* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: STREE AANI PURUSH
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665109
  • Edition : 7
  • Publishing Year : JANUARY 1944
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THERE ARE VARIOUS REASONS BEHIND EVERY SOCIAL PROBLEM. ONE SIDE LIFE IS BECOMING MECHANIZED & MONEY-CENTRIC & ON THE OTHER SIDE BATTLE FOR EQUALITY HAS BEEN RISING UP STRONGLY. IN SUCH CRUCIAL TIME PROBLEMS OF LIFE COULDN’T BE SOLVED WITH SWEET DRAMATIC PHILOSOPHY. ONE SHOULD NOT SUPPORT THE UNETHICAL WAYS OF EARNING . OUR STRUGGLE IS NOT AGAINST THE MACHINE, BUT WE HAVE TO FIGHT AGAINST INEQUALITY .
आजच्या सामाजिक समस्या विविध कारणांनी निर्माण झालेल्या आहेत. एकीकडे जीवन यांत्रिक आणि म्हणूनच सर्वस्वी अर्थप्रधान होऊ पाहत आहे. दुसरीकडे समतेचे निशाण सर्व सामाजिक क्षेत्रांत जोरजोराने फडफडू लागले आहे. अशा वेळी जे जीवनविषयक कूटप्रश्न उत्पन्न होतात, त्यांची उत्तरे गोड, गुळगुळीत शेवट असणार्या गोष्टीनी, स्वप्नरंजनावर आधारलेल्या तत्त्वज्ञानाने किंवा आत्मवंचना करून घेणार्या सांस्कृतिक विचारांनी देता येणार नाहीत.....विषमतेवर आधारलेल्या सध्याच्या समाजरचनेतल्या अगदी ढोबळ अशा नीतिनियमांना सुद्धा पांयाखाली तुडवून जो पैसा संपादन केला जातो, त्याच्याकडे माणुसकीची चाड असणार्या समाजाने तिरस्कारानेच पाहिले पाहिजे......आपला झगडा यंत्राशी नसून विषमतेला अंधपणे साहाय्य करणार्या यांत्रिक संस्कृतीशी आहे...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #हिरवा चाफा #स्त्री आणि पुरुष
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 13-03-1996

    ‘समर्थ स्त्री’चे सुंदर चित्रण… ‘स्त्री आणि पुरुष’ हा वि. स. खांडेकर यांचा १९४४ मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेला कथासंग्रह. या कथासंग्रहाची जानेवारी १९९६मध्ये प्रकाशित झालेली ही चौथी आवृत्ती. ‘स्त्री आणि पुरुष’ ही यातील शेवटची कथा. स्वत: लेखकाला आवडलेली ह अप्रतिम कथा. या कथेबद्दल ‘भूमिका’ या शेवटच्या प्रकरणात स्वत: वि. स. खांडेकरांनी इतके अर्थवाही, मार्मिक व मर्मग्राही लिहिले आहे, की १९९६ मध्ये मुद्दाम ‘स्त्रीवादी’ चळवळ ‘स्त्रीवादी’ भूमिका घेणाऱ्यांनी ही ‘भूमिका’ मुद्दाम आवर्जून व खुल्या दिलाने वाचावी अशी. तर ही कथा मुळात आहे तरी काय? माया ही सुसंस्कृत, तरल, सुशिक्षित आणि संवेदनक्षमाची तरुणी, वामन मल्हार जोशी तिचे कॉलेजमधले आदर्श प्राध्यापक. तिचे वडील स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतलेले सच्चो गांधीवादी शाळामास्तर. तीपण पदवीधर झाल्यावर माध्यमिक शाळेत शिक्षिका. तिचे सदानंदाशी लग्न होते. त्याला कारकुनाची नोकरी असते. पण तो त्याचवेळी शिकत शिकत व स्वबळावर मोठा होतो. तो व्यापाऱ्यांकडून सत्तेच्या, अधिकाराच्या जोरावर पैसे उकळू लागतो आणि बघता-बघता तीन-चार वर्षात बढती मिळून मोठा अधिकारी बनतो. मायाला नोकरी सोडायला लावतो. मायाच्या अंगावर सोन्याचे-मोत्याचे दागिने अन् घरात अनेक श्रीमंती वस्तू येऊ लागतात. हा पापाचा तर पैसा नाही ना, याने शंकित झालेली आणि आता दिवस गेलेली माया प्रकृती स्वास्थ्यासाठी खेड्यात जाते. तिला तिथे अज्ञानी, गरीब दु:खी लोकांचे जीवन जवळून बघता येते. एका शेतमजुराचा मुलगा स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश गोळीबारात बळी पडला. त्यावेळी आपण व सदानंद सुखी संसाराच्या मायेत पोहत होतो, या विचाराने व आपण वा. म. जोशी आणि आपले स्वातंत्र्यलढ्यातील सहभागी बापाची मुलगी असूनही पापाचरणाच्या चैनीच्या संसारात बळी कशी गेलो, याचे ती दु:ख करते. एका बाजूल्या नवऱ्याबद्दलची प्रीती आणि पोटातल्या बाळाचे वात्सल्य व दुसऱ्या बाजूला काळ्या बाजाराला विकला गेलेला भ्रष्टाचारी, पापी असा आपला पती, या संभ्रमात ती सापडते. पण खेड्यात दिसणारी अमानुष दुश्ये तिच्या सामाजिक पावित्र्याच्या आदर्शाला जागृत करतात आणि तिच्यामधली मानवता तिला सदानंदाला सोडायला भाग पाडते. असा हा संक्षेपाने असलेला कथा भाग. ‘भूमिके’त या कथेची भलावण करताना वि. स. खांडेकरांनी सुशिक्षित, जागृत स्त्री सामाजिक पापाचरणाला कसे तोंड देऊ शकेल व भ्रष्टाचार दुराचार कसा दूर होऊ शकेल, याचे मोठे मनोहारी चित्रण १९५२ मध्ये रंगविले आहे. आजची स्त्री सुशिक्षित असूनही ती आपल्या पतीचे दुराचार, अत्याचार, भ्रष्टाचार थांबवू शकलेली नाही, हे आपण दैनंदिन पाहतो आहोत. या कथासंग्रहात एकूण पाच कथा आहेत. बहुतेक कथांमधील स्त्री ही वेगवेगळ्या नात्यांनी बद्ध आहे. ती सुशिक्षित आहे, घराचा उंबरठा ओलांडून नोकरी करणारी आहे (८ जून); पण तरी तिला संसार, पतिप्रेम, स्वत:चे मूल असणे या बाबींचीही स्वतंत्रतेबरोबरच अनिवार ओढ आहे. त्यामुळे तिच्या मनात द्वंद्व व कुतरओढ सुरू असते. ती स्वतंत्र स्वावलंबी होऊनही सुखी नाही. हे सिंधू या माध्यमिक शिक्षिकेच्या ‘८ जून’ या कथेतल्या व्यक्तिरेखेतून उमजते. ‘आईचा शब्द’ ही तर कॅरेल कॅपेक यांच्या ‘दि मदर’ या नाटकाच्या आधारे लिहिलेली कथा. एका बाजूला आपल्या एकुलत्या एक वाचलेल्या मुलाबद्दलचं ममत्व आईला. त्याला युद्धावर पाठवू देत नाही. मुलगा देशाच्या हाकेला ओ देणारा. आपल्या मुलाला ती आपल्याच नजरेखाली ठेवू पाहते. शेवटी तिच्या मनाची होणारी आत्यंतिक घालमेल. मुलगा तर आईचा होकाराच्या शब्दासाठी आसुसलेला. हे कथेत केलेलं भावभावनांचं अन् देशप्रेमाचं प्रतीक असलेलं रूपांतर फारच संवेदनशील झालंय. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या वि. स. खांडेकरांच्या या १९२९ ते १९४८ या कालखंडातील लिहिलेल्या कथा. स्त्री-पुरुष संबंधातील वेगवेगळ्या भूमिका साकार करणाऱ्या. आजही त्या अतिशय वाचनीय. कारण शाश्वत भावविश्वावर त्या आधारित म्हणून या कथासंगहाची ही चौथी आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more