक मुक्त तत्त्वप्रणाली; पैसा हे या प्रणालीत एक साधन आहे, साध्य नव्हे, जीवनाची विविध साधनं मिळवून देण्याची यंत्रणा भांडवलशाहीत आहे. तो साम्यवादात नाही. साम्यवाद गरीबीचे उच्चाटन, रोजगाराची हमी आणि प्रत्येकाला अन्न-वस्त्र निवारा यांचा आग्रह धरतो; परंतु त्या त्या व्यक्तीला ते मिळवून देण्याचा मार्ग मात्र साम्यवादाकडे नाही. भांडवलशाही ही केवळ एक यंत्रणा आहे आणि तिचा कार्यकारणभाव ठरवण्याची जबाबदारी स्वत:पुरती प्रत्येक व्यक्तीवर आहे. भांडवलशाहीचा साचा होऊ शकत नाही. भांडवलशाही कितीही यशस्वी ठरली तरी भांडवलशाही कशासाठी या प्रश्नाचं उत्तर देण्याची ताकद तिच्यात नाही. भांडवलशाहीच्या सार्थकतेसाठी आपल्याला आपल्या स्वत:साठी आणि इतरांसाठी जीवनाकडून काय हवं आहे या संबंधीची अधिक नेमकी, चांगली समजूत सर्वंकष जाणीव आवश्यक आहे. या जाणिवेमध्ये पैशाला योग्य ते महत्त्व असेल परंतु त्याचे फाजील स्तोम माजवले जाणार नाही. शासनाच्या दृष्टीने भांडवलशाही सांभाळणे ही एक महाकर्मकठीण बाब आहे. बाजारपेठेचा भस्मासुर सर्व काही गिळंकृत करू शकेल. भांडवलशाहीवर त्यासाठी अंकुश हवा; त्यासाठी लोकांची सामूहिक इच्छाशक्ती जागवावी लागेल. दुसऱ्या भागात व्यक्तिगत सार्वभौमत्वात उद्घोष करण्यात आला आहे. आपले जीवन हे आपले स्वत:चे आहे. आपल्या जगण्याचा उद्देश त्यासाठी स्पष्ट जाणवायला हवा. हा उद्देश ठरवण्यासाठी काही तात्त्विक अधिष्ठान लागते. हा उद्देश केवळ आर्थिक व्यवस्थेने ठरवता येत नाही. ठरवू नये. विशिष्ट शासकीय पद्धत, विशिष्ट शासकीय धोरण, बाजारपेठेचे स्वरूप याद्वारे आपल्या जीवनाचे उद्दिष्टे ठरवणे इष्ट नाही. आपल्या वैयक्तिक अस्तित्वाचा आणि जीवनाचा हेतू काय आहे, काय असावा हे प्रथम आपण ठरवायला हवे. त्याचा निरोप विचारबुद्धी गहाण टाकून विशिष्ट धार्मिक दंडक वा नीतिनियम प्रमाण मानायला आता लोक तयार नाहीत. धार्मिकता अंतरात्म्याशी संपर्क साधण्याचे मार्ग दाखवते. त्या अर्थाने महत्त्वपूर्ण असते चार्ल्स हॅन्डी या संदर्भात सुयोग्य स्वार्थीपणाची संकल्पना मांडतात. तिच्यासाठी स्वहिताचा अर्थ नव्याने लावताना आर्थिक बाबींवर फार जोर देण्याचे टाळावे असे म्हणतात. स्वहितावर आधारित प्रगती ही आर्थिक प्रगतीपेक्षा व्यापक हवी. आर्थिक सुरक्षिततेबरोबर सामाजिक सुरक्षिततेलाही महत्त्व असते. टिवूâन राहण्याची इच्छाही महत्त्वाची ठरते. बाह्य गोष्टींद्वारे तसेच आंतरिक गोष्टींद्वारे प्रेरणा मिळते. स्वार्थीपणामागची नैतिकता ही सुयोग्य पातळीवर राहिली तर तो सर्वांनी हितावह ठरते. इतरांबरोबर नैतिकता ही सुयोग पातळीवर राहिली तर ती सर्वांना हितावह ठरते. इतरांबरोबर राहून काम करणे हेही एक मूल्य आहे. माणसाच्या स्वास्थ्यासाठी त्याची गरज आहे. अधिक सभ्य आणि सुखी समाज तिसऱ्या भागात अधिक चांगल्या भांडवली व्यवस्थेकडे जाण्याचे, अधिक सभ्य व सुखकारक समाजाकडे जाण्याचे मार्ग सुचवण्यात आले आहेत. भांडवलशाहीला सभ्यता देण्यासाठी संस्था, शिक्षणव्यवस्था, शासकीय प्रणाली, वैयक्तिक जबाबदारीची उन्नत जाणीव या सर्व गोष्टींची गरज आहे. बर्टेलसमान (प्रसारमाध्यमातील एक महत्त्वपूर्ण कंपनी-उलाढाल ८२ लक्ष पौंड) च्या उदाहरणाद्वारे सध्याच्या व्यवस्थापनाचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रँडनेमबद्दलचा विश्वास निर्माण करणे हे एक मोठे दिव्य असते. सुयोग्य शिक्षणाद्वारे माहिती, विश्लेषण, आकडेवारी, क्रीडा, अंतज्र्ञान, भावना, व्यवहार, नातेसंबंध, संगीत वगैरे बाबतीतील बुद्धिमत्तेचा विकास साधायला हवा याकडे लक्ष वेधले आहे. आयुष्यही एक लांब पल्ल्याची मॅरेथॉन शर्यत आहे, याचेही भान हवे, असे हॅन्डी बजावतात. सुयोग्य शिक्षण या प्रकरणात शेवटी चार्ल्स हॅन्डी अनेक अभिनव कल्पना मांडतात. शाळा-कॉलेजातून ज्ञान देण्याची जी शिक्षणपद्धती आहे, ती मुलामुलींना बाह्य जगापासून दूर ठेवते. शिक्षण घेताना मुलांना बाहेरच्या जगाचेही अनुभव आवश्यक आहेत. तेव्हा चार्ल्स हॅन्डी युनिव्हर्सिटी र्आफ कम्युनिटी, व्यावसायिक विद्यापीठ, जीवनविषयक विश्वविद्यापीठ यासारख्या कल्पनांचा पुरस्कार करतात. देशाने, शासनाने आपल्या आयुष्याचे व्यवस्थापन करण्याऐवजी ते अधिक सुखकर करण्याकडे लक्ष द्यावे; आपण प्रजानन नाही, नागरिक आहो हे शासनाने लक्षात ठेवावे. पुरेसं मिळवल्याची तृप्तीची, समाधानाची भावना नागरिकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी शासनाने आवश्यक ती संसाधने पुरवावी. हे लोकांचा सेवक असलेल्या शासनाचे कर्तव्य आहे. जीवनाचे पायाभूत घटक शासनाने पुरवायला हवेत. हे घटक केवळ उच्च वर्गीयांसाठी सीमित राहू नयेत, ते कमजोर वर्गालाही सहज साध्य हवेत. त्यामुळे त्यांनाही समर्थ होणे शक्य व्हावे असा दृष्टिकोन हवा. कार्यक्षमता आणि परिणामकारकता आंतरराष्ट्रीय उद्योगक्षेत्रात स्पर्धात्मक वातावरणात क्रमप्राप्त आहे. परंतु जेथे अधिक लोक लागतात त्या क्षेत्रात (उदाहरणार्थ सरकारी कामकाज) निकष जरासे सैल करून तांत्रिकदृष्ट्या आवश्यक त्यापेक्षा जास्त लोकांना कामावर ठेवावे असाही सल्ला हॅन्डी यांनी दक्षिण आफ्रिकन सरकारला दिला होता. बेकारभत्ता देण्यापेक्षा हा मार्ग श्रेयस्कर असे त्यांना वाटते. लोकांचा संपूर्ण माहिती देणे, त्यांचे मत जाणून निर्णय घेणे हा मार्ग श्रेयस्कर असे त्यांना वाटते. लोकांचा सेवक असलेल्या शासनाने लोकांवर वाटेल तशी सक्ती करू नये, लोकांच्या मर्जीने आणि संमतीने त्यांच्याचसाठी काम करावे. लोकांना संपूर्ण माहिती देणे, त्यांचे मत जाणून निर्णय घेणे हा मार्ग श्रेयस्कर. याबाबतीत भलेबुरे अनुभव ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र आलेले आहेत. जबाबदार सुजाण नागरिकत्व आणि व्यापक जनहित यावर भर दिला तर त्यातून मार्ग निघेल. जबाबदारी हक्कातून जन्मते. खऱ्या सुयोग्य स्वार्थासाठी आपली जबाबदारीची जाणीवच प्रखर करायला हवी असा याचा अर्थ आहे. ‘दि हंग्री स्पिरिट’मुळे जागतिक समस्यांवरचा, राजकीय व्यवस्थेबाबतचा तोडगा एका नव्या भूमिकेतून समोर येतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more