* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SUKHACHA SHODH
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665949
  • Edition : 19
  • Publishing Year : JANUARY 1939
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IS HUMAN LIFE? IT IS A UNION OF THREE BEAUTIFUL FEELINGS. THE FIRST IS OUR OWN HAPPINESS AND PROGRESS. THE SECOND FELLING IS TOWARDS OUR FAMILY, THE OBLIGATIONS, THE INDEBTNESS. ONE HAS TO TRY TO REPAY IT TO THE BEST OF HIS/HER ABILITY. THE THIRD IS THE UNSEEN FLOW, TO HELP THE SOCIETY PROGRESS, THE SOCIETY OF WHICH WE ARE MEMBERS. ONES LIFE CAN BE SAID FULFILLED ONLY WHEN THE INDEBTEDNESS OF OURSELVES, THAT OF THE FAMILY AND OF THE SOCIETY IS SATISFIED AT THE SAME TIME. IF THERE IS NO CONFLICT BETWEEN THESE THREE THEN WE CAN SAY THAT THE PERSON IS SUCCESSFUL IN HIS LIFE. V. S. KHANDEKAR`S BOOK REVEALS THESE SECRETS OF HUMAN LIFE IN HIS NOVEL. THERE ARE MANY CHARACTERS IN THIS NOVEL OF THEM, ANAND BELIEVES ONLY IN SACRIFICE, THE TRADITIONAL BELIEF; APPA AND BHAYYA ARE THOSE INCOMPETENT PEOPLE WHO SHADE OFF THEIR RESPONSIBLITIES AND JUSTIFY THEMSELVES BY MAKING A SINGLE PERSON SHOULDER IT. MANIK IS HOPELESS, LITERATE GIRL BUT HAS ALWAYS FAILED IN RECOGNISING A GOOD MIND, USHA IS YET ANOTHER CHARACTER WHO HAS BEEN ALOOF, NEVER EXPRESSING FEELINGS, GOOD OR BAD. WHAT ARE THESE CHARACTERS EILLING US? THEY TELL US THAT FOLLOWING THE CUSTOMS AND TRADITIONS BLINDLESSLY IS HARMFUL NOT ONLY TO THE PERSON FOLLOWING THEM BUT ALSO TO THE SOCIETY AT LARGE. IT WAS IN 1939 THAT THE AUTHOR STATED HIS VIEWS AS FOLLOWS, "WHEN WE TALK ABOUT THE VALUES IN A MAN`S LIFE THEN SACRIFICE IS ALWAY HIGHLY REGARDED THAN ENDURING. BUT THE SACRIFICE SHOULD ALWAYS BE FOR A NOBLE CAUSE.` DO NOT YOU THINK THAT THIS VIEW IS TRUE EVEN TODAY?
‘मानवी जीवन हा एक प्रकारचा त्रिवेणी संगम आहे. स्वत:चे सुख आणि विकास ही या संगमातील पहिली नदी. कुटुंबाचे ऋण फेडणे हा त्यातला दुसरा प्रवाह आणि ज्या समाजाचा घटक म्हणून समाजाच्या प्रगतीला हातभार लावणे ही या संगमातील गुप्त सरस्वती.’ व्यक्तिगत ऋण, कुटुंबऋण आणि समाजऋण ही तीनही सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अविरोधाने नांदू शकली तरच हे जीवन यशस्वी झाले असे म्हणता येईल. मानवी जीवनाचे रहस्य सांगणारे हे क्रांतिकारी विचार वि. स. खांडेकरांनी ‘सुखाचा शोध’ या कादंबरीतून मांडले आहेत. ‘त्यागातच सुख असते’ ही परंपरागत जीवनमूल्ये प्रमाण मानणारा ‘आनंद’, एकावरच संसाराचे ओझे लादणारी ‘आप्पा आणि भय्या’ ही कर्तृत्वहीन माणसे, मनामनाची मिळवणी करण्यात असमर्थ ठरलेली सुशिक्षित ‘माणिक’ आणि भावनातिरेक व भावनाशून्यता या दोन्ही विकृतींपासून अलिप्त असलेली ‘उषा’. ही सर्व पात्रे हेच सांगतात की, `परंपरागत आदर्श आंधळेपणाने पाळणे हे व्यक्तीच्या तसेच समाजाच्या दृष्टीनेही अहितकारक ठरते.` `मानवी मूल्यांच्या दृष्टीने भोगापेक्षा त्याग श्रेष्ठ आहे; परंतु त्याग कधीही कुपात्री होता कामा नये.` १९३९ साली मांडलेले हे विचार आजच्या समाजालाही उपयुक्त ठरावे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #हिरवा चाफा #सुखाचा शोध
Customer Reviews
  • Rating Starअविनाश गडवे

    सुख कुणाला नको असते? अनेक अवतार, साधु, संत,महंत, साऱ्यांनीच आपले आयुष्य सुखाच्या शोधातच तर घालवले पण सुख मिळाले? की सुखाच्या शोधात असताना प्रत्येकाच्या वाट्याला येतात ती दुःखेच? असं म्हणतात, "सुख पाहता जीवा एवढे दुःख पर्वता एवढे" पण त्या जीवा एवढ्याश सुखासाठीच माणूस आयुष्यभर धाप लागेपर्यंत धावत असतो. पण...लागतो का सुखाचा शोध? आपल्या पैकी प्रत्येकाचीच सुखाची कल्पना अनेक हव्या हव्याशा वाटणाऱ्या अतृप्त गोष्टींनी भरलेली असते. कितीही पूर्ण झाल्या तरीही काही शिल्लक उरतातच आणि सुरुच राहतो सुखाचा शोध. आज मी ज्या पुस्तकाचा परिचय तुम्हाला करून देणार आहे, ते आहे मराठी साहित्याचा माणिक मणी, पज्ञभुषण, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि ज्यांना `ययाती` बद्दल साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला ते प्रसिद्ध मराठी साहित्यक वि. सं. खांडेकर यांचे, "सुखाचा शोध". (१९३९) साली आमच्या जुन्या पिढीतील सदस्यांनी हा सिनेमा देखिल बघितला असेल. बाबुराव पेंढारकर , मिनाक्षी, विमला सरदेसाई,दामुआण्ण मालवणकर, विष्णू पंत जोग,उषा मंत्री आणि शांता ठकार अशी प्रचंड भारी स्टारकास्ट, वि.स. खांडेकर आणि भा. रा. तांबे यांची गाणी, हाच सिनेमा हिंदीत `मेरा हक` म्हणून प्रदर्शित झाला होता. याचेच हे थोडक्यात कादंबरी सदृश कथानक. या कादंबरीत एक एक पात्र स्वतःला व्यक्त करत जाते आणि आपण अधिकाधिक त्या सुखाच्या कल्पनेत गुंतत जातो. पुस्तक संपले की नकळतच डोळ्यात आसवे जमा होतात ही जादु वि.स. खांडेकरांच्या लेखनीची. कादंबरी फिरत जाते ती आप्पा, आनंद, उषा, चंचला या पात्रांभोवतीच. स्वतंत्र्य लढ्याचा काळ, ज्याला घरचा कर्ता पुरुष म्हणावे असा अप्पा समाजसेवेचे कंकण बांधून सवंग लोकप्रियतेच्या मागे लागलेला. लोकांनी आपल्याला एक मोठा नेता मानावे म्हणून अहोरात्र झटणारा आणि प्रसंगी गरोदर पत्नी, तिची प्रकृती ठीक नसतानाही आणि आपणच घरचे कर्ते पुरुष आहोत याचा विचार न करता नोकरी करायचे सोडून व्याख्याने, सभा यांत रममाण होणारा. आधीच कसेबसे लग्न लावून दिलेल्या पण मुलाला जन्म देऊन इहलोक त्यागलेल्या आपल्या मुलीच्या मुलाला, आपल्या नातवाला सावत्र आईचा जाच नको म्हणून त्याला आपल्या घरी घेऊन येणारी, त्याचे पालन पोषण करणारी आनंदची आई, आणि याच लाडाने पुढे वाढत गेलेला, बिघडत गेलेला, स्त्रीसुखाची आस बाळगत वावणारा भैय्या! अप्पाने समाजसवेचेच्या नादात दुर्लक्षित केल्याने बाळ आणि मिरा या दोन जीवांना सोडून गेलेल्या आईविना पोरके झालेल्या मुलांचे संगोपन, आईच्या व्याकुळ डोळ्यातील आजर्व, यात खूप शिकून मोठे व्हायचे, वकील व्हायचे स्वप्न बघणाऱ्या आनंदला मात्र आईचे दुःख, घराच्या जबाबदाऱ्या आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्या सुखाला तिलांजली देणे भाग पडते. तो शिक्षण अर्धवट सोडून विमा एजंट होतो. अशाच एका प्रवासात कोवळ्या वयात विधवा झालेल्या, दीर आणि सभोवतालच्या विखारी पुरुषी नजरांनी घायाळ झालेली उषा बोटीतून उडी मारुन जीव देण्याच्या प्रयत्नात असताना आनंद तीला वाचवतो, आधार देतो, घरी घेऊन येतो. तीला आनंदच्या नजरेत कधीच वासनेचा गंधही दिसत नाही, तिच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा तो कधीच प्रयत्न करत नाही. दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रेम दाटून आलेले पण ते एका देव आणि भक्ताच्या नात्यासारखे पवित्र होते. आनंदला उषाचा भक्तिरुपी विश्वास तोडायचा नसतो तर उषाला त्याच्या नजरेत स्वतःचे प्रेम कमी होऊ दयायचे नसते. त्याचा अनादर करायचा नसतो. पुढे अप्पाने आणलेल्या स्थळाशी, माणिक सोबत आनंदचे लग्न होते. पण अप्पा सारखाच समाजसेवेचा वसा सांगत माणिक स्वतःला व्याख्याने, सभा, छोटे मोठे कार्यक्रम यात रममाण करून घेते. आनंद तीच्या सहवासासाठी, तिच्या प्रेमासाठी झुरतच राहतो पण ती मात्र त्यात नाममात्र सुद्धा आकर्षण दाखवत नाही. उषाचा, मुलांचा देखिल ती दुस्वास करायला लागते. आनंदच्या आईच्या निधनानंतर तर ती पुरती बेभान, बेताल होऊन वागायला लागते. शेवटी नाईलाजाने आनंद, उषा आणि मुलांची व्यवस्था बोर्डिंगमध्ये करतो. इकडे विमा पॉलिसी निमित्ताने आनंदची ओळख चंचला नामक नटीशी होते. तीच्या सहवासासाठी, सोबतीसाठी, स्पर्शासाठी आजवर अनेक हपापलेले लोक तिने बघितलेले असतात. तिला आनंद वेगळा वाटतो. ती आनंदकडे आकर्षित होते पण आनंद तीला वश होत नाही, तिच्या सौदर्यावर भाळत नाही. हे बघून तीचा अहंकार दुखावतो. ती कसेही करून त्याला शरण आणायचा चंग धरते. त्यासाठी ती माणिक आणि आनंदमध्ये भांडण लाऊन त्याला आपल्या बंगल्यात घेऊन येते. त्याला दारुबाज बणवते. पण वेळोवेळी जागा होणारा सद्सदविवेक आनंदला तिचा गुलाम होऊ देत नाही. पुरुषी मत्सर जागा करायला ती परदेशी वास्तव्य केलेल्या, आप्पा आणि माणिकला समाजकार्यात सोबत असल्याची बतावणी करणाऱ्या धनंजयला घरात घेऊन येते आनंद समोर मुद्दाम धनंजय सोबत प्रेमाचे चाळे करते पण तरीही आनंद तीला शरण येत नाही बघून ती त्याला घराबाहेर काढते. आनंद पासून अपेक्षित सुख तीला मिळतच नाही. दारुच्या पुरता आहारी गेलेला, आयुष्यात कुणीही जवळचे उरलेले नाही, ज्यांच्या सुखासाठी आपल्या स्वप्नांचा त्याग केला ते कुणीच आपले झाले नाही या विदिर्ण अवस्थेत आनंद आत्महत्या करायचे ठरवतो पण नेमकी त्याचवेळी उषा त्याला पुन्हा भेटते, त्याला आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करते. एक खोली घेऊन त्यासोबत राहायला लागते. त्याच्यातले कर्तृत्व जागे करते. जगात किती वेगवेगळ्या प्रकारची दुःख आपल्या सभोवताली आहेत आणि लोक न मरता त्याचा कसा सामना करताहेत ते दाखविते. आनंदचे आयुष्य बदलत जाते. तो आत्मविश्वास मिळवत गोर गरीबांना मदत करणारा वकील होतो. आयुष्यात पुन्हा एकदा त्याच्या जीवनात रंग भरतील, सुखाचे दिवस येतील असे वाटत असतानाच, पुन्हा एकदा माणिक चे वादळ त्यांच्या घरात घोंगावत येते. कॉलेजमधील जुना मित्र, आता अप्पा सोबत आणि तिच्या सोबत समाजसेवक म्हणून वावरत असलेल्या धनंजयला एका बेसावध क्षणी माणिक सर्वस्व देऊन बसते. मात्र ती गरोदर राहताच धनंजय तीचा स्विकार करायला स्पष्ट नकार देतो. तिच्या लाख याचनांकडे दुर्लक्ष करतो. तो पर्यंत तो चंचलेच्या पुरता नादी लागलेला असतो. एक दिवस धनंजय अप्पांनी संमेलनासाठी ठेवलेले पैसे परस्पर काढून घेऊन आप्पा आणि चंचलेच्याही हातावर तुरी देऊन फरार होतो. माणिक पुरती कोलमडते. तीला तिचे आनंद, उषा सोबतचे वागणे आठवून प्रचंड पश्चात्ताप होतो. आनंदला एक दिर्घ पत्र लिहून आणि आनंद उषाला नेहमीसाठी एक व्हायचे सांगून त्यांच्या आयुष्यातून कायमची दूर निघून जाते. उदरात वाढत असलेल्या अंकुरासोबत सुखाच्या शोधात. ज्या समाजसेवेत नाव होईल, किर्ती होईल, आपण लोकनेते होऊ या सुखाच्या शोधात असलेल्या आप्पाला सूख भेटतच नाही. आणि घरात असलेले सूख त्याला दिसतच नाही. आपल्या स्वप्नांना, सुखाच्या शोधात कधी आईसाठी, घरासाठी, भाच्यांच्या भविष्यासाठी, माणिकसाठी, उषाच्या निष्कलंक प्रेमाचा उपमर्द होऊ नये म्हणून आपले बोलूनही न दाखवणाऱ्या आनंदचा सुखाचा शोध सुरूच राहतो की खरंच तो सुखाचा शोध शेवटी उषाजवळ येऊन थांबतो? सूखाच्या शोधात सुडाच्या आहारी जाऊन खाली हात राहीलेल्या माणिकवर सूख रुसलेलेच राहतं की उदरात वाढणाऱ्या बाळात ती ते शोधते? अनेक प्रकारच्या संघर्षानंतर, शेवटपर्यंत आपल्या पेक्षा आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्या सुखाच्या कल्पनेतच आपले सूख मानणाऱ्या उषाच्या मनात असलेला सुखाचा शोध शेवटी थांबतो का? सुंदर शरीर सारी सुखे मिळवून देऊ शकत नाही हे लक्षात आल्यानंतर चंचलेच्या सुखाची धाव कुठे येऊन थांबते? "त्यागातच सुख असते" अशी परंपरागत जीवनमूल्ये मानणाऱ्या. आनंद आणि उषाला सुख का हुलकावणी देत राहते? प्रत्येकाची अशी सुखाची व्याख्या आपल्या डोक्यात थैमान घालत राहते. भैय्या, अप्पा सारखी कर्तृत्वहीन माणसे एकावरच घराचे सारे ओझे टाकून मजा मारतात हे चित्र आम्ही सभोवताली बघतोच ना? थोडक्यात त्याग हा कुपात्री होता कामा नये. परंपरागत आदर्श आंधळेपणाने पाळणे कधी कधी आपल्या आणि समाजाच्या दृष्टीने देखिल योग्य नसते.१९३९ साली मांडलेले हे विचार आजही आमच्या समाजात तंतोतंत लागू पडतात. पुस्तक वाचत असताना आपणही आपल्या मनातील सुखाच्या शोधात विचार करायला लागतो. आपण आपल्याला सुखी भासवतो की सुखाच्या शोधात धावतच आहोत, आणि कदाचित धावतच राहू शेवटच्या श्वासापर्यंत हा विचार मनात येत राहतो, त्या सुखाच्या शोधात अस्वस्थ वाटत जाणे ही या पुस्तकाची ताकद कारण हा सिनेमा बघायचे भाग्य लाभले नाही. तरीही या पुस्तकात पानोपानी जी मनाला खिळवून ठेवतात अशी काही वाक्ये परिचय आटोपतांना तुमच्यासाठी... " स्त्रीवर खरं प्रेम मृत्युच करू शकतो." " अगदी सत्याग्रह करायचा बेत दिसतो तुमचा! ज्याचा आग्रह धरावा, अशी जगात `सत्य ` ही एकच गोष्ट आहे. " त्यागाने देव प्रसन्न होतात, भुते नाही." " संसार हा यज्ञ आहे पण ज्या यज्ञात ॠत्विजावरच बलिदानाचा पशू व्हायची वेळ येते." " आंधळ्या त्यागाने जगाची प्रगती साधू पाहणे हे आंधळ्या मार्गदर्शकाच्या साहाय्याने हिमालय चढू पाहण्याइतकेच वेडेपणाचे आहे." ...Read more

  • Rating StarPurva Badave

    #सुखाचा_शोध #वि_स_खांडेकर `अमृतवेल` वाचल्यावर खांडेकरांच्या पुस्तकांबद्दल उत्सुकता लागून राहिली होती.ह्या पुस्तकात कथानक पात्रांच्या स्वगतशैलीतून वाट घेत राहते.पहिल्या दोन पात्रांपर्यंत गती पकडत नाही पण नंतर ही कादंबरी एकदम गती पकडून ठेवते. १९३९साली मांडलेले खांडेकरांचे विचार हे आजच्या काळात ही समाजाला उपयुक्त ठरतात.यातील पात्रांच्या वर्तणुकीतून ते हेच सांगतात की, `परंपरागत आदर्श जर का आंधळेपणाने पाळत गेले तर ते व्यक्तीसकट समाजाच्या दृष्टीने किती अहितकारक ठरू शकते.`! -पूर्वा बडवे ...Read more

  • Rating StarVikas Dokhe

    कुटुंबाच्या सुखासाठी सर्वस्वाचा त्याग करणार्या कुटुंबप्रमुखाची करूण कथा ` मानवी जीवन हा एक प्रकारचा त्रिवेणी संगम आहे. स्वत:चे सुख आणि विकास हि या संगमातील पहिली नदी. कुटूंबाचे ऋण फेडणे हा त्यातला दुसरा प्रवाह आणि ज्या समाजाचा घटक म्हणून समाजाच्या प्गतीला हातभार लावणे ही या संगमातील गुप्त सरस्वती.` व्यतिगत ऋण, कुटूंबऋण आणि समाजऋण ही तीनही सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अविरोधाने नांदू शकली तरच हे जीवन यशस्वी झाले असे म्हणता येईल. मानवी जीवनाचे रहस्य सांगणारे हे क्रांतिवीर विचार वि. स. खांडेकरांनी ` सुखाचा शोध ` या कादंबरी मांडले आहेत. ` त्यागातच सुख असते ` ही परंपरागत जीवन मुल्ये प्रमाण मानणारा ` आनंद `, एकावरच संसाराचे ओझे लादणारी ` अप्पा आणि भय्या ` ही क कर्तृत्वहीन माणसे, मनामनाची मिळवणी करण्यात असमर्थ ठरलेली सुरशिक्षित ` माणिक आणि भावनातिरेक व भावनाशून्यता या दोन्ही विकृतींपासून अलिप्त असलेली ` उषा `. ही सर्व पात्रे हेच सांगतात की, परंपरागत आदर्श आंधळेपणाने पाळणे हे व्यक्तीच्या तसेच समाजाच्या दुष्ट्रीनेही अहितकारक ठरते.` ` मानवी मूल्यांच्या दुष्ट्रीने भोगापेक्षा त्याग त्रेष्ठ आहे. परतूं त्याग कधीही कुपात्री होता कामा नये.` १९३९ साली मांडलेले हे विचार आजच्या समाजालाही उपयुत्क ठरावे. ...Read more

  • Rating StarSiddhant Jain

    आज सुखाचा शोध ही कादंबरी वाचून झाली. सुख शोधणाऱ्या मानवी मनाची चाललेली धडपड खांडेकरांनी अचूक मांडली आहे. या कादंबरीतील आनंद यातील मुख्य पात्र. मध्यम वर्गातील करता पुरुष हा नकळतच एका गुलामगिरीत खितपत पडलेला असतो. कुटुंबियांसाठी चाललेल्या या यज्ञात तोआपल्या सर्वस्वी सुखाची आहुती देतो. त्याग हेच धर्म असे समजून तो आपले आयुष्य कंठीत असतो. पण या यज्ञात त्याला स्वतःचा आनंद तर विसराच कुटुंबाचे सुद्धा कल्याण होत नाही. त्याने केलेला त्याग हा अंती विफल ठरतो. मग असा हा व्यक्ती जगरहाटी प्रमाणे आपले आयुष्य जगतो. सभोवताली असलेल्या वाईट गोष्टीमध्ये तो आपले सुख शोधु लागतो. पण त्यातही तो अपयशी ठरतो. अशा वेळी त्याला हवी असते साथ प्रीतीची अथवा असा व्यक्ती जो त्याला ही जखम भरण्यास मदत करेल हे काम यात उषा ने केले आहे असे मला वाटते. उषाने आपल्या आनंदवर असणाऱ्या भक्तीने त्याला त्याच्या पूर्वावस्येत परत आणले. जगण्याचे त्याने सांगितलेलं तत्वज्ञान " जीवाला जीव द्या। मातीला नाही!" हे त्यालाच समजवून दिले. माणुसकी आणि सुख यांचा परस्पर काही एक संबंध नाही. या जगात सुखी व्हायचे असेल तर वाघाप्रमाणे दुसऱ्यांचे रक्त प्यावे लागते. नीती, त्याग, कर्तव्य, माणुसकी, प्रामाणिकपणा, शील हे ज्याला विसरता येतात तोच खरा सुखी अशी समजूत असलेली चंचला आपल्या सौदर्याच्या बळावर आपण जग जिंकू शकतो हा असलेला अहंपणा आणि मनात असलेला मोह यामुळे तिची झालेली फसगत हे रोचक शब्दात वर्णन केले आहे. सुख काव्याची थट्टा करण्यात नाही तर आपल्या जीवनाणे दुसऱ्याच्या जीवनात काव्य निर्माण करण्यात आहे...। अजून सांगायचे झाले तर सुख हे दोन माणसांच्या जगात असते. पण हे केव्हा शक्य होते जेव्हा ही दोन माणसांची हृदये एकरूप होतात तेव्हाच ते प्रकट होते.....। शेवटी एकच सांगावेसे वाटते मानवी मूल्याच्या दृष्टीने त्याग हा महत्वाचा घटक आहे पण केलेला त्याग हा व्यर्थ जाता कामा नये.....। ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more