* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SUVARNAMUDRA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662788
  • Edition : 4
  • Publishing Year : 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SOMETHING LIKE THIS.... IF I FOUND SOMETHING SIGNIFICANT, FASCINATING, BEAUTIFUL IN THE BOOKS FROM CHILDHOOD, I USED TO WRITE IT DOWN. CHILDHOOD PASSED, BUT THAT HOBBY DID NOT GO AWAY. ON THE OTHER HAND, WHEN I GOT CLOSE TO ENGLISH AND SANSKRIT ALONG WITH MARATHI IN MY CHILDHOOD, I FELT AS IF I HAD ACQUIRED A RICH COLLECTION OF SUCH SAYINGS. I ALSO TRANSLATED ENGLISH AND SANSKRIT POEMS AND INCLUDED THEM IN MY COLLECTION.
असे काही.... लहानपणापासून पुस्तकांत कुठे काही लक्षणीय, चित्तवेधक, सुंदर आढळले, तर ते मी जवळ लिहून ठेवत असे. बालवय गेले, पण तो छंद सुटला नाही. उलट मोठेपणी मराठीच्या जोडीने इंग्रजी, संस्कृत या भाषांशीही निकट परिचय झाला, तेव्हा तर अशा उक्तींचे समृद्ध भांडारच हाती गवसल्यासारखे वाटले. इंग्रजी, संस्कृत कवितांचे अनुवाद करून त्यांचाही मी माझ्या संग्रहात समावेश केला — उदाहरणार्थ : राष्ट्राची श्रेष्ठता तुमच्या राष्ट्रात किती मोटारी आहेत, किती टोलेजंग इमारती आहेत, यावर तुमचे राष्ट्र मोठे ठरत नाही. तुमच्या राष्ट्रात चारित्र्यसंपन्न, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अशा नागरिकांची संख्या किती आहे ते मला सांगा, म्हणजे मी तुमचे राष्ट्र किती श्रेष्ठ आहे ते सांगू शकेन! — मार्टिन ल्यूथर किंग निवडक उतारे, वचने, सुभाषिते, कवितापंक्ती, मार्मिक विनोद–जे जे जसे मला आवडत गेले, ते मी या संकलनात घेत राहिले. माझ्या दृष्टीने हे मुद्रित शब्दधन म्हणजे सुवर्णमुद्राच आहेत. ते समृद्ध भांडार माझ्याप्रमाणे वाचकांनाही रंजक, कुतूहलजनक, उद्बोधक वाटेल, अशी मी आशा करते...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#सुवर्णमुद्रा #शान्ता ज. शेळके #ललितगद्य #SUVARNAMUDRA #SHANTA J. SHELAKE #LALITGADYA
Customer Reviews
  • Rating StarVijay Bhadane

    ठसठशीत सुवर्णमुद्रा !!! शब्दव्रती शांताबाई शेळके या महान साहित्यिका होत्या . कथा,कविता गाणी , ललित लेख अनुवाद,निबंध,अशा कसदार साहित्य निर्मितीने मराठी भाषेला त्यांनी वैभवशाली केले मराठी साहित्य प्रांत समृद्ध केला त्यांच्या सहजसुंदर,प्रासादिक व ओघवत्या भाषाशैलीतील "सुवर्णमुद्रा " हे अद्वितीय पुस्तक माझ्या वाचनात आले व त्याने मी अक्षरशा भारावून गेलो त्याचा थोडा परीचय . लेखिकेने जेवढे लिहिले तेवढेच किंबहुना अधिक ब हुवीध दर्जेदार असे वाचन केले होते .संस्कृत,इंग्रजी भाषेतील अभिजात साहि त्य या विदुषीने वाचले हो ते. वाचन करताना त्याती ल निवडक उतारे,लक्षवेध क वचने,सुभाषित,काव्य पंक्ती,मार्मिक विनोद यांची टिपण नोंदवहीत करण्या ची त्यांना सवय होती पुढे या आगळ्या छंदाची व्याप्ती वाढली,कक्षा रुंदा वली त्यातुनच लेखिकेचे मधुसंचय व सुवर्णमुद्रा ही आगळीवेगळी पुस्तके निर्माण झाली.नोंदवहीत अभिजात साहित्यातील टिपनांचे संकलन म्हणजे एकापरीने मुद्रीत शब्दधनच म्हणजेच "अक्षरांच्या सुवर्ण मुद्राचं" होय. ,,म्हणून सुवर्णमुद्रा असे समर्पक नाव लेखिकेने या पुस्तकाला दिले आहे. या अभिनव पुस्तकात अनेक ज्ञात,अज्ञात प्रतिभा वंत जुने जाणते ,नवोदित साहित्यिक ,तत्वज्ञ ,विचा रवंत,कवी,नाटककार अशा गुणवंताच्या साहित्याची झलक दृष्टीस पडते.प्रसिद्ध संतकवी,नाटककार, लोक वाङमयातील पारंपारिक ओव्या, गीत,विनोद यांचा उल्लेख आढळतो दुबळी माणसे संधीची वाट बघत बसतात मात्र कर्तृत्ववान माणसे स्वताच संधी निर्माण करतात ! उत्कट दुःखाप्रमाणे उत्कट आनंदही निशब्द असतो प्रश्न विचारून अज्ञान दूर करु बघणारा क्षणिक अडाणी परंतु मुळीच प्रश्न न विचारणारा जन्मभर अडाणी राहतो ! असे सुविचार म्हणी यांची रेलचेल पुस्तकात आढळते लेखिकेचा पिंड प्रतिभावंत कवयित्रीचा असल्याने काही प्रतिभावंत कवींच्या काव्यपाक्तींचा उल्लेख पुस्तकात आढळतो उदा माझं दुःख माझं दुःख तळघरात कोंडले माझं सुख माझं सुख हंड्या झुंबर टांगले । बहिणाबाई चौधरी कसा उच्छादी हा वारा केळ झोडपून गेला किती झाकशील मांडी नाही मर्यादा ग ह्याला पु .शि रेगे या काव्यपंक्ती प्रातिनि धिक ठराव्यात शांताबाईंनी आपल्या तरल बुद्धीने लोकहितवादी च्या डौलदार मराठी भाषा शैलीचा नोंद करून ठेवले ला खालील उतारा बघा " शेवटच्या बाजीराव पेश व्याच्या कारकिर्दीत सौदे गिरी फार माजली होती. उनाड लोक शेंडी संजाब दार ,पागोटे कंगनीदार, जोडा अनिदार , अंगरखा कळीदार,मिशा पिळदार, धोत्रे चुणीदार,भुवया कमा नदार,गंध साखळीदार, छाती गोलदार अशी ढोंगे करू लागले .पूर्वीचा साधे पणा गेला " ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    विविध विषयांवरील चिंतनगर्भ अवलोकने... शांताबाई शेळके यांच्या व्यक्तितमत्त्वाला अनेक पैलू आहेत. मधुकर वृत्तीने कणाकणाने ज्ञानसंचय करण्यातील त्यांचा उत्साह साठीनंतरच्या काळातही अविरत अप्रतिहत चालूच आहे. शाळकरी वयात त्या आपल्याला आवडलेले सुविचार, सुभाषते, विनोद, गमतीदार माहिती, काव्यपंक्ती वगैरे टिपणवहीत लिहून ठेवत. पुढे संस्कृत, इंग्लिश साहित्याशी परिचय घडला. त्यातीलही नवलाईचा खजिना त्या आपल्या टिपणवहीत आणू लागल्या. मधमाशी जशी फुलाफुलांवर उड्या मारून कणाकणाने मधुर मध गोळा करते, तद्वतच शांताबार्इंचे सुंदर वचनांचे संकलन चालू असते. त्या वचनांमधील अर्थगांभीर्याने त्या भावविभोर होतात. त्याचा स्वत:शीच पुन:पुन्हा आस्वाद घेतात. वेळोवेळी जमवलेल्या या सुविचारवजा पंक्ती म्हणजे त्यांना सुवर्णमुद्रा वाटतात आणि त्या सुवर्णमुद्रांची झळाळी आपल्या मित्रमंडळींना दाखवण्याची त्यांची उर्मी उफाळून येते. त्यातून मधुसंचय, सुवर्णमुद्रा यासारखी संकलने वाचकांसमोर अवतरतात. ‘सुवर्णमुद्रा’मध्ये चारपाचशे मुद्रांचा समावेश आहे. त्या सर्वच सर्वांना बावनकशी वाटतील असे नाही; परंतु वीसबावीस कॅरटची तरी शुद्धता त्यात नक्कीच जाणवेल. या सुवर्णमुद्रा मूळ कुठल्या भांडांरातून घेतल्या आहेत तेही शक्य तेथे नमूद केले आहे. रामायण-महाभारत, वेदउपनिषदे ही भांडारे त्यांनी तूर्त बाजूला ठेवलेली असली तरी जपानी, चिनी, फ्रेंच म्हणी, सेनेकासारखे ग्रीक-रोमन योद्धे, ज्ञानेश्वर-तुकाराम-नामदेव-रामदास आदी संत, शंकराचार्य, कबीर, विवेकानंद, फादर स्टिफन्स वगैरे संतमहात्मे त्यांना प्रिय आहेत. पाश्चात्य लेखकांमधील व्हिक्टर ह्युगो, टॉमस रीड, कान्ट, ऑस्कर वाइल्ड, शेक्सपियर, जॉर्ज इलियट, सॉमरसेट मॉम, मार्क ट्वेन, मार्टिन ल्युथर किंग, जॉन्सन, स्पेन्सर, बरट्रँड रसेल, अँड्र्यू कार्नेजी, ओ हेन्री, अब्राहम लिंकन, ट्रमर्सन, थोरो, मायकेल अँजेलो, जेम्स बॅरी, लुइझा अलकॉट, बाल्झॅक, आर्किटेक्ट फ्रॅंक लॉइड राइट, रॉबर्ट फ्रॉस्ट, वगैंरेंनी शांताबार्इंना भुरळ घातलेली दिसते. बाकी मराठी कवीलेखक तर घरचेच. फुले, खांडेकर, फडके, शिरवाडकर, र.वा. दिघे, लोकहितवादी, आगरकर, माडखोलकर, शशीकान्त पुनर्वसू, माडगूळकर, नानासाहेब गोरे, बालकवी, नाथमाधव, ग.ल.ठोकळ, आचार्य कालेलकर, सावरकर, शरच्चंद्र, मुक्तिबोध, श्री. दा. पानवलकर, द.भि. कुलकर्णी. खानोलकर, पु.शि.रेगे. गो.ब. देवल, अच्युत बळवंत कोल्हटकर, श्री.म.माटे, दुर्गा भागवत, मारुती चितमपल्ली. इ, पासून डॉ. अभय बंग यांच्यापर्यंत लेखककवींची संस्मरणीय वाक्ये या सुवर्णमुद्रांमध्ये झगमगतात. प्रत्येक सुविचाराला शीर्षक दिले आहे. तसे विषयवार वर्गीकरण व संकलन केलेले नाही त्यामुळे कुठेही कुठलाही विचार कुठल्याही क्रमाने आलेला आहे. या मुक्त उधळणीचा एक फायदा असा की कुठलेही पान उघडावे व वाचू लागावे. मागचा पुढचा संदर्भ बघायची गरज नाही. प्रत्येक वचन हे स्वयंपूर्ण व स्वयंसिद्ध असल्याने त्याचा मुक्त मनाने आस्वाद घ्यावा. काही मासले बघा. पवित्र - विद्वान माणसाने लेखनासाठी वापरलेली शाई ही हुतात्म्याने सांडलेल्या रक्ताहूनही अधिक पवित्र असते- महंमद पैगंबर प्रतिभा व बुद्धिमत्ता - अव्वल दर्जाची प्रतिभा बऱ्याच वेळा उपाशी मरते. बऱ्यापैकी बुद्धिमत्ता जरीची वस्त्रे घालून डौलाने मिरवते- सॉमरसेट मॉम. संधी - दुबळी माणसे संधीची वाट बघत बसतात. सामर्थ्यसंपन्न माणसे स्वत:साठी संधी निर्माण करतात. शेजाऱ्याचे अंगण - शेजाऱ्याच्या अंगणात साठलेल्या कचऱ्यावर टीका करण्याआधी आपल्या घरासमारचे अंगण झाडून स्वच्छ करा. लढाई - दर दिवसाला जीवनमार्गी नवी पायरी चढतो मी, इतरांसंगे कमी परंतु अधिक स्वत:शी लढतो मी.- कबीर बदल - परिस्थिती बदलत नाही. आपण बदलतो. धिटाई - एखादे मांजर देखील राजाकडे धीट नजरेने बघू शकते. सत्य - सत्य ही अत्यंत महाग व दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणून बोलताना तिचा वापर जपून करा. - मार्क ट्वेन धर्म - माणसाने माणसावर प्रेम करणे हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे - महात्मा गांधी वाट - पावलामागे पाऊल टाकत राहिले की वाट आपोआप सरते. फरक - प्रश्न विचारून आपले अज्ञान दूर करू बघणारा माणूस हा पाच मिनिटांपुरताच अडाणी असतो. पण जो मुळी प्रश्नच विचारत नाही तो जन्मभर अडाणी राहतो - चिनी म्हण श्रीमंती - कर्तव्यदक्ष प्रेमळ पत्नी आणि निकोप प्रकृती यापेक्षा वेगळी श्रीमंती काय असते? सुख - आपले विचार, बोलणे व प्रत्यच कृती यांच्यात एकमेळ, सुसंवाद असणे हे खरे सुख आहे. घातक - भलत्या वेळी सांगितलेले सत्य असत्याइतकेच घातक असते. उशीर - खरे सौख्य म्हणजे काय ते त्याला लग्न होईपर्यंत कळले नव्हते आणि तोवर फार उशीर झाला होता. स्वर्ग - सुखी कुटुंब म्हणजे आपल्याला इहलोकी लाभलेला स्वर्ग आहे. जुगार - लग्न हा एक जुगार आहे या. जुगारात पुरुष आपले स्वातंत्र्य पणाला लावतात तर स्त्रिया आपले सौख्य - फ्रेंच म्हण वादळे - जितकी जास्त वादळे अंगावरून जातात तितकी ओकवृक्षाची पाळेमुळे जमिनीत अधिक खोलवर शिरतात. कलावंताची प्रार्थना - परमेश्वरा, मला एकच वरदान दे. मला जे साधले आहे त्यापेक्षा सतत काहीतरी अधिक साध्य करण्याची इच्छा माझ्या मनात सतत राहू दे.- मायकेल अँजेलो. जुनी पत्रे - जुनी पत्रे वाचताना खूप गंमत वाटते. आनंदही होतो. या आनंदाचे एक कारण असे की त्या पत्रांना उत्तरे लिहिण्याची जबाबदारी आपल्यावर नसते. इशारा - तुम्ही जेव्हा आनंदात असता तेव्हा कुणालाही कसलेही वचन देऊ नका आणि तुम्ही जेव्हा संतप्त असता तेव्हा कुणाच्याही पत्राला उत्तर देऊ नका - चिनी म्हण ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 18-08-2002

    ज्ञानविचारांची सुवर्णमुद्रा उमटविणारे पुस्तक... पुस्तके हा मानवी जीवनाचा अमोल ठेवा आहे तो यासाठी की ज्ञानाचा तो प्रमुख स्रोत आहे. आयुष्य जगण्यासाठी ज्या तात्त्विक व्यवहाराची गरज भासते ती अशा ज्ञानातून पूर्ण होत असते. आपल्या आजूबाजूला बऱ्याच चांगल्यागोष्टी असतात आणि त्या अर्थातच अनुकरणीय असतात. चांगल्या गोष्टीतील सौंदर्य हे चिरकाल टिकणारे असते आणि म्हणूनच मांगल्याचा ठेवा टिकून राहिलेला असतो. आपण ऐकलेल्या बऱ्याचशा चांगल्या गोष्टी इतरांनाही सांगाव्यात अशी उर्मी उठली की एका पिढीचे कल्याण होते असे म्हणणे अतिशयोक्ती वाटू नये. चांगले ऐकावे आणि ऐकवावे असे ज्येष्ठ कवयित्री कै. शांता शेळके यांना वाटले आणि ‘सुवर्णमुद्रा’ हे पुस्तक प्रकाशित झाले. मेहता प्रकाशनाने ही जबाबदारी लगेच स्वीकारली. परंपरेनुसार चालत आलेल्या पुस्तकी आणि मौखिक ज्ञानाचे काही कण आपल्यासाठी शेळकेंनी वेचले आहेत. जीवन जगण्यासाठी भाकरीखेरीज विचार लागत असतात आणि हे विचार धन मार्गदर्शक ठरणारे आहे. प्रख्यात विचारवंत, लेखक, कवी, चित्रकार, समाजसेवक इ. मानाच्या पातळीला चढलेल्या कलावंताचे आनुभविक शब्द नेमकेपणाने आपल्यासमोर येतात त्याचे प्रमुख कारण शांता शेळकेंची राजहंसवृत्ती. नेहमीच्या पद्धतीने परीक्षण करण्यासारखे हे पुस्तक नव्हे तर प्रत्येक वाचकाने आपल्याजवळ बाळगावे अथवा भेट देण्यासाठी सहज उचलावे असे पुस्तक आहे हे! या पुस्तकात विविध विषयांवरील मतांचा खजिना आहे. ज्याला तो आवडेल तो घ्यावा. काव्यपंक्ती, अभिप्राय, विशिष्ट वर्णन, विनोद, चुटके इ. सर्व काही येथे आहे. आधी याच धर्तीवरचे ‘मधुसंचय’ हे पुस्तक येऊन गेले आहेच. अर्थात वेचक आणि मोजकेच यात आहे आणि अजूनही अशा पुस्तकांची मालिका येऊ शकतेही. दुर्दैवाने आज त्या आपल्यात नाहीत. या पुस्तकाची ओळख करून देणे म्हणजे उदाहरणे देणे कारण त्या विचारांचा मागोवा वाचकांनी घ्यायचा आहे, नव्हे तो आपल्या आयुष्याला लावून पाहायचा आहे. ‘मी माझे अंतिम ध्येय कसे गाठू शकलो याचे रहस्य मी तुम्हाला सांगतो. त्याचा माझ्या बुद्धिमत्तेशी फारसा संबंध नाही. माझी सारी ताकद माझ्या चिकाटीत आणि अमर्याद कष्ट करण्याच्या स्वभावात आहे’ – लूई पाश्चर. मानवी जीवनाला मार्गदर्शक ठरणारी ही वाक्ये आहेत. मार्क ट्वेन म्हणतो– ‘सत्य ही अत्यंत महाग आणि दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणून बोलताना तिचा वापर अगदी जपून, बेताबेताने करा.’ आचार्य अत्रेंविषयी प्र. श्री. कोल्हटकरांनी छानच लिहिले आहे. अत्रे यांचे आयुष्यच त्यातून प्रकट होते. मैत्रीविषयी बोलताना राल्फ वॉल्डो इमर्सन प्रांजळपणे म्हणतो– ‘जुन्या मित्रांचा एक असा फायदा आहे की त्यांच्या सहवासात आपण वाटेल तसे मूर्खासारखे बोलू किंवा वागू शकतो. ग्रंथाचे महत्त्व सांगणारा एक परिच्छेद विनायक कोंडदेव ओक यांनी लिहिताना म्हटलेय कुठे बरोबर न्यायचे असल्यास त्यांचे बोचके बांधावे त्याला ही ग्रंथांची ना नाही.’ शांताबाई शेळकेंना पारंपरिक काव्यगीतांचा सोस असल्याने त्याचेही प्रतिबिंब यात उमटले आहे. ही अर्थातच मौखिक परंपरा असते. ‘डावी तारी उजवी मारी । समोर करी घात पाठी उभा जगन्नाथ’ ‘नदीतीरावर बसून एकली । आसवे ढाळीत राही तिच्या आसावांनी नदीचा प्रवाह । अधिक सखोल होई’ अशी बरीच उदाहरणे देता येतील. संतांच्या अभंगांनीही येथे जागा मिळवली आहे. यात काहीच आश्चर्य नाही समर्थ रामदासांची सूर्यस्तुती ही प्रकाश द्विगुणीत करणारी आहे. ‘इतरांसंगे कमी परंतु अधिक स्वत:शी लढतो मी’ ही संत कबीरांची स्पष्टोक्ती मार्गदर्शक आहे. ऑस्कर वाईल्ड म्हणतो – ‘दु:ख हे निखळ स्वरूपात तुमच्यापुढे येते. ते सुखासारखे मुखवटा घालून येत नाही. दु:खाला एकप्रकारचा विलक्षण सच्चेपणा असतो. ते फार सधन असते. सुख हे सुंदर शरीरासाठी. पण दु:ख हे सुंदर आत्म्यासाठी. अनेक लेखकांची प्रसंग वर्णनेही दिली आहेत आणि ती सुंदरच आहेत. नाथमाधवांनी शिवाजी महाराजांच्या आरमाराविषयी म्हटले ते देखील येथे आहे. अभंग जसे येथे आहेत तसा शृंगाराचाही थोडा बाज येथे आहे. मनाला सहज म्हणून चाळा लावणारी ही विचारसंपदा आहे. वाचकांचे कुतूहल वाढविणारी आणि सोबत जगण्याचे कारण शोधून देणारी ही पुस्तिका आहे. जुन्या आठवणीही यामुळे चाळवल्या जातात. चंद्रमोहन कुलकर्णींनी मुखपृष्ठावर मेहनत घेतलेली जाणवते. आपण हे पुस्तक सतत वाचनात ठेवावे. जमले तर इतरांनाही विचार सांगावेत. तीच खरी समृद्धी असते. तोच खरा हेतू असतो. -अशोक नारायण जाधव ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 31-03-2002

    साहित्यसोनियाच्या मुद्रा... कवयित्री शांता ज. शेळके यांनी संग्रहित केलेल्या साहित्याचे संकलन सुवर्णमुद्रा या नावाने मेहता प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. संस्कृत सुभाषिते, विनोद, माहितीवर मजकूर, सुंदर निसर्गचित्रे, थोरांची वचने अनुवाद करून संग्रहित ेलेली आहेत. या संकलनाचे हे त्यांचे दुसरे पुस्तक आहे. यापूर्वी मधुसंचय नावाने एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. सोन्याच्या मोहरा असा या संकलनाच्या शीर्षकाला समर्पक अर्थ आहेच; शिवाय मनावर उमटलेला सुवर्णठसा असाही अर्थ त्याला आहे. अतिशय उपयुक्त असे हे संकलन आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more