* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SPY PRINCESS
  • Availability : Available
  • Translators : BHARATI PANDE
  • ISBN : 9788190734493
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 256
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AN INDIAN PRINCESS, WHO IS IN THE LINEAGE OF TIPU SULTAN, PARTICIPATES IN THE SECOND WORLD WAR, SHE SPIES FOR THE BRITISH. THIS BRAVE AND FIERCE TIGRESS GETS CAUGHT BY THE GERMANS, AS A RESULT OF TREACHERY. HER FUTURE IS CLEAR; SHE SUFFERS IMMENSE PAINS AT THE HANDS OF GERMANS. TREACHERY, TORTURE AND TERRIBLE TORMENT.. ONE DAY, A BULLET REVEALS HER FROM ALL THIS TORTURE. SHE WAS THE ONE WHO KEPT THE FLAME OF BRAVERY ENLIGHTENED.
टिपू सुलतानाची वंशज असलेली एक भारतीय राजकन्या दुसऱ्या महायुद्धात सामील होते, ब्रिटिश गुप्तहेर बनून! नसानसांत अपार धैर्य भिनलेली ही शूर वाघीण, अखेर जर्मनांच्या हाती लागते. विश्वासघात, अनन्वित छळ आणि प्राणांतिक यातना... पिस्तुलाची गोळीच तिची यातून मुक्तता करते. शौर्याचं अनोखं स्फुल्लिंग जागतं ठेवणारी...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #SHRABANIBASU #BHARATIPANDE #SPYPRINCESS #BIOGRAPHYA&TRUESTORIES
Customer Reviews
  • Rating StarPUJA KUCHEKAR

    टिपू सुलतान ची वंशज असलेली एक भारतीय राजकन्या. दुसऱ्या महायुद्धात सामील होते एक "ब्रिटिश गुप्तहेर" बनून!!!!! नसानसांत अपार धैर्य भिनलेली हि शूर वाघिण, अखेर जर्मनांच्या हाती लागते. विश्वासघात ,अनन्वित छळ आणि प्राणांतिक यातना..... पिस्तुलाची गोळच तिची यातून मुक्तता करते. शौर्याचं अनोखं स्फुल्लिंग जागत ठेवणारी एक रोचक ,थरारक सत्यकथा . गुप्तहेर युवराज्ञी "नूर इनायत खान" हिची. ...Read more

  • Rating StarDAINIK DESHDOOT 04-04-2010

    नूरच्या शौर्याचा मागोवा... नूर इनायत खान एका पारंपरिक आणि आध्यात्मिक वळणाच्या मुस्लीम कुटुंबातील मुलगी गुप्तहेर बनते आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात सर्वांत धोकादायक अशा सुद्धक्षेत्रात गुप्तहेर म्हणून काम करते. या एकाच गोष्टीने मूळ लेखिका श्रवणी बसू यांचे लक्ष वेधले आणि तिने नूरचा तपशीलावर अभ्यास करण्याचे ठरवले. नूरचा मुळाचा पिंड हेरगिरीचा नव्हता, तर तीही सर्वसामान्य चारचौघींसारखीच स्वप्नाळू, सुंदर आणि सौम्य मुलगी होती. तिला मुलांसाठी कथा लिहिणे फार आवडे. नेमबाज, विशेष शारीरिक कौशल्य यापैकी कोणतीही गोष्ट सूरकडे नव्हती. तरीही तिने प्रचंड धैर्य, हिंमत दाखवली. नूरने युद्धकाळात जी गुप्तहेरगिरी केली त्या वेळचे तिचे सर्व सहकारी फ्रान्समध्ये मारले गेले. तिचे वरिष्ठी हयात नसल्याने नूरचे कुटुंबीय भाऊ, एसओई कंपनीच्या गुप्त फाइल्स एवढ्याच आधारावर नूरचे जीवन उलगडले. नूर ही मुळची भारतीय. तिचे वडील सूफी तत्त्वज्ञानी. त्यांनी नूरला ती एक भारतीय राजकन्या असून तिच्या नसानसात टिपू सुलतानचे रक्त खेळत असल्याची शिकवण दिली. त्यामुळेच ती ब्रिटिश गुप्तहेर बनली. नसानसात अपार धैय भिनलेली ही शूर वाघीण अखेर जर्मनीच्या हाती लागते. जर्मन अधिकारी अंधार कोठडीत तिचा अन्वनित छळ करतात. पण तरीही नूर त्या अधिकाऱ्यांना आपल्याबरोबरच्या गुप्तहेर सहकाऱ्यांची नावे सांगत नाही. एखादी स्त्री जरा हटके पेशा पत्करून एवढे धाडस दाखवते हे वाचतानाही अंगावर काटा येतो. नूरच्या बरोबर तीन महिला गुप्तहेरांना तुरुंग अधिकाऱ्यांनी मानेच्या मागच्या बाजूला गोळ्या घालून संपवले. पण नूर हिच्यावर अतिशय धोकादायक असा शिक्का असल्यामुळे तिला अधिक छळ करण्यासाठी निवडण्यात आले. जर्मन अधिकाऱ्यांनी मृत्यूच्या आदल्या दिवशी तिला रात्रभर लाथाबुक्यांनी रक्तबंबाळ केले आणि सकाळी तिच्या डोक्याशी अगदी जवळून गोळी घातली तेव्हा नूरने ‘लिबर्ते’ (स्वातंत्र्य) शब्दाचा उच्चार करून प्राण सोडला त्यावेळी नूरचे वय अवघे तीस वर्षे होते. केवढे धाडस होते तिच्या अंगी. शत्रूची गोळी खातानाही ‘मी मुक्त झाले आहे’ याचाच आनंद नूरला होता. पिस्तुलाच्या गोळीने तिची यमयातनांमधून मुक्तता केली. नूरच्या शौर्याने अनोखे स्फुल्लिंग जागते ठेवणाऱ्या या स्फूर्तिदायक सत्यकथेवर आधारित ही कादंबरी अंगावर थरार आणणारी आहे. ...Read more

  • Rating StarMAITRIN 01-03-2011

    टिपू सुलतानाची नात ब्रिटिश गुप्तहेर... नोरा इनायत खान या भारतीय गुप्तहेर तरुणीला जर्मनांनी छळ छावणीत डांबून निर्घृणपणे ठार मारले. टिपू सुलतानाच्या वंशातील या तरुणीची माहिती आपल्याला फारशी नाही किंवा खरे तर अजिबात नाही. दुसऱ्या महायुद्धातील एस ओ ई चीगोपनीय कागदपत्रे आता उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे नोरा इनायत खानच्या कार्याची आणि बेडरपणाची कहाणी आता सुसूत्रपणे सांगता येणे शक्य झाले आहे. श्रावणी बासू या लंडनमधील पत्रकार महिलेने मूल कागदपत्रे अभ्यासून नूरचे चरित्र लिहून ‘स्पाय प्रिन्सेस’ या नावाने प्रसिद्ध केले. त्याचा मराठी अनुवाद भारती पांडे यांनी केला असून तो मेहता पब्लिशिंग हाऊसने बाजारात आणला आहे. सुफी पंथाचा प्रभाव असलेल्या एका मुस्लीम कुटुंबातील नूर ही मुलगी स्वप्नाळू, सुंदर आणि समंजस होती. तिचे वडील इनायत खान. आई अमेरिकन. मुलांसाठी कथा लिहिण्याची तिला आवड होती. दिसायला नाजूक, मूळ भारतीय पण आता पॅरिसमध्ये स्थायिक. विलायत आणि हिदायत हे तिचे धाकटे भाऊ. ती ब्रिटिश, फ्रेंच आणि भारतीय होती. ब्रिटिशांची गुप्तहेर म्हणून ती पॅरिसमध्ये काम करू लागली. पॅरिस जर्मनांच्या ताब्यात गेल्यावर तिला पकडण्यात आले आणि जर्मनीतील छळछावणीत पाठविण्यात आले. तिचा भयंकर छळ करण्यात आला आणि शेवटी तिला गोळ्या घालून ठार करण्यात आले. जनरल चार्ल्स द गॉल यांनी तिच्या मृत्यूनंतर तिला क्वा द गेर हा सर्वोच्च मुलकी पुरस्कार देऊन सुवर्णताऱ्यासह तिचा गौरव केला. सन्मानपत्रात म्हटले आहे. ‘‘ए.एस.ओ. नोरा इनायत खान, डब्ल्यू एएएफ, हिला १६ जून १९४३ रोजी लायसँडर विमानाने फ्रान्समध्ये पाठविण्यात आले. बिनतारी यंत्रचालक म्हणून पॅरिसमधील बंडखोरांची एक संघटना आणि लंडन यांच्यातील संपर्क चालू ठेवण्याची कामगिरी तिच्यावर सोपवलेली होती. त्या बंडखोर संघटनेतील अनेक लोकांना पकडण्यात आले. तेव्हा तिला पळून जावे लागले. तरीही तिने आपले काम चालू ठेवले. १९४३ जुलैमध्ये ती ग्रिग्राँ येथे चकमकीत सापडली. जर्मन सैनिकांना जखमी करून तिने पळ काढला. परंतु तिला ऑक्टोबर १९४३ मध्ये पकडूनच जर्मनीला पाठविण्यात आले.’’ या प्रशस्तिपत्रासोबत सुवर्ण ताऱ्यासह तिला क्रवा द गेर हा सन्मान देण्यात आला. जनरल द चार्ल्स द गॉल यांची स्वाक्षरी या पत्रावर आहे. नोराला १९४९ मध्ये जॉर्ज क्रॉस देण्यात आला. खरे तर भारतीय स्वातंत्र्यासाठी लढण्याची तिची इच्छा होती. १९४२ मध्ये आर.ए.एफ. मध्ये नोकरीसाठी तिने अर्ज केला होता आणि इंग्लंडमध्ये मी युद्धकाळात ब्रिटिशांना सहाय्य करीत असले तरी युद्ध संपल्यावर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणार आहे असे ती स्पष्ट सांगत होती... डाखाऊ येथे तीस हजार व्यक्तींची रक्षा पुरण्यात आली आहे. तेथेच नूरचे स्मरण जागवणारी छोटी फुलबाग आहे. एका भारतीय पराक्रमी स्त्रीची नव्याने ओळख करून देणारे हे पुस्तक वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more